Tuesday, May 31, 2022

ShriRamCharitManas Aranyakand Part 12 Doha 26 to 27 श्रीरामचरितमानस अरण्यकाण्ड भाग १२ दोहा २६ ते २७

 

ShriRamCharitManas 
Aranyakand Part 12 
Doha 26 to 27 
श्रीरामचरितमानस 
अरण्यकाण्ड भाग १२ 
दोहा २६ ते २७

छं०—निज परम प्रीतम देखि लोचन सुफल करि सुख पाइहौं ।

श्री सहित अनुज समेत कृपानिकेत पद मन लाइहौं ॥

निर्बान दायक क्रोध जा कर भगति अबसहि बसकरी ।

निज पानि सर संधानि सो मोहि बधिहि सुखसागर हरी ॥

तो मनात विचार करु लागला की, आपल्या परमप्रिय श्रीरामांना पाहून नेत्रांचे पारणे फेडीन. जानकीसह व लक्ष्मणासह कृपानिधान श्रीरामांच्या चरणी मन लावीन. ज्यांचा क्रोध सुद्धा मोक्ष देणारा आहे आणि ज्यांची भक्ती स्वतंत्र अशा भगवंताना वश करणारी आहे, अहाहा ! तेच आनंदाचे सागर असलेले श्रीहरी आपल्या हातांनी बाण मारुन माझा वध करणार !

दोहा---मम पाछें धर धावत धरें सरासन बान ।

फिरि फिरि प्रभुहि बिलोकिहउँ धन्य न मो सम आन ॥ २६ ॥

धनुष्य-बाण धारण केलेल्या प्रभूंना मी माझ्या मागे मागे मला पकडण्यासाठी पृथ्वीवर धावताना वारंवार पाहीन. माझ्यासारखा धन्य दुसरा कोणीही नाही. ॥ २६ ॥

 तेहि बन निकट दसानन गयऊ । तब मारीच कपटमृग भयऊ ॥

अति बिचित्र कछु बरनि न जाई । कनक देह मनि रचित बनाई ॥

श्रीराम ज्या वनात राहात होते, त्या वनाजवळ जेव्हा रावण पोहोचला, तेव्हा मारीच वेषधारी मृग झाला. तो इतका अद्भुत होता की, त्याचे वर्णन करता येत नाही. त्याचे सोन्याचे शरीर रत्नजडित होते. ॥ १ ॥

सीता परम रुचिर मृग देखा । अंग अंग सुमनोहर बेषा ॥

सुनहु देव रघुबीर कृपाला । एहि मृग कर अति सुंदर छाला ॥

सीतेने ते अत्यंत सुंदर हरण बघितले. त्याच्या अंगांची शोभा फार मनोहर होती. ती म्हणू लागली, ‘ हे देवा, हे कृपाळू रघुवीर, ऐका. या मृगाचे कातडे फारच सुंदर आहे. ‘ ॥ २ ॥

सत्यसंध प्रभु बधि करि एही । आनहु चर्म कहति बैदेही ।

तब रघुपति जानत सब कारन । उठे हरषि सुर काजु सँवारन ॥

जानकी म्हणाली, ‘ हे सत्यप्रतिज्ञ प्रभो, याला मारुन याचे कातडे आणून द्या. ‘ तेव्हा रघुनाथ मारीच हा खोटा मृग असल्याचे जाणूनही देवांचे कार्य सिद्ध करण्यासाठी आनंदाने उठले. ॥ ३ ॥

मृग बिलोकि कटि परिकर बॉंधा । करतल चाप रुचिर सर सॉंधा ॥

प्रभु लछिमनहि कहा समुझाई । फिरत बिपिन निसिचर बहु भाई ॥

हरणाला पाहून श्रीरामांनी कंबर कसली आणि हातात धनुष्य घेऊन त्याच्यावर दिव्य बाण चढविला. मग प्रभूंनी लक्ष्मणाला समजावून सांगितले की, ‘ हे बंधू, वनात पुष्कळ राक्षस फिरत आहेत. ॥ ४ ॥

सीता केरि करेहु रखवारी । बुधि बिबेक बल समय बिचारी ॥

प्रभुहि बिलोकि चला मृग भाजी । धाए रामु सरासन साजी ॥

तू बुद्धीने आणि विवेकाने शक्ती व वेळ-प्रसंग पाहून सीतेचे रक्षण कर. ‘ प्रभूंना पाहून मृग पळू लागला. श्रीरामचंद्रसुद्धा धनुष्य सज्ज करुन त्याच्यामागे धावले. ॥ ५ ॥

निगम नेति सिव ध्यान न पावा । मायामृग पाछें सो धावा ॥

कबहुँ निकट पुनि दूरि पराई । कबहुँक प्रगटइ कबहुँ छपाई ॥

वेद ज्यांच्याविषयी ‘ नेति नेति ‘ असे म्हणतात आणि शिवांनाही ध्यानामध्ये ज्यांचे दर्शन घडत नाही, जे मन व वाणी यांच्या पलीकडचे आहेत, तेच श्रीराम मायेने बनलेल्या मृगामागे धावत होते. तो कधी जवळ येई, तर कधी दूर पळे. कधी प्रकट दिसे, तर कधी लपून राही. ॥ ६ ॥

प्रगटत दुरत करत छल भूरी । एहि बिधि प्रभुहि गयउ लै दूरी ॥

तब तकि राम कठिन सर मारा । धरनि परेउ करि घोर पुकारा ॥

अशाप्रकारे कधी दिसत तर कधी लपत अनेक प्रकारे कपट करीत तो प्रभूंना दूर घेऊन गेला. तेव्हा श्रीरामांनी नेम धरुन तीक्ष्ण बाण मारला. तो लागताच तो किंचाळून खाली पडला. ॥ ७ ॥

लछिमन कर प्रथमहिं लै नामा । पाछें सुमिरेसि मन महुँ रामा ॥

प्रान तजत प्रगटेसि निज देहा । सुमिरेसि रामु समेत सनेहा ॥

प्रथम लक्ष्मणाचे नाव घेऊन त्याने श्रीरामांचे स्मरण केले. प्राण-त्याग करताना त्याने आपले राक्षसी रुप प्रकट केले आणि प्रेमाने श्रीरामांचे स्मरण केले. ॥ ८ ॥

अंतर प्रेम तासु पहिचाना । मुनि दुर्लभ गति दीन्हि सुजाना ॥

सर्वज्ञ श्रीरामांनी त्याच्या मनातील प्रेम पाहून त्याला मुनींनाही दुर्लभ असलेली आपल्या परमपदाची गती दिली. ॥ ९ ॥

दोहा---बिपुल सुमन सुर बरषहिं गावहिं प्रभु गुन गाथ ।

निज पद दीन्ह असुर कहुँ दीनबंधु रघुनाथ ॥ २७ ॥

देव फुले उधळत होते आणि प्रभूंची स्तुती करीत होते की, श्रीरघुनाथ असे दीनबंधू आहेत की, त्यांनी असुरालाही आपले परमपद दिले. ॥ २७ ॥

खल बधि तुरत फिरे रघुबीरा । सोह चाप कर कटि तूनीरा ॥

आरत गिरा सुनी जब सीता । कह लछिमन सन परम सभीता ॥

दुष्ट मारीचाला मारुन श्रीरघुवीर लगेच परतले. त्यांच्या हातात धनुष्य व कमरेला भाता शोभून दिसत होता. इकडे मरताना मारीचाने ‘ हा लक्ष्मणा ‘ असा आवाज काढला होता. जेव्हा सीतेने ती दुःखपूर्ण वाणी ऐकली, तेव्हा ती फार घाबरली आणि लक्ष्मणाला म्हणू लागली, ॥ १ ॥

जाहु बेगि संकट अति भ्राता । लछिमन बिहसि कहा सुनु माता ॥

भृकटि बिलास सृष्टि लय होई । सपनेहुँ संकट परइ कि सोई ॥

‘ तू ताबडतोप जा. तुझे भाऊ संकटात आहेत. ‘ लक्ष्मण हसून म्हणला, ‘ हे माते, ज्यांच्या भृकुटीच्या नुसत्या इशार्‍यावर संपूर्ण सृष्टीचा नाश होतो, ते श्रीराम कधी स्वप्नातही संकटात पडू शकतील काय ‘ ? ॥ २ ॥

मरम बचन जब सीता बोला । हरि प्रेरित लछिमन मन डोला ॥

बन दिसि देव सौंपि सब काहू । चले जहॉं रावन ससि राहू ॥

त्यावर सीता मनाला बोचणारे बोलू लागली. तेव्हा भगवंतांच्या प्रेरणेने लक्ष्मणाचे मनही अस्थिर झाले. तो सीतेला वन-देवता व दिशा-देवतांच्या भरवशावर सोडून निघाला. रावणरुपी चंद्राला ग्रासणारे राहुरुप श्रीराम होते, तिकडे तो गेला. ॥ ३ ॥

सून बीच दसकंधर देखा । आवा निकट जती कें बेषा ॥

जाकें डर सुर असुर डेराहीं । निसि न नीद दिन अन्न न खाहीं ॥

जवळ कुणी नाही, अशी संधी बघून रावण संन्यासी वेषात सीतेजवळ आला. ज्याच्या भीतीमुळे देव आणि दैत्य इतके घाबरत की, त्यांना रात्री झोप येत नसे आणि दिवसा पोटभर जेवणही जात नसे. ॥ ४ ॥

सो दससीस स्वान की नाईं । इत उत चितइ चला भड़िहाईं ॥

इमि कुपंथ पग देत खगेसा । रह न तेज तन बुधि बल लेसा ॥

तोच रावण कुत्र्याप्रमाणे इकडे-तिकडे पाहात चोरी करण्यास निघाला. काकभुशुंडी म्हणतात, ‘ हे गरुडा, अशाप्रकारे कुमार्गावर पाऊल ठेवताच शरीरामध्ये तेज, बुद्धी व बळ यांचा लेशही उरत नाही.’ ॥ ५ ॥

नाना बिधि करि कथा सुहाई । राजनीति भय प्रीति देखाई ॥

कह सीता सुनु जती गोसाईं । बोलेहु बचन दुष्ट की नाईं ॥

रावणाने अनेक प्रकारच्या छान गोष्टी रचून सीतेला राजनीती, भय आणि प्रेम दाखविले. सीता म्हणाली, ‘ हे संन्याश्या ! तूं तर दुष्टासारखे बोललास. ‘ ॥ ६ ॥

तब रावन निज रुप देखावा । भई सभय जब नाम सुनावा ॥

कह सीता धरि धीरजु गाढ़ा । आइ गयउ प्रभु रहु खल ठाढ़ा ॥

तेव्हा रावणाने आपले खरे रुप दाखविले आणि जेव्हा आपले नाव सांगितले, तेव्हा सीता भयभीत झाली. तिने मोठ्या धीराने म्हटले, ‘ अरे दुष्टा, थांब तर खरा ! प्रभू आले. ‘ ॥ ७ ॥

जिमि हरिबधुहि छुद्र सस चाहा । भएसि कालबस निसिचर नाहा ॥

सुनत बचन दससीस रिसाना । मन महुँ चरन बंदि सुख माना ॥

ज्याप्रमाणे सिंहिणीची अभिलाषा तुच्छ सशाला वाटते,

 त्याचप्रमाणे अरे राक्षसराज, तू माझी इच्छा धरल्याने

 काळाला वश झाला आहेस. ‘ हे ऐकून रावणाला राग

 आला, परंतु मनात त्याने सीतेच्या चरणांना वंदन करुन

 आनंद मानला. ॥ ८ ॥ 



Custom Search

No comments: