Monday, September 14, 2020

ShriRamcharitmans Part 44 श्रीरामचरितमानस भाग ४४

 

ShriRamcharitmans Part 44  
Doha 219 to 221 
श्रीरामचरितमानस भाग ४४ 
दोहा २१९ ते २२१ 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा--रुचिर चौतनीं सुभग सिर मेचक कुंचित केस ।
नख सिख सुंदर बंधु दोउ सोभ सकल सुदेस ॥ २१९ ॥
मस्तकावर सुंदर चौकोनी टोप्या होत्या. केस काळे व कुरळे होते. दोन्ही भाऊ नखशिखांत सुंदर होते आणि संपूर्ण शोभा जेथे जशी हवी तशी होती. ॥ २१९ ॥
देखन नगरु भूपसुत आए । समाचार पुरबासिन्ह पाए ॥
धाए धाम काम सब त्यागी । मनहुँ रंक निधि लूटन लागी ॥
नगर पाहण्यासाठी दोघे राजकुमार आले आहेत, हे वर्तमान समजताच नगरवासी घरदार व सर्व कामधाम सोडून असे धावले की,जसे दरिद्री लोक खजिना लुटण्यासाठी धावत सुटतात. ॥ १ ॥
निरखि सहज सुंदर दोउ भाई । होहिं सुखी लोचन फल पाई ॥
जुबतीं भवन झरोखन्हि लागीं । निेरखहिं राम रुप अनुरागीं ॥
स्वभावतःच सुंदर असलेल्या दोन्ही भावांना पाहून नगरवासी लोक नेत्रांचे पारणे फिटल्याचे वाटून सुखावले. तरुण स्त्रिया घराच्या खिडक्यांना डोळे लावून प्रेमाने श्रीरामाचंद्रांचे रुप न्याहाळत होत्या. ॥ २ ॥
कहहिं परसपर बचन सप्रीती । सखि इन्ह कोटि काम छबि जीती ॥
सुर नर असुर नाग मुनि माहीं । सोभा असि कहुँ सुनिअति नाहीं ॥
त्या आपसात मोठ्या प्रेमाने बोलत होत्या की, ' हे सखी, यांनी तर कोट्यवधी मदनांचे सौंदर्य लुटून घेतले आहे. देव, मनुष्य, असुर, नाग आणि मुनी यांच्यामध्येही असे सौंदर्य कुणाचे असल्याचे ऐकिवात नाही. ॥ ३ ॥
बिष्नु चारि भुज बिधि मुख चारी । बिकट बेष मुख पंच पुरारी ॥
अपर देउ अस कोउ न आही । यह छबि सखी पटतरिअ जाही ॥
भगवान विष्णूंना चार बाहू आहेत, ब्रह्मदेवांना चार मुखे आहेत, शिवांचा भयानक वेष आहे आणि त्यांना पाच मुखे आहेत. हे सखी, किंबहुना या रुपाला उपमा देण्यासाठी कोणताच देव नाही. ॥ ४ ॥
 दोहा--बय किसोर सुषमा सदन स्याम गौर सुख धाम ।
अंग अंग पर वारिअहिं कोटि कोटि सत काम ॥ २२० ॥
या किशोर अवस्थेमध्ये, हे सौंदर्याचे माहेर असलेले, सावळ्या व गोर्‍या रंगाचे किशोर हे सुखाचे निधान आहेत. यांच्या एकेका अवयवावरुन शतकोटी मदनांना ओवाळून टाकावे. ॥ २२० ॥
कहहु सखी अस को तनुधारी । जो न मोह यह रुप निहारी ॥
कोउ सप्रेम बोली मृदु बानी । जो मैं सुना सो सुनहु सयानी ॥
हे सखी, सांग बरे, असा कोणता देहधारी आहे की, जो हे रुप पाहून मोहून जाणार नाही ? ' तेव्हा दुसरी एक सखी प्रेमाने व कोमल शब्दांनी म्हणाली, ' अग शहाणे, मी जे ऐकले आहे ते ऐक. ॥ १ ॥
ए दोऊ दसरथ के ढोटा । बाल मरालन्हि के कल जोटा ॥
मुनि कौसिक मख के रखवारे । जिन्ह रन अजिर निसाचर मारे ॥
हे दोन्ही राजकुमार महाराज दशरथांचे पुत्र आहेत. ही बाल राजहंसांची सुंदर जोडी आहे. या दोघांनी विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण केले आहे. यांनी युद्धक्षेत्रामध्ये राक्षसांना मारले आहे. ॥ २ ॥
स्याम गात कल कंज बिलोचन । जो मारीच सुभुज मदु मोचन ॥
कौसल्या सुत सो सुख खानी । नामु रामु धनु सायक पानी ॥
ज्यांचे अंग सावळे असून सुंदर कमलांसारखे नेत्र आहेत, जे मारीच व सुबाहू यांचा मद उतरुन टाकणारे आहेत आणि सौंदर्याची खाण आहेत, ज्यांनी हातांमध्ये धनुष्य-बाण धारण केलेले आहेत, ते हे कौसल्येचे पुत्र होत. त्यांचे नाव राम आहे. ॥ ३ ॥
गौर किसोर बेषु बर काछें । कर सर चाप राम के पाछें ॥
लछिमनु नामु राम लघु भ्राता । सुनु सखि तासु सुमित्रा माता ॥
ज्यांचा रंग गोरा असून किशोर अवस्था आहे, ज्यांनी सुंदर वेश धारण केला आहे. आणि हाती धनुष्य-बाण घेऊन जे श्रीरामांच्या मागे-मागे चालत आहेत, ते रामांचे धाकटे भाऊ आहेत. त्यांचे नाव लक्ष्मण, हे सखी, त्यांची माता सुमित्रा आहे. ॥ ४ ॥
 दोहा--बिप्रकाजु करि बंधु दोउ मग मुनिबधू उधारि ।
आए देखन चापमख सुनि हरषीं सब नारि ॥ २२१ ॥
हे दोघे बंधू ऋषी विश्वामित्रांचे कार्य पूर्ण करुन आणि वाटेमध्ये मुनी गौतमांची पत्नी अहल्या हिचा उद्धार करुन येथे धनुष्य-यज्ञ पाहण्यासाठीआलेले आहेत. ' हे ऐकून सर्व स्त्रियांना आनंद झाला. ॥ २२१ ॥
देखि राम छबि कोउ एक कहई । जोगु जानकिहि यह बरु अहई ॥
जौं सखि इन्हहि देख नरनाहू । पन परिहरि हठि करइ बिबाहू ॥
श्रीरामांचे रुप पाहून कुणी तरी आपल्या सखीला म्हणाली की, ' हा जानकीसाठी योग्य आहे. हे सखी, जर राजांनी यांना पाहिले, तर ते आपली ( धनुष्ययज्ञाची ) प्रतिज्ञा सोडून आग्रहाने यांच्याशीच जानकीचे लग्न लावून टाकतील. ' ॥ १ ॥
कोउ कह ए भूपति पहिचाने । मुनि समेत सादर सनमाने ॥
सखि परंतु पनु राउ न तजई । बिधि बस हठि अबिबेकहि भजई ॥
कुणी म्हणाली की, ' राजांनी यांना ओळखले आहे आणि मुनींच्या सोबतच यांचा आदराने सन्मान केलेला आहे. परंतु हे सखी, राजे आपला पण सोडून देणार नाहीत. ते नशिबावर भरवसा ठेवून हट्टाने हा अविवेक करीत आहेत.' ( आपल्या पणावर दृढ राहण्याचा मूर्खपणा सोडणार नाहीत. ) ॥ २ ॥
कोउ कह जौं भल अहइ बिधाता । सब कहँ सुनिअ उचित फलदाता ॥
तौ जानकिहि मिलिहि बरु एहू । नाहिन आलि इहॉं संदेहू ॥
कोणी म्हणत होती की, ' जर विधाता न्यायी आहे आणि तो सर्वांना उचित फळ देतो, असे म्हणतात. हे सत्य असेल, तर जानकीला हाच वर लाभेल. हे सखी, यात शंका नाही. ॥ ३ ॥
जौं बिधि बस अस बनै सँजोगू । तौ कृतकृत्य होइ सब लोगू ॥
सखि हमरें आरति अति तातें । कबहुँक ए आवहिं एहि नातें ॥
जर दैवयोगाने हे जुळून आले, तर आम्ही सर्व कृतार्थ होऊन जाऊ. हे सखी, या नात्याने ( जानकीपती म्हणून ) हे कधी येथे येतील, ( आणि आम्हांला यांचे दर्शन होईल ), म्हणून मला फार आतुरता लागून राहिली आहे. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: