Monday, September 14, 2020

ShriRamcharitmans Part 45 श्रीरामचरितमानस भाग ४५

 

ShriRamcharitmans Part 45 
Doha 222 to 224 
श्रीरामचरितमानस भाग ४५ 
दोहा २२२ ते २२४ 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा--नाहिं त हम कहुँ सुनहु सखि इन्ह कर दरसनु दूरि ।
यह संघटु तब होइ जब पुन्य पुराकृत भूरि ॥ २२२ ॥
( हा विवाह झाला नाही तर ) हे सखी, आम्हांला यांचे दुर्लभ दर्शन होणार नाही. आपल्या पूर्वजन्मीचे पुण्य थोर असेल तरच हा योग घडून येईल.' ॥ २२२ ॥
बोली अपर कहेहु सखि नीका । एहिं बिआह अति हित सबही का ॥
कोउ कह संकर चाप कठोरा । ए स्यामल मृदु गात किसोरा ॥
दुसरी सखी म्हणाली, ' हे सखी, तू फार छान बोललीस. हा विवाह होण्यात सर्वांचेच मोठे कल्याण आहे. ' कुणी म्हणाली, ' भगवान शंकरांचे धनुष्य मोठे अवजड आहे आणि हे सावळे राजकुमार सुकुमार बालक आहेत. ॥ १ ॥
 सबु असमंजस अहइ सयानी । यह सुनि अपर कहइ मृदु बानी ॥
सखि इन्ह कहँ कोउ अस कहहीं । बड़ प्रभाउ देखत लघु अहहीं ॥
ए शहाणे ! येथेच सर्व घोळ आहे. ' हे ऐकून दुसरी सखी कोमलपणे म्हणाली की, ' हे सखी, यांच्याविषयी काहीजण म्हणतात की, हे जरी दिसायला लहान वाटले, तरी यांचा प्रभाव फार मोठा आहे. ॥ २ ॥
परसि जासु पद पंकज धूरी । तरी अहल्या कृत अघ भूरी ॥
सो कि रहिहि बिनु सिवधनु तोरें । यह प्रतीति परिहरिअ न भोरें ॥
ज्यांच्या चरणकमलांच्या धुळीच्या स्पर्शामुळे मोठे पाप घडलेली अहल्या तरुन गेली, ते शिवधनुष्य तोडल्याविना राहतील काय ? हा विश्र्वास चुकूनही सोडता कामा नये. ॥ ३ ॥
जेहिं बिरंचि रचि सीय सँवारी । तेहिं स्यामल बरु रचेउ बिचारी ॥
तासु बचन सुनि सब हरषानीं । ऐसेइ होउ कहहिं मृदु बानीं ॥
ज्या विधात्याने मोठ्या चातुर्याने कौशल्यपूर्वक सीतेला निर्माण केले, त्यानेच विचारपूर्वक हा सावळा वरही निर्माण केला आहे. ' तिचे हे बोल ऐकून सर्वजणींना आनंद झाला आणि कोमल शब्दात त्या म्हणू लागल्या की, ' असेच घडो. ' ॥ ४ ॥
दोहा--हियँ हरषहिं बरषहिं सुमन सुमुखि सुलोचनि बृंद ।
जाहिं जहॉं जहँ बंधु दोउ तहँ तहँ परमानंद ॥ २२३ ॥
त्या सुंदर कमलनेत्र स्त्रियांचे समुदाय मनातून आनंदित होऊन फुलांचा वर्षाव करु लागले. दोघे भाऊ जिथे जिथे जात होते, तिथे तिथे मोठा आनंद पसरत होता. ॥ २२३ ॥
पुर पूरब दिसि गे दोउ भाई । जहँ धनुमख हित भूमि बनाई ॥
अति बिस्तार चारु गच ढारी । बिमल बेदिका रुचिर सँवारी ॥
दोघे भाऊ नगराच्या पूर्वेला गेले. तिथे धनुष्य-यज्ञासाठी रंगभूमी बनविली होती. विस्तृत असे बनविलेले पक्के अंगण होते. त्यावर सुंदर व स्वच्छ असा चबुतरा सजविलेला होता. ॥ १ ॥
चहुँ दिसि कंचन मंच बिसाला । रचे जहॉं बैठहिं महिपाला ॥
तेहि पाछें समीप चहुँ पासा । अपर मंच मंडली बिलासा ॥
चोहीकडे सोन्याचे मोठमोठे चबुतरे राजांना बसण्यासाठी उभातले होते. त्यांच्या मागे जवळच चारी बाजूंना दुसर्‍या सज्ज्यांचा गोलाकार वेढा शोभत होता. ॥ २ ॥
कछुक ऊँचि सब भॉंति सुहाई । बैठहिं नगर लोग जहँ जाई ॥
तिन्ह के निकट बिसाल सुहाए । धवल धाम बहुबरन बनाए ॥
तो काहीसा उंच होता आणि सर्व तर्‍हेने सुंदर होता. तेथे नगरातील लोक बसणार होते. त्यांच्याजवळच विशाल व सुंदर अशी बसण्याची ठिकाणे अनेक रंगांनी रंगविलेली होती. ॥ ३ ॥
जहँ बैठें देखहिं सब नारी । जथाजोगु निज कुल अनुहारी ॥
पुर बालक कहि कहि मृदु बचना । सादर प्रभुहि देखावहिं रचना ॥
तेथे आपल्या कुलाच्या योग्यतेप्रमाणे सर्व स्त्रिया यथायोग्य रीतीने बसून पाहू शकणार होत्या. नगरातील मुले गोड गोड बोलून मोठ्या आदराने प्रभू रामचंद्रांना यज्ञशालेची रचना दाखवीत होती. ॥ ४ ॥
दोहा--सब सिसु एहि मिस प्रेमबस परसि मनोहर गात ।
तन पुलकहिं अति हरषु हियँ देखि देखि दोउ भ्रात ॥ २२४ ॥
सर्व मुले या निमित्ताने मोठ्या प्रेमाने श्रीरामांच्या अंगाला स्पर्श करुन रोमांचित होत होती आणि दोन्ही भावांना पाहून त्यांच्या मनाला मोठा आनंद होत होता. ॥ २२४ ॥
 सिसु सब राम प्रेमबस जाने । प्रीति समेत निकेत बखाने ॥
निज निज रुचि सब लोहिं बोलाई । सहित सनेह जाहिं दोउ भाई ॥ 
श्रीरामचंद्रांनी सर्व मुलांचे ते प्रेम पाहून ( यज्ञभूमीच्या ) स्थानांची मनापासून प्रशंसा केली. ( त्यामुळे बालकांचा उत्साह, आनंद आणि प्रेम आणखी वाढले. ) ते सर्वजण आपापल्या आवडीप्रमाणे त्यांना बोलवीत होते आणि प्रत्येकाच्या बोलावण्यावर दोघे भाऊ मोठ्या प्रेमाने त्यांच्याकडे जात होते. ॥ १ ॥
राम देखावहिं अनुजहि रचना । कहि मृदु मधुर मनोहर बचना ॥
लव निमेष महुँ भुवन निकाया । रचइ जासु अनुसासन माया ॥
कोमल, मधुर व मनोहर शब्दांनी श्रीराम आपला धाकटा भाऊ लक्ष्मण यास यज्ञशालेची रचना दाखवित होते. ज्यांच्या आज्ञेने माया ही एका निमिषामध्ये ब्रह्मांडांचे समूह निर्माण करते. ॥ २ ॥
 भगति हेतु सोइ दीनदयाला । चितवत चकित धनुष मखसाला ॥
कौतुक देखि चले गुरु पाहीं । जानि बिलंबु त्रास मन माहीं ॥
ते दीनांवर दया करणारे श्रीराम भक्तीमुळे धनुष्ययज्ञशाला चकित होऊन पाहात होते. अशा प्रकारे कौतुकास्पद रचना पाहून ते गुरुंजवळ परत आले. उशीर झाल्याचे वाटून त्यांच्या मनात काहीशी भीती होती. ॥ ३ ॥
जासु त्रास डर कहुँ डर होई । भजन प्रभाउ देखावत सोई ॥
कहि बातें मृदु मधुर सुहाईं । किए बिदा बालक बरिआईं ॥ 
ज्यांच्या भयामुळे भीतीलाही भय वाटते, तेच प्रभू भजनाचा प्रभाव दाखवीत होते. त्यांनी कोमल, मधुर आणि सुंदर गोष्टी सांगून मुलांना आग्रहाने निरोप दिला. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: