Monday, October 26, 2020

Shri GopalDwadashaNam Stotram श्री गोपालद्वादशनाम स्तोत्रम्


 

Shri GopalDwadashaNam Stotram 
श्री गोपालद्वादशनाम स्तोत्रम्
Shri Gopal Dwadasha Nam Stotram is in Sanskrit. It is from Shri MahaBharat Aranya Parvani and appeared in ShriKrishna-Arjun discussion. These are the twelve pious names of God ShriKrishna. The devotee who recites three times in a day receives the blessings of yGod. the punya is equal to hundred Kanya Dan Punya and thousand Aswamsgha Yagnya is said in this stotra.
  श्रीगोपालद्वादशनाम स्तोत्रम्
शृणुध्वं मुनयः सर्वे गोपालस्य महात्मनः ।
अनंतस्याप्रमेयस्य नामद्वादशं स्तवम् ॥ १ ॥
अर्जुनाय पुरा गीतं गोपालेन महात्मनः । 
द्वारकायां प्रार्थयते यशोदायाश्र्च संनिधौ ॥ २ ॥
अस्य श्रीदिव्यद्वादशनामस्तोत्रमहामंत्रस्य फाल्गुनऋषिः ,
अनुष्टुप् छंदः, श्रीकृष्णः परमात्मा देवता, 
ॐ बीजं स्वाहेति शक्तिः , श्रीगोपालकृष्णप्रीत्यर्थे जपे विनियोगः ॥
अथ ध्यानम् ॥
जानुभ्यामपि धावंतं बाहुभ्यामतिसुंदरम् ॥
सकुंडलालकं बालं गोपालं चिंतयेद्बुधः ॥ १ ॥
प्रथमं तु हरि वंद्यं द्वितीयं केशवं तथा ।
तृतीये पद्मनाभं तु चतुर्थं वामनं तथा ॥ २ ॥
पंचमं वेदगर्भं च षष्ठं तु मधुसूदनम् ।
सप्तमं वासुदेवं च वाराहं चाष्टमं तथा ॥ ३ ॥
नवमं पुंडरीकाक्षं दशमं तु जनार्दनम् । 
कृष्णमेकादशं प्रोक्तं द्वादशं श्रीधरं तथा ॥ ४ ॥
एतद्द्वादशनामानि मया प्रोक्तानि फाल्गुन ।
कालत्रये पठेद्यस्तु तस्य पुण्यफलं शृणु ॥ ५ ॥
चांद्रायणसहस्रस्य कन्यादानशतस्य च ।
अश्र्वमेधसहस्रस्य फलमाप्नोति मानवः ॥ ६ ॥
इति श्रीमहाभारतेऽरण्यपर्वणि श्रीकृष्णार्जुनसंवादे द्वादशनामस्तोत्रं संपूर्णम ॥
Shri GopalDwadashaNam Stotram 
श्री गोपालद्वादशनाम स्तोत्रम्





Custom Search

Shri Dnyaneshwari Adhyay 4 Part 2 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ४ भाग २


 

Shri Dnyaneshwari Adhyay 4 Part 2 
Ovya 26 to 50 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ४ भाग २ 
ओव्या २६ ते ५०

कैसा नेणों मोहो वाढीनला । तेणें बहुतेक काळु व्यर्थ गेला ।

म्हणोनि योगु हा लोपला । लोकीं इये ॥ २६ ॥

२६) हा मोह इतका कसा वाढला कोण जाणें ! त्यामुळें बहुतेक काळ व्यर्थ गेला आणि म्हणून या लोकांतला हा निष्काम कर्मयोग बुडाला.

तोचि हा आजि आतां । तुजप्रती कुंतीसुता ।

सांगितला आम्ही तत्त्वता । भ्रांति न करीं ॥ २७ ॥

२७) तोच हा योग अर्जुना, आम्हीं तुला आज खरोखर सांगितला, याविषयीं संशय ठेवूं नकोस.

हें जीवींचें निज गुज । परी केवीं राखों तुज ।

जे पढियेसी तूं मज । म्हणऊनियां ॥ २८ ॥

२८) हा योग ( म्हणजे ) माझ्या जिवाची अगदीं गुप्त गोष्ट आहे; पण तुझ्यापासून ती कशी चोरुन ठेवूं ? कारण तूं माझा अगदी लाडका पडलास.

तूं प्रेमाचा पुतळा । भक्तीचा जिव्हाळा ।

मैत्रियेची चित्कळा । धनुर्धरा ॥ २९ ॥

२९) अर्जुना, तूं प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा व सख्याची जीवनकला आहेस.

तूं अनुसंगाचा ठावो । आतां तुज काय वंचूं जावों ।

जरी संग्रामारुढ आहों । जाहलों आम्ही ॥ ३० ॥

३०) अर्जुना, तुझा व माझा संबंध अगदीं निकटचा आहे. या वेळीं तुझी फसवणूक कशी करावी ? जरी आम्ही युद्धाला सज्ज झालों आहों;

तरी नावेक हें सहावें । गाजाबज्यही न धरावें ।

परी तुझें अज्ञानत्व हरावें । लागे आधीं ॥ ३१ ॥

३१ तरी क्षणभर तें बाजूला ठेवून, या गडबडीचाहिं विचार मनांत न आणतां पहिल्यानें तुझें अज्ञान घालवून टाकलें पाहिजे. 

तंव अर्जुन म्हणे हरी । माय आपुलेयाचा स्नेहो करी ।

एथ विस्मयो काय अवधारीं । कृपानिधी ॥ ३२ ॥

३२) तेव्हां अर्जुन म्हणाला, कृपानिधि श्रीहरि, पाहा बरें, आई आपल्या ( मुलांवर ) ममता करते, त्यांत नवल तें काय ?

तूं संसारश्रांतांची साउली । अनाथा जीवांची माउली ।

आमुतें कीर प्रसवली । तुझी कृपा ॥ ३३ ॥

३३) संसारतापानें थकलेल्यांची तूं सावली आहेस; अनाथ जीवाची आई आहेस, आम्हांला तर केवळ तुझ्या कृपेनेंच जन्मास घातलें आहे.   

देवा पांगुळ एकादें विइजे । तरी जन्मौनि जोजारु साहिजे ।

हें बोलों काय तुझें । तुजचि पुढां ॥ ३४ ॥

३४) देवा, ( आईनें ) एखाद्या पांगळ्या मुलाला जन्म दिला, तर जन्मापासून त्याचा त्रास तिला काढावाच लागतो; या तुझ्या ( गोष्टीं ) तुझ्यासमोर काय बोलाव्या.

आतां पुसेन जें मी कांहीं । तेथ निकें चित्त देईं ।

तेवींचि देवें कोपावें ना कांहीं । बोला एका ॥ ३५ ॥  

३५) आतां मी जें काहीं विचारीन, त्याकडे चांगलें चित्त दे. त्याचप्रमाणें देवा, माझ्या या बोलाचा ( प्रश्र्णाचा ) मुळीं राग धरुं नकोस.

तरी मागील जे वार्ता । तुवां सांगितली होती अनंता ।

ते नावेक मज चित्ता । मानेचिना ॥ ३६ ॥

३६) अनंता, पूर्वींची गोष्ट म्हणून जी तूं मला सांगितलीस, ती क्षणभर माझ्या मनाला पटतच नाहीं.  

जे तो विवस्वतु म्हणजे कायी । ऐसें हें वडिलां ठाउकें नाहीं ।

तरी तुवांचि केवीं पाहीं । उपदेशिला ॥ ३७ ॥

३७) पाहा, तो विवस्वत म्हणजे कोण हें वाडवडिलांनासुद्धां ठाऊक नाहीं; तर तूं त्याला उपदेश केलास, हे कसें शक्य आहे ?  

तो तरी आइकिजे बहुतां काळांचा । आणि तूं तंव कृष्ण सांपेचा ।

म्हणोनि गा इये मातुचा । विसंवादु ॥ ३८ ॥

३८) तो तर फार पूर्वींच्या काळाचा, म्हणजे देवा, हें तुझें बोलणें विसंगत आहे.

तेवींचि देवा चरित्र तुझें । आपण कांहीं काय जाणिजे ।

हें लटिकें केवीं म्हणिजे । एकिहेळां ॥ ३९ ॥

३९) तसेंच; देवा, तुझें चरित्र मला कसें काय समजणार ? तेव्हा हें एकदम खोटें तरी कसें म्हणावें ?

परी हेचि मातु आघवी । मी परियेसें तैशी सांगावी ।

जे तुवांचि तया रवीं केवीं । उपदेशु केला ॥ ४० ॥   

४०) तेव्हां तूंच त्या सूर्याला उपदेश कसा केलास, हीच सगळी हकीकत मला पटेल तशी सांग.

तंव कृष्ण म्हणे पंडुसुता । तो विवस्वतु जैं होता ।

तैं आम्ही नसों ऐसीचित्ता । भ्रांति जरी तुज ॥ ४१ ॥

४१) त्यावर श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना, जेव्हा तो विवस्वान् होता, तेव्हां आम्ही नव्हतों, अशी जर तुझ्या चित्ताला भ्रांति झाली आहे,

तरी तूं गा हें नेणसी । पैं जन्में आम्हां तुम्हांसी ।

बहुतें गेलीं परी तियें न समरसी । आपलीं तूं ॥ ४२ ॥

४२) तरी अरे, तुला हें माहीत नाहीं कीं, तुमचे व आमचे ( आजपर्यंत ) कितीतरी जन्म होऊन गेलेले आहेत; पण तुला आपल्या जन्मांची आठवण नाही.

मी जेणें जेणें अवसरें । जें जें होऊनि अवतरें ।

तें समस्तही स्मरें । धनुर्धरा ॥ ४३ ॥

४३) ज्या ज्या वेळीं जें जें रुप घेऊन मी अवतरलों, तें तें सगळे अर्जुना मला आठवतें.

म्हणोनि आघवें । मागील मज आठवें ।

मी अजुही परि संभवें । प्रकृतियोगें ॥ ४४ ॥

४४) म्हणून मागचें सगळें मला आठवतें. मी जन्मरहित आहें. पण मायेच्या योगानें जन्म घेतों.

माझें अव्ययत्व तरी न नसे । परी होणें जाणें एक दिसे ।

तें प्रतिबिंबे मायावशें । माझांचि ठायीं ॥ ४५ ॥  

४५) माझा अविनाशीपणा तर नाहींसा होत नाहीं. पण अवतार घेणें व संपविणें ही जी एक क्रिया ( माझ्या संबंधानें ) दिसते, ती माझ्या ठिकाणीं मायेच्या योगानें भासते.

माझी स्वतंत्रता तरी न मोडे । परी कर्माधीनु ऐसा आवडे ।

तेंही भ्रांतिबुद्धि तरी घडे । एर्‍हवीं नाहीं ॥ ४६ ॥   

४६) माझी स्वतंत्रता तर बिघडतच नाहीं; परंतु मी कर्माधीन आहे, असें जें दिसतें, ते भ्रांत ( अज्ञान ) बुद्धि असली तरच दिसतें, एरव्हीं नाहीं.     

कीं एकचि दिसे दुसरें । तें दर्पणाचेनि आधारें ।

एर्‍हवीं काय वस्तुविचारें । दुजें आहे ॥ ४७ ॥

४७) किंवा एकाच वस्तूचीं दोन रुपें दिसतात; पण तीं केवळ आरशाच्या योगानें दिसतात; एर्‍हवीं ( त्या मूळ ) वस्तूचा विचार केला तर, तिला दुसरें ( रुप ) आहे काय ?

तैसा अमूर्तचि मी किरीटी । परी प्रकृति जैं अधिष्ठीं ।

तैं साकारपणें नटें नटीं । कार्यालागीं ॥ ४८ ॥

४८) तसा अर्जुना, मी निराकारच आहें;  पण जेव्हां मायेचा आश्रय करतों तेव्हां कांहीं विशेष कार्यासाठी मी सगुण रुपाच्या वेषानें नटतों.

जे धर्मजात आघवें । युगायुगीं म्या रक्षावें ।

ऐसा ओघु हा स्वभावें । आद्य असे ॥ ४९ ॥

४९) कारण कीं, जेवढे धर्म म्हणून आहेत, तेवढ्या सर्वांचे प्रत्येक युगांत मी रक्षण करावें, असा क्रम स्वभावतः अगदीं मुळापासून चालत आलेला आहे. 

म्हणोनि अजत्व परतें ठेवीं । मी अव्यक्तपणही नाठवीं ॥

जे वेळीं धर्मातें अभिभवी । अधर्मु हा ॥ ५० ॥

५०) म्हणून ज्या वेळेला अधर्म हा धर्माचा पराभव करतों, त्या वेळेला मी आपला जन्मरहितपणा बाजूला ठेवतों व आपलें अव्यक्तपणहि मनांत आणीत नाहीं. 




Custom Search


ShriRamcharitmans Part 57 श्रीरामचरितमानस भाग ५७

 

ShriRamcharitmans Part 57 
Doha 260 to 263 
श्रीरामचरितमानस भाग ५७ 
दोहा २६० ते २६३ 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड

दोहा—राम बिलोके लोग सब चित्र लिखे से देखि ।

चितई सीय कृपायतन जानी बिकल बिसेषि ॥ २६० ॥

श्रीरामांनी सर्व लोकांकडे पाहिले. ते चित्राप्रमाणे स्तब्ध झालेले पाहून कृपासागर श्रीरामांनी सीतेकडे कटाक्ष टाकला आणि ती फार व्याकूळ झाल्याचे त्यांना दिसले. ॥ २६० ॥

देखी बिपुल बिकल बैदेही । निमिष बिहात कलप सम तेही ॥

तृषित बारि बिनु जो तनु त्यागा । मुएँ करइ का सुधा तड़ागा ॥

त्यांनी जानकीला फार व्याकूळ झाल्याचे पाहिले. तिचा एक-एक क्षण कल्पाप्रमाणे जात होता. तहानेने व्याकूळ झालेला माणूस पाण्याविना मेला, तर तो मेल्यावर अमृताचा तलाव मिळाला तरी काय उपयोग ? ॥ १ ॥

का बरषा सब कृषी सुखानें । समय चुकें पुनि का पछितानें ॥

अस जियँ जानि जानकी देखी । प्रभु पुलके लखि प्रीति बिसेषी ॥

सर्व शेती करपून गेल्यावर पाऊस आला तरी काय उपयोग ? वेळ निघून गेल्यावर मग पश्र्चात्ताप करुन काय होणार ? मनात असा विचार करुन श्रीरामांनी जानकीकडे पाहिले आणि तिचे उत्कट प्रेम पाहून ते पुलकित झाले. ॥ २ ॥

गुरहि प्रनामु मनहिं मन कीन्हा । अति लाघवँ उठाइ धनु लीन्हा ॥

दमकेउ दामिनि जिमि जब लयऊ । पुनि नभ धनु मंडल सम भयऊ ॥

त्यांनी मनातल्या मनात गुरुंना प्रणाम केला आणि मोठ्या चपळाईने धनुष्य उचलले. जेव्हा त्यांनी ते हाती घेतले, तेव्हा ते धनुष्य वीजेप्रमाणे चमकले आणि मग अंतराळात वर्तुळाकार झाले. ॥ ३ ॥

लेत चढ़ावत खैंचत गाढ़ें । काहुँ न लखा देख सबु ठाढ़ें ॥

तेहि छन राम मध्य धनु तोरा । भरे भुवन धुनि घोर कठोरा ॥

ते घेताना, सज्ज करताना व जोराने ओढताना कुणीच पाहिले नाही. ( कारण या तिन्ही गोष्टी अतिशय वेगाने घडल्या ) सर्वांनी बघितले की श्रीराम धनुष्य ओढून उभे आहेत. त्याच क्षणी श्रीरामांनी ते मधोमध मोडले. त्या भयंकर कडकडाटाने त्रैलोक्य निनादून गेले. ॥ ४ ॥

छं०—भरे भुवन घोर कठोर रव रबि बाजि तजि मारगु चले ।

चिक्करहिं दिग्गज डोल महि अहि कोल कूरुम कलमले ॥

सुर असुर मुनि कर कान दीन्हें सकल बिकल बिचारहिं ।

कोदंड खंडेउ राम तुलसी जयति बचन उचारहीं ॥

भयंकर कठोर आवाजाने त्रैलोक्य दणाणून गेले. सूर्याचे घोडे मार्ग सोडून धावू लागले. दिग्गज चीत्कार करु लागले. पृथ्वी डगमगू लागली. शेष, वराह व कच्छप व्याकूळ होऊन तळमळू लागले. देव, राक्षस व मुनी सर्वजण कानांवर हात ठेवून व्याकूळ होऊन विचार करु लागले. तुलसीदास म्हणतात कीं सर्वांना पटले की, श्रीरामांनी धनुष्य मोडून टाकले, तेव्हा सर्वजण ‘ श्रीरामचंद्र की जय ‘ असा जयजयकार करु लागले.

सो०—संकर चापु जहाजु सागरु रघुबर बाहुबलु ।

बूड़ सो सकल समाजु चढ़ा जो प्रथमहिं मोह बस ॥ २६१ ॥

शिवांचे धनुष्य जहाज आहे आणि श्रीरामचंद्रांचे बाहुबल समुद्र आहे. धनुष्य मोडल्यामुळे जो समाज मोहामुळे या जहाजावर चढला होता, तो बुडून गेला. ॥ २६१ ॥

प्रभु दोउ चापखंड महि डारे । देखि लोग सब भए सुखारे ॥

कौसिकरुप पयोनिधि पावन । प्रेम बारि अवगाहु सुहावन ॥

प्रभु श्रीरामांनी धनुष्याचे दोन तुकडे भूमीवर टाकून दिले. हे पाहून सर्वांना आनंद झाला. विश्र्वामित्ररुपी पवित्र समुद्रामध्ये प्रेमरुपी सुंदर अथांग जल भरले होते. ॥ १ ॥

रामरुप राकेसु निहारी । बढ़त बीचि पुलकावलि भारी ॥

बाजे नभ गहगहे निसाना । देवबधू नाचहिं करि गाना ॥

श्रीरामरुपी पूर्ण चंद्राला पाहून विश्र्वामित्ररुपी समुद्रात रोमांचरुपी मोठ्या लहरी उसळू लागल्या. आकाशात अत्यंत जोराने नगारे वाजू लागले आणि अप्सरा गात गात नाचू लागल्या. ॥ २ ॥

ब्रहमादिक सुर सिद्ध मुनीसा । प्रभुहि प्रसंसहिं देहिं असीसा ॥

बरिसहिं सुमन रंग बहु माला । गावहिं किंनर गीत रसाला ॥

ब्रह्मदेव इत्यादी देव, सिद्ध, मुनीश्र्वर हे प्रभूंची प्रशंसा करु लागले आणि आशीर्वाद देऊ लागले. ते रंगी-बेरंगी फुले व माळा यांचा वर्षाव करु लागले. किन्नर रसाळ गायन करु लागले. ॥ ३ ॥

रही भुवन भरि जय जय बानी । धनुषभंग धुनि जात न जानी ॥

मुदित कहहिं जहँ तहँ नर नारी । भंजेउ राम संभुधनु भारी ॥

संपूर्ण ब्रह्मांडात जयजयकाराचा ध्वनी दुमदूमु लागला. त्यामुळे धनुष्य-भंगाचा ध्वनी त्यात केव्हा विलीन झाला, हे कळलेच नाही. जिकडे-तिकडे स्त्री-पुरुष प्रसन्न होऊन म्हणत होते की, ‘ श्रीरामचंद्रांनी प्रचंड शिवधनुष्याचा भंग केला. ॥ ४ ॥

दोहा—बंदी मागध सूतगन बिरुद बदहिं मतिधीर ।

करहिं निछावरि लोग सब हय गय धन मनि चीर ॥ २६२ ॥

धीर बुद्धीचे लोक, भाट, मागध आणि सूतजन हे श्रीरामांच्या बिरुदावलीचे वर्णन करु लागले. सर्वजण घोडे, हत्ती, धन, रत्ने आणि वस्त्रे श्रीरामांवरुन ओवाळून टाकू लागले. ॥ २६२ ॥

झॉंझि मृदंग संख सहनाई । भेरि ढोल दुंदुभी सुहाई ॥

बाजहिं बहु बाजने सुहाए । जहँ तहँ जुबतिन्ह मंगल गाए ॥

झांज, मृदंग, शंख, सनई, भेरी, ढोल आणि मोहक नगारे इत्यादी सुंदर वाद्ये मधुर वादन करु लागली. जिकडे-तिकडे तरुणी मंगल गीते गाऊ लागल्या. ॥ १ ॥

सखिन्ह सहित हरषी अति रानी । सूखत धान परा जनु पानी ॥

जनक लहेउ सुखु सोचु बिहाई । पैरत थकें थाह जनु पाई ॥

राणी सख्यांसह अत्यंत आनंदित झाली, जणू सुकत चाललेल्या भात पिकावर पाऊस पडल्यामुळे त्याला जीवदान मिळाले. जनक राजांची चिंता जाऊन त्यांना आनंद झाला. जणू पोहूनपोहून थकून गेलेल्या माणसाला आधार मिळाला. ॥ २ ॥

श्रीहत भए भूप धनु टूटे । जैसें दिवस दीप छबि छूटे ॥

सीय सुखहि बरनिअ केहि भॉंती । जनु चातकी पाइ जलु स्वाती ॥

ज्याप्रमाणे दिवसा दिव्याची शोभा राहात नाही, त्याप्रमाणे धनुष्यभंग झाल्यामुळे जमलेले राजेलोक निस्तेज झाले. सीतेच्या सुखाला पारावार नव्हता. जणू चातक पक्षिणीला स्वातीचे जल पिण्यास लाभले. ॥ ३ ॥

रामहि लखनु बिलोकत कैसें । ससिहि चकोर किसोरकु जैसें ॥

सतानंद तब आयसु दीन्हा । सीतॉं गमनु राम पहिं कीन्हा ॥

ज्याप्रमाणे चकोराचे पिल्लू चंद्राला चकित होऊन पाहात राहाते, त्याप्रमाणे लक्ष्मण श्रीरामांना पाहात होता. तेव्हा शतानंदांच्या आज्ञेने सीता श्रीरामांच्याजवळ गेली. ॥ ४ ॥

दोहा—संग सखीं सुंदर चतुर गावहिं मंगलचार ।

गवनी बाल मराल गति सुषमा अंग अपार ॥ २६३ ॥

तिच्या बरोबर सुंदर व चतुर सख्या मंगल गीते गात निघाल्या आणि सीता बालहंसीच्या चालीने निघाली. तिची सर्वांगे अपार कांतीने उजळली होती. ॥ २६३ ॥

सखिन्ह मध्य सिय सोहति कैसें । छबिगन मध्य महाछबि जैसें ॥

कर सरोज जयमाल सुहाई । बिस्व बिजय सोभा जेहिं छाई ॥

सख्यांच्यामध्ये सीता अशी शोभून दिसत होती की, जणू पुष्कळशा लावण्यवतींच्या मध्ये महालावण्यवती असावी. तिच्या करकमलांमध्ये सुंदर जयमाला होती. तिच्यामध्ये विश्र्वविजयी शोभा सामावली होती. ॥ १ ॥

तन सकोचु मन परम उछाहू । गूढ़ प्रेमु लखि परइ न काहू ॥

जाइ समीप राम छबि देखी । रहि जनु कुअँरि चित्र अवरेखी ॥

सीतेचे शरीर लाजेने चूर होते, परंतु मनामध्ये परम उत्साह भरलेला होता. तिचे ते गुप्त प्रेम कुणाला कळून आले नाही. जवळ गेल्यावर श्रीरामांचे लावण्य पाहून राजकुमारी सीता चित्रासारखी तटस्थ झाली. ॥ २ ॥

चतुर सखीं लखि कहा बुझाई । पहिरावहु जयमाल सुहाई ॥

सुनत जुगल कर माल उठाई । प्रेम बिबस पहिराइ न जाई ॥

चतुर सखीने तिची ही दशा पाहून समजाविले की, ‘ अग, ही सुंदर जयमाला त्यांना घाल ना. ‘ हे ऐकून सीतेने दोन्ही हातांनी माला उचलली, परंतु प्रेमविवश झाल्यामुळे तिला ती घालता येईना. ॥ ३ ॥

सोहत जनु जुग जलज सनाला । ससिहि सभीत देत जयमाला ॥

गावहिं छबि अवलोकि सहेली । सियँ जयमाल राम उर मेली ॥

जणूं देठांसह दोन कर-कमळे चंद्राला पाहाताना बावरुन 

जयमाला अर्पण करीत आहेत. ते रुप पाहून सख्या गाणी 

गाऊ लागल्या. तेव्हा सीतेने श्रीरामांच्या गळ्यात 

जयमाला घातली. ॥ ४ ॥



Custom Search

ShriRamcharitmans Part 56 श्रीरामचरितमानस भाग ५६

 

ShriRamcharitmans Part 56 
Doha 256 to 259 
श्रीरामचरितमानस भाग ५६ 
दोहा २५६ ते २५९ 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड

दोहा—मंत्र परम लघु जासु बस बिधि हरि हर सुर सर्ब ।

महामत्त गजराज कहुँ बस कर अंकुस खर्ब ॥ २५६ ॥

ब्रह्मदेव, विष्णू, शिव व सर्व देव ज्याच्या अधीन असतात, तो मंत्र अत्यंत छोटा असतो. महान मस्तवाल गजराजाला छोटासा अंकुर ताब्यात ठेवतो. ॥ २५६ ॥

काम कुसुम धनु सायक लीन्हे । सकल भुवन अपने बस कीन्हे ॥

देबि तजिअ संसउ अस जानी । भंजब धनुष राम सुनु रानी ॥

कामदेवाने फुलांच्याच धनुष्यबाणाने सर्व लोकांना वश करुन ठेवले आहे. हे देवी, हे जाणून संशय सोडून द्या. हे राणी, सांगते ते ऐका. श्रीरामचंद्र धनुष्य नक्कीच मोडतील. ‘ ॥ १ ॥

सखी बचन सुनि भै परतीती । मिटा बिषादु बढ़ी अति प्रीती ॥

तब रामहि बिलोकि बैदेही । सभय हृदयँ बिनवति जेहि तेही ॥

सखीचे वचन ऐकून राणीला विश्र्वास वाटू लागला. तिचा विषाद मावळला आणि श्रीरामांविषयी तिच्या मनातील प्रेम अधिकच वाढले. त्याचवेळी श्रीरामांना पाहून सीता बावरलेल्या मनाने ज्या त्या देवांची विनवणी करु लागली. ॥ २ ॥

मनहीं मन मनाव अकुलानी । होहु प्रसन्न महेस भवानी ॥

करहु सफल आपनि सेवाकाई । करि हितु हरहु चाप गरुआई ॥

ती व्याकूळ होऊन मनातल्या मनात आळवत होती की, ‘ हे महेश-भवानी. माझ्यावर प्रसन्न व्हा. मी जी तुमची सेवा केली आहे, तिचे फळ मला द्या आणि माझ्यावर स्नेह ठेवून धनुष्याचा जडपणा नाहीसा करा. ॥ ३ ॥

गननायक बरदायक देवा । आजु लगें कीन्हिउँ तुअ सेवा ॥

बार बार बिनती सुनि मोरी । करहु चाप गुरुता अति थोरी ॥

हे गणनायका, वरदायी गणेशदेवा, मी आजच्या या दिवसासाठीच तुमची सेवा केली होती. वारंवार केलेली माझी विनंती ऐकून धनुष्याचा जडपणा खूपच कमी करुन टाका. ‘ ॥ ४ ॥

  दोहा—देखि देखि रघुबीर तन सुर मनाव धरि धीर ।

भरे बिलोचन प्रेम जल पुलकावली सरीर ॥ २५७ ॥

श्रीरघुनाथांच्याकडे पाहात-पाहात सीता धीर धरुन देवांची आळवणी करीत होती. तिच्या नेत्रांत प्रेमाश्रू भरले होते, आणि शरीर रोमांचित झाले होते. ॥ २५७ ॥

नीकें निरखि नयन भरि सोभा । पितु पनु सुमिरि बहुरि मनु छोभा ॥

अहह तात दारुनि हठ ठानी । समुझत नहिं कछु लाभु न हानी ॥

डोळे भरुन श्रीरामांचे लावण्य पाहाताना पित्याच्या पणाची आठवण येताच सीतेचे मन क्षुब्ध झाले. ती मनात म्हणू लागली, ‘ अहो, माझ्या वडिलांनी मोठा कठीण पण ठेवला आहे. त्यांना त्यातील लाभ-हानी काही समझेनाशी झाली आहे. ॥ १ ॥

सचिव सभय सिख देइ न कोई । बुध समाज बड़ अनुचित होई ॥

कहँ धनु कुलिसहु चाहि कठोरा । कहँ स्यामल मृदुगात किसोरा ॥

मंत्री घाबरत असल्यामुळे कुणी त्यांना सल्लाही देत नाही. पंडितांच्या सभेमध्ये हे जे घडत आहे, ते अयोग्य आहे. कुठे वज्रापेक्षाही कठोर धनुष्य आणि कुठे हे कोमल शरीराचे किशोर श्यामसुंदर ! ॥ २ ॥

बिधि केहि भॉंति धरौं उर धीरा । सिरस सुमन कन बेधिअ हीरा ॥

सकल सभा कै मति भै भोरी । अब मोहि संभुचाप गति तोरी ॥

हे विधात्या, मी मनात धीर कसा धरु ? शिरीषाच्या फुलातील केशराने कुठे हिरा छेदता येईल काय ? सर्व सभेची बुद्धी बावचळली आहे म्हणून हे शिव-धनुष्या, आता मला तुझाच एक आधार आहे. ॥ ३ ॥

निज जड़ता लोगन्ह पर डारी । होहि हरुअ रघुपतिहि निहारी ॥

अति परिताप सीय मन माहिं । लव निमेष जुग सय सम जाहीं ॥

हे धनुष्या ! तू आपला जडपणा लोकांच्यावर टाकून व श्रीरामांचे सुकुमार शरीर पाहून हलका हो. ‘ अशा प्रकारे सीतेच्या मनाला मोठी व्यथा लागून राहिली होती. निमेषाचा एक अंश सुद्धा तिला युगासारखा वाटत होता. ॥ ४ ॥

   दोहा—प्रभुहि चितइ पुनि चितव महि राजत लोचन लोल ।

खेलत मनसिज मीन जुग जनु बिधु मंडल डोल ॥ २५८ ॥

प्रभु श्रीरामचंद्रांना पाहून नंतर पृथ्वीकडे पाहाणार्‍या सीतेचे चंचल नयन असे शोभत होते की, जणू चंद्रमंडलरुपी जलपूर्ण कलशात कामदेवाच्या दोन मासोळ्या खेळत आहेत. ॥ २५८ ॥

गिरा अलिनि मुख पंकज रोकी । प्रगट न लाज निसा अवलोकी ॥

लोचन जलु रह लोचन कोना । जैसें परम कृपन कर सोना ॥

सीतेच्या वाणीरुपी भ्रमरीला तिच्या मुखरुपी कमळाने कोंडून ठेवले होते. लज्जारुपी रात्र पाहून ती प्रकट होत नव्हती. ज्याप्रमाणे एखाद्या कंजूष कोपर्‍यातच सोने गाडून ठेवतो त्याप्रमाणे तिच्या नेत्रांतील पाणी कोपर्‍यातच थबकले होते. ॥ १ ॥      

सकुची ब्याकुलता बड़ि जानी । धरि धीरज प्रतीति उर आनी ॥

तन मन बचन मोर पनु साचा । रघुपति पद सरोज चितु राचा ॥

आपली व्याकुळता पाहून सीता लाजली आणि धीर धरुन तिने मनात विश्र्वास बाळगला की, ‘ जर तन, मन आणि वचन यांनी माझा पण खरा असेल आणि श्रीरघुनाथांच्या चरणकमळी माझे चित्त खरोखरच अनुरुक्त असेल, ॥ २ ॥

तौ भगवानु सकल उर बासी । करिहि मोहि रघुबर कै दासी ॥

जेहि कें जेहि पर सत्य सनेहू । सो तेहि मिलइ न कछु संदेहू ॥

तर सर्वांच्या हृदयात निवास करणारे भगवंत मला रघुश्रेष्ठ श्रीरामचंद्रांची दासी नक्कीच बनवतील, ज्याचे ज्याच्यावर खरे प्रेम असते, त्याला तो मिळतोच, यात काही शंका नाही.’ ॥ ३ ॥

प्रभु तन चितइ प्रेम तन ठाना । कृपानिधान राम सबु जाना ॥

सियहि बिलोकि तकेउ धनु कैसें । चितव गरुरु लघु ब्यालहि जैसें ॥

प्रभु श्रीरामांना पाहून सीतेच्या शरीराने प्रेमाचा निश्र्चय केला. कृपानिधान श्रीरामांनी हे ओळखले. त्यांनी सीतेकडे पाहून धनुष्याकडे असे बघितले की, गरुड जसा छोट्या सापाकडे पाहतो. ॥ ४ ॥

दोहा—लखन लखेउ रघुबंसमनि ताकेउ हर कोदंडु ।

पुलकि गात बोले बचन चरन चापि ब्रह्मांडु ॥ २५९ ॥

इकडे जेव्हा लक्ष्मणाने पाहिले की, रघुकुलरत्न श्रीरामांनी शिव-धनुष्याकडे दृष्टी टाकली आहे, तेव्हा त्याचे शरीर शहारले त्याने ब्रह्मांडाला आपल्या चरणांनी दाबून म्हटले, ॥ २५९ ॥

दिसिकुंजरहु कमठ अहि कोला । धरहु धरनि धरि धीर न डोला ॥

रामु चहहिं संकर धनु तोरा । होहु सजग सुनि आयसु मोरा ॥

‘ हे दिग्गजांनो, हे कच्छपा, हे शेषा, हे वराहा ! तुम्ही धैर्याने पृथ्वीला धरुन ठेवा. कारण ती डळमळू नये. श्रीरामचंद्र शिवांचे धनुष्य मोडू पाहात आहेत. माझ आज्ञा समजून सर्वजण सावध राहा. ‘ ॥ १ ॥

चाप समीप रामु जब आए । नर नारिन्ह सुर सुकृत मनाए ॥

सब कर संसउ अरु अग्यानू । मंद महीपन्ह कर अभिमानू ॥

श्रीरामचंद्र जेव्हा धनुष्याजवळ आले, तेव्हा सर्व स्त्री-पुरुषांनी देवांची व आपल्या पुण्यांची विनवणी केली. सर्वांचा संशय आणि अज्ञान, नीच राजांचा अभिमान, ॥ २ ॥

भृगुपति केरि गरब गरुआई । सुर मुनिबरन्ह केरि कदराई ॥

सिय कर सोचु जनक पछितावा । रानिन्ह कर दारुन दुख दावा ॥

परशुरामाचा प्रचंड गर्व, देव व मुनींची व्याकुळता ( भय ), सीतेची चिंता, जनकांचा पश्र्चात्ताप आणि राण्यांच्या दारुण दुःखाचा दावानल, ॥ ३ ३

संभुचाप बड़ बोहितु पाई । चढ़े जाइ सब संगु बनाई ॥

राम बाहुबल सिंधु अपारु । चहत पारु नहिं कोउ कड़हारु ॥

हे सर्व शिवांचे धनुष्यरुपी मोठे जहाज मिळाल्याने समूह बनवून, त्यावर आरुढ झाले. हे सर्व श्रीरामांच्या भुजांच्या बलरुपी अपार समुद्रापलीकडे जाऊ इच्छितात. परंतु कोणी नावाडी नाही. ॥ ४ ॥   



Custom Search

Wednesday, October 21, 2020

ShriRamcharitmans Part 55 श्रीरामचरितमानस भाग ५५

 

ShriRamcharitmans Part 55 
Doha 252 to 255 
श्रीरामचरितमानस भाग ५५ 
दोहा २५२ ते २५५ 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड

  दोहा—कहि न सकत रघुबीर डर लगे बचन जनु बान ।

            नाइ राम पद कमल सिरु बोले गिरा प्रमान ॥ २५२ ॥

श्रीरघुवीरांच्या भीतीमुळे तो काही बोलू शकला नव्हता, परंतु जनक राजांचे बोलणे त्याला बाणाप्रमाणे टोचू लागले. जेव्हा राहावले नाही तेव्हा श्रीरामचंद्रांच्या चरणकमलांवर मस्तक लववून त्याने स्पष्टपणे म्हटले, ॥ २५२ ॥

रघुबंसिन्ह महुँ जहँ कोउ होई । तेहिं समाज अस कहइ न कोई ॥

कही जनक जसि अनुचित बानी । बिद्यमान रघुकुलमनि जानी ॥

‘ जेथे रघुवंशीयांपैकी कोणीही असतो, त्या सभेत जनकांनी रघुकुलशिरोमणी श्रीराम येथे उपस्थित असताना जे शब्द उच्चारले आहेत, असे अनुचित कोणी बोलत नसते. ॥ १ ॥

सुनहु भानुकुल पंकज भानू । कहउँ सुभाउ न कछु अभिमानू ॥

जौं तुम्हारि अनुसासन पावौं । कंदुक इव ब्रह्मांड उठावौं ॥

हे सूर्यकुलरुपी ( कमलासाठी ) सूर्य असणार्‍या श्रीरामा ! ऐका. मी अभिमानाने नव्हे तर सहज म्हणून म्हणतो की, जर तुमची आज्ञा असेल तर मी ब्रह्मांडाला चेंडूप्रमाणे उचलून धरीन. ॥ २ ॥

काचे घट जिमि डारौं फोरी । सकउँ मेरु मूलक जिमि तोरी ॥

तव प्रताप महिमा भगवाना । को बापुरो पिनाक पुराना ॥

आणि कच्च्या मडक्याप्रमाणे फोडून टाकीन. मी सुमेरु पर्वताला मुळीप्रमाणे उघडून टाकू शकतो. हे भगवन ! तुमच्या प्रतापाच्या महिम्यापुढे हे बिचारे जीर्ण धनुष्य ते काय ? ॥ ३ ॥

नाथ जानि अस आयसु होऊ । कौतुकु करौं बिलोकिअ सोऊ ॥

कमल नाल जिमि चाप चढ़ावौं । जोजन सत प्रमान लै धावौं ॥

हे नाथ, असे मानून आज्ञा द्याल, तर गंमत करुन दाखवितो. ती पाहा तर खरे. धनुष्याला कमळाच्या देठीप्रमाणे उचलून घेऊन शंभर योजने धावत जाईन. ॥ ४ ॥

दोहा—तोरौं छत्रक दंड जिमि तव प्रताप बल नाथ ।

जौं न करौं प्रभु पद सपथ कर न धरौं धनु भाथ ॥ २५३ ॥

हे नाथ, आपल्या प्रतापाच्या बळावर मी हे धनुष्य कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे मोडून टाकीन. जर मी असे केले नाही, तर प्रभूंच्या चरणांची शपथ घेऊन सांगतो की, मग मी धनुष्य व भाता कधीही हाती धरणार नाही.’ ॥ २५३ ॥

लखन सकोप बचन जे बोले । डगमगानि महि दिग्गज डोले ॥

सकल लोग सब भूप डेराने । सिय हियँ हरषु जनकु सकुचाने ॥

लक्ष्मण रागाने ओरडताच पृथ्वी डळमळू लागली आणि दिग्गज हादरले. सर्व लोक आणि राजे घाबरले. सीतेला आनंद झाला आणि जनक वरमले. ॥ १ ॥

गुर रघुपति सब मुनि मन माहीं । मुदित भए पुनि पुनि पुलकाहीं ॥

सयनहिं रघुपति लखनु नेवारे । प्रेम समेत निकट बैठारे ॥

गुरु विश्र्वामित्र, श्रीरघुनाथ व सर्व मुनी मनात आनंदले आणि वारंवार रोमांचित झाले. श्रीरघुनाथांनी खूण करुन लक्ष्मणाला रोखले आणि प्रेमपूर्वक आपल्याजवळ बसवून घेतले. ॥ २ ॥

बिस्वामित्र समय सुभ जानी । बोले अति स्नेहमय बानी ॥

उठहु राम भंजहु भवचापा । मेटहु तात जनक परितापा ॥

शुभ वेळ आल्याचे जाणून विश्र्वामित्र अत्यंत प्रेमाने म्हणाले, ‘ हे रामा, ऊठ शिवांचे धनुष्य मोडून टाक आणि बाळा ! जनकांची चिंता दूर कर. ‘ ॥ ३ ॥

सुनि गुरु बचन चरन सिरु नावा । हरषु बिषादु न कछु उर आवा ॥

ठाढ़े भए उठि सहज सुभाएँ । ठवनि जुबा मृगराजु लजाएँ ॥

गुर-वचन ऐकून श्रीरामांनी त्यांच्या चरणी मस्तक ठेवले. त्यांच्या मनात हर्ष नव्हता की विषाद नव्हता. ते मोठ्या ऐटीने एखाद्या तरुण सिंहालाही लाजविल्यासारखे सहजपणे उभे राहिले. ॥ ४ ॥

दोहा—उदित उदयगिरि मंच पर रघुबर बालपतंग ।

बिकसे संत सरोज सब हरषे लोचन भृंग ॥ २५४ ॥

मंचरुपी उदयाचलावर रघुनाथरुपी बाल-सूर्य उगवताच सर्व संतरुपी कमळे फुलून गेली आणि त्यांचे नेत्ररुपी भ्रमर आनंदित झाले. ॥ २५४ ॥

नृपन्ह केरि आसा निसि नासी । बचन नखत अवली न प्रकासी ॥

मानी महिप कुमुद सकुचाने । कपटी भूप उलूक लुकाने ॥

राजांची आशारुपी रात्र नाहीशी झाली. त्यांच्या वचनरुपी तारांच्या समुदायाचे चमकणे बंद झाले. घमेंडी राजारुपी रात्रविकासी कमळे कोमेजली आणि कपटी राजारुपी घुबडे लपून बसली. ॥ १ ॥

भए बिसोक कोक मुनि देवा । बरिसहिं सुमन जनावहिं सेवा ॥

गुर पद बंदि सहित अनुरागा । राम मुनिन्ह सन आयसु मागा ॥

मुनी व देवरुपी चक्रवाकांचे दुःख सरले. ते फुलांचा वर्षाव करीत सेवा करु लागले. प्रेमाने गुरुंच्या चरणांना वंदन करुन श्रीरामचंद्रांनी मुनींची आज्ञा मागितली. ॥ २ ॥

सहजहिं चले सकल जग स्वामी । मत्त मंजु बर कुंजर गामी ॥

चलत राम सब पुर नर नारी । पुलक पूरि तन भए सुखारी ॥

संपूर्ण जगताचे स्वामी श्रीराम हे मस्त व श्रेष्ठ हत्तीच्या डौलदार चालीने निघाले. श्रीराम निघताच नगरातील सर्व स्त्री-पुरुष सुखावून गेले व रोमांचित झाले. ॥ ३ ॥

बंदि पितर सुर सुकृत सँभारे । जौं कछु पुन्य प्रभाउ हमारे ॥

तौ सिवधनु मृनाल की नाईं । तोरहुँ रामु गनेस गोसाईं ॥

त्यांनी पितर व देवांना वंदन करुन आपल्या पुण्याईचे स्मरण केले. ते म्हणाले, ‘ जर आमच्या पुण्याचा काही प्रभाव असेल, तर हे देवा गणेशा, श्रीराम हे शिव-धनुष्य कमळाच्या देठाप्रमाणे मोडून टाकू देत. ‘ ॥ ४ ॥

दोहा—रामहि प्रेम समेत लखि सखिन्ह समीप बोलाइ ।

सीता मातु सनेह बस बचन कहइ बिलखाइ ॥ २५५ ॥

सीतेची माता श्रीरामांना वात्सल्याने पाहून व सख्यांना जवळ बोलावून प्रेमवश सद्गदित होऊन म्हणाली, ॥ २५५ ॥

सखि सब कौतुकु देखनिहारे । जेउ कहावत हितू हमारे ॥

कोउ न बुझाइ कहइ गुर पाहीं । ए बालक असि हठ भलि नाहीं ॥

‘ हे सखी, हे जे आमचे हितचिंतक म्हणवितात, ते सर्व कौतुक पाहाणारे आहेत. यापैकी कोणीही गुरु विश्र्वामित्रांना समजावून का सांगत नाहीत की, हे श्रीराम लहान आहेत. त्यांच्यासाठी असा आग्रह धरणे चांगले नव्हे. ॥ १ ॥

रावन बान छुआ नहिं चापा । हारे सकल भूप करि दापा ॥

सो धनु राजकुअँर कर देहीं । बाल मराल कि मंदर लेहीं ॥

रावण व बाणासुर धनुष्याला स्पर्शसुद्धा करु शकले नाहीत आणि सर्व घमेंडखोर राजांनी ज्याच्यापुढे हात टेकले, तेच हे धनुष्य या सुकुमार राजकुमाराच्या हाती देत आहेत. हंसाचे पिल्लू कधी मंदराचल उचलू शकेल काय ? ॥ २ ॥

भूप सयानप सकल सिरानी । सखि बिधि गति कछु जाति न जानी ॥

बोली चतुर सखी मृदु बानी । तेजवंत लघु गनिअ न रानी ॥

ज्ञानी महाराजांचेही सर्व शहाणपण संपले आहे, असे वाटते. हे सखी, विधात्याची गती काही समजत नाही.’ असे म्हणून राणी गप्प बसली. तेव्हा एक चतुर सखी कोमल वाणीने म्हणाली, ‘ हे राणी, जो तेजस्वी असतो त्याला कधीही लहान सनजू नये.’ ॥ ३ ॥

कहँ कुंभज कहँ सिंधु अपारा । सोषेउ सुजसु सकल संसारा ॥

रबि मंडल देखत लघु लागा । उदयँ तासु तिभुवन तम भागा ॥

कुठे घटातून उत्पन्न झालेले मुनी अगस्त्य आणि कुठे अपार समुद्र. परंतु त्यांनी तो शोषून टाकला, त्यांची श्रेष्ठ कीर्ती विश्र्वात पसरली आहे. सूर्यमंडल दिसायला लहान दिसते, परंतु त्याचा उदय होताच तिन्ही लोकीचा अंधकार पळून जातो. ॥ ४ ॥



Custom Search