Showing posts with label दोहा २२८ ते २३०. Show all posts
Showing posts with label दोहा २२८ ते २३०. Show all posts

Sunday, September 27, 2020

ShriRamcharitmans Part 47, श्रीरामचरितमानस भाग ४७

 

ShriRamcharitmans Part 47  
Doha 228 to 230 
श्रीरामचरितमानस भाग ४७ 
दोहा २२८ ते २३० 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा--तासु दसा देखी सखिन्ह पुलक गात जलु नैन ।
कहु कारनु निज हरष कर पूछहिं सब मृदु बैन ॥ २२८ ॥
सख्यांनी तिची दशा पाहिली. तिचे शरीर पुलकित झाले होते आणि नेत्र सजल झालेले होते. सर्वजणी कोमल स्वरांनी विचारु लागल्या की, ' तुझ्या आनंदाचे कारण काय बरे ! ' ॥ २२८ ॥
देखन बागु कुअँर दुइ आए । बय किसोर सब भाँति सुहाए ॥
स्याम गौर किमि कहौं बखानी । गिरा अनयन नयन बिनु बानी ॥
( ती म्हणाली, ) ' दोन राजकुमार बाग पाहण्यास आले आहेत. ते किशोर वयाचे असून फार सुंदर आहेत. ते सावळ्या व गोर्‍या रंगाचे आहेत. मी त्यांचे सौंदर्य कसे वर्णन करु ? ( कारण ) वाणीला नेत्र नाहीत आणि नेत्रांना वाणी नाही. ' ॥ १ ॥
सुनि हरषीं सब सखीं सयानी । सिय हियँ अति उतकंठा जानी ॥
एक कहइ नृपसुत तेइ आली । सुने जे मुनि सँग आए काली ॥
हे ऐकून आणि सीतेच्या मनातही उत्कंठा दाटलेली पाहून त्या सर्व चतुर सख्याही आनंदून गेल्या. तेव्हा एक सखी म्हणाली, ' हे सखी, काल विश्वामित्र मुनींच्याबरोबर आले आहेत, असे ऐकले होते, तेच हे राजकुमार असावेत. ॥ २ ॥
जिन्ह निज रुप मोहनी डारी । कीन्हे स्वबस नगर नर नारी ॥
बरनत छबि जहँ तहँ सब लोगू । अवसि देखिअहिं देखन जोगू ॥
त्यांनी आपल्या रुपाच्या मोहिनीने नगरातील स्त्री-पुरुषांना वश केले आहे. जिकडे-तिकडे सर्व लोक त्यांच्या सौंदर्याचे वर्णन करीत आहेत. ते पाहण्याजोगे आहेत. त्यांना जरुर पाहिले पाहिजे.' ॥ ३ ॥
तासु बचन अति सियहि सोहाने । दरस लागि लोचन अकुलाने ॥
चली अग्र करि प्रिय सखि सोई । प्रीति पुरातन लखइ न कोई ॥
सखीचे हे बोल सीतेला फार आवडले आणि त्यांच्या दर्शनासाठी तिचे नेत्र आसुसले . त्या प्रिय सखीला पुढे करुन सीता निघाली. शाश्र्वत प्रेम कोणी पाहू शकत नाही. ॥ ४ ॥
दोहा--सुमिरि सीय नारद बचन उपजी प्रीति पुनीत । 
चकित बिलोकति सकल दिसि जनु सिसु मृगी सभीत ॥ २२९ ॥
नारदांचे वचन आठवून सीतेच्या मनात पवित्र प्रेम उपजले. ती चकित होऊन सगळीकडे पाहू लागली. जणू बावरलेली हरिणी इकडे-तिकडे पाहात असावी. ॥ २२९ ॥
कंकन किंकिनि नूपुर धुनि सुनि । कहत लखन सन रामु हृदयँ गुनि ॥
मानहुँ मदन दुंदुभी दीन्ही । मनसा बिस्व बिजय कहँ कीन्ही ॥
कंकणे, मेखलाांच्या घागर्‍या आणि नूपुरे यांचा ध्वनी कानी येताच श्रीरामचंद्रांच्या मनात विचार येऊन, त्यांनी लक्ष्मणाला म्हतले, ( हा ध्वनी असा येत आहे की, ) ' जणू कामदेवाने विश्व जिंकण्याचा संकल्प करुन दुंदुभी वाजविल्या आहेत. ' ॥ १ ॥
अस कहि फिरि चितए तेहि ओरा । सिय मुख ससि भए नयन चकोरा ॥
भए बिलोचन चारु अचंचल । मनहुँ सकुचि निमि तजे दिगंचल ॥
असे म्हणून श्रीरामांनी वळून तिकडे पाहिले. सीतेचा मुख-चंद्र पाहण्यासाठी त्यांचे नेत्र चकोर बनले. त्यांचे सुंदर नेत्र स्थिरावले. ( एकटक पाहू लागले. ) जणू ( जनकांचे पूर्वज ) निमी राजाने संकोचाने ( निमी हे सर्वांच्या पापण्यावर निवास करतात, असे मानले जाते. त्यांनी आपली कन्या व जावई यांचा मिलन-प्रसंग पाहणे उचित वाटले नाही, म्हणून ) पापण्यांचा त्याग केला असावा. ( त्यांनी पापण्यांवर राहणे सोडल्यामुळे पापण्या मिटणे थांबले. ॥ २ ॥
देखि सीय सोभा सुखु पावा । हृदयँ सराहत बचनु न आवा ॥
जनु बिरंचि सब निज निपुनाई । बिरचि बिस्व कहँ प्रगटि देखाई ॥
सीतेचे सौंदर्य पाहून श्रीराम फार आनंदित झाले. मनात त्यांनी तिच्या सौंदर्याची प्रशंसा केली. परंतु मुखातून शब्द फुतला नाही. ( ते सौंदर्य असे अनुपम होते की, ) जणू ब्रह्मदेवांनी आपले संपूर्ण कौशल्य साकार करुन ( सीतेच्या रुपाने ) जगाला प्रकट करुन दाखविले होते. ॥ ३ ॥        
सुंदरता कहुँ सुंदर करई ॥ छबिगृहँ दीपसिखा जनु बरई ॥
सब उपमा कबि रहे जुठारी । केहिं पटतरौं बिदेहकुमारी ॥
सीतेचे सौंदर्य सौंदर्यालाही सुंदर बनविणारे होते. ( असे वाटत होते की, ) जणू सौंदर्याच्या घरामध्ये दीप उजळला आहे. ( आजवर सौंदर्य-भवनामध्ये अंधार होता, ते भवन जणू सीतेच्या सौंदर्यरुपी दीपशिखेमुळे उजळून निघाले, पूर्वीपेक्षा फार सुंदर झाले. ) कवींनी सर्व उपमा उष्ट्या करुन टाकल्या आहेत. तेव्हा मी जनकनंदिनी सीतेला कशाची उपमा देऊ ? ॥ ४ ॥
दोहा--सिय सोभा हियँ बरनि प्रभु आपनि दसा बिचारि ॥
बोले सुचि मन अनुज सन बचन समय अनुहारि ॥ २३० ॥
( अशा प्रकारे ) मनात सीतेच्या सौंदर्याची वाखाणणी करीत व आपली झालेली मोहित दशा पाहून प्रभू श्रीरामांनी पवित्र मनाने लक्ष्मणाला समयानुकूल म्हटले, ॥ २३० ॥
तात जनकतनया यह सोई । धनुषजग्य जेहि कारन होई ॥
पूजन गौरि सखीं लै आईं । करत प्रकासु फिरइ फुलवाईं ॥
' हे बंधू जिच्यासाठी धनुष्ययज्ञ होत आहे, तीच ही जनककन्या आहे. सख्या हिला गौरीपूजनासाठी घेऊन आल्या आहेत. ही या फुलबागेला उजळून टाकीत वावरत आहे. ॥ १ ॥
जासु बिलोकि अलौकिक सोभा । सहज पुनीत मोर मनु छोभा ॥
सो सबु कारन जान बिधाता । फरकहिं सुभद अंग सुनु भ्राता ॥
तिचे अलौकिक सौंदर्य पाहून स्वभावतः पवित्र माझे मन विचलित झाले आहे. त्याचे कारण त्या विधात्यालाच ठाऊक. परंतु हे बंधू ,माझी मंगलदायक उजवी अंगे स्फुरण पावू लागली आहेत. ॥ २ ॥
रघुबंसिन्ह कर सहज सुभाऊ । मनु कुपंथ पगु धरइ न काऊ ॥
मोहि अतिसय प्रतीति मन केरी । जेहिं सपनेहुँ परनारि न हेरी ॥
रघुवंशी लोकांचा हा सहज स्वभाव आहे की, त्यांचे मन कधी कुमार्गावर पाऊल टाकीत नाही. मला माझ्या मनाची खात्री आहे की, त्याने ( जागृतीतच काय ) स्वप्नातही पर-स्त्रीवर दृष्टी टाकलेली नाही. ॥ ३ ॥
जिन्ह कै लहहिं न रिपु रन पीठी । नहिं पावहिं परतिय मनु डीठी ॥
मंगन लहहिं न जिन्ह कै नाहीं । ते नरबर थोरे जग माहीं ॥
रणामध्ये शत्रूंना ज्यांची पाठ दिसत नाही, पर-स्त्री ज्यांचे मन आणि दृष्टी मोहून टाकू शकत नाही, आणि ज्यांच्याकडून याचकाला कधी नकार मिळत नाही, असे श्रेष्ठ पुरुष जगात फार थोडे आहेत. ॥ ४ ॥   



Custom Search