Friday, August 13, 2021

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 37 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग ३७

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 37 
Doha 215 and 220 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग ३७ 
दोहा २१५ आणि २२०

दोहा—संपति चकई भरतु चक मुनि आयस खेलवार ।

तेहि निसि आश्रम पिंजरॉं राखे भा भिनुसार ॥ २१५ ॥

ती भोग-विलासाची सामग्री चकवी होती आणि भरत हा चक्रवाक. मुनींची आज्ञा हा खेळ होता. त्या खेळात त्या रात्री आक्षमरुपी पिंजर्‍यात दोघांना बंदिस्त केले होते. ( चक्रवाक पक्षी व पक्षिणी यांचा रात्रीच्यावेळी संयोग होत नाही. त्याप्रमाणे मुनींच्या आज्ञेने भोग-पदार्थ उपलब्ध होते, परंतु भरत मनानेसुद्धा त्याला शिवला नाही. ) ॥ २१५ ॥

मासपारायण, एकोणिसावा विश्राम    

कीन्ह निमज्जनु तीरथराजा । नाइ मुनिहि सिरु सहित समाजा ॥

रिषि आयसु असीस सिर राखी । करि दंडवत बिनय बहु भाषी ॥

प्रातःकाळी भरताने तीर्थराजामध्ये स्नान केले आणि सर्व परिवारासह मुनींपुढे नतमस्तक होऊन त्यांची आज्ञा आणि आशीर्वाद मिळविला. नंतर त्यांना दंडवत करुन नम्रतापूर्वक त्यांचा निरोप घेतला. ॥ १ ॥

पथ गति कुसल साथ सब लीन्हें । चले चित्रकूटहिं चितु दीन्हें ॥

रामसखा कर दीन्हें लागू । चलत देह धरि जनु अनुरागू ॥

त्यानंतर मार्ग माहीत असलेल्या लोकांबरोबर सर्व लोकांना घेऊन भरत चित्तामध्ये चित्रकूटाचे ध्यान करीत निघाला. तो रामसखा गुहाच्या हातात हात घालून असा चालला होता की, जणू प्रत्यक्ष श्रीरामप्रेमच साकार झाले होते. ॥ २ ॥

नहिं पद त्रान सीस नहिं छाया । पेमु नेमु ब्रतु धरमु अमाया ॥

लखन राम सिय पंथ कहानी । पूँछत सखहि कहत मृदु बानी ॥

त्याच्या पायांत जोडे नव्हते आणि डोक्यावर छत्र नव्हते. त्याचे प्रेम, नियम, व्रत व धर्म निष्कपट होते. तो निषादराजाला लक्ष्मण, श्रीरामचंद्र आणि सीता यांच्या प्रवासाविषयी कोमल वाणीने विचारत होता. ॥ ३ ॥

राम बास थल बिटप बिलोकें । उर अनुराग रहत नहिं रोकें ॥

देखि दसा सुर बरिसहिं फूला । भइ मृदु महि मगु मंगल मूला ॥

श्रीरामांच्या उतरण्याच्या जागा आणि तेथील वृक्ष पाहून त्याच्या हृदयातील प्रेम आवरत नव्हते. भरताची ती दशा पाहून देव फुले उधळू लागले. पृथ्वी कोमल बनली आणि मार्ग मांगल्याचे मूळ बनला. ॥ ४ ॥

दोहा—किएँ जाहिं छाया जलद सुखद बहइ बर बात ।

तस मगु भयउ न राम कहँ जस भा भरतहि जात ॥ २१६ ॥

मेघ सावली धरीत होते, सुखद वारा वाहात होता. भरत जात होता त्यावेळी मार्ग असा सुखदायक झाला की, तसा श्रीरामचंद्रांसाठीही झाला नव्हता. ॥ २१६ ॥

जड़ चेतन मग जीव घनेरे । जे चितए प्रभु जिन्ह प्रभु हेरे ॥

ते सब भए परम पद जोगू । भरत दरस मेटा भव रोगू ॥

वाटेत असंख्य जड-चेतन जीव होते. त्यांपैकी ज्यांना श्रीरामांनी कृपा-दृष्टीने पाहिले किंवा ज्यांनी प्रभु श्रीरामांना पाहिले, ते सर्व तत्क्षणी परमपदाचे अधिकारी झाले. परंतु आता भरताच्या दर्शनामुळे त्यांचा जन्म-मरणरुपी भव-रोगच नाहींसा झाला. ॥ १ ॥

यह बड़ि बात भरत कइ नाहीं । सुमिरत जिनहि रामु मन माहीं ॥

बारक राम कहत जग जेऊ । होत तरन तारन नर तेऊ ॥

भरताकरता ही काही फार मोठी गोष्ट नव्हती. कारण प्रत्यक्ष श्रीराम त्याचे आपल्या मनात सदा स्मरण करीत होते. जगामध्ये जे मनुष्य एकदा ‘ राम ‘ म्हणतात, ते सुद्धा तरुन जाणारे व तारुन नेणारे होत असतात. ॥ २ ॥

भरतु राम प्रिय पुनि लघु भ्राता । कस न होइ मगु मंगलदाता ॥

सिद्ध साधु मुनिबर अस कहहीं । भरतहि निरखि हरषु हियँ लहहीं ॥

शिवाय, भरत हा तर श्रीरामचंद्रांचा प्रिय असा धाकटा भाऊ होता. मग त्याच्यासाठी मार्ग सुखदायक का बरे होणार नाही ? असे सिद्ध, साधू आणि श्रेष्ठ मुनी म्हणत होते आणि भरताला पाहून मनातून आनंदित होत होते. ॥ ३ ॥

देखि प्रभाउ सुरेसहि सोचू । जगु भल भलेहि पोच कहुँ पोचू ॥

गुर सन कहेउ करिअ प्रभु सोई । रामहि भरतहि भेट न होई ॥

भरताचे हे प्रेम पाहून इंद्र कालजीत पडला. ( आता याच्या प्रेमाला वश होऊन श्रीराम परत न जावोत व आमच्या कार्याला विघ्न न येवो, म्हणजे झाले. ) जग चांगल्यासाठी चांगले व वाईटासाठी वाईट असते. इंद्राने गुरु बृहस्पतींना म्हटले की, ‘ हे प्रभो, श्रीरामचंद्र व भरत यांची भेट होऊ नये असा उपाय करा. ॥ ४ ॥

दोहा—रामु सँकोची प्रेम बस भरत सपेम पयोधि ।

बनी बात बेगरन चहति करिअ जतनु छलु सोधि ॥ २१७ ॥

श्रीरामचंद्र भिडस्त आणि प्रेमाला भुलणारे आहेत आणि भरत तर प्रेमाचा समुद्र आहे. सगळे जुळून आलेले विस्कटू पाहात आहेत. म्हणून काहीतरी कपटी युक्ती शोधून यावर उपाय करा. ॥ २१७ ॥

बचन सुनत सुरगुरु मुसुकाने । सहसनयन बिनु लोचन जाने ॥

मयापति सेवक सन माया । करइ त उलटि परइ सुरराया ॥

इंद्राचे बोलणे ऐकताच देवगुरु बृहस्पतींना हसू आले. त्यांना तो हजार डोळ्यांचा ( पण ज्ञान नेत्र नसल्यामुळे ) नेत्ररहित ( मूर्ख ) वाटला. ते म्हणाले, ‘ हे देवराज, मायेचे स्वामी असलेल्या श्रीरामचंद्रांच्या सेवकावर जर कुणी माया केली, तर ती उलटून त्याच्यावरच पडते. ॥ १ ॥

तब किछु कीन्ह राम रुख जानी । अब कुचालि करि होइहि हानी ॥

सुनु सुरेस रघुनाथ सुभाऊ । निज अपराध रिसाहिं न काऊ ॥

मागील वेळी श्रीरामांचा रोख पाहूनच वनवासाला जाण्याचे कारस्थान रचले होते. परंतु यावेळी दुष्ट चाल खेळल्यास हानीच होईल. हे देवराज, श्रीरामांचा स्वभाव ऐका. ते स्वतःवर केलेल्या अपराधामुळे कधी रागावत नाहीत. ॥ २ ॥

जो अपराधु भगत कर करई । राम रोष पावक सो जरई ॥

लोकहुँ बेद बिदित इतिहासा । यह महिमा जानहिं दुरबासा ॥

परंतु कुणी त्यांच्या भक्ताचा अपराध केला, तर मात्र श्रीराम क्रोधाग्नीने भडकतात. लोक व वेद यांमध्ये ही गोष्ट प्रसिद्ध आहे. हा महिमा दुर्वासांना माहीत आहे. ॥ ३ ॥

भरत सरिस को राम सनेही । जगु जप राम रामु जप जेही ॥

सारे जग श्रीरामांचा जप करोत, परंतु श्रीराम स्वतः ज्याचा जप करतात, त्या भरतासारखा श्रीरामांचा भक्त कोण असणार ? ॥ ४ ॥

दोहा—मनहुँ न आनाअ अमरपति रघुबर भगत अकाजु ।

अजसु लोक परलोक दुख दिन दिन सोक समाजु ॥ २१८ ॥

म्हणून हे देवराज, रघुकुलश्रेष्ठ श्रीरामांच्या भक्ताच्या कार्यात विघ्न आणायचे मनातसुद्धा आणू नका. असे केल्याने या लोकी अपकीर्ती आणि परलोकी दुःख मिळेल आणि शोकाची कारणे दिवसेंदिवस वाढतच जातील. ॥ २१८ ॥

सुनु सुरेस उपदेसु हमारा । रामहि सेवकु परम पिआरा ॥

मानत सुखु सेवक सेवकाईं । सेवक बैर बैरु अधिकाईं ॥

हे देवराज, आमचा उपदेश ऐका. श्रीरामांना आपला सेवक अत्यंत प्रिय असतो. त्यांना आपल्या सेवकाच्या सेवेमध्ये सुख वाटते आणि सेवकाबरोबर वैर केल्यास ते फार मोठे शत्रुत्व मानतात. ॥ १ ॥

जद्यपि सम नहिं राग न रोषू । गहहिं न पाप पूनु गुन दोषू ॥

करम प्रधान बिस्व करि राखा । जो जस करइ सो तस फलु चाखा ॥

जरी ते सम आहेत. त्यांच्यामध्ये आसक्ती नाही व रोषही नाही आणि ते कुणाचे पाप-पुण्य आणि गुण-दोषही ग्रहण करीत नाहीत, त्यांनी विश्वामध्ये कर्मालाच प्राधान्य दिले आहे, जो जसे कर्म करतो, त्याला तसेच फळ भोगावे लागते. ॥ २ ॥

तदपि करहिं सम बिषम बिहारा । भगत अभगत हृदय अनुसारा ॥

अगुन अलेप अमान एकरस । रामु सगुन भए भगत पेम बस ॥

तथापि ते भक्त व अभक्ताच्या भावनेप्रमाणे सम व विषम व्यवहार करतात. ( भक्ताला आलिंगन देतील, तर अभक्ताला ठार मारुन त्याला तारुन नेतील. ) गुणरहित, निर्लेप, मानरहित आणि सदा एकरस असलेले भगवान श्रीराम भक्ताच्या प्रेमामुळेच सगुण झालेले आहेत. ॥ ३ ॥

राम सदा सेवक रुचि राखी । बेद पुरान साधु सुर साखी ॥

अस जियँ जानि तजहु कुटिलाई । करहु भरत पद प्रीति सुहाई ॥

श्रीरामांना नेहमी आपले भक्त आवडतात. वेद, पुराणे, साधू आणि देव हे यासाठी साक्षीला आहेत. असे जाणून कपट सोडून भरताच्या चरणी मनापासून प्रेम बाळगा. ॥ ४ ॥

दोहा—राम भगत परहित निरत पर दुख दुखी दयाल ।

भगत सिरोमनि भरत तें जनि डरपहु सुरपाल ॥ २१९ ॥

हे देवराज इंद्रा, श्रीरामचंद्रांचे भक्त नेहमी दुसर्‍याचे हित करण्यात मग्न असतात. ते दुसर्‍यांच्या दुःखाने दुःखी व दयाळू असतात. त्यात भरत हा तर भक्तशिरोमणि आहे. याला मुळीच घाबरु नका. ॥ २१९ ॥

सत्यसंघ प्रभु सुर हितकारी । भरत राम आयस अनुसारी ॥

स्वारथ बिबस बिकल तुम्ह होहू । भरत दोसु नहिं राउर मोहू ॥

प्रभू श्रीरामचंद्र हे सत्यप्रतिज्ञ व देवांचे हित करणारे आहेत आणि

भरत हा श्रीरामांच्या आज्ञेप्रमाणे वागणारा आहे. तुम्ही विनाकारण स्वार्थाचा विचार करुन घाबरला आहात. यात भरताचा काही दोष नाही. तुमचा मोहच आहे. ‘ ॥ १ ॥

सुनि सरबर सुरगुर बर बानी । भा प्रमोदु मन मिटी गुलानी ॥

बरषि प्रसून हरषि सुरराऊ । लगे सराहन भरत सुभाऊ ॥

देवगुरु ब्रहस्पतींची हितकर वाणी ऐकून इंद्राला मनापासून आनंद झाला आणि त्याची चिंता नाहीशी झाली. तेव्हा आनंदाने त्याने पुष्पवर्षाव करुन भरताची प्रशंसा केली. ॥ २ ॥

एहि बिधि भरत चले मग जाहीं । दरसा देखि मुनि सिद्ध सिहाहीं ॥

जबहिं रामु कहि लेहिं उससा । उमगत पेमु मनहुँ चहु पासा ॥

अशा प्रकारे भरत वाटेने चालत होता. त्याची प्रेममय दशा पाहून मुनी व सिद्ध पुरुष यांनासुद्धा हेवा वाटे.भरत जेव्हा ‘ राम ‘ म्हणत उसासा टाकी, तेव्हा जणू चोहीकडे प्रेम उसळे. ॥ ३ ॥

द्रवहिं बचन सुनि कुलिस पषाना ।  पुरजन पेमु न जाइ बखाना ॥

बीच बास करि जमुनहिं आए । निरखि नीरु लोचन जल छाए ॥

भरताचे प्रेमाचे व दैन्याचे बोलणे ऐकून वज्र व पाषाणही विरळून जात. अयोध्यावासीयांच्या प्रेमाबद्दल काय सांगावे ? मध्ये एकदा मुक्काम करुन भरत यमुनातीरावर पोहोचला. यमुनेचे पाणी पाहून त्याच्या डोळ्यांत पाणी आले. ॥ ४ ॥

दोहा—रघुबर बरन बिलोकि बर बारि समेत समाज ।

होत मगन बारिधि बिरह चढ़े बिबेक जहाज ॥ २२० ॥

श्रीरामांच्या सावळ्या रंगाप्रमाणे असलेले यमुनेचे श्यामल जळ पाहून भरत व सर्व परिवार प्रेमविव्हल होऊन विरहरुपी समुद्रात बुडुन जात असताना ते विवेकरुपी जहाजावर चढले. ( विरहव्यथेमध्ये बुडत असताना आपण लवकर जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेऊ, या विचाराने ते सर्व उत्साहित झाले. ) ॥ २२० ॥

जमुन तीर तेहि दिन करि बासू । भयउ समय सम सबहि सुपासू ॥

रातिहिं घाट घाट की तरनी । आईं अगनित जाहिं न बरनी ॥

त्या दिवशी यमुनेच्या किनार्‍यावर त्यांनी मुक्काम केला. प्रसंगानुरुप खाण्या-पिण्याची चांगली व्यवस्था झाली. निषादराजाच्या इशार्‍यावर रातोरात सर्व घाटावरील असंख्य नौका तेथे आल्या होत्या. त्यांचे वर्णनही करणें कठीण. ॥ १ ॥

प्रात पार भए एकहि खेवॉं । तोषे रामसखा की सेवॉं ॥

चले नहाइ नदिहि सिर नाई । साथ निषादनाथ दोउ भाई ॥

सकाळी एका फेरीतच सर्व लोक पलीकडे गेले. ते सर्व श्रीरामांचा मित्र निषादराजाच्या या सेवेमुळे प्रसन्न झाले. नंतर स्नान करुन व यमुना नदीपुढे नतमस्तक होऊन दोघे भाऊ निषादराजासह निघाले. ॥ २ ॥             

आगें मुनिबर बाहन आछें । राजसमाज जाइ सबु पाछें ॥

तेहि पाछें दोउ बंधु पयादें । भूषन बसन बेष सुठि सादें ॥

पुढील चांगल्या वाहनांवर श्रेष्ठ मुनी होते. त्यांच्यामागे सर्व राज-परिवार जात होता आणि मागे दोघे बंधू सामान्य वस्त्राभूषणामध्ये पायी चालत होते. ॥ ३ ॥

सेवक सुहृद सचिवसुत साथा । सुमिरत लखनु सीय रघुनाथा ॥

जहँ जहँ राम बास बिश्रामा । तहँ तहँ करहिं सप्रेम प्रनामा ॥

त्याच्यासोबत सेवक, मित्र व मंत्र्यांचे पुत्र होते. लक्ष्मण,

 सीता व रघुनाथ यांचे स्मरण करीत ते चालत होते. जिथे

 जिथे श्रीरामांनी निवास केला, विश्रांती घेतली, तेथे तेथे ते

 प्रेमाने प्रणाम करीत होते. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: