Wednesday, October 21, 2020

ShriRamcharitmans Part 54 श्रीरामचरितमानस भाग ५४

ShriRamcharitmans Part 54 
Doha 249 to 251 
श्रीरामचरितमानस भाग ५४ 
दोहा २४९ ते २५१ 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड

दोहा—बोले बंदी बचन बर सुनहु सकल महिपाल ।

पन बिदेह कर कहहिं हम भुजा उठाइ बिसाल ॥ २४९ ॥

भाटांनी म्हटले, ‘ हे पृथ्वीचे पालन करणार्‍या सर्व राजांनो, ऐका. आम्ही बाहू उभारुन जनकांचा महान पण सांगतो. ॥ २४९ ॥

नृप भुजबलु बिधु सिवधनु राहू । गरुअ कठोर बिदित सब काहू ॥

रावनु बानु महाभट भारे । देखि सरासन गवँहिं सिधारे ॥

राजांच्या भुजांचे बल हे चंद्र आहे आणि शिवांचे धनुष्य राहू आहे. ते अवजड व कठोर आहे, ही गोष्ट सर्वांना ठाऊक आहे. योद्धे रावण व बाणासुरसुद्धा हे धनुष्य पाहून गप्पपणे निघून गेले. त्याला स्पर्श करण्याची सुद्धा हिम्मत त्यांना झाली नाही. ॥ १ ॥

सोइ पुरारि कोदंडु कठोरा । राज समाज आजु जोइ तोरा ॥

त्रिभुवन जय समेत बैदेही । बिनहिं बिचार बरइ हठि तेही ॥

हे भगवान शिवांचे अवजड धनुष्य आज या राजसमाजामध्ये जो कोणी मोडेल, त्याला त्रैलोक्याच्या विजयाबरोबर जानकी कोणताही विचार न करता मनापासून वरील. ॥ २ ॥

सुनि पन सकल भूप अभिलाषे । भटमानी अतिसय मन माखे ॥

परिकर बॉंधि उठे अकुलाई । चले इष्टदेवन्ह सिर नाई ॥

हा पण ऐकून सर्व राजांना उत्कंठा लागली. ज्यांना आपल्या शौर्याचा अभिमान होता, ते मनातून अधीर झाले. कमर कसून उतावळेपणे उठले व आपल्या इष्टदेवांना नमस्कार करुन निघाले. ॥ ३ ॥

तमकि ताकि तकि सिवधनु धरहीं । उठइ न कोटि भॉंति बलु करहीं ॥

जिन्ह के कछु बिचारु मन माहीं । चाप समीप महीप न जाहीं ॥

त्यांनी मोठ्या तावातावाने शिवधनुष्याकडे बघितले आणि लक्षपूर्वक ते पकडले. असंख्य प्रकारे जोर लावला, परंतु ते उचलले गेले नाही. ज्या राजांना काही विवेक होता, ते धनुष्याकडे फिरकले नाहीत. ॥ ४ ॥

दोहा—तमकि धरहिं धनु मूढ़ नृप उठइ न चलहिं लजाइ ।

मनहुँ पाइ भट बाहुबलु अधिकु अधिकु गरुआइ ॥ २५० ॥

ज्या मूर्ख राजांनी तावातावाने धनुष्य धरले, परंतु ते जेव्हा उचलले गेले नाही, तेव्हा ते लाजून परत गेले. जणू वीरांच्या भुजांचे बळ लाभल्यामुळे ते धनुष्य जास्तच अवजड होत होते. ॥ २५० ॥

भूप सहस दस एकहि बारा । लगे उठावन टरइ न टारा ॥

डगइ न संभु सरासनु कैसें । कामी बचन सती मनु जैसें ॥

मग एक हजार राजे एकाच वेळी धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करु लागले. तरीही ते हलले नाही. ज्याप्रमाणे कामी पुरुषांच्या बोलण्यामुळे सतीचे मन विचलित होत नाही, त्याप्रमाणे शिवांचे ते धनुष्य हलत नव्हते. ॥ १ ॥

सब नृप भए जोगु उपहासी । जैसें बिनु बिराग संन्यासी ॥

कीरति बिजय बीरता भारी । चले चाप कर बरबस हारी ॥

ज्याप्रमाणे वैराग्याविना संन्यासी हास्यास्पद ठरतो, त्याप्रमाणे सर्व राजे हास्यास्पद झाले.  आपली कीर्ती, विजय, अत्यंत शौर्य—हे त्या धनुष्याकडून जबरदस्तीने हिरावून घेतले गेल्यामुळे ते पराभूत होऊन निघून गेले. ॥ २ ॥

श्रीहत भए हारि हियँ राजा । बैठे निज निज जाइ समाजा ॥

नृपन्ह बिलोकि जनकु अकुलाने । बोले बचन रोष जनु साने ॥

राजेलोक मनातून पराजित झाल्याने निष्प्रभ झाले आणि आपापल्या गोटामध्ये जाऊन बसले. सर्व राजे अपयस्वी ठरल्याचे पाहून राजा जनक व्याकूळ झाले आणि क्रोधाने म्हणाले, ॥ ३ ॥

दीप दीप के भूपति नाना । आए सुनि हम जो पनु ठाना ॥

देव दनुज धरि मनुज सरीरा । बिपुल बीर आए रनधीरा ॥

‘ जो पण मी ठेवला होता, तो ऐकून द्वीपद्वपांतरातील अनेक राजे आले. देव व दैत्य हे सुद्धा मनुष्याचे शरीर धारण करुन आले. आणखीही पुष्कळसे रणधीर वीर आले. ॥ ४ ॥

दोहा—कुअँरि मनोहर बिजय बड़ि कीरति अति कमनीय ।

पावनिहार बिरंचि जनु रचेउ न धनु दमनीय ॥ २५१ ॥

परंतु धनुष्य मोडून मनोहर कन्या, मोठा विजय आणि उज्ज्वल कीर्ती प्राप्त करणारा जणू ब्रह्मदेवांनी कोणी निर्माणच केला नाही. ॥ २५१ ॥

कहहु काहि यहु लाभु न भावा । काहुँ न संकर चाप चढ़ावा ॥

रहउ चढ़ाउब तोरब भाई । तिलु भरि भूमि न सके छड़ाई ॥

हा लाभ कुणाला आवडला नसता ? सांगा. परंतु कोणीही शंकरांचे धनुष्य उचलू शकला नाही. उचलणे आणि मोडणे हे तर दूरच राहिले, कुणी ते तिळभरही जमिनीपासून हलवू शकला नाही. ॥ १ ॥

अब जनि कोउ माखै भट मानी । बीर बिहीन मही मैं जानी ॥

तजहु आस निज निज गृह जाहू । लिखा न बिधि बैदेहि बिबाहू ॥

आता कुणी वीरतेचा अभिमान बाळगणार्‍याने नाराज व्हायचे कारण नाही. मला तर कळून चुकले की, पृथ्वीवर वीरच नाहीत. आता आशा सोडून आपापल्या घरी जा. ब्रह्मदेवांनी सीतेचा विवाह तिच्या नशिबी लिहिलेलाच नाही. ॥ २ ॥

सुकृतु जाइ जौं पनु परिहरऊँ । कुअँरि कुआरि रहउ का करऊँ ॥

जौं जनतेउँ बिनु भट भुबि भाई । तौ पनु करि होतेउँ न हँसाई ॥

जर मी पण सोडला, तर पुण्य जाईल. तर आता काय करावे ? कन्या कुमारीच राहील. जर मला आधी ठाऊक असते की, पृथ्वी वीरांनी रहित आहे, तर हा पण करुन मी हास्यास्पद झालो नसतो. ‘ ॥ ३ ॥

जनक बचन सुनि सब नर नारी । देखि जानकिहि भए दुखारी ।

माखे लखनु कुटिल भइँ भौंहें । रदपट फरकत नयन रिसौंहें ॥

जनकांचे बोलणे ऐकून सर्व स्त्री-पुरुष जानकीकडे पाहून हळहळले. परंतु लक्ष्मण रागाने लालबुंद झाला, त्याच्या भुवया उंचावल्या, ओठ फडफडू लागले आणि डोळे रागामुळे लाल झाले. ॥ ४ ॥



Custom Search

1 comment:

micheal pan said...

I just want the whole world to know about this spell caster I met
two weeks ago, wisdomspiritualtemple@gmail.com I cannot say everything he has done for me my wife
left me 3 years ago left with my kids I was going through online
when I meant this wonderful man's testimony online I decided to
give it a try and my wife is back to me now and we ar1e happily
married again cause is too much to put in writing all I can say is
thank you very much am very happy .and does alot of spell
including Love Spell
Death Spell
Money Spell
Power Spell
Success Spell
Sickness Spell
Pregnancy Spell
Marriage Spell
Job Spell
Protection SpellI just want the whole world to know about this spell caster I met
two weeks ago, wisdomspiritualtemple@gmail.com I cannot say everything he has done for me my wife
left me 3 years ago left with my kids I was going through online
when I meant this wonderful man's testimony online I decided to
give it a try and my wife is back to me now and we ar1e happily
married again cause is too much to put in writing all I can say is
thank you very much am very happy .and does alot of spell
including Love Spell
Death Spell
Money Spell
Power Spell
Success Spell
Sickness Spell
Pregnancy Spell
Marriage Spell
Job Spell
Protection Spell
Lottery Spell
Court Case Spell
Luck Spell etc. In case you need his help contact him on this email
address wisdomspiritualtemple@gmail.com he is a good man
thanks.whatsapp number +234813 648 2342
Lottery Spell
Court Case Spell
Luck Spell etc. In case you need his help contact him on this email
address wisdomspiritualtemple@gmail.com he is a good man
thanks.whatsapp number +234813 648 2342