Monday, October 26, 2020

ShriRamcharitmans Part 56 श्रीरामचरितमानस भाग ५६

 

ShriRamcharitmans Part 56 
Doha 256 to 259 
श्रीरामचरितमानस भाग ५६ 
दोहा २५६ ते २५९ 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड

दोहा—मंत्र परम लघु जासु बस बिधि हरि हर सुर सर्ब ।

महामत्त गजराज कहुँ बस कर अंकुस खर्ब ॥ २५६ ॥

ब्रह्मदेव, विष्णू, शिव व सर्व देव ज्याच्या अधीन असतात, तो मंत्र अत्यंत छोटा असतो. महान मस्तवाल गजराजाला छोटासा अंकुर ताब्यात ठेवतो. ॥ २५६ ॥

काम कुसुम धनु सायक लीन्हे । सकल भुवन अपने बस कीन्हे ॥

देबि तजिअ संसउ अस जानी । भंजब धनुष राम सुनु रानी ॥

कामदेवाने फुलांच्याच धनुष्यबाणाने सर्व लोकांना वश करुन ठेवले आहे. हे देवी, हे जाणून संशय सोडून द्या. हे राणी, सांगते ते ऐका. श्रीरामचंद्र धनुष्य नक्कीच मोडतील. ‘ ॥ १ ॥

सखी बचन सुनि भै परतीती । मिटा बिषादु बढ़ी अति प्रीती ॥

तब रामहि बिलोकि बैदेही । सभय हृदयँ बिनवति जेहि तेही ॥

सखीचे वचन ऐकून राणीला विश्र्वास वाटू लागला. तिचा विषाद मावळला आणि श्रीरामांविषयी तिच्या मनातील प्रेम अधिकच वाढले. त्याचवेळी श्रीरामांना पाहून सीता बावरलेल्या मनाने ज्या त्या देवांची विनवणी करु लागली. ॥ २ ॥

मनहीं मन मनाव अकुलानी । होहु प्रसन्न महेस भवानी ॥

करहु सफल आपनि सेवाकाई । करि हितु हरहु चाप गरुआई ॥

ती व्याकूळ होऊन मनातल्या मनात आळवत होती की, ‘ हे महेश-भवानी. माझ्यावर प्रसन्न व्हा. मी जी तुमची सेवा केली आहे, तिचे फळ मला द्या आणि माझ्यावर स्नेह ठेवून धनुष्याचा जडपणा नाहीसा करा. ॥ ३ ॥

गननायक बरदायक देवा । आजु लगें कीन्हिउँ तुअ सेवा ॥

बार बार बिनती सुनि मोरी । करहु चाप गुरुता अति थोरी ॥

हे गणनायका, वरदायी गणेशदेवा, मी आजच्या या दिवसासाठीच तुमची सेवा केली होती. वारंवार केलेली माझी विनंती ऐकून धनुष्याचा जडपणा खूपच कमी करुन टाका. ‘ ॥ ४ ॥

  दोहा—देखि देखि रघुबीर तन सुर मनाव धरि धीर ।

भरे बिलोचन प्रेम जल पुलकावली सरीर ॥ २५७ ॥

श्रीरघुनाथांच्याकडे पाहात-पाहात सीता धीर धरुन देवांची आळवणी करीत होती. तिच्या नेत्रांत प्रेमाश्रू भरले होते, आणि शरीर रोमांचित झाले होते. ॥ २५७ ॥

नीकें निरखि नयन भरि सोभा । पितु पनु सुमिरि बहुरि मनु छोभा ॥

अहह तात दारुनि हठ ठानी । समुझत नहिं कछु लाभु न हानी ॥

डोळे भरुन श्रीरामांचे लावण्य पाहाताना पित्याच्या पणाची आठवण येताच सीतेचे मन क्षुब्ध झाले. ती मनात म्हणू लागली, ‘ अहो, माझ्या वडिलांनी मोठा कठीण पण ठेवला आहे. त्यांना त्यातील लाभ-हानी काही समझेनाशी झाली आहे. ॥ १ ॥

सचिव सभय सिख देइ न कोई । बुध समाज बड़ अनुचित होई ॥

कहँ धनु कुलिसहु चाहि कठोरा । कहँ स्यामल मृदुगात किसोरा ॥

मंत्री घाबरत असल्यामुळे कुणी त्यांना सल्लाही देत नाही. पंडितांच्या सभेमध्ये हे जे घडत आहे, ते अयोग्य आहे. कुठे वज्रापेक्षाही कठोर धनुष्य आणि कुठे हे कोमल शरीराचे किशोर श्यामसुंदर ! ॥ २ ॥

बिधि केहि भॉंति धरौं उर धीरा । सिरस सुमन कन बेधिअ हीरा ॥

सकल सभा कै मति भै भोरी । अब मोहि संभुचाप गति तोरी ॥

हे विधात्या, मी मनात धीर कसा धरु ? शिरीषाच्या फुलातील केशराने कुठे हिरा छेदता येईल काय ? सर्व सभेची बुद्धी बावचळली आहे म्हणून हे शिव-धनुष्या, आता मला तुझाच एक आधार आहे. ॥ ३ ॥

निज जड़ता लोगन्ह पर डारी । होहि हरुअ रघुपतिहि निहारी ॥

अति परिताप सीय मन माहिं । लव निमेष जुग सय सम जाहीं ॥

हे धनुष्या ! तू आपला जडपणा लोकांच्यावर टाकून व श्रीरामांचे सुकुमार शरीर पाहून हलका हो. ‘ अशा प्रकारे सीतेच्या मनाला मोठी व्यथा लागून राहिली होती. निमेषाचा एक अंश सुद्धा तिला युगासारखा वाटत होता. ॥ ४ ॥

   दोहा—प्रभुहि चितइ पुनि चितव महि राजत लोचन लोल ।

खेलत मनसिज मीन जुग जनु बिधु मंडल डोल ॥ २५८ ॥

प्रभु श्रीरामचंद्रांना पाहून नंतर पृथ्वीकडे पाहाणार्‍या सीतेचे चंचल नयन असे शोभत होते की, जणू चंद्रमंडलरुपी जलपूर्ण कलशात कामदेवाच्या दोन मासोळ्या खेळत आहेत. ॥ २५८ ॥

गिरा अलिनि मुख पंकज रोकी । प्रगट न लाज निसा अवलोकी ॥

लोचन जलु रह लोचन कोना । जैसें परम कृपन कर सोना ॥

सीतेच्या वाणीरुपी भ्रमरीला तिच्या मुखरुपी कमळाने कोंडून ठेवले होते. लज्जारुपी रात्र पाहून ती प्रकट होत नव्हती. ज्याप्रमाणे एखाद्या कंजूष कोपर्‍यातच सोने गाडून ठेवतो त्याप्रमाणे तिच्या नेत्रांतील पाणी कोपर्‍यातच थबकले होते. ॥ १ ॥      

सकुची ब्याकुलता बड़ि जानी । धरि धीरज प्रतीति उर आनी ॥

तन मन बचन मोर पनु साचा । रघुपति पद सरोज चितु राचा ॥

आपली व्याकुळता पाहून सीता लाजली आणि धीर धरुन तिने मनात विश्र्वास बाळगला की, ‘ जर तन, मन आणि वचन यांनी माझा पण खरा असेल आणि श्रीरघुनाथांच्या चरणकमळी माझे चित्त खरोखरच अनुरुक्त असेल, ॥ २ ॥

तौ भगवानु सकल उर बासी । करिहि मोहि रघुबर कै दासी ॥

जेहि कें जेहि पर सत्य सनेहू । सो तेहि मिलइ न कछु संदेहू ॥

तर सर्वांच्या हृदयात निवास करणारे भगवंत मला रघुश्रेष्ठ श्रीरामचंद्रांची दासी नक्कीच बनवतील, ज्याचे ज्याच्यावर खरे प्रेम असते, त्याला तो मिळतोच, यात काही शंका नाही.’ ॥ ३ ॥

प्रभु तन चितइ प्रेम तन ठाना । कृपानिधान राम सबु जाना ॥

सियहि बिलोकि तकेउ धनु कैसें । चितव गरुरु लघु ब्यालहि जैसें ॥

प्रभु श्रीरामांना पाहून सीतेच्या शरीराने प्रेमाचा निश्र्चय केला. कृपानिधान श्रीरामांनी हे ओळखले. त्यांनी सीतेकडे पाहून धनुष्याकडे असे बघितले की, गरुड जसा छोट्या सापाकडे पाहतो. ॥ ४ ॥

दोहा—लखन लखेउ रघुबंसमनि ताकेउ हर कोदंडु ।

पुलकि गात बोले बचन चरन चापि ब्रह्मांडु ॥ २५९ ॥

इकडे जेव्हा लक्ष्मणाने पाहिले की, रघुकुलरत्न श्रीरामांनी शिव-धनुष्याकडे दृष्टी टाकली आहे, तेव्हा त्याचे शरीर शहारले त्याने ब्रह्मांडाला आपल्या चरणांनी दाबून म्हटले, ॥ २५९ ॥

दिसिकुंजरहु कमठ अहि कोला । धरहु धरनि धरि धीर न डोला ॥

रामु चहहिं संकर धनु तोरा । होहु सजग सुनि आयसु मोरा ॥

‘ हे दिग्गजांनो, हे कच्छपा, हे शेषा, हे वराहा ! तुम्ही धैर्याने पृथ्वीला धरुन ठेवा. कारण ती डळमळू नये. श्रीरामचंद्र शिवांचे धनुष्य मोडू पाहात आहेत. माझ आज्ञा समजून सर्वजण सावध राहा. ‘ ॥ १ ॥

चाप समीप रामु जब आए । नर नारिन्ह सुर सुकृत मनाए ॥

सब कर संसउ अरु अग्यानू । मंद महीपन्ह कर अभिमानू ॥

श्रीरामचंद्र जेव्हा धनुष्याजवळ आले, तेव्हा सर्व स्त्री-पुरुषांनी देवांची व आपल्या पुण्यांची विनवणी केली. सर्वांचा संशय आणि अज्ञान, नीच राजांचा अभिमान, ॥ २ ॥

भृगुपति केरि गरब गरुआई । सुर मुनिबरन्ह केरि कदराई ॥

सिय कर सोचु जनक पछितावा । रानिन्ह कर दारुन दुख दावा ॥

परशुरामाचा प्रचंड गर्व, देव व मुनींची व्याकुळता ( भय ), सीतेची चिंता, जनकांचा पश्र्चात्ताप आणि राण्यांच्या दारुण दुःखाचा दावानल, ॥ ३ ३

संभुचाप बड़ बोहितु पाई । चढ़े जाइ सब संगु बनाई ॥

राम बाहुबल सिंधु अपारु । चहत पारु नहिं कोउ कड़हारु ॥

हे सर्व शिवांचे धनुष्यरुपी मोठे जहाज मिळाल्याने समूह बनवून, त्यावर आरुढ झाले. हे सर्व श्रीरामांच्या भुजांच्या बलरुपी अपार समुद्रापलीकडे जाऊ इच्छितात. परंतु कोणी नावाडी नाही. ॥ ४ ॥   



Custom Search

No comments: