Friday, February 10, 2023

Lanka Kanda Part 2 Doha 2 to 4 लङ्काकाण्ड भाग २ दोहा २ ते ४

 

Lanka Kanda Part 2 
ShriRamCharitManas 
Doha 2 to 4 
लङ्काकाण्ड भाग २ 
श्रीरामचरितमानस 
दोहा २ ते ४

दोहा—संकरप्रिय मम द्रोही सिव द्रोही मम दास ।

ते नर करहिं कलप भरि घोर नरक महुँ बास ॥ २ ॥

ज्यांना शंकर प्रिय आहेत, परंतु जे माझे द्रोही आहेत आणि जे शिवांचे द्रोही आहेत आणि माझे दास बनू इच्छितात, ते मनुष्य कल्पापर्यंत घोर नरकात जातात. ॥ २ ॥

जे रामेस्वर दरसनु करिहहिं । ते तनु तजि मम लोक सिधरिहहिं ॥

जो गंगाजलु आनि चढ़ाइहि । सो साजुज्य मुक्ति नर पाइहि ॥

जे लोक मी स्थापन केलेल्या या रामेश्वराचे दर्शन घेतील, ते शरीर सोडल्यावर माझ्या लोकी जातील आणि जो गंगाजल या रामेश्र्वराला अर्पण करील, तो मनुष्य सायुज्य मुक्ती प्राप्त करुन माझ्यामध्ये एकरुप होईल. ॥ १ ॥

होइ अकाम जो छल तजि सेइहि । भगति मोरि तेहि संकर देइहि ॥

मम कृत सेतु जो दरसनु करिही । सो बिनु श्रम भवसागर तरिही ॥

जे कपट सोडून निष्काम मनाने श्रीरामेश्र्वराची सेवा करतील, त्यांना शंकर माझी भक्ती देतील आणि जे मी बनविलेल्या सेतूचे दर्शन घेतील, ते विनासायास संसाररुपी समुद्र तरुन जातील. ‘ ॥ २ ॥

राम बचन सब के जिय भाए । मुनिबर निज निज आश्रम आए ॥

गिरिजा रघुपति कै यह रीती । संतत करहिं प्रनत पर प्रीती ॥

श्रीरामांचे बोलणे सर्वांना मनापासून आवडले. त्यानंतर श्रेष्ठ मुनी आपल्या आश्रमाला गेले. शिव म्हणतात, ’ हे पार्वती, शरणागतावर नेहमी प्रेम करणे, ही रघुनाथांची रीतच आहे. ‘ ॥ ३ ॥

बॉंधा सेतु नील नल नागर । राम कृपॉं जसु भयउ उजागर ॥

बूड़हिं आनहि बोरहिं जेई । भए उपल बोहित सम तेई ॥

चतुर नल व नील यांनी सेतू बांधला, श्रीरामांच्या कृपेमुळे त्यांची उज्ज्वल कीर्ती सर्वत्र पसरली. जे पाषाण बुडतात आणि दुसर्‍यांनाही बुडवितात, तेच पाषाण जहाजाप्रमाणे स्वतः तरणारे व दुसर्‍यांना तारुन नेणारे झाले. ॥ ४ ॥

महिमा यह न जलधि कइ बरनी । पाहन गुन न कपिन्ह कइ करनी ॥

हा काही समुद्राचा महिमा नाही, दगडांचा गुण नाही की, ही वानरांची करामत नाही. ॥ ५ ॥

दोहा—श्री रघुबीर प्रताप ते सिंधु तरे पाषान ।

ते मतिमंद जे राम तजि भजहिं जाइ प्रभु आन ॥ ३ ॥

श्रीरघुवीरांच्या प्रतापाने पाषाणसुद्धा समुद्रावर तरले. अशा श्रीरामांना सोडून जो दुसर्‍या कुणा स्वामीकडे जाऊन त्याला भजतो, तो खरोखरच मंदबुद्धीचा होय. ॥ ३ ॥

बॉंधि सेतु अति सुदृढ़ बनावा । देखि कृपानिधि के मन भावा ॥

चली सेन कछु बरनि न जाई । गर्जहिं मर्कट भट समुदाई ॥

नल-नील यांनी सेतू बांधून तो मजबूत बनविला. तो पाहून श्रीरामांना फार बरे वाटले. सेना निघाली. तिचे वर्णन करणे कठीण. योद्धे असलेल्या वानरांचे समूह गर्जना करीत होते. ॥ १ ॥ 

सेतुबंध ढिग चढ़ि रघुराई । चितव कृपाल सिंधु बहुताई ॥

देखन कहुँ प्रभु करुना कंदा । प्रगट भए सब जलचर बृंदा ॥

कृपाळू श्रीरघुनाथ सेतुबंधनाच्या तटावर चढून समुद्राचा विस्तार पाहू लागले. करुणानिधी प्रभूंचे दर्शन घेण्यासाठी सर्व जलचरांचे समूह पाण्याबाहेर आले. ॥ २ ॥

मकर नक्र नाना झष ब्याला । सत जोजन तन परम बिसाला ॥

अइसेउ एक तिन्हहि जे खाहीं । एकन्ह कें डर तेपि डेराहीं ॥

बर्‍याच प्रकारच्या मगरी, नक्र, मासे आणि सर्प होते. त्यांची विशाल शरीरे शंभर-शंभर योजने होती. काही असेही जंतू होते, जे त्यांनाही खाऊन टाकत. काहींच्या भीतीने तेसुद्धा घाबरत होते. ॥ ३ ॥

प्रभुहि बिलोकहिं टरहिं न टारे । मन हरषित सब भए सुखारे ॥

तिन्ह कीं ओट न देखिअ बारी । मगन भए हरि रुप निहारी ॥

ते सर्वजण वैर विसरुन प्रभूंचे दर्शन घेत होते. हाकलले तरी जात नव्हते. सर्वांची मने आनंदित होती. सर्वजण सुखी झाले. त्यांच्या आच्छादनामुळे पाणी दिसत नव्हते. ते सर्व भगवंताचे रुप पाहून आनंद-प्रेममग्न झाले होते. ॥ ४ ॥

चला कटकु प्रभु आयसु पाई । को कहि सक कपि दल बिपुलाई ॥

प्रभू श्रीरामांची आज्ञा झाल्यावर सेना निघाली. वानरसेना प्रचंड होती. तिची गणना कोण करणार ? ॥ ५ ॥

दोहा--- सेतुबंध भइ भीर अति कपि नभ पंथ उड़ाहिं ।

अपर जलचरन्हि ऊपर चढ़ि चढ़ि पारहि जाहिं ॥ ४ ॥

सेतुबंधावर मोठी गर्दी झाली. त्यामुळे काही वानर आकाश-मार्गाने उडू लागले आणि काही तर जलचर जीवांना ओलांडून पलीकडे जात होते. ॥ ४ ॥   

अस कौतुक बिलोकि द्वौ भाई । बिहँसि चले कृपाल रघुराई ॥

सेन सहित उतरे रघुबीरा । कहि न जाइ कपि जूथप भीरा ॥

कृपाळू श्रीराम व बंधू लक्ष्मण हे कौतुक पाहात हसत निघाले. श्रीराम सेनेसह समुद्रपार गेले. वानर आणि त्यांच्या सेनापतींची गर्दी तर काही विचारु नका. ॥ १ ॥

सिंधु पार प्रभु डेरा कीन्हा । सकल कपिन्ह कहुँ आयसु दीन्हा ॥

खाहु जाइ फल मूल सुहाए । सुनत भालु कपि जहँ तहँ धाए ॥

प्रभूंनी समुद्र पार करुन मुक्काम ठोकला आणि सर्व वानरांना आज्ञा दिली की, ‘ तुम्ही जाऊन चांगली फळे-मुळे खाऊन घ्या. ‘ हे ऐकताच अस्वले व वानर इकडे-तिकडे धावत निघाले. ॥ २ ॥  

सब तरु फरे राम हित लागी । रितु अरु कुरितु काल गति त्यागी ॥

खाहिं मधुर फल बिटप हलावहिं । लंका सन्मुख सिखर चलावहिं ॥

श्रीरामांच्या सेवेसाठी सर्व वृक्ष ॠतु-काल नसतानाही फळांनी बहरले. वानर व अस्वले गोड गोड फळे खात होते, वृक्ष हालवीत होते आणि पर्वतांची शिखरे लंकेकडे टाकीत होते. ॥ ३ ॥

जहँ कहुँ फिरत निसाचर पावहिं । घेरि सकल बहु नाच नचावहिं ॥

दसनन्हि काटि नासिका काना । कहि प्रभु सुजसु देहिं तब जाना ॥

फिरत असताना कोठे एखादा राक्षस भेटला, तर सर्वजण त्याला घेरुन खूप नाचवत होते आणि दातांनी त्याचे नाक-कान कापून प्रभूंची सुकीर्ती सांगून त्यांना जाऊ देत होते. ॥ ४ ॥

जिन्ह कर नासा कान निपाता । तिन्ह रावनहि कही सब बाता ॥

सुनत श्रवन बारिधि बंधाना । दस मुख बोलि उठा अकुलाना ॥

ज्या राक्षसांचे नाक-कान कापले होते, त्यांनी जाऊन सर्व

 वृत्तांत रावणाला सांगितला. समुद्रावर सेतु बांधल्याचे

 ऐकून रावण दहा तोंडांनी म्हणाला, ॥ ५ ॥



Custom Search

No comments: