Friday, August 19, 2022

KikshindhaKanda Part 6 ShriRamCharitManas Doha 15 to Doha 17 किष्किन्धाकाण्ड भाग ६ श्रीरामचरितमानस दोहा १५ ते दोहा १७

 

KikshindhaKanda Part 6
ShriRamCharitManas 
Doha 15 to Doha 17 
किष्किन्धाकाण्ड भाग ६ 
श्रीरामचरितमानस 
दोहा १५ ते दोहा १७

दोहा---कबहुँ प्रबल बह मारुत जहँ तहँ मेघ बिलाहिं ।

जिमि कपूत के उपजें कुल सद्धर्म नसाहिं ॥ १५ ( क ) ॥

कधी कधी वारे जोराने वाहातात, त्यामुळे मेघ इकडे तिकडे नाहीसे होतात. ज्याप्रमाणे कुपुत्र उत्पन्न झाल्यावर उत्तम कुलाचार नष्ट होतात. ॥ १५ ( क ) ॥

कबहुँ दिवस महँ निबिड़ तम कबहुँक प्रगट पतंग ।

बिनसइ उपजइ ग्यान जिमि पाइ कुसंग सुसंग ॥ १५ ( ख ) ॥

कधी मेघांमुळे दिवसा अंधार दाटून येतो आणि कधी सूर्य प्रकट होतो. ज्याप्रमाणे कुसंगाने ज्ञान नष्ट होते आणि सत्संग मिळाल्यावर ते पुन्हा प्रकट होते. ॥ १५ ( ख ) ॥

बरष बिगत सरद रितु आई । लछिमन देखहु परम सुहाई ॥

फूलें कास सकल महि छाई । जनु बरषॉं कृत प्रगट बुढ़ाई ॥

हे लक्ष्मणा, बघ. वर्षाकाल संपला आणि परम सुंदर शरद् ऋतू आला. फुललेल्या कास गवतामुळे संपूर्ण पृथ्वी झाकली गेली आहे. जणू वर्षाऋतूने कासरुपी पांढर्‍या केसांच्या रुपाने आपले म्हातारपण प्रकट केले आहे. ॥ १ ॥

उदित अगस्ति पंथ जल सोषा । जिमि लोभहि सोषइ संतोषा ॥

सरिता सर निर्मल जल सोहा । संत हृदय जस गत मद मोहा ॥

ज्याप्रमाणे संतोष हा लोभाला शोषून घेतो, त्याप्रमाणे अगस्त्य तार्‍याने उदित होऊन मार्गावरील पाणी शोषले आहे. ज्याप्रमाणे संतांचे हृदय मद-मोहरहित निर्मल असते, त्याप्रमाणे नद्या व तलाव यांचे निर्मळ जल शोभत आहे. ॥ २ ॥          

रस रस सूख सरित सर पानी । ममता त्याग करहिं जिमि ग्यानी ॥

जानि सरद रितु खंजन आए । पाइ समय जिमि सुकृत सुहाए ।

नद्या व तलाव यांचे पाणी हळू हळू घटत आहे, ज्याप्रमाणे ज्ञानी पुरुष ममतेचा त्याग करतात. शरदऋतूची चाहूल लागताच खंजन पक्षी आले आहेत, ज्याप्रमाणे वेळ येताच चांगले पुण्य प्रगट होते.

पंक न रेनु सोह असि धरनी । नीति निपुन नृप कै जसि करनी ॥

जल संकोच बिकल भइँ मीना । अबुध कुटुंबी जिमि धनहीना ॥

ज्याप्रमाणे नीतिनिपुण राजाचा कारभार स्वच्छ असतो, त्याप्रमाणे चिखल व धूळ नसल्याने धरणी निर्मल बनून शोभून दिसत आहे. पाणी कमी झाल्यामुळे मासे व्याकूळ झाले आहेत, ज्याप्रमाणे विवेकशून्य गृहस्थ धनाविना व्याकूळ होतो. ॥ ४ ॥

बिनु घन निर्मल सोह अकासा । हरिजन इव परिहरि सब आसा ॥

कहुँ कहुँ बृष्टि सारदी थोरी । कोउ एक पाव भगति जिमि मोरी ॥

मेघांविना निर्मळ आकाश असे शोभून दिसत आहे की, ज्याप्रमाणे भगवद् भक्त सर्व आशा सोडून निर्मळ होतात. कुठे कुठे शरऋतूचा थोडा थोडा पाऊस पडत आहे, ज्याप्रमाणे कोणी विरळाच माझी भक्ती प्राप्त करतो. ॥ ५ ॥

दोहा—चले हरषि तजि नगर नृप तापस बनिक भिखारि ।

जिमि हरिभगति पाइ श्रम तजहिं आश्रमी चारि ॥ १६ ॥

शरदऋतू आल्यावर राजा, तपस्वी, व्यापारी आणि भिक्षुक हे विजय, तप, व्यापार आणि भिक्षुकी मिळवण्यासाठी आनंदाने नगर सोडून निघतात. त्याप्रमाणे श्रीहरीची भक्ती मिळाल्यावर चारी आश्रमांतील लोक नाना प्रकारच्या साधनांचे श्रम सोडून देतात. ॥ १६ ॥

सुखी मीन जे नीर अगाधा । जिमि हरि सरन न एकउ बाधा ॥

फूलें कमल सोह सर कैसा । निर्गुन ब्रह्म सगुन भएँ जैसा ॥

जे मासे खोल पाण्यात आहेत, ते सुखी आहेत. ज्याप्रमाणे श्रीहरीला शरण गेल्यावर एकही संकट येत नाही. कमळांनी फुललेले तलाव असे शोभत आहेत की, जसे निर्गुण ब्रह्म सगुण झाल्यावर शोभून दिसते. ॥ १ ॥

गुंजत मधुकर मुखर अनूपा । सुंदर खग रव नाना रुपा ॥

चक्रबाक मन दुख निसि पेखी । जिमि दुर्जन पर संपति देखी ॥

भ्रमर अनुपम आवाज करीत गुंजन करीत आहेत आणि पक्षी नाना प्रकारचे सुंदर कूजन करीत आहेत. रात्र झाल्याचे पाहून चक्रवाक पक्ष्याच्या मनात तसेच दुःख होते, ज्याप्रमाणे दुसर्‍याची संपत्ती पाहून दुष्टाला दुःख वाटते. ॥ २ ॥

चातक रटत तृषा अति ओही । जिमि सुख लहइ न संकरद्रोही ॥

सरदातप निसि ससि अपहरई । संत दरस जिमि पातक टरई ॥

चातक ढगाला आळवत आहे, त्याला खूप तहान लागली आहे. ज्याप्रमाणे शंकराचा द्वेष करणार्‍या माणसाला सुख न मिळाल्यामुळे तो दुःखी होतो. शरदऋतूचा ताप रात्री चंद्र हरण करतो, ज्याप्रमाणे संतांच्या दर्शनाने पापे नाहीशी होतात. ॥ ३ ॥

देखि इंदु चकोर समुदाई । चितवहिं जिमि हरिजन हरि पाई ॥

मसक दंस बीते हिम त्रासा । जिमि द्विज द्रोह किएँ कुल नासा ॥

चकोर पक्ष्यांचे समुदाय चंद्राला अशा प्रकारे एकटक पाहू लागतात, ज्याप्रमाणे भगवद्भक्त भगवंत भेटल्यावर निर्निमेष नेत्रांनी त्यांचे दर्शन घेतात. मच्छर, डास हे थंडीच्या भीतीने अशा प्रकारे नाहीसे झाले आहेत की, ज्याप्रमाणे ब्राह्मणांशी वैर केल्याने कुळाचा नाश होतो. ॥ ४ ॥

दोहा—भूमि जीव संकुल रहे गए सरद रितु पाइ ।

सदगुर मिलें जाहिं जिमि संसय भ्रम समुदाई ॥ १७ ॥

वर्षाऋतुमुळे पृथ्वीवर जे जीव भरले होते, ते जीव शरदऋतू आल्यावर नष्ट झाले, ज्याप्रमाणे सद्गुरु लाभल्यावर संशय आणि भ्रम यांचे समूह नष्ट होतात. ॥ १७ ॥

बरषा गत निर्मल रितु आई । सुधि न तात सीता कै पाई ॥

एक बार कैसेहुँ सुधि जानौं । कालहु जीति निमिष महुँ आनौं ॥

वर्षाकाल गेला , निर्मळ शरदऋतु आला. परंतु हे बंधो ! सीतेची काही वार्ता  कळली नाही. एकदा का पत्ता मिळाला, तर मी काळालाही जिंकून एका क्षणांत जानकीला घेऊन येईन. ॥ १ ॥  

कतहुँ रहउ जौं जीवति होई । तात जतन करि आनउँ सोई ।

सुग्रीवहुँ सुधि मोरि बिसारी । पावा राज कोस पुर नारी ॥

हे बंधो ! कुठेही ती असो. जिवंत असेल, तर मी प्रयत्न करुन तिला नक्की आणीन. राज्य, खजिना, स्त्री व राजधानी मिळाल्यामुळे सुग्रीवही मला विसरला. ॥ २ ॥

जेहिं सायक मारा मैं बाली । तेहिं सर हतौं मूढ़ कहँ काली ॥

जासु कृपाँ छूटहिं मद मोहा । ता कहुँ उमा कि समनेहुँ कोहा ॥

ज्या बाणाने मी वालीला मारले, त्याच बाणाने मी त्या मूर्खाला मारीन. ‘ शिव म्हणतात, ‘ हे उमे, ज्यांच्या कृपेमुळे मद व मोह सुटतात, त्यांना स्वप्नातही कधी क्रोध येईल काय ? परंतु ही तर श्रीरामांची लीला आहे. ॥ ३ ॥

जानहिं यह चरित्र मुनि ग्यानी । जिन्ह रघुबीर चरन रति मानी ॥

लछिमन क्रोधवंत प्रभु जाना । धनुष चढ़ाइ गहे कर बाना ॥

ज्या ज्ञानी मुनींना श्रीरघुनाथांच्या चरणीं प्रेम आहे, तेच ही

 लीला जाणतात. लक्ष्मणाने जेव्हा प्रभू क्रुद्ध झालेले

 पाहिले, तेव्हा त्याने धनुष्य सज्ज करुन बाण हाती घेतला.

 ॥ ४ ॥



Custom Search

No comments: