Showing posts with label Doha 237 to 239. Show all posts
Showing posts with label Doha 237 to 239. Show all posts

Tuesday, October 6, 2020

ShriRamcharitmans Part 50 श्रीरामचरितमानस भाग ५०

 

ShriRamcharitmans Part 50 
Doha 237 to 239 
श्रीरामचरितमानस भाग ५० 
दोहा २३७ ते २३९ 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा--जनमु सिंधु पुनि बंधु बिषु दिन मलीन सकलंक ।
सिय मुख समता पाव किमि चंदु बापुरो रंक ॥ २३७ ॥
चंद्राचा जन्म खार्‍या समुद्रात झाला आहे. त्याचा समुद्रात उत्पन्न झाल्यामुळे विष याचा भाऊ आहे. दिवसा हा मलिन असतो आणि कलंकित आहे. बिचारा चंद्र सीतेच्या मुखाची बरोबरी कशी करु शकेल ? ॥ २३७ ॥
घटइ बढ़इ बिरहिनि दुखदाई । ग्रसइ राहु निज संधिहिं पाई ॥
कोक सोकप्रद पंकज द्रोही । अवगुन बहुत चंद्रमा तोही ॥
शिवाय तो वाढतो व घटत जातो. विरहिणींना दुःख देतो. राहू संधी मिळताच त्याला ग्रासून टाकतो, चंद्र हा चक्रवाक पक्ष्याला चक्रवाकीच्या वियोगामुळे शोक देणार आणि सूर्यविकासी कमळांचा वैरी आहे. हे चंद्रा, तुझ्यामुध्ये पुष्कळसे अवगुण आहेत. ॥ १ ॥
बैदेही मुख पटतर दीन्हे । होइ दोषु बड़ अनुचित कीन्हे ॥
सिय मुखछबि बिधु ब्याज बखानी । गुर पहिं चले निसा बडि जानी ॥ 
म्हणून जानकीच्या मुखाला तुझी उपमा देण्याने मोठे अनुचित कर्म करण्याचे पाप लागेल. ' अशा प्रकारे चंद्राच्या निमित्ताने सीतेच्या मुख-सौंदर्याचे वर्णन करता-करता रात्र फार झाल्याचे पाहून श्रीराम गुरुजींच्याजवळ गेले. ॥ २ ॥
करि मुनि चरन सरोज प्रनामा । आयसु पाइ कीन्ह बिश्रामा ॥
बिगत निसा रघुनायक जागे । बंधु बिलोकि कहन अस लागे ॥
मुनींच्या चरण-कमलांना प्रणाम करुन व आज्ञा घेऊन त्यांनी विश्रांती घेतली. रात्र संपल्यावर श्रीरघुनाथ जागे झाले आणि लक्ष्मणाला पाहून म्हणाले, ॥ ३ ॥
उयउ अरुन अवलोकहु ताता । पंकज कोक लोक सुखदाता ॥
बोले लखनु जोरि जुग पानी । प्रभु प्रभाउ सूचक मृदु बानी ॥
' लक्ष्मणा, बघ. कमल, चक्रवाक व संपूर्ण जगाला सुख देणारा अरुणोदय झाला. ' लक्ष्मण दोन्ही हात जोडून प्रभूंच्या प्रभावाला अनुकूल अशा कोमल वाणीने म्हणाला, ॥ ४ ॥
दोहा--अरुनोदयँ सकुचे कुमुद उडगन जोति मलीन । 
जिमि तुम्हार आगमन सुनि भए नृपति बलहीन ॥ २३८ ॥
' अरुणोदय झाल्यामुळे कुमुदिनी मिटली आणि तारांगणांचा प्रकाश निस्तेज झाला. ज्याप्रमाणे तुम्ही आल्याचे समजताच सर्व राजे बलहीन व्हावे. ॥ २३८ ॥
नृप सब नखत करहिं उजिआरी । टारि न सकहिं चाप तम भारी ॥
कमल कोक मधुकर खग नाना । हरषे सकल निसा अवसाना ॥
सर्व राजेरुपी तारे मंद प्रकाश देतात, परंतु ते धनुष्यरुपी महान अंधकाराला दूर करु शकत नाहीत. रात्रीचा अंत झाल्यामुळे कमल, चक्रवाक पक्षी, भ्रमर आणि नाना प्रकारचे पक्षी आनंदून गेले आहेत. ॥ १ ॥
ऐसेहिं प्रभु सब भगत तुम्हारे । होइहहिं टूटें धनुष सुखारे ॥
उयउ भानु बिनु श्रम तम नासा । दुरे नखत जग तेजु प्रकासा ॥
त्याप्रमाणे हे प्रभो, धनुष्य मोडल्यावर तुमचे सर्व भक्त सुखी होतील. सूर्योदय झाला आणि अनायासे अंधार नष्ट झाला. तारे मावळले आणि जगात तेजाचा प्रकाश पडला. ॥ २ ॥
रबि निज उदय ब्याज रघुराया । प्रभु प्रतापु सब नृपन्ह दिखाया ॥
तव भुज बल महिमा उदघाटी । प्रगटी धनु बिघटन परिपाटी ॥
हे रघुनाथ, सूर्याने आपल्या उदयाने सर्व राजांना तुमचा प्रताप दाखवून दिला आहे. तुमच्या भुजांच्या बलाचा महिमा प्रकट करण्यासाठी धनुष्य मोडण्याचा पण लावण्यात आला आहे. ॥ ३ ॥
बंधु बचन सुनि प्रभु मुसुकाने । होइ सुचि सहज पुनीत नहाने ॥
नित्यक्रिया करि गुरु पहिं आए । चरन सरोज सुभग सिर नाए ॥
लक्ष्मणाचे बोल ऐकून श्रीरामांनीं मंद हास्य केले. नंतर स्वभवतःच पवित्र असलेल्या श्रीरामांनी प्रातर्विधीनंतर स्नान केले आणि नीत्य कर्म आटोपून ते गुरुंजवळ आले. त्यांनी गुरुंच्या पूज्य चरण-कमलांवर मस्तक ठेवले. ॥ ४ ॥
सतानंदु तब जनक बोलाए । कौसिक मुनि पहिं तुरत पठाए ॥
जनक बिनय तिन्ह आइ सुनाई ॥ हरषे-बोलि लिए दोउ भाई ॥
एवढ्यांत राजा जनकांनी शतानंदांना बोलावून विश्र्वामित्रांच्याकडे पाठविले. त्यांनी येऊन जनकांची विनंती निवेदन केली. विश्र्वामित्रांनी आनंदाने दोघा भावांना बोलाविले. ॥ ५ ॥
 सतानंद पद बंदि प्रभु बैठे गुर पहिं जाइ ।
चलहु तात मुनि कहेउ तब पठवा जनक बोलाइ ॥ २३९ ॥
शतानंदांच्या चरणांना वंदन करुन प्रभू श्रीराम गुरुजींच्याजवळ बसले. तेव्हा मुनी म्हणाले, ' वत्सांनो, चला. जनक राजांनी आपल्याला बोलावणे पाठविले आहे. ॥ २३९ ॥   
मासपारायण, आठवा विश्राम 
नवाह्नपारायण, दुसरा विश्राम 
सीय स्वयंबरु देखिअ जाई । ईसु काहि धौं देइ बड़ाई ॥
लखन कहा जस भाजनु सोई । नाथ कृपा तव जापर होई ॥
( मुनी म्हणाले, ) जाऊन सीतेचे स्वयंवर पाहिले पाहिजे. बघूया, ईश्वर कुणाला सन्मान देणार आहे.' लक्ष्मण म्हणाला, ' हे नाथ, ज्यावर तुमची कृपा असेल, तोच सन्मानाला पात्र ठरणार.' ॥ १ ॥
हरषे मुनि सब सुनि बर बानी । दीन्हि असीस सबहिं सुखु मानी ॥
पुनि मुनिबृंद समेत कृपाला । देखन चले धनुषमख साला ॥
ही उत्तम वाणी ऐकून सर्व मुनी प्रसन्न झाले. सर्वांना आनंदाने आशीर्वाद दिला. नंतर मुनिसमुदायासह कृपाळू श्रीरामचंद्र धनुष्ययज्ञ-शाला पाहण्यास गेले. ॥ २ ॥
रंगभूमि आए दोउ भाई । असि सुधि सब पुरबासिन्ह पाई ॥
चले सकल गृह काज बिसारी । बाल जुबान जरठ नर नारी ॥
दोघे भाऊ रंगभूमीवर आले आहेत, अशी वार्ता जेव्हा नगरवासीयांना मिळाली, तेव्हा आबालवृद्ध स्त्री-पुरुष, घर आणि काम-धाम विसरुन निघाले. ॥ ३ ॥
देखी जनक भीर भै भारी । सुचि सेवक सब लिए हँकारी ॥
तुरत सकल लोगन्ह पहिं जाहू । आसन उचित देहु सब काहू ॥
जेव्हां जनकांना दिसले की, मोठी गर्दी झाली आहे, तेव्हा त्यांनी सर्व विश्वासू सेवकांना बोलावून घेतले आणि म्हटले , ' तुम्ही ताबडतोब सर्व लोकांपाशी जा आणि सर्वांना यथायोग्य आसने द्या. ' ॥ ४ ॥



Custom Search