Wednesday, September 27, 2017

Shri Saraswati Chalisa श्रीसरस्वती चालीसा


Shri Saraswati Chalisa 
Shri Saraswati Chalisa is in Hindi. It is a beautiful creation of RamSagar. He was a great devotee of Goddess Saraswati. At the end He is asking Goddess to bless him and devotees with Intelligence, Knowledge and power and remove all difficulties from the life.
श्रीसरस्वती चालीसा
दोहा 
जनक जननि पदम दुरज, निज मस्तक पर धारि ।
बन्दौं मातु सरस्वती, बुद्धि बल दे दातारि ॥
पूर्ण जगत में व्याप्त तव, महिमाअमित अनन्तु ।
रामसागर के पाप को, मातु तुही अब हन्तु ॥
॥ चौपाई ॥   
जय श्रीसकल बुद्धि बल रासी । 
जय सर्वज्ञ अमर अविनाशी ॥
जय जय जय वीणा कर धारी ।
करती सदा सुहंस संवारी ॥
रुप चतुर्भुज धारी माता ।
सकल विश्व अन्दर विख्याता ॥
जग में पाप बुद्धि जब होती ।
तब ही धर्म की फीकी ज्याोति ॥
तबहि मातु का निज अवतारा ।
पाप हीन करती महि तारा ॥
बाल्मीकि जी थे हत्यारा ।
तव प्रसाद जानै संसारा ॥
रामचरित जो रचे बनाई ।
आदि कवि पदवी को पाई ॥
कालीदास जो भये विख्याता । 
तेरी कृपा दृष्टि से माता ॥
तुलसी सूर आदि विद्वाना । 
भये जोऔर ज्ञानी नाना ॥
तिन्ह न और रहेउ अवलम्बा ।
कृपा करउ जय जय जगदम्बा ॥
मधु कैटभ जो अति बलवाना ।
बाहु युद्ध विष्णु से ठाना ॥
समर हजार पॉंच में घोरा ।
फिर भी मुख उनसे नहीं मोर ॥
मातु सहाय कीन्ह तेहि काला । 
बुद्धि विपरीत भई खलहाला ॥
तेहि ते मृत्यु भई खल केरी ।
पुरवहु मातु मनोरथ मेरी ॥
चंड मुंड जो थे विख्याता ।
छण महु संहारेउ तेहि माता ॥
रक्तबीज से समरथ पापी । 
सुरमुनि हृदयधरा सब कॉंपी ॥
काटेउ सिर जिम कदली खम्बा ।
बार बार विनऊं जगदम्बा ॥
जग प्रसिद्ध जो शुम्भ निशुम्भा ।
छण में बांधे ताहि तूँ अम्बा ॥
भरत मातु बुद्धि फेरेऊ जाई । 
रामचन्द्र बनवास कराई ॥
एहिविधि रावन वध तू कीन्हा । 
सुरनर मुनि सबको सुखदीन्हा ॥
को समरथ तव यश गुनगाना ।
निगम अनादि अनंत बखाना ॥
विष्णु रुद्र अज सकहि न मारि ।
जिनकी हो तुम रक्षाकारी ॥
रक्त दन्तिका और शताक्षी ।
नाम अपार है दानव भक्षी ॥
दुर्गम काज धरा पर कीन्हा ।
दुर्गा नाम सकल जग लीन्हा ॥
दुर्ग आदि हरनी तू माता । 
कृपा करहु जब जब सुखदाता ॥                
नृप कोपित को मारन चाहै ।
कानन में घेरे मृग नाहै ॥
सागर मध्य बाधा या दुःख में । 
हो दरिद्र अथवा संकट में ॥
नाम जपे मंगल सब होई ।
संशय इसमें करइ न कोई ॥
पुत्र हीन जो आतुर भाई ।
सबै छांडि पूजें एहि माई ॥
करै पाठ नित यह चालीसा ।
होय पुत्र सुन्दर गुण ईशा ॥
धूपादिक नैवेद्य चढावै ।
संकट रहित अवश्य हो जावै ॥
भक्ति मातुकी करै हमेशा । 
निकट न आवै ताहि कलेशा ॥ 
बंदी पाठ करें सत बारा ।
बंदी पाश दूर हो सारा ॥
रामसागर बाधि हेतु भवानी ।
कीजै कृपा दास निज जानी ॥
दोहा 
मातु सूर्य कान्ति तव, अन्धकार मम रुप ।
डूबन से रक्षा करहु परुं न मैं भव कूप ॥
बल बुद्धि विद्या देहु मोहि, सुनहु सरस्वती मातु ।
राम सागर अधम को आश्रय तूही ददातु ॥
॥ इति सरस्वती चालीसा ॥ 
  Shri Saraswati Chalisa 
श्रीसरस्वती चालीसा


Custom Search

Tuesday, September 26, 2017

Samas Pahila Devadarshan समास पहिला देवदर्शन


Dashak Aathava Samas Pahila Devadarshan 
Samas Pahila Devdarshan, It is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about God. Who is God? Whether God is Sagun or Nirgun? The creation of this entire world is done by God. There is much more in this Samas about God.
समास पहिला देवदर्शन
श्रीराम ॥
श्रोतीं व्हावें सावध । विमळ ज्ञान बाळबोध ।
गुरुशिष्यांचा संवाद । अति सुगम परियेसा ॥ १ ॥
१) श्रोत्यांनी आतां नीट लक्ष द्यावें. हा गुरुशिष्यांचा संवाद आहे. यामध्यें शुद्ध आत्मज्ञान सोपे करुन सांगितलें आहे.   
नाना शास्त्रें धांडोळितां । आयुष्य पुरेना सर्वथा ।
अंतरी संशयाची वेथा । वाढेंचि लागे ॥ २ ॥
२) पुष्कळ शास्त्रें आहेत त्यांचा अभ्यास करतां आयुष्य कमी पडेल. तरी मन निःशंक न होता उलट संशय वाढतच जातो. 
नाना तीर्थें थोरथोरें । सृष्टीमध्यें अपारें ।
सुगमें दुर्गमें दुष्करें । पुण्यदायकें ॥ ३ ॥  
३) जगामध्यें बरीच मोठीमोठी तीर्थक्षेत्रें आहेत. त्याच्यापैकीं कांहींच्या यात्रा सोप्या, कांहींच्या यात्रा कठीण आहेत. तर कांहींच्या फार कठीण आहेत.  तीर्थयात्रा केल्यानें पुण्यसंचय होतो.   
ऐसीं तीर्थें सर्वहि करी । ऐसा कोण रे संसारी ।
फिरों जातां जन्मवरी । आयुष्य पुरेना ॥ ४ ॥ 
४) पण या सर्व तीर्थयत्रा करणारा असा जगांत कोण आहे? तीर्थयात्रा करीत माणूस जन्मभर फिरला तरी तीर्थें संपणार नाहीत. 
नाना तपें नाना दानें । नाना योग नाना साधनें ।
हें सर्वहि देवाकारणें । करिजेत आहे ॥ ५ ॥
५) देवदर्शन व्हावें म्हणून लोक अनेक तपें, अनेक दानें, अनेक योग आणि अनेक साधनें करीत आहेत.  
पावावया देवाधिदेवा । बहुविध श्रम करावा ।
तेणें देव ठाईं पाडावा । हें सर्वमत ॥ ६ ॥
६) देवांचा देव पावावा. म्हणून बहुविधप्रकारें नाना कष्ट घ्यावेत तसे केलें तरच देवदर्शन होते. असा सर्वांचा समज आहे.  
पावावया भगवंतातें । नाना पंथ नाना मतें ।
तया देवाचें स्वरुप तें । कैसें आहे ॥ ७ ॥
७) भगवंत कसा भेटेल हे सांगणारे नाना पंथ आहेत. अनेक मतें आहेत. पण भगवंताचे खरे स्वरुप आहे तरी कसें, हें समजले पाहिजे.   
बहुत देव सृष्टीवरी । त्यांची गणना कोण करी ।
येक देव कोणेपरी । ठांई पडेना ॥ ८ ॥  
८) जगांत गणना करितां येत नाही इतके देव आहेत. त्यामुळें खरा जो एक देव आहे तो कसा आहे हेम कांहीं समजत नाही.     
बहुविध उपासना । ज्याची जेथें पुरे कामना । 
तो तेथेंचि राहिला मना । सदृढ करुनि ॥ ९ ॥
९) उपासनेचें पुष्कळ प्रकार आहेत. ज्याची इच्छा ज्या उपासनेनें सफल होते , ती उपासना तो माणूस मनांत दृढ करतो. 
बहु देव बहु भक्त । इ्छ्या जाले आसक्त ।
बहु ऋषी बहु मत । वेगळालें ॥ १० ॥
१०) देव पुष्कळ आहेत तसेंच भक्तही पुष्कळ आहेत. ते भक्त इच्छा पूर्ण व्हावी म्हणून देवाला आसक्त होऊन भजतात. तसेच ऋषींही पुष्कळ होऊन गेले व त्यांची मतेम पण वेगवेगळीं आहेत.   
बहु निवडितां निवडेना । येक निश्र्चय घडेना ।
शास्त्रें भांडती पडेना । निश्र्चय ठांई ॥ ११ ॥
११) त्यामध्यें आपल्याला हवें तें शोधून काढणें जमत नाही. कोणत्याही एका देवाबद्दल, उपासनेबद्दल किंवा मताबद्दल निश्र्चय करता येत नाही. शास्त्रांचा परस्परांत मतभेद असल्यानें एक निश्र्चय करण्यास त्यांचा उपयोग होत नाही.     
बहुत शास्त्रीं बहुत भेद । मतांमतांस विरोध ।
ऐसा करितां वेवाद । बहुत गेले ॥ १२ ॥
१२) शास्त्रांची संख्या पुष्कळ आहे. त्यामच्यांत पुष्कळ भेदही आहेत. त्यांच्या मतामतांमध्येंही विरोध आहे. असा शास्त्रांबद्दल वाद करतां करतां पुष्कळ लोक नाहींसे झाले.
सहस्त्रामधें कोणी येक । पाहे देवाचा विवेक ।
परी त्या देवाचें कौतुक । ठांई न पडे ॥ १३ ॥
१३) हजारों लोकांमध्यें एखादाच माणूस खरा देव शोधून काढण्यास प्रयत्न करतो. तरी खर्‍या देवाचे स्वरुप व सामर्थ्य त्यास आकलन होत नाही.   
ठांई न पडे कैसें म्हणतां । तेथें लागली अहंता ।
देव राहिला परता । अहंतागुणें ॥ १४ ॥ 
१४) अहो, असें कसें म्हणता ? सर्व माणसांना अहंता लागली आहे. त्यामुळें देव लांब राहतो. अहंकारी माणूस देवापर्यंत पोहोचू शकत नाही.  
आतां असो हें बोलणें । नाना योग ज्याकारणें ।
तो देव कोण्या गुणें । ठांई पडे ॥ १५ ॥
१५) आतां हे बोलणें पुरे. ज्याचें दर्शन व्हावें म्हणून अनेक प्रकारचे योग आहेत, तो देव कोणत्या उपायानें प्राप्त होईल ? 
देव कोणासी म्हणावें । कैसें तयासी जाणावें ।
तेंचि बोलणें स्वभावें । बोलिजेल ॥ १६ ॥
१६) देव म्हणावें तरी कोणाला ? त्या खर्‍या देवाला ओळखावें तरी कसें ? या प्रश्र्णांची उत्तरे आतां सोप्या रीतीनें सांगीन. 
जेणें केलें चराचर । केले सृष्ट्यादि व्यापार ।
सर्वकर्ता निरंतर । नाम ज्याचें ॥ १७ ॥
१७) ज्याच्या सत्तेनें हें एवढें मोठें चराचर रचलें गेलें, ज्यच्यामुळें या विश्र्वांतील सर्व घडामोडी घडून येतात, तो खरा देव होय. तो सर्वकर्ता म्हणून ज्ञानी लोक त्याला जाणतात.
तेणें केल्या मेघमाळा । चंद्रबिंबीं अमृतकळा ।
तेज दिधलें रविमंडळा । जया देवें ॥ १८ ॥
१८) आकाशांतील मेघमाळा त्यानें रचल्या, चंद्रबिंबांत त्यानेंच अमृत घातलें. त्याच देवानें रविमंडळांत तेज ओतले. 
ज्याची मर्यादा सागर । जेणें स्थापिलें फणिवरा ।
जयांचेनि गुणें तारा । अंतरिक्ष ॥ १९ ॥
१९) ज्यानें समुद्राला मर्यादा घालून दिली, ज्यानें शेषाची स्थापना करुन पृथ्वी स्थिर केली, त्याच देवानें आकाशामध्यें अनंत तारका निर्माण केल्या.
च्यारी खाणी च्यारी वाणी । चौर्‍यासि लक्ष जीवयोनी ।
जेणें निर्मिले लोक तिनी । तया नाव देव ॥ २० ॥
२०) जीवप्राण्यांचे चार प्रकार, वाणीचे चार प्रकार, प्राण्यांच्या चौर्‍यांशी योनी, आणि स्वर्ग, मृत्यु व पाताळ हे तीन लोक ज्याच्या सत्तेनें निर्मान झाले. त्या निर्मात्याला देव हे नांव आहे.  
ब्रह्मा विष्णु आणी हर । हे जयाचे अवतार ।
तोचि देव हा निर्धार । निश्र्चयेंसीं ॥ २१ ॥
२१) ब्रह्मा, विष्णु व शंकर हे ज्याचे अवतार  आहेत तोच खरा देव होय हें अगदी निश्र्चित समजावें. 
देव्हाराचा उठोनि देव । करुं नेणें सर्व जीव ।
तयाचेनि ब्रह्मकटाव । निर्मिला न वचे ॥ २२ ॥  
२२) देव्हार्‍यांतील देव खरा देव नव्हे. कारण तो कांहीं सर्व जीव प्राणी निर्माण करुं शकत नाही. हें ब्रह्मांड तो उत्पन्न करुं शकत नाही.        
ठांई ठांई देव असती । तेहिं केली नाहीं क्षिती ।
चंद्र सूर्य तारा जीमूती । तयांचेनि नव्हे ॥ २३ ॥
२३) जागोजागीं किती तरी देव आढळतात. पण त्यांच्यापैकी कोणी पृथ्वी निर्मिली नाही. किंवा चंद्र, सूर्य, तारका आणि मेघ त्याच्या सामर्थ्यानें अस्तित्वांत आलेले नाहीत.    
सर्वकर्ता तोचि देव । पाहों जातां निरावेव ।
ज्याची कळा लीळा लाघव । नेणती ब्रह्मादिक ॥ २४ ॥
२४) या सर्वांचा जो कर्ता आहे तोच देव होय. तो कर्ता म्हणून त्यास पहावयास जावे तर निराकार असल्यानें दिसत नाही. तरी तो एवढें विश्र्व निर्माण करतो. त्याची ही लिला ब्रह्मादिकांनाही कळत नाही. 
येथें आशंका उठिली । ते पुढिलीये समासीं फिटली । 
आतां वृत्ती सावध केली । पाहिजे श्रोतीं ॥ २५ ॥
२५) देवाचें हें वर्णन ऐकून श्रोत्यांच्या मनांत शंका निर्माण झाली. त्या शंकेचे निरसन पुढील समासांत केलें आहे. तोपर्यंत या समासांतील विषयाकडे श्रोत्यांनी सावधान वृत्तीनें लक्ष द्यावें. 
पैस अवकाश आकाश । कांहींच नाहीं जे भकास ।
तये निर्मळीं वायोस । जन्म जाला ॥ २६ ॥
२६) प्रथम सगळीकडे मोकळी जागा होती. तेंच आकाश होय. तें शून्यमय होते. त्या शुद्ध आकाशांत वायूचा जन्म झाला. 
वायोपासून जाला वन्ही । वन्हीपासुनी जालें पाणी ।
ऐसी जयाची करणी । अघटित घडली ॥ २७ ॥
२७) वायूपासून अग्नि निर्माण झाला. अग्नीपासून पाणी झाले. ही अघटित घटना ही त्याच्या सत्तेची करणी,
उदकापासून सृष्टि जाली । स्तंभेविण उभारली ।
ऐसी विचित्र कळा केली । त्या नाव देव ॥ २८ ॥
२८) पाण्यापासून सृष्टी निर्माण झाली. खांबांच्या आधाराशिवाय ती आकाशांत ठेवली. अशी ज्याची विलक्षण कळा तो देव होय. 
देवें निर्मिली हे क्षिती । तिचे पोटीं पाषाण होती ।
तयासचि देव म्हणती । विवेकहीन ॥ २९ ॥
२९) देवानें ही पृथ्वी निर्माण केली. तेथें दगड निर्माण झाले. त्या दगडांनाच विवेकशून्य माणसें देव म्हणतात. ( याला काय म्हणावें. ) 
जो सृष्टिनिर्माणकर्ता । तो ये सृष्टीपूर्वीं होता । 
मग हे तयाची सत्ता । निर्माण जाली ॥ ३० ॥
३०) ज्यादेवानें ही सृष्टी निर्माण केली तो या सृष्टीपूर्वींही होता. मग त्यानें आपल्या सत्तेनें हे विश्व निर्माण केले.
कुल्लाळ पात्रा पूर्वीं आहे । पात्रें कांहीं कुल्लाळ नव्हे ।
तैसा देव पूर्वींच आहे । पाशाण नव्हे सर्वथा ॥ ३१ ॥
३१) कुंभार मातीची भांडी घडवितो. भांडी घडविण्यापूर्वीं तो असतोच. कुंभांर हा कांहीं मडकीं बनत नाही. त्याचप्रमाणें विश्र्व निर्माण करणारा देव विश्वाच्या आधीपासून असतो. विश्र्व निर्माण झाल्यावर तो वेगळा राहतो. म्हणून पृथ्वीवरील दगड म्हणजे कांही देव नव्हे.   
मृत्तिकेचें  शैन्य केलें । कर्ते वेगळे राहिले ।
कार्यकारण येक केलें । तरी होणार नाहीं ॥ ३२ ॥
३२) समजा एखाध्यानें मातीच्या शिपायांचे सैन्य तयार केलें. सैन्य तयार करणारा कारागीर सैन्याहून वेगळा राहतो. अर्थात् कारण व कार्य एकरुप  करु म्हटले तरी करतां येणार नाहींत.
तथापि होईल पंचभूतिक। निर्गुण नव्हे कांहीं येक ।
कार्याकारणाचा विवेक । भूतांपरता नाहीं ॥ ३३ ॥  
३३) कार्य आणि कारण या घटना दृश्य पंचभौतिक विश्वामधील आहेत. त्या पलीकडे असणार्‍या निर्गुण स्वरुपामध्यें कार्य नाहीं तसे कारणही नाहीं. कार्यकारणाचा संबंध पंचभूतात्मक विश्वामधील घटनांना लागूं पडतो. त्यापलीकडे तो लटका पडतो. 
अवघी सृष्टि जो कर्ता । तो ते सृष्टीहूनि पर्ता ।
तेथें संशयाची वार्ता । काढूंचि नये ॥ ३४ ॥
३४) हें सबंध विश्व ज्यानें निर्माण केलें तो देव त्या विष्वाहून निराळा आहे. त्याच्या पलीकडे आहे. याबद्दल थोडादेखील संशय राहूं नये.    
खांबसूत्रींची बाहुली । जेणें पुरुषें नाचविली ।
तोचि बाहुली हे बोली । घडे केवी ॥ ३५ ॥
३५) जो माणूस कळसूत्री बाहुल्या नाचवतो तोच बाहुली बनतो हें म्हणणे देखील चूक आहे.  
छायामंडपीची सेना । सृष्टिसारिखीच रचना ।
सूत्रें चाळी परी तो नाना । वेक्ति नव्हे ॥ ३६ ॥
३६) पातळ पदद्यामागें दिवा ठेवतात. त्या दिव्याच्या उजेडानें कागदी शिपायांच्या सावल्या पडद्यावर दाखवितात. त्यास छायामंडप म्हणतात. या छायामंडपांत शिपायांचे सैन्य दाखवतात. दिसायला तें खर्‍या सैन्यासारखें दिसते. एक माणूस दोर्‍यांच्या सहाय्यानें शिपायांचीं चित्रें नाचवतो. एकच माणोस अनेक चित्रें नाचवतो. प्रत्येक चित्राला निराळा माणूस नाचवणारा नसतो.  
तैसा सृष्टिकर्ता देव । परी तो नव्हे सृष्टिभाव ।
जेणें केले नाना जीव । तो जीव कैसेनी ॥ ३७ ॥
३७) त्याचप्रमाणें हें विश्व निर्माण करणारा देव एकच आहे. विश्वांतील पदार्थांहून तो वेगळा आहे. ज्या देवानें अनेक जीव निर्माण केलें तो स्वतःच  जीव कसा असूं शकेल ?  
जें जें जया करणें पडे । तें तें तो हें कैसें घडे ।
म्हणोनि वायांचि बापुडे । संदेहीं पडती ॥ ३८ ॥   
३८) जें जें कर्म माणसाला करावें लागतें तें तें कर्म तो  कधीच होऊं शकत नाही. कर्म व ते करनारा कर्ता सदैव भिन्नच राहतात. हें ज्यांच्या ध्यांनांत येत नाही, ते अज्ञ लोक विनाकारण संशयांत पडतात.  
सृष्टि ऐसेंचि स्वभावें । गोपुर निर्मिलें बरवें ।
परी तो गोपुर कर्ता नव्हे । निश्र्चयेंसीं ॥ ३९ ॥
३९) एका कारागिराने देवळाच्या महाद्वारावर सुंदर गोपुर उभारलें. परंतु गोपुर व तें करणारा कारगिर दोन्ही एकच असूं शकत नाही. 
तैसें जग निर्मिलें जेणे । तो वेगळा पूर्णपणें ।
येक म्हणती मूर्खपणें । जग तोचि जगदीश ॥ ४० ॥
४०) त्याचप्रमाणें ज्यानें जग निर्माण केलें तो देव जगाहून पूर्णपणें वेगळा आहे. जग व जगदीश एकच आहेत हे केवळ मूर्खपणें लोक म्हणतात.  
एवं जगदीश तो वेगळा । जग निर्माण त्याची कळा ।
तो सर्वांमधें परी निराळा । असोन सर्वीं ॥ ४१ ॥
४१) थोडक्यांत जग निर्माण करणारा जगदीश हा जगाहून वेगळा आहे. जग निर्माण करणें ही त्याची मोठी कला आहे. तो सर्वामध्यें असूनही सर्वापेक्षा निराळा आहे.    
म्हणोनि भूतांचा कर्दमु । यासी अलिप्त आत्मारामु । 
अविद्यागुणें मायाभ्रमु । सत्यचि वाटे ॥ ४२ ॥
४२) म्हणून विश्वामध्यें आढळणार्‍या पंचभूतांच्या मिश्रणाहून आत्माराम अगदी अलिप्त असतो. अविद्येचा परिणाम झाल्यानें मायेनें निर्माण केलेला हा विश्वभ्रम संपूर्णपणें खरा वाटतो. 
मायोपाधी जगडंबर । आहे सर्वहि साचार ।
ऐसा हा विपरीत विचार । कोठेंचि नाहीं ॥ ४३ ॥
४३) विश्वाचा हा एवढा पसारा मायेनें निर्माण केलेलें दृश्य आहे. हें सर्वस्वी खरें आहे, असा चुकीचा विचार कोणत्याही अद्वैत ग्रंथामध्यें आढळणार नाही. 
म्हणोनि जग मिथ्या साच आत्मा । सर्वांपर जो परमात्मा ।
अंतर्बाह्य अंतरात्मा । व्यापूनि असे ॥ ४४ ॥
४४) अर्थात् हें दृश्य विश्व मिथ्या आहे आणि आत्मस्वरुप तेवढें खरें आहे. त्याच्याही पलीकडे परमात्मा असतो. अंतरात्मा सर्वांना आंतबाहेर व्यापून असतो.          
तयास म्हणावें देव । येर हें अवघेंचि वाव ।
ऐसा आहे अंतर्भाव । वेदांतीचा ॥ ४५ ॥
४५) त्या शुद्ध आत्मस्वरुपाला देव म्हणावें. त्याखेरीज बाकींचे सर्व दृश्य व्यर्थ आहे. वेदान्ताचें असे हें रहस्य आहे.  
पदार्थवस्तु नासिवंत । हें तो अनुभवास येत ।
याकारणें भगवंत । पदार्थावेगळा ॥ ४६ ॥
४६) सर्व वस्तु नाशवंत आहेत. हा तर सर्वांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. आणि भगवंत हा अविनाशी आहे. म्हणून तो या सर्व पदार्थांहून वेगळा असलाच पाहिजे.   
देव विमळ आणी अचळ । शास्त्रें बोलती सकळ ।
तया निश्र्चळास चंचळ । म्हणों नये सर्वथा ॥ ४७ ॥
४७) सर्व शास्त्रें सांगतात कीं, देव अगदीं शुद्ध व शाश्वत आहे. अशा निश्चल शाश्वत देवाला अशाश्वत व चंचल कधींही म्हणू नये. 
देव आला देव गेला । देव उपजला देव मेला ।
ऐसें बोलतां दुरिताला । काये उणें ॥ ४८ ॥
४८) देव आला, देव गेला, देव जन्मला, देव मेला असें बोलल्यानें पापाचाच साठा केल्यासारखें होते.  
जन्ममरणाची वार्ता । देवास लागेना सर्वथा ।
देव अमर ज्याची सत्ता । त्यासी मृत्यु कैसेनी ॥ ४९ ॥
४९) जन्म व मृत्यु देवाला नाही. देव हा नेहमी आहे व त्याचीच सर्वत्र सत्ता चालते. त्याला मृत्यु कसा येणार ?   
उपजणें आणी मरणें । येणें जाणें दुःख भोगणें ।
हें त्या देवाचें करणें । तो कारण वेगळा ॥ ५० ॥
५०) जन्मास येणें व मरणें; येणें व जाणें व दुःख भोगणें हें सगळें त्या देवाच्या सत्तेनें चालते. तो या सर्वांचे कारण आहे. म्हणूनच तो सगळ्यांहून निराळा आहे. 
अंतःकरण पंचप्राण । बहुतत्वीं पिंडज्ञान ।
यां सर्वांस आहे चळण । म्हणोनि देव नव्हेती ॥ ५१ ॥
५१) अंतःकरण, पंचप्राण, पिंडांमधील आपणांस माहित असलेली अनेक तत्वें, हीं सारी अशाश्वत आहेत. बदलणारीं आहेत. म्हणून तीं देव नव्हेत.   
येवं कल्पनेरहित । तया नांव भगवंत । 
देवपणाची मात । तेथें नाहीं ॥ ५२ ॥
५२) इतकेंच काय जेथें मानवी कल्पना कमी पडतात, त्या स्वरुपास भगवंत असें नांव आहे. त्या स्वरुपामध्यें देवपणाच्या कल्पनेला देखील स्थान नाही. 
तव शिष्यें आक्षेपिलें । तरी कैसें ब्रह्मांड केलें ।
कर्तेपणें कारण पडिलें । कार्यामधें ॥ ५३ ॥
५३) यावर शिष्यानें शंका काढली. कर्तेपणा हें कारण आहे. तें सुद्धा जर कार्य ठरलें तर मग हें विश्व निर्माण झालें कसें?  
द्रष्टेपणें द्रष्टा दृश्यीं । जैसा पडे अनायांसी ।
कर्तेपणें निर्गुणासी । गुण तैसे ॥ ५४ ॥
५४) द्रष्टा दृश्य पाहतो. पण मी द्रष्टा आहें ही जाणीव झाली म्हणजे आपण द्रष्ट्यालाच पाहतो. त्यामुळें द्रष्टाच दृश्य बनतो. अशा रीतींनें द्रष्टा जसा विनासायास दृश्यांत जाऊन पडतो तसे निर्गुणस्वरुपाच्या ठिकाणीं कर्तेपणामुळें गुण दिसूं लागतात.   
ब्रह्मांडकर्ता कवण । कैसी त्याची वोळखण ।
देव सगुण किं निर्गुण । मज निरोपावा ॥ ५५ ॥
५५) या विश्वाचा कर्ता कोण ? त्याला ओळखावें कसें ? देव सगुण कीं निर्गुण ? हें मला समजून सांगावें. 
येक म्हणती त्या ब्रह्मातें । इच्छामत्रें सृष्टिकर्ते ।
सृष्टिकर्ते त्यापर्ते  । कोण आहे ॥ ५६ ॥
५६) कोणी म्हणतात कीं परब्रह्मानें केवळ आपल्या संकल्पानें विश्व निर्माण केलें. हें खरें नसेल तर त्याच्या व्यतिरिक्त विश्व निर्माण करणारें आणखी कोण आहे ? 
आतां असो हे बहु बोली । सकळ माया कोठून जाली ।
ते हे आतां निरोपिली । पाहिजे स्वामी ॥ ५७ ॥
५७) जास्त बोलणें आतां पुरें. ही सगळी माया कोठून आली, कशी निर्माण झाली याचा स्वामी, आपण खुलासा करावा.  
ऐसें ऐकोनि वचन । वक्ता  म्हणे सावधान ।
पुढेलें समासीं निरुपण । सांगिजेल ॥ ५८ ॥
५८) शिष्याचे हे बोलणें ऐकून वक्ता म्हणाला कीं तूं जरा लक्ष दे. पुढच्या समासामध्यें या प्रश्र्णांची उत्तरे मी देणार आहे. 
ब्रह्मी माया कैसी जाली । पुढें असे निरोपिली ।
श्रोतीं वृत्ती सावध केली । पाहिजे आतां ॥ ५९ ॥  
५९) परब्रह्मामध्यें माया कशी निर्माण झाली हें पुढें समजून सांगितलें आहे. श्रोत्यांनी लक्षपूर्वक श्रवण करावें.   
पुढें हेंचि निरुपण । विशद केलें श्रवण ।
जेणें होये समाधान । साधकांचें ॥ ६० ॥
६०) पुढें याच विषयाचेम विवेचन आहे. तें एकाग्र मनानें श्रवण केल्यास साधकाच्या मनाचें समाधान होईल. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे देवदर्शननाम समास पहिला ॥
Samas Pahila Devadarshan
समास पहिला देवदर्शन


Custom Search

Monday, September 25, 2017

Renuka Stotra रेणुका स्तोत्रम्



Renuka Stotra
Renuka Stotra is in Sanskrit. It is from Vayu Purana. It is created by Parshuram. Goddess Renuka had told that the devotee who recite this stotra every day, will receive money, The devotee who wants wife/husband will get it. Who is ill will be cured.
 रेणुका स्तोत्रम्
श्रीगणेशायनमः । श्रीसरस्वत्यैनमः । श्रीगुरुभ्योनमः ।
श्रीरेणुकांबायनमः ।
ॐनमः परमानंदेसर्वदेवमयी शुभे ।
अकारादिक्षकारांतं मात्रकामंत्रमालिनी ॥ १ ॥
एकवीरे एकरुपे महारुपअरुपिणी ।
अव्यक्ते व्यक्तिमापन्यगुणातीते गुणात्मिके ॥ २ ॥
कमले कमलाभासे हृत्सत्प्रक्तर्णिकलये ।
नाभीचक्रस्थिते देवी कुंडली तंतुरुपिणी ॥ ३ ॥
वीरमाता वीरवंद्या योगिनी समयप्रिये ।
वेदमाता वेदगर्भे विश्र्वगर्भे नमोस्तुते ॥ ४ ॥
रानमातर्नमस्तुभ्यं नमस्त्रैलोक्य रुपिणी ।
महदादिदं पंचभूत जमदग्निप्रियाशुभे ॥ ५ ॥
यैस्तु भक्त्या स्तुता ध्याता अर्चयित्वा पिते शिवे ।
भो मोक्षप्रदे देवि कामेश्र्वरि नमोस्तुते ॥ ६ ॥
नमोस्तुते निरालंबे परमानंद कवचविग्रहे ।
पंचभूतात्मके देवी भूतभावविवर्जिते ॥ ७ ॥  
महारौद्रे महाकाय सृष्टेसंहारकारिणी ।
ब्रह्मांडगोलकाकारे विश्र्वरुप नमोस्तुते ॥ ८ ॥
चतुर्भुजे खड्गहस्ते महाडमरुधारिणी ।
शिरःपात्रधरे देवी एकवीरे नमोस्तुते ॥ ९ ॥
नीलांबरे नीलवर्णे मयूरपिच्छधारिणी ।
वनभिल्लधनुर्वामे दक्षिणे बाणधारिणी ॥ १० ॥
रौद्रकाये महाकाये सहस्त्रार्जुनभजनी ।
येकं शिरः पुरा स्थित्वा रक्तपात्रे च पूरितं ॥ ११ ॥
मृतधारापिबं देवी रुधिरं दैत्यदेहजं ।
रक्तवर्णे रक्तदंते खड्गलांगलधारिणी ॥ १२ ॥
वामहस्ते च खट्वांगं डमरु चैव दक्षिणे ।
प्रेतवाहनके देवी ऋषिपत्नी च देवते ॥ १३ ॥
येकवीरे महारौद्रे मालिनी विश्र्वभैरवी ।
योगिनी योगयुक्ता च महादेवी महेश्र्वरी ॥ १४ ॥
कामाक्षी भद्रकाली च हुंकारी त्रिपुरेश्र्वरी ।
रक्तवक्रे रक्तनेत्रे महात्रिपुरसुंदरी ॥ १५ ॥
रेणुकासूनुयोगी च भक्तानां अभयंकारी ।
भोगलक्ष्मीर्योगलक्ष्मी दिव्यलक्ष्मीश्र्च सर्वदा ॥ १६ ॥   
कालरात्रिमहारात्री मद्यमांसशवप्रिये ।
भक्तानां श्रीपदे देवी लोकत्रयविमोहिनी ॥ १७ ॥
हृींकारी कामपीठेच हृींकारी च प्रबोध्यता ।
श्रींकारीच श्रिया देवी सिद्धलक्ष्मीच सूप्रभा ॥ १८ ॥  
महालक्ष्मीश्र्च कौमारी कौबेरी सिंहवाहिनी ।
सिंहप्रेतासने देवी रौद्री क्रूरावतारिणी ॥ १९ ॥
दैत्यमारी कुमारीच रौद्रदैत्यानिपातिनी ।
त्रिनेत्रा श्र्वेतरुपा च सूर्यकोटीसमप्रभा ॥ २० ॥
खड् गिनी बाणहस्ता च आरुढमहिषवाहनी ।
महाकुंडलिनी साक्षात्कंकाली भुवनेश्र्वरी ॥ २१ ॥
कृत्तिवासा विष्णुरुपा हृदया देवतामया ।
देवमारुतमाता च भक्तमाता च शंकरी ॥ २२ ॥
चतुर्भुजचतुर्वक्रे स्वस्तिपद्मासनस्थिता ।
पंचवक्र महागंगा गौरीशंकरवल्लभा ॥ २३ ॥
कपालिनी देवमाता कामधेनुस्त्रोगुणी ।
विद्या एकमहाविद्या स्मशानप्रेतवासिनी ॥ २४ ॥
देवत्रिगुणत्रैलोक्या जगत्रयविलोकिनी ।
रौद्रावेतालीकंकालीभवानी भयवल्लभा ॥ २५ ॥  
कालिकापालिनी क्रोधा मातंगी वेणुधारिणी ।
रुद्रस्य न पसाभूता रुद्रदेहार्धधारिणी ॥ २६ ॥
जया च विजया चैव अजया अपराजिता ।
रेणुकायै नमस्तेस्तु सिद्धदेवी नमोनमः ॥ २७ ॥
श्रियं देवी नमस्तेस्तु दीननाथे नमो नमः ।
जयत्देवदेवत्वस्वं सर्वदेवीनमोस्तुते ॥ २८ ३
देवदेवस्य जननी पंचप्राणप्रपूरिते ।
त्वतप्रसादाय देवेशी देवा क्रंदति विष्णवे ॥ २९ ॥
महाबले महारौद्रे सर्वदैत्यनिपातिनी ।
आधाराबुद्धिताशक्तिः कुंडली तंतुरुपिणी ॥ ३० ॥
षट्चक्रमणे देवी योगिनी दिव्यरुपिणी ।
कामिका कामरक्ता च लोकत्रयविलोकिनी ॥ ३१ ॥
महानिद्रा मद्यनिद्रा मधुकैटभभंजनी ।
भद्रकाली त्रिसंध्या च महाकाली कपालिनी ॥ ३२ ॥
रक्षिता सर्वभूतानि दैत्यानां च क्षयंकरी ।
शरण्यसर्वसत्वानां रक्ष त्वं परमेश्र्वरी ॥ ३३ ॥
त्वामारादहयते लोके तेषां राज्यं च भूतले ।
आषाढे कार्तिके चैव पूर्णेपूर्णचतुर्दशी ॥ ३४ ॥
आश्र्विने पाोषमासे च कृत्वा पूजांप्रयत्नतः ।
गंधपुष्पैश्र्च नैवेद्यैस्तोषितां पंचभिः सह ॥ ३५ ॥
यं यं प्रार्थयते नित्यं तं तं प्राप्नोति निश्र्चितं ।
तत्वमेवरदे देवी रक्ष मां परमेश्र्वरी ॥ ३६ ॥
तव वामांकितं देवी रक्ष मे सकलेश्र्वरी ।
सर्वभूतोदये देवी प्रसादवरदे शिवे ॥ ३७ ॥
श्रीदेव्युवाच ॥
वरं ब्रूहि महाभाग राज्यं कुरु महीतले ।
ममाराध्यते लोके भयं कापि न विद्यते  ॥ ३८ ॥
मममार्गे च यायांती भोदेवी मम सन्निधौ ।
अभार्यो लभते भार्यां निर्धनो लभते धनं ॥ ३९ ॥
विद्यापुत्रमवाप्नोति शत्रुनाशंच विंदति ।
अपुत्रा लभते पुत्रान् बद्धो मुच्येत बंधनात् ॥ ४० ॥
कामार्थी लभते कामं रोगी आरोग्यमाप्नुयात् ।
मम आराधनं नित्यं राज्यं प्राप्नोति भूतले ॥ ४१ ॥
सर्वकार्याणि सिध्यंति प्रसादान्मे न संशयः ।
सर्वकार्याणिमवाप्नोति दीर्घायुश्र्च लभेत्सुखी ॥ ४२ ॥
श्रीपरशुराम उवाच ॥
अत्र स्थानेषु भवतां अभयं कुरु सर्वदा ॥ ४३ ॥
यं यं प्रार्थयते नित्यं तं तं प्राप्नोति निश्र्चितं ।
प्रयागे पुष्करे चैव गंगासागरसंगमे ॥ ४४ ॥
स्नानं च लभते नित्यं नित्यं च चरणोदकं । 
इदं स्तोत्रं पठेन्नित्यं त्रिसंध्यं श्रद्धयान्वितः ॥ ४५ ॥
सर्वान् कामान् अवाप्नोति प्राप्यते परमं पदं ।
इति श्रीवायुपुराणे परशुरामकृते श्रीरेणुकास्तोत्रं संपूर्णं ॥  
Renuka Stotram (Tamil )
 ரேணுகா ஸ்தோத்திரம் ॐ ஶ்ரீ கணேஶாய நமঃ । ॐ ஶ்ரீஸரஸ்வதியை நமঃ । ॐ ஶ்ரீகுருப்யோநமঃ. ॐ ஶ்ரீரேணுகாம்பாயநமঃ । ॐ நமঃ பரமாநந்தஸர்வதேவமயீ ஶுபே । ஆக்‌ஷ என்ற எழுத்தில் தொடங்கும் மந்திரங்களின் மாலையே எழுத்து மாத்ரா ஆகும். 1 ॥ ஒரு ஹீரோ, ஒரு வடிவம், பெரிய வடிவம் மற்றும் உருவமற்ற தன்மை. வெளிப்படாத, ஜட இயற்கையின் முறைகளுக்கு அப்பாற்பட்ட நிலையில், பரம புருஷ பகவான் அதீதமானவர். 2 ॥ ஓ தாமரை, நீ தாமரை போன்றவன், எல்லா உண்மைக்கும் நீயே ஆதாரம். தொப்புள் சக்கரத்தில் அமைந்துள்ள குண்டலி தேவி, இழை வடிவில் இருக்கிறார். 3 ॥ அவள் மாவீரர்களின் தாய், நாயகர்களை வணங்குபவள், யோகினி, காலத்தை நேசிப்பவள். ஓ வேதங்களின் தாயே, பிரபஞ்சத்தின் கருவறையே, உமக்கு எனது மரியாதையான வணக்கங்களைச் சமர்ப்பிக்கிறேன். 4 ॥ ஓ காடுகளின் தாயே, நீ மூன்று உலகங்களின் உருவம். ஓ தீயவனே, ஜமதக்னியின் நெருப்புக்குப் பிரியமானவனே, இந்த ஐந்து கூறுகளும் பிரபஞ்சத்தின் மகத்துவத்துடன் தொடங்கியது. 5 ॥ தந்தையாகிய சிவபெருமானை பக்தியுடன் துதித்து, தியானித்து, வழிபட்டவர்கள், விடுதலையை அருளும் தெய்வமே, காமத்தின் தலைவரே, நான் உங்களுக்கு என் வணக்கங்களைச் சமர்ப்பிக்கிறேன். 6 ॥ சார்புநிலையிலிருந்து விடுபட்டவரும், உன்னதமான பேரின்பத்தின் கவசமாகியவருமான உமக்கு வணக்கங்கள். துர்கா தேவி ஐந்து கூறுகளால் ஆனவள் மற்றும் எந்த ஒரு பொருள் தன்மையும் இல்லாதவள். 7 ॥ அவள் மிகவும் பயங்கரமானவள் மற்றும் ஒரு பெரிய உடலைக் கொண்டிருந்தாள் மற்றும் அனைத்து படைப்புகளையும் அழித்தாள். ஓ பிரபஞ்சத்தின் வடிவே, பிரபஞ்சத்தின் கோள வடிவில், நான் உங்களுக்கு எனது மரியாதைக்குரிய வணக்கங்களைச் சமர்ப்பிக்கிறேன். 8 ॥ அவள் கையில் நான்கு கரங்களும் வாளும் இருந்தன. தலையில் பாத்திரம் வைத்திருக்கும் தெய்வமே, நீ மட்டுமே வீரன், உனக்கு வணக்கங்கள். 9 ॥ அவள் நீல நிற உடையணிந்து மயில் தோலை அணிந்திருந்தாள். அவள் இடதுபுறத்தில் காட்டில் இருந்து வில் மற்றும் அம்புகளை வைத்திருந்தாள். 10 ॥ சஹஸ்ரார்ஜுனனை பயங்கரமான உடலுடனும், பெரிய உடலுடனும் வணங்கினாள். தலை ஒன்று முன்பு சிவப்பு பாத்திரத்தில் வைக்கப்பட்டது. 11 ॥ அந்த அரக்கனின் உடலில் இருந்து இறந்த ரத்தத்தை தேவி குடித்தாள். சிவந்த நிறமும், சிவந்த பற்களும், வாளும் தடியும் அணிந்திருந்தாள். 12 ॥ அவரது இடது கையில் வாளும், வலதுபுறத்தில் டம்ளரும் வைத்திருந்தார் முனிவரின் மனைவியான துர்கா தேவி, இறந்த உடலின் வாகனத்தில் வணங்கப்படுகிறார். 13 ॥ ஒரே நாயகனான விஸ்வபைரவியின் மாலை மிகவும் உக்கிரமானது. தேவி மகாதேவி யோகி என்றும் அழைக்கப்படுகிறார் மற்றும் யோகம் பெற்றவர். 14 ॥ அவள் காமக்ஷி, பத்ரகாளி மற்றும் ஹம்காரி, மூன்று உலகங்களின் தெய்வம் என்று அழைக்கப்படுகிறாள். சிவந்த வளைவும் சிவந்த கண்களும் உடையவள் மூவுலகிலும் மிக அழகாக இருந்தாள். 15 ॥ ரேணுகாவின் மகனான இவர் பக்தர்களுக்கு அஞ்சாதவர். அதிர்ஷ்டத்தின் தெய்வம் எப்போதும் இன்பத்தின் தெய்வம் மற்றும் யோகா மற்றும் தெய்வீக தெய்வம் 16 ॥ நேரத்தின் இரவு சிறந்த இரவு, நீங்கள் மது, இறைச்சி மற்றும் சடலங்களை விரும்புகிறீர்கள். ஸ்ரீபாதரின் பாதத்தில், துர்கா தேவி தன் பக்தர்களுக்காக மூன்று உலகங்களையும் திகைக்கிறாள். 17 ॥ ஹ்ரீம்காரி ஆசையின் இருப்பிடம் மற்றும் ஹ்ரீம்காரி விழிப்புணர்வை ஏற்படுத்துகிறது. ஸ்ரீங்கரி, ஸ்ரீ, தேவி, சித்தலக்ஷ்மி மற்றும் சுப்ரபா. 18 ॥ மகாலட்சுமி கன்னி கௌபேரி மற்றும் சிம்மத்தை தாங்குபவர். ரௌத்ரி தேவி சிங்கம் மற்றும் பேய் சிம்மாசனத்தில் அமர்ந்திருக்கிறாள். 19 ॥ அவள் அரக்கர்களைக் கொன்றாள் மற்றும் ஒரு கன்னியாக இருந்தாள் மற்றும் பயங்கரமான அரக்கர்களை அழித்தாள். அவள் மூன்று கண்கள் மற்றும் ஒரு வெள்ளை நிறம் மற்றும் அவரது பிரகாசம் ஒரு மில்லியன் சூரியன்களுக்கு சமமாக இருந்தது. 20 ॥ வாளையும் அம்புகளையும் ஏந்தி எருமையின் மீது ஏறிச் சென்றாள். பெரிய காதணிகள் நேரடியாக கண்காளி என்று அழைக்கப்படுகின்றன மற்றும் அவை பிரபஞ்சத்தின் தெய்வம். 21 ॥ அவள் பகவான் விஷ்ணுவின் வடிவத்தை அணிந்து, தெய்வத்தின் இதயமாக இருந்தாள். தேவர்களுக்கும் காற்றுக்கும் அன்னையாகவும் பக்தர்களுக்கு அன்னையாகவும் விளங்குகிறாள். 22 ॥ நான்கு கரங்கள் மற்றும் நான்கு வளைவுகளுடன் தாமரை இருக்கையில் அமர்ந்திருக்கிறாள். பஞ்சவக்ர மஹாகங்கா கௌரீஶங்கரவல்லভா 23 ॥ கபாலினி தெய்வங்களின் தாய் மற்றும் காமதேனு மூன்று மடங்கு தெய்வம். வித்யா என்பது கல்லறையிலும் இறந்தவர்களிலும் வாழும் ஒரு பெரிய அறிவு. 24 ॥ இவளே முப்பெரும் தெய்வம், மூவுலகம். ரௌத்ரவேதாலிகன்காலிபவானி பயத்தின் பிரியமானவள். 25 ॥ அவள் இருளின் காவலாளி மற்றும் கோபத்தின் தாய். அவள் சிவபெருமானின் பசுவாக மாறவில்லை, ஆனால் அவள் அவனுடைய உடலின் பாதியை சுமந்தாள். 26 ॥ ஜெயா, விஜயா, அஜயா மற்றும் அபராஜிதா. பரிபூரணத்தின் தெய்வமான ரேணுகாவுக்கு வணக்கம். 27 ॥ அதிர்ஷ்ட தெய்வமே, ஏழைகளின் தலைவரே, உங்களுக்கு எனது மரியாதைக்குரிய வணக்கங்களைச் சமர்ப்பிக்கிறேன். எல்லா அதிர்ஷ்ட தேவதைகளின் மீதும் நீ வெற்றி பெறுவாய். 28. தேவர்கள் மற்றும் தெய்வங்களின் தாய் ஐந்து உயிர் சக்திகளால் நிரப்பப்பட்டவர். ஓ பகவான் விஷ்ணு, அதிர்ஷ்டத்தின் தெய்வம், அதிர்ஷ்டத்தின் தெய்வம், உனது கருணைக்காக உன்னிடம் மன்றாடுகிறான். 29 ॥ அவள் மிகவும் வலிமையானவள், மிகக் கொடூரமானவள், எல்லா அசுரர்களையும் வென்றாள். அடிப்படை அறிவுசார் ஆற்றல் ஒரு இழை வடிவில் உள்ள சுருள் ஆகும். 30 ॥ ஆறு சக்கரங்களில், யோகினி தெய்வம் தெய்வீக வடிவில் உள்ளது. அவள் காமமும் உணர்ச்சியும் உடையவள், மூன்று உலகங்களையும் பார்க்கக்கூடியவள். 31 ॥ மஹாநிদ்ரா மদ்யநிদ்ரா மதுகைடভভஞ்ஜநீ । பத்ரகாளிக்கு திரிசந்தியா என்றும், மஹாகாளிக்கு கபாலினி என்றும் பெயர். 32 ॥ எல்லா உயிர்களையும் பாதுகாத்து அசுரர்களையும் அழித்தவள். அதிர்ஷ்ட தேவியே, தயவு செய்து உனது அடைக்கலமான அனைத்து உயிர்களையும் காக்கவும். 33 ॥ அது உங்களை இந்த உலகத்திலும் அவர்களுடைய ராஜ்ஜியத்திலும் மரணமடையச் செய்யும். ஆஷாட மாதத்தின் பதினான்காம் நாள் பூரணம் என்றும் பூர்ணா என்றும் அழைக்கப்படுகிறது. 34 ॥ அஸ்வினி மற்றும் பாஷையில், மிகுந்த முயற்சியுடன் வழிபாடு செய்ய வேண்டும். நறுமண மலர்கள் மற்றும் பிரசாதம் ஐந்து பிரசாதம் அவள் திருப்தி 35 ॥ யாருக்காக தினமும் பிரார்த்தனை செய்கிறாரோ, அவர் நிச்சயமாகப் பெறுவார். எல்லா உண்மையையும் அருளும் தெய்வமே, தயவுசெய்து என்னைக் காப்பாற்றுங்கள். 36 ॥ அனைவருக்கும் அதிபதியான தேவி, உமது இடது கையிலிருந்து என்னைக் காப்பாற்றுங்கள். ஓ மங்களகரமான தேவி, எல்லா உயிர்களுக்கும் ஆதாரமாகவும், அருளை வழங்குபவராகவும் இருக்கிறீர்கள். 37 ॥ ஶ்ரீதேவிவாசா ॥ தயவு செய்து உனது விருப்பத்தை என்னிடம் கூறுங்கள், ஓ மிகவும் அதிர்ஷ்டசாலி, பூமியை ஆட்சி செய். என்னை வணங்குபவனுக்கு இவ்வுலகில் பயம் இல்லை. 38 ॥ நான் செல்லும் வழியில் போதேவி என் முன்னிலையில் இருக்கிறாள். மனைவி இல்லாத ஆணுக்கு மனைவியும், ஏழைக்கு செல்வமும் கிடைக்கும். 39 ॥ அவர் அறிவின் மகனைப் பெறுகிறார் மற்றும் அவரது எதிரிகளை அழிக்கிறார். புத்திரர் இல்லாவிடில் புத்திரர் பிறப்பார், கட்டுண்டால் பந்தத்திலிருந்து விடுபடுவார். 40 ॥ ஆசையைத் தேடுபவர் ஆசையைப் பெறுகிறார், நோயாளி ஆரோக்கியம் அடைகிறார். தினமும் என்னை வழிபடுபவர் பூமியில் ராஜ்யத்தைப் பெறுகிறார் 41 ॥ என்னுடைய எல்லாப் பணிகளும் என் அருளால் நிறைவேற்றப்படுகின்றன, சந்தேகமில்லை. அவர் தனது அனைத்து கடமைகளையும் பெற்று நீண்ட ஆயுளையும் மகிழ்ச்சியையும் அடைகிறார் 42 ॥ ஸ்ரீ பரசுராமர் கூறினார்: இந்த இடங்களில் நீங்கள் எப்போதும் பாதுகாப்பாக இருக்கட்டும். 43 ॥ யாருக்காக தினமும் பிரார்த்தனை செய்கிறாரோ, அவர் நிச்சயமாகப் பெறுவார். பிரயாகையிலும், கங்கை கடலில் கலக்கும் புஷ்கரத்திலும் 44 ॥ தினமும் குளித்துவிட்டு, தினமும் கால்களைக் கழுவுவார் இந்த ஸ்தோத்திரத்தை ஒருவர் தினமும் மூன்று மாலைகள் நம்பிக்கையுடன் படிக்க வேண்டும். 45 ॥ அவன் தன் ஆசைகள் அனைத்தையும் அடைந்து உன்னதமான இருப்பிடத்தை அடைகிறான். இது ஸ்ரீ வாயு புராணத்தில் பரசுராமரால் இயற்றப்பட்ட ஸ்ரீ ரேணுகாவின் முழுமையான ஸ்தோத்திரமாகும்.
Renuka Stotra
 रेणुका स्तोत्रम्


Custom Search

Monday, September 18, 2017

Samas Dahava Dehanta Nirupan समास दहावा देहान्तनिरुपण


Dashak Satava Samas Dahava Dehanta Nirupan 
Samas Dahava Dehanta Nirupan, It is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us how we can make use of our body to attain Moksha. Now we know that we are not body. There is something more important in our body when it leaves the body we are called as dead.
समास दहावा देहान्तनिरुपण
श्रीराम ॥
मिथ्या तेंचि जालें सत्य । सत्य तेचि जालें असत्य ।
मायाविभ्रमाचें कृत्य । ऐसें असे पाहातां ॥ १ ॥
१) जें दृश्य खरें नाहीं तें आपल्याला खरें वाटते. जें अदृश्य आत्मरुप खरे आहे तें आपल्याला खोटे वाटते. खरे पाहिलें तर हा सर्व मायेपासून निर्माण झालेला भ्रम आहे. 
सत्य कळाया कारणें । बोलिलीं नाना निरुपणें ।
तरी उठेना धरणें । असत्याचें ॥ २ ॥
२) सत्य काय आहे हें कळण्यासाथीं पुष्कळ निरुपणें, विवेचनें केली तरीपण मनावर असलेली असत्याची पकड कांहीं ढिली होत नाही. 
असत्य अंतरीं बिंबलें । न सांगतां तें दृढ जालें ।
सत्य असोन हारपलें । जेथील तेथें ॥ ३ ॥
३) असत्य सत्यरुपानें मनांत बसलें कीं मग तें कोणीही न सांगतां मनामध्यें दृढ होते. आणि अंतरीं सत्य असूमही तें तेथल्या तेथें नाहींसे होते. 
वेदशास्त्रेंं पुराणें सांगती । सत्याचा निश्र्चय करिती ।
तरी न ये आत्मप्रचिती । सत्यस्वरुप ॥ ४ ॥
४) वेद, शास्त्रें, पुराणें नाना प्रकारें विवेचन करुन सत्याचे स्वरुप निश्र्चितपणें सांगतात. तरी त्या सत्यस्वरुपाची आपल्याला प्रचीति येत नाही. 
सत्य असोन आछ्यादलें । मिथ्या नसोन सत्य जालें ।
ऐसें विपरीत वर्तलें । देखत देखतां ॥ ५ ॥
५) सत्य प्रत्यक्ष असून झाकलें गेलें. आंणि सत्य नाहीं तें मात्र सत्यपणास पावले. अशा प्रकारें हा विपरीत प्रकार पाहतां पाहतां घडून गेला.   
ऐसी मायेची करणी । कळों आली तत्क्षणीं ।   
संतसंगें  निरुपणीं । विचार घेतां ॥ ६ ॥
६) अशी ही मायेची करणी आहे. संतांच्या संगतींत राहून श्रवण केले व मनन केले तर मायेचा परिणाम लगेच लक्षांत येतो.  
मागां जालें निरुपण । देखिलें आपणासि आपण ।
तेणें बाणली खूण । परमार्थाची ॥ ७ ॥
७) आतांपर्यंत या ग्रंथांमध्यें आत्मज्ञानाचें निरुपण केलें. त्यामुळें साधकाला स्वस्वरुपाचे ज्ञान झाले असलेच पाहीजे. त्यामुळें परमार्थाची खूण त्याच्या अंगी बाणणारच. 
तेणें समाधान जालें । चित्त चैतंनीं मिळालें ।
निजस्वरुपें वोळखिलें । निजवस्तुसी ॥ ८ ॥
८) स्वरुपज्ञानानें मनाचें संपूर्ण समाधान होते. चित्त चैतन्याशी समरस होऊन जातें. आणि खरा मी कोण आहे हे कळल्यानें ब्रह्मस्वरुप ओळखता येते. 
प्रारब्धीं टाकिला देहो । बोधें फिटला संदेहो ।
आतांचि पडो अथवा राहो । मिथ्या कळीवर ॥ ९ ॥
९) ज्ञानी पुरुष आपला देह प्रारब्धावर सोडतो. आत्मज्ञानानें त्याचे सर्व संशय नाहींसे होतात. देहाचे खोटेपण समजल्यानें ज्ञानी पुरुष त्याच्याबद्दल अनासक्त असतो. मग देह आज पडला काय किंवा बरेच दिवस टिकला काय या दोन्हीबद्दल त्यास सुखदुःख उरत नाही. 
ज्ञानियांचें जें शेरीर । तें मिथ्यत्वें निर्विकार ।
जेथें पडे तेचि सार । पुण्य भूमी ॥ १० ॥
१०) ज्ञानी पुरुषाला शरीर असत्यपणाने जाणवते. त्यामुळें शरीराचे विकारीदी दोष त्याला बाधत नाहीत. प्रारब्धानें त्याचे शरीर जेथें पडतें तीच मोठी पुण्यभूमी बनून जाते. 
साधुदर्शनें पावन तीर्थ । पुरती त्यांचे मनोरथ ।
साधु न येतां जिणें वेर्थ । तयां पुण्यक्षेत्रांचें ॥ ११ ॥
११) साधुसंत येऊन राहील्यानें तीर्थक्षेत्रांना पवित्रपणा येतो. त्यांचे महत्व वाढते. साधुसंत त्या तीर्थक्षेत्रांत राहीले नाहीत तर त्या पुण्यक्षेत्रांना महत्व राहणार नाही. 
पुण्यनदीचें जें तीर । तेथें पडावें शरीर ।
हा इतर जनाचा विचार । साधु नित्य मुक्त ॥ १२ ॥
१२) एखाद्या पवित्र नदीच्या कांठी मरण यावें म्हणजे आपल्याला मुक्ति मिळेल हा आपण सामान्य लोक विचार करतो. साधु नेहमी मुक्तच असतो. 
उत्तरायेण तें उत्तम । दक्षणायेन तें अधम ।
हा संदेहीं वसे भ्रम । साधु तो निःसंदेह ॥ १३ ॥
१३) देहाला मृत्यु यावा उत्तरायणांत तर तें उत्तम पण दक्षिणायनांतील मृत्यु अधम होय हा देहाचा भ्रम समजावा. अंतर्यामी आत्मबुद्धि स्थिर झाल्यानें साधु निःसंदेहपणें कालसत्तेच्या पलीकडे वावरतो. देहबुद्धी नसल्यानें जिवंतपणींच साधु ब्रह्मरुप झालेला असतो. त्याला अंतःकाळचे भय नसते. त्याला कालाचे बंधन नसते. तो ज्या क्षणीं देह ठेवतो तोच पुण्यकाल होतो.  
शुक्लपक्ष उत्तरायेण । गृहीं दीप दिवा मरण ।
अंतीं राहावें स्मरण । गतीकारणें ॥ १४ ॥
१४) शास्त्राप्रमाणें उत्तरायणांत शुक्लपक्षांत घरामध्यें दिवा जळत असतां दिवसा मरण यावें, त्यांत अंतःकाळीं भगवंताचे स्मरण राहावें म्हणजे जीवाला उत्तम गति मिळते.  
इतुकें नलगे योगियांसी । तो जीव चि मुक्त पुण्यरासी ।
तिळांजुळी पापपुण्यासी । दिधली तेंणें ॥ १५ ॥
१५) परंतु आत्मज्ञानी पुरुषाला यांपैकीं काहीं नसले तरी तो जिवंतपणींच मुक्त असल्यानें पापपुण्याला त्यानें तिळांजली दिलेली असते. 
देहाचा अंत बरा आला । देह सुखरुप गेला ।
त्यासी म्हणती धन्य जाला । अज्ञान जन ॥ १६ ॥
१६) देहाचा शेवट चांगला झाला. सायास, कष्ट न होतां मरण आले तर अज्ञाानी लोक,  मरणारा धन्य झाला असें समजतात.    
जनाचें विपरीत मत । अंतीं भेटतो भगवंत ।
ऐसें कल्पून घात । करिती आपुला स्वयें ॥ १७ ॥
१७) जन्मभर कसेंही वर्तन केलें तरी शेवटी भगवंताचे स्मरण केले म्हणजे भगवंत भेटतो असे अज्ञानी माणसांचे चुकीचे मत आहे. मात्र हें मत खरें मानून ते आपलेच नुकसान करुन घेतात. 
जितां सार्थक नाहीं केलें । वेर्थ आयुष्य निघोन गेलें ।
मुळीं धान्येचि नाहीं पेरिलें । तें उगवेल कैंचें ॥ १८ ॥
१८) जिवंतपणीं कोणतेही परमार्थाचे साधन जर केलेले नसेल तर सबंध आगुष्य कांहीं न साधतां वाया जाते. धान्यच जर पेरले नाहीं तर कांहींही उगवणारच नाहीं. 
जरी केलें ईश्र्वरभजन । तरीच होईजे पावन ।
जैसें वेव्हारितां धन । रासि माथां लाभे ॥ १९ ॥
१९) जिवंत असतांना माणसानें ईश्र्वराची भक्ति केली तर तो पवित्र होऊन जातो. एखाद्या माणसानें जवळील पैशाचा नीट व्यवहार केला तर त्यास खूप पैसा मिळतो, तसेंच हें आहे. 
दिधल्याविण पाविजेना । पेरिल्याविण उगवेना ।
ऐसें हें वाक्य जना । ठाउकेंचि आहे ॥ २० ॥
२०) आपण दिल्याशिवाय आपल्याला मिळत नाही, पेरल्यावाचून उगवत नाहीं ही वाक्यें लोकांना माहित आहेत. 
न करितां सेवेच्या व्यापारा । स्वामीस म्हणे कोठें मुशारा ।
तैसें अंतीं अभक्त नरां । स्वहित न घडे ॥ २१ ॥
२१) जो सेवेचे कष्ट करीत नाही त्याला मालकाजवळ मोबदला मागता येत नाही. तसेच जो जिवंतपणी भगवंताची भक्ति करीत नाही, त्याचें अंतःकाळी कल्याण होत नाही. 
जितां नाहीं भगवद्भक्ती । मेल्यां कैंची होईल मुक्ती ।
असो जे जे जैसें करिती । ते ते पावती तैसें ॥ २२ ॥
२२) जिवंतपणी ज्यानें भगवंताची भक्ति केलेली नसते, तो अंतःकाळीं चांगल्या अवस्थेला पोहोंचत नाहीं. मेल्यावर त्याला मुक्ति मिळत नाही. जो जशी करणी करतो तसेंच बरेवाईट फळ त्याला मिळते.  
एवं न करितां भगवद्भजन । अंती नव्हीजे पावन ।
जरी आलें बरें मरण । तरी भक्तीविण अधोगति ॥ २३ ॥
२३) थोडक्यांत भगवंताची भक्ति केली नाहीं तर अंतकाळी तो पवित्र होत नाही. देहाला कष्ट न होतां त्याला जरी मरण आलें तरी भक्ती न केल्यानें त्याला वाईट गतीच मिळते. 
म्हणौन साधूनें आपलें । जीत अस्तांच सार्थक केलें ।
शरीर कारणीं लागलें । धन्य त्याचें ॥ २४ ॥
२४) साधु म्हणुनच जिवंत असतांना आपल्या देहाचे सार्थक करुन घेतो. आत्मसाक्षात्कार करुन घेतो. त्यामुळें त्याचे शरीर भगवंताचे कारणीं लागते. त्यामुळे तो धन्य होय.  
जें कां जीवन्मुक्त ज्ञानी । त्यांचें शरीर पडो रानीं ।
अथवा पडो स्मशानीं । तरी धन्य जालें ॥ २५ ॥
२५) जे जीवन्मुक्त आत्मज्ञानी असतात त्यांचे शरीर अंतःकाळीं रानांत पडो किंवा स्मशानांत पडो तें धन्यच होतात.  
साधूचा देह खितपला । अथवा श्र्वानादिकीं भक्षिला।
हें प्रशस्त न वटे जनाला । मंदबुद्धीस्तव ॥ २६ ॥
२६) एखाद्या साधुचा देह जर खितपत पडला किंवा कुत्रा आदि श्वापदांनी खाल्ला तर अज्ञानी लोकांना त्याचे वाईट वाटते.  
अंत बरा नव्हेचि म्हणोन । कष्टी होती इतर जन ।
परी बापुडे अज्ञान । नेणती वर्म ॥ २७ ॥ 
२७) त्या साधुचा अंत बरा झाला नाही म्हणून लोक दुःखी होतात. पण ते अज्ञानी असल्यानें साधूच्या अंतरंगांतील अवस्थेंचे वर्म ते जाणू शकत नाहीत.          
जो जन्मलाच नाहीं ठाईचा । त्यास मृत्य येईल कैंचा ।
विवेकबळें जन्ममृत्याचा । घोट भरिला जेणें ॥ २८ ॥
२८) " मी आत्माच आहे " अशी अगदीं दृढ भावना साधुची असते. या दृष्टीनें ज्या आत्म्याला जन्मच नाही त्याला मृत्यु कसा येणार ? आत्मानात्मविवेकाच्या सामर्थ्यानें साधु जन्ममृत्युचा घोट पिऊन बसलेला असतो. म्हणजेच जन्ममृत्युच्या पलीकडे तो गेलेला असतो. 
स्वरुपानुसंधानबळें । सगळी मायाच नाडळे ।
तयाचा पार न कळे । ब्रह्मादिकासी ॥ २९ ॥
२९) आात्मस्वरुपाशी तदाकार झाल्यानें सगळींकडे त्याला परमात्माच भरलेला दिसतो. सगळी माया त्याला आढळतच नाही. ब्रह्मादिकांना त्याच्या स्वरुपाचा अंदाज येत नाही. 
तो जितचि असतां मेला । मरणास मारुन ज्याला ।
जन्ममृत्य न स्मरे त्याला। विवेकबळें ॥ ३० ॥
३०) देहबुद्धिच नसल्यानें तो जिवंत असून मेल्यासारखाच असतो. वासना नसल्यानें मृत्युला मारुन जिवंत राहतो. मी आत्मा आहे या विवेकाच्या बळावर त्याला जन्ममृत्युचे स्मरण उरत नाही.  
तो जनीं दिसतो परी वेगळा । वर्ततां भासे निराळा ।
दृश्य पदार्थ त्या निर्मळा । स्पर्शलाचि नाहीं ॥ ३१ ॥
३१) तो सामान्य माणसांमध्यें राहतो. परंतु त्यांच्याहुन वेगळा असतो. त्याचे एकंदर वागणें बघितलें तर त्याचे वेगळेपण अनुभवास येते. तो शुद्ध, निर्मळ असल्यानें त्याला अशुद्ध, मलिन व दृश्य पदार्थ स्पर्शच करुं शकत नाहीत.
असो ऐसे साधुजन । त्यांचें घडलियां भजन ।
तेणें भजनें पावन । इतर जन होती ॥ ३२ ॥
३२) असो. असे जें साधुसंत असतात त्यांची भक्ति केली तर त्या भक्तीनें इतर सामान्य माणसें पवित्र होतात.
सद्गुरुचा जो अंकित साधक । तेणें केलाचि करावा विवेक ।
विवेक केलियां तर्क । फुटे निरुपणीं ॥ ३३ ॥
३३) जो साधकवृती धरुन सद्गुरुच्या आज्ञेंत राहतो, त्यानें पुन्हा पुन्हा आत्मानात्मविवेक करीत जावा. सातत्यानें विवेक चालू ठेवला म्हणजे विषयविवेचनामध्यें नवीन विचार स्फुरतात. 
हेंचि साधकासी निरवणें । अद्वैत प्रांजळ निरुपणें ।
तुमचेंहि समाधान बाणे । साधूच ऐसें ॥ ३४ ॥
३४) साधजनांस हीच सूचना मी देतों कीं, त्यांनीं शुद्ध अद्वैताचे विवेचन प्रतिपादन करावें. तसें केल्यानें साधूला ज्या समाधानाचा अनुभव येतो त्याचा त्यांना देखील अनुभव येईल.   
जो संतांस शरण गेला । तो संतचि ठेला ।
इतर जनास उपेगा आला । कृपाळूपणें ॥ ३५ ॥
३५) जो साधक संतांना शरण जातो, तो स्वतःच संतपदास पोहोचतो. मग तो दयावंत होऊन इतर लोकांना मार्गदर्शन करतो.  
ऐसें संतांचें महिमान । संतसंगें होतें ज्ञान ।
सत्संगपरतें साधन । आणीक नाहीं ॥ ३६ ॥
३६) संतांचा थोरपणा हा असा आहे. संतांच्या संगतीनें आत्मज्ञान होते. म्हणून जीवाचे कल्याण होण्यास संतसंगतीसारखें दुसरें साधन नाही. 
गुरुभजनाचेनि आधारें । निरुपणाचेनि विचारें ।
क्रियाशुद्ध निर्धारें । पाविजे पद ॥ ३७ ॥
३७) सद्गुरुच्या भक्तीचा आधार घ्यावा. सदैव आत्मानात्म विचार करावा. आणि आचरण शुद्ध ठेवावें. या तीनही गोष्टींनी माणसाला खात्रीनें ब्रह्मपद प्राप्त होते.    
परमार्थाचें जन्मस्थान । तेंचि सद्गुरुचें भजन ।
सद्गुरुभजनें समाधान । अकस्मात बाणे ॥ ३८ ॥
३८) सद्गुरुच्या भक्तीमध्येंच परमार्थ आहे. सद्गुरुच्या भक्तीनें माणसाला समाधानाचा त्वरित लाभ होतो.  
देह मिथ्या जाणोनि जीवें । याचें सार्थकचि करावें ।
भजनभावें तोषवावें । चित्त सद्गुरुचें ॥ ३९ ॥
३९) आपला देह खरा नाहीं हें मनापासून ओळखावें आणि त्याचे सार्थक करुन घ्यावें. अत्यंत मनापासून शुद्ध भावनेनें भक्ति करुन सद्गुरुचें चित्त प्रसन्न करावें. 
शरणांगतांची वाहे चिंता । तो येक सद्गुरु दाता ।
जैसें बाळक वाढवी माता । नाना येत्नें करुनी ॥ ४० ॥  
४०) आपल्याला जो शरण येतो त्याची चिंता, काळजी सद्गुरु घेतो. जशी माता आपल्या मुलाला अनेक प्रकारें सांभाळून लहानाचा मोठा करते. तसाच सद्गुरु आपल्या शिष्याला परमार्थामध्यें लहानाचा मोठा करतो.    
म्हणौन सद्गुरुचें भजन । जयासि घडे तोचि धन्य ।
सद्गुरुविण समाधान । आणीक नाहीं ॥ ४१ ॥
४१) म्हणून सद्गुरुची भक्ति ज्याचेकडून घडते त्याचे जीवन धन्य होते. सद्गुरुवाचून समाधान मिळविण्याचा अन्य मार्ग नाही. 
सरली शब्दाची खटपट । आला ग्रंथाचा सेवट ।
येथें सांगितलें पष्ट । सद्गुरुभजन ॥ ४२ ॥
४२) आता शब्दांची खटपट संपली. या ग्रंथाचा शेवट आला आहे. या ग्रंथामध्यें सद्गुरुची भक्ति करावी असें अगदी स्पष्ट सांगितलें आहे.      
सद्गुरुभजनापरतें कांहीं । मोक्षदायेक दुसरें नाहीं ।
जयास न मने तेंहीं । अवलोकावी गुरुगीता ॥ ४३ ॥
४३) सद्गुरुच्या भक्तीवांचून मोक्ष देणारे असें दुसरें साधन नाही. माझें हें सांगणें ज्याला पटत नाहीं, त्यानें गुरुगीता अभ्यासावी
तेथें निरोपिलें बरवें । पार्वतीप्रति सदाशिवें ।
याकारणें सद्भावें । सद्गुरुचरण सेवावे ॥ ४४ ॥
४४)गुरुगीतेमध्यें श्रीशंकरांनीं पार्वतीला हेंच उत्तम रीतीनें सांगितलें आहे. म्हणून अगदी मनापासून खर्‍या भक्तीनें श्रद्धेनें श्रीसद्गुरुच्या पायांची सेवा करावी.     
जो ये ग्रंथींचा विवेक । विवंचूनि पााहे साधक ।
तयास सांपडे येक । निश्र्चय ज्ञानाचा ॥ ४५ ॥
४५) या ग्रंथामध्यें जे विचार मांडलेले आहेत त्यावर जो साधक विचार करील त्याला आढळेल येथें आत्मज्ञानच निश्र्चितपणें प्रतिपादन केलें आहे. 
जे ग्रंथीं बोलिलें अद्वैत । तो म्हणो नये प्राकृत । 
सत्य जाणावा वेदांत । अर्थविषंई ॥ ४६ ॥
४६) ज्या ग्रंथामध्यें अद्वैत सांगितलेले असते तो मराठींत आहे म्हणून त्यास कमी लेखूं नये. जोपर्यंत ग्रंथाचा अर्थ अद्वैत आहे तोपर्यंत तें तत्वज्ञान अगदी खरें मानावें. 
प्राकृतें वेदांत कळे । सकळ शास्त्रीं पाहातां मिळे ।
आणी समाधान निवळे । अंतर्यामीं ॥ ४७ ॥
४७) मराठीमध्यें असल्यानें वेदान्त समजतो. शिवाय संस्कृत ग्रंथामधें तोच वेदांत प्रतिपादन केला आहे असेआढळेल. आणि मग अंतर्यामी समाधान मिळेल. 
तें प्राकृत म्हणों नये । जेथें ज्ञानाचे उपाये ।
मूर्खासि हें कळे काये । मर्कटा नारिकेळ जैसें ॥ ४८ ॥
४८) ज्या ग्रंथामधें आत्मज्ञानाचा उपाय सांगितला आहे, तो ग्रंथ संस्कृतामधें नसला तरी कमी समजू नये. माकडाला ज्याप्रमाणे नारळाची किंमत कळत नाही. त्याचप्रमाणें मूर्खास हें कळत नाही. 
आतां असो हें बोलणें । अधिकारपरत्वें घेणें ।
शिंपीमधील मुक्त उणें । म्हणों नये ॥ ४९ ॥
४९) आतां हें बोलणें पुरे झाले. प्रत्येकानें आपल्या लायकीप्रमाणें ग्रंथांतूंन जें घ्यावयाचे तें घ्यावें. शिंपल्यामधें मोती तयार होतो म्हणून मोत्याला कोणी उणा समजत नाहीत. 
जेथें नेति नेति श्रुती । तेथें न चले भाषावित्पत्ती ।
परब्रह्म आदिअंतीं । अनुर्वाच्य ॥ ५० ॥
५०) ब्रह्मस्वरुप कळत नाही, असें म्हणून जेथें वेदानें हार खाल्ली तेथें भाषेचें चातुर्य उपयोगी पडत नाही. आरंभापासून शेवटपर्यंत परब्रह्म शब्दाच्या आवाक्याबाहेरचें असतें.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे देहान्तनिरुपणनाम समास दहावा ॥
Samas Dahava Dehanta Nirupan 
समास दहावा देहान्तनिरुपण


Custom Search