Tuesday, December 20, 2022

SunderKanda Part 15 ShriRamCharitManas Doha 41 to Doha 43 सुंदरकाण्ड भाग १५ श्रीरामचरितमानस दोहा ४१ ते दोहा ४३

 

SunderKanda Part 15 
ShriRamCharitManas 
Doha 41 to Doha 43 
सुंदरकाण्ड भाग १५ 
श्रीरामचरितमानस 
दोहा ४१ ते दोहा ४३

दोहा—रामु सत्यसंकल्प प्रभु सभा कालबस तोरि ।

मैं रघुबीर सरन अब जाउँ देहु जनि खोरि ॥ ४१ ॥

‘ श्रीराम सत्यसंकल्प व सर्वसमर्थ प्रभू व हे रावणा, तुझी सभा काळाच्या दाढेत आहे. म्हणून मी श्रीरामांना शरण जातो. नंतर मला दोष देऊ नकोस.’ ॥ ४१ ॥

अस कहि चला बिभीषनु जबहीं । आयूहीन भए सब तबहीं ॥

साधु अवग्या तुरत भवानी । कर कल्यान अखिल कै हानी ॥

असे म्हणून बिभीषण जाताच सर्व राक्षसांचा मृत्यु निश्र्चित झाला. शिव म्हणतात, ‘ हे भवानी, साधूचा अपमान संपूर्ण कल्याणाचा तत्काळ नाश करतो. ॥ १ ॥   

रावन जबहिं बिभीषन त्यागा । भयउ बिभव बिनु तबहिं अभागा ॥

चलेउ हरषि रघुनायक पाहीं । करत मनोरथ बहु मन माहीं ॥

रावणाने ज्या क्षणी बिभीषणाचा त्याग केला, त्याच क्षणी तो अभागी ऐश्र्वर्यहीन झाला. बिभीषण आनंदामध्ये अनेक मनोरथ करीत श्रीरघुनाथांच्याकडे गेला. ॥ २ ॥

देखिहउँ जाइ चरन जलजाता । अरुन मृदुल सेवक सुखदाता ॥

जे पद परसि तरी रिषिनारी । दंडक कानन पावनकारी ॥

तो विचार करीत होता की, ‘ मी जाऊन भगवंताच्या कोमल व तांबूस चरण-कमलांचे दर्शन घेईन. ते सेवकांना सुख देणारे आहेत. त्या चरणांच्या स्पर्शाने ऋषिपत्नी अहल्येचा उद्धार झाला आणि ते चरण दंडकवनास पवित्र करणारे आहेत. ॥ ३ ॥

जे पद जनकसुतॉं उर लाए । कपट कुरंग संग धर धाए ।

हर उर सर सरोज पद जेई । अहोभाग्य मैं देखिहउँ तेई ॥

जे चरण जानकीने आपल्या हृदयी धारण केले आहेत, जे चरण कपटमृगाच्या मागे पृथ्वीवर धावत होते आणि जी चरण-कमले साक्षात शिवांच्या हृदयरुपी सरोवरात विराजमान आहेत, तीच मी आज पाहीन. हे केवढे माझे भाग्य ! ॥ ४ ॥

दोहा—जिन्ह पायन्ह के पादुकन्हि रतु रहे मन लाइ ।

ते पद आजु बिलोकिहउँ इन्ह नयनन्हि अब जाइ ॥ ४२ ॥

ज्या चरणांच्या पादुकांमध्ये भरताने आपले मन मग्न केले आहे, अहाहा, आज जाऊन त्याच चरणांचे दर्शन मी आपल्या नेत्रांनी घेणार ! ॥ ४२ ॥

एहि बिधि करत सप्रेम बिचारा । आयउ सपदि सिंधु एहिं पारा ॥

कपिन्ह बिभीषनु आवत देखा । जाना कोउ रिपु दूत बिसेषा ॥

अशा प्रकारे प्रेमपूर्वक विचार करीत बिभीषण लगेच समुद्राच्या पलीकडील तीरावर पोहोचला. बिभीषण येताना पाहून वानरांना वाटले की, हा शत्रूचा कोणी खास दूत असावा. ॥ १ ॥

ताहि राखि कपीस पहिं आए । समाचार सब ताहि सुनाए ॥

कह सुग्रीव सुनहु रघुराई । आवा मिलन दसानन भाई ॥

त्याला पहार्‍यावर थांबवून ते सुग्रीवाजवळ आले आणि त्यांनी बातमी सांगितली. सुग्रीवाने श्रीरामांच्याजवळ सांगितले की, ‘ हे रघुनाथा, रावणाचा भाऊ तुम्हांला भेटायला आला आहे. ‘ ॥ २ ॥

कह प्रभु सखा बूझिऐ काहा । कहइ कपीस सुनहु नरनाहा ॥

जानि न जाइ निसाचर माया । कामरुप केहि कारन आया ॥

प्रभू राम म्हणाले, ‘ हे मित्रा, तुझा काय विचार आहे ?’ वानरराज सुग्रीव म्हणाला, ‘ हे महाराज, राक्षसांची माया समजत नाही. आपल्या इच्छेप्रमाणे रुप बदलणारा हा कशासाठी आला आहे, कुणास ठाऊक ! ॥ ३ ॥

भेद हमार लेन सठ आवा । राखिअ बॉंधि मोहि अस भावा ॥

सखा नीति तुम्ह नीकि बिचारी । मम पन सरनागत भयहारी ॥

मला असे वाटते की, हा मूर्ख आपले रहस्य जाणून घेण्यासाठी आला आहे, म्हणून याला बांधून घालावे, ‘ श्रीराम म्हणाले, ‘ हे मित्रा, तू चांगली नीती सांगितलीस. परंतु शरणागताचे भय दूर करणे, हे माझे ब्रीद आहे. ॥ ४ ॥

सुनि प्रभु बचन हरष हनुमाना । सरनागत बच्छल भगवाना ॥

प्रभूंचे वचन ऐकून हनुमानाला आनंद झाला. तो मनात म्हणू लागला की, ‘ भगवान किती शरणागतवत्सल आहेत ! ‘ ॥ ५ ॥   

दोहा—सरनागत कहुँ जे तजहिं निज अनहित अनुमानि ।

ते नर पावँर पापमय तिन्हहि बिलोकत हानि ॥ ४३ ॥

मग श्रीराम म्हणू लागले, ‘ जे लोक आपले अहित होईल, असे अनुमान करुन शरण आलेल्याला दूर लोटतात, ते क्षुद्र होत, पापी होत. त्यांना पाहणे हेसुद्धा पाप आहे.’ ॥ ४३ ॥

कोटि बिप्र बध लागहिं जाहू । आएँ सरन तजउँ नहिं ताहू ॥

सनमुख होइ जीव मोहि जबहीं । जन्म कोटि अघ नासहिं तबहीं ॥

ज्याने कोट्यावधी ब्राह्मणांची हत्या केली असेल, तोही शरण आल्यास मी त्याचा त्याग करीत नाही. ज्याक्षणीं जीव माझ्यासमोर येतो, त्याच क्षणी त्याचे कोट्यावधी जन्मांचे पाप नष्ट होते. ॥ १ ॥

पापवंत कर सहज सुभाऊ । भजनु मोर तेहि भाव न काऊ ॥

जौं पै दुष्ट हृदय सोइ होई । मोरें सनमुख आव कि सोई ॥

माझे भजन कधीही न आवडणे, हा पापी मनुष्याचा मुळचा स्वभाव असतो. जर तो रावणाचा भाऊ खराच दुष्ट मनाचा असता, तर तो माझ्यासमोर आला असता का ? ॥ २ ॥

निर्मल मन जन सो मोहि पावा । मोहि कपट छल छिद्र न भावा ॥

भेद लेन पठवा दससीसा । तबहुँ न कछु भय हानि कपीसा ॥

जो मनुष्य निर्मल मनाचा असतो, तोच मला भेटतो. मला कपट, लबाडी हे आवडत नाहीत. जरी रावणाने आपले रहस्य जाणण्यासाठी त्याला पाठविले असले, तरी हे सुग्रीवा, आपल्याला कोणतेही भय किंवा नुकसान नाही. ॥ ३ ॥

जग महुँ सखा निसाचर जेते । लछिमनु हनइ निमिष महुँ तेते ॥

जौं सभीत आवा सरनाईं । रखिहउँ ताहि प्रान की नाईं ॥

कारण हे मित्रा, जगात जितके म्हणून राक्षस आहेत,

 त्यांना एका क्षणांत लक्ष्मण मारु शकतो आणि तो

 भयभीत होऊन मला शरण आला असेल, तर मी त्याला

 प्राणाप्रमाणे जपेन. ‘ ॥ ४ ॥



Custom Search

No comments: