Wednesday, May 13, 2020

ShriRamCharitManas Part 12 श्रीरामचरितमानस भाग १२


ShriRamCharitManas Part 12 
श्रीरामचरितमानस भाग १२

श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा—जोगी जटिल अकाम मन नगन अमंगल बेष ।
अस स्वामी एहि कहँ मिलिहि परी हस्त असि रेख ॥ ६७ ॥
संशयरहित, योगी, जटाधारी, निष्कामहृदय, नग्न व अमंगल वेषधारी असा पति हिला मिळेल. हिच्या हातावरील रेषा अशाच आहेत. ॥ ६७ ॥
सुनि मुनि गिरा सत्य जियँ जानी । दुख दंपतिहि उमा हरषानी ॥
नारदहूँ यह भेदु न जाना । दसा एक समुझब बिलगाना ॥
नारदमुनींची वाणी ऐकून आणि ती खरी वाटून पति-पत्नी ( हिमवान आणि मैना ) या दोघांनाही वाईट वाटले. परंतु पार्वती आनंदित झाली. नारदांनाही त्याचे रहस्य उमजले नाही.कारण सर्वांची बाह्य दशा एकसारखी असली तरी आंतरिक भाव भिन्न होते. ॥ १ ॥
सकल सखीं गिरिजा गिरि मैना । पुलक सरीर भरे जल नैना ॥
होइ न मृषा देवरिषि भाषा । उमा सो बचनु हृदयँ धरि राखा ॥
सर्व सख्या, पार्वती, पर्वतराज हिमवान आणि मैना या सर्वांचे अंग पुलकित झाले आणि सर्वांचे नेत्र सजल झाले. देवर्षींचे वचन असत्य होणार नाही, ( हा विचार करुन ) पार्वतीने ते वचन आपल्या मनात कोरुन ठेवले. ॥ २ ॥
उपजेउ सिव पद कमल सनेहू । मिलन कठिन मन भा संदेहू ॥
जानि कुअवसरु प्रीति दुराई । सखी उछँग बैठी पुनि जाई ॥
तिला शंकरांच्या चरणी प्रेम उपजले, परंतु मनात संशय वाटत होता की, ते भेटणे कठीण आहे. वेळ-काळ पाहून उमेने आपले प्रेम लपवून ठेवले आणि ती सखीच्या मांडीवर जाऊन बसली. ॥ ३ ॥
झूठि न होइ देवरिषि बानी । सोचहिं दंपति सखीं सयानी ॥
उर धरि धीर कहइ गिरिराऊ । कहहु नाथ का करिअ उपाऊ ॥
देवर्षींची वाणी खोटी ठरणार नाही या विचाराने हिमवान, मैना आणि सर्व चतुर सख्यांना काळजी पडली. मग धीर धरुन पर्वतराजाने म्हटले की, ‘ हे नाथ, यावर उपाय काय करावा, ते सांगा. ‘ ॥ ४ ॥
दोहा—कह मुनीस हिमवंत सुनु जो बिधि लिख लिलार ।
देव दनुज नर नाग मुनि कोउ न मेटनिहार ॥ ६८ ॥
मुनीश्वर नारद म्हणाले, ‘ हे हिमवान ! ऐक. ब्रह्मदेवाने ललाटावर जे टाकू शकत नाही. ॥ ६८ ॥
तदपि एक मैं कहउँ उपाई । होइ करै जौं दैउ सहाई ॥
जस बरु मैं बरनेउँ तुम्ह पाहीं । मिलिहि उमहि तस संसय नाहीं ॥
तरीही मी एक उपाय सांगतो. दैवाची साथ मिळाली तर यश येईल. तुझ्यासमोर मी जसे वर्णन केले आहे, तसाच वर उमेला नक्की मिळेल. ॥ १ ॥
जे जे बर के दोष बखाने । ते सब सिव पहिं मैं अनुमाने ॥ 
जौं बिबाहु संकर सन होई । दोषउ गुन सम कह सबु कोई ॥
मी जे वराचे दोष सांगितले, ते सर्व माझ्या अंदाजाप्रमाणे श्रीशिवांमध्ये आहेत. जर शिवांच्या बरोबर लग्न झाले, तर लोक दोषांनाच गुणांप्रमाणे मानतील. ॥ २ ॥
जौं अहि सेज सयन हरि करहीं । बुध कछु तिन्ह कर दोषु न धरहीं ॥
भानु कृसानु सर्ब रस खाहीं । तिन्ह कहँ मंद कहत कोउ नाहीं ॥
ज्याप्रमाणे भगवान विष्णु हे शेषनागाच्या शय्येवर शयन करतात, तरीही पंडित त्यांना काही दोष देत नाहीत. सूर्य व अग्निदेव बर्‍या-वाईट सर्व रसांचे सेवन करतात, म्हणून त्यांना कोणी वाईट म्हणत नाही. ॥ ३ ॥
सुभअरु असुभसलिल सब बहई । सुरसरि कोउ अपुनीत न कहई ॥
समरथ कहुँ नहिं दोषु गोसाईं । रबि पावक सुरसरि की नाईं ॥
गंगेमध्ये शुद्ध व अशुद्ध सर्व पाणी वाहाते, परंतु गंगेला कोणी अपवित्र म्हणत नाही. सूर्य, अग्नी आणि गंगा यांच्याप्रमाणे समर्थाला कोणताही दोष लागत नाही. ॥ ४ ॥
दोहा—जौं अस हिसिषा करहिं नर जड बिबेक अभिमान ।
परहिं कलप भरि नरक महुँ जीव कि ईस समान ॥ ६९ ॥
जेव्हा मूर्ख माणसे ज्ञानाच्या घमेंडीमुळे अशा प्रकारचे वर्तन करतात, तेव्हा ती कल्पांतापर्यंत नरकात पडतात. जीव हा ईश्वरासारखा ( सर्वथा स्वतंत्र ) होऊ शकेल काय ? ॥ ६९ ॥
सुरसरि जल कृत बारुनि जाना । कबहुँ न संत करहिं तेहि पाना ॥
सुरसरि मिलें सो पावन जैसें । ईस अनीसहि अंतरु तैसें ॥
गंगेच्या पाण्यापासून बनविलेली मदिरा असते, तरी संतजन काही ती पीत नाहीत. पण तीच ( मदिरा ) गंगेच्या प्रवाहांत मिसळल्यावर पवित्र बनते. ईश्र्वर व जीव यांच्यामध्ये असाच फरक आहे. ॥ १ ॥
संभु सहज समरथ भगवाना । एहि बिबाहँ सब बिधि कल्याना ॥
दुराराध्य पै अहहिं महेसु । आसुतोष पुनि किएँ कलेसू ॥
शिव जे स्वभावतःच समर्थ आहेत, कारण ते भगवान आहेत. म्हणून या विवाहामध्ये सर्व प्रकारे कल्याण आहे. महादेवांची आराधना करणे मोठे कठीण आहे, तरीही तपाचे क्लेश सहन केल्यावर ते लगेच संतुष्ट होतात. ॥ २ ॥
जौं तपु करै कुमारि तुम्हारी । भाविउ मेटि सकहिं त्रिपुरारी ॥
जद्यपि बर अनेक जग माहीं । एहि कहँ सिव तजि दूसर नाहीं ॥
जर तुमच्या कन्येने तप केले, तर महादेव अनिष्ट प्रारब्ध नष्ट करु शकतील. जगात जरी अनेक वर असले, तरी हिच्यासाठी शिवांखेरीज दुसरा वर नाही. ॥ ३ ॥
बर दायक प्रनतारति भंजन । कृपासिंधु सेवक मन रंजन ॥
इच्छित फल बिनु सिव अवराधें । लहिअ न कोटि जोग जप साधें ॥
शिव हे वरदान देणारे, शरणागतांची दुःखे नाहीशी करणारे, कृपासागर आणि सेवकांचे मन प्रसन्न करणारे आहेत. शिवांची आराधना केल्याविना कोट्यावधी योग आणि जप करुनही इच्छित फल मिळत नाही. ॥ ४ ॥
दोहा—अस कहि नारद सुमिरि हरि गिरिजहि दीन्हि असीस ।
होइहि यह कल्यान अब संसय तजहु गिरीस ॥ ७० ॥
असे म्हणून भगवंतांचे स्मरण करीत नारदांनी पार्वतीला आशीर्वाद दिला. ( आणी ते म्हणाले, ) ‘ हे पर्वतराज, तुम्ही मनातला संशय काढून टाका.आता हे कल्याणच होईल. ॥ ७० ॥
कहि अस ब्रह्मभवन मुनि गयऊ । आगिल चरित सुनहु जस भयऊ ॥
पतिहि एकांत पाइ कह मैना । नाथ न मैं समुझे मुनि बैना ॥
असे म्हणून नारदमुनी ब्रह्मलोकी निघून गेले. आता पुढे जे झाले, ते ऐका, एकांत मिळाल्यावर मैनाने पतीला म्हटले, हे नाथ, मुनींच्या वचनांचा अर्थ मला कळला नाही. ॥ १ ॥
जौं घरु बरु कुलु होइ अनूपा । करिअ बिबाहु सुता अनुरुपा ॥
न त कन्या बरु रहउ कुआरी । कंत उमा मम प्रानपिआरी ॥
जर आपल्या मुलीसाठी अनुकूल घर, वर व कुळ उत्तम असेल तर विवाह करा. नाहीतर मुलगी कुमारी राहिली तरी चालेल. ( अयोग्य वराशी तिचा विवाह करण्याची माझी इच्छा नाही. ), कारण हे स्वामी ! पार्वती मला प्राणासारखी आवडती आहे. ॥ २ ॥
जौं न मिलिहि बरु गिरिजहि जोगू । गिरि जड सहज कहिहि सबु लोगू ॥
सोइ बिचारि पति करेहु बिबाहू । जेहिं न बहोरि होइ उर दाहू ॥
जर पार्वतीला योग्य वर मिळाला नाही तर सर्व लोक म्हणतील की, पर्वत स्वभावतः जड ( मूर्ख ) असतात. हे स्वामी ! या गोष्टीचा पूर्ण विचार करुन विवाह करा. नंतर मनात पश्चात्ताप व्हायला नको. ॥ ३ ॥
अस कहि परी चरन धरि सीसा । बोले सहित सनेह गिरीसा ॥
बरु पावक प्रगटै ससि माहीं । नारद बचनु अन्यथा नाहीं ॥
असे म्हणत मैनाने पतीच्या चरणी लोळण घेतली. तेव्हा हिमवानाने प्रेमाने म्हटले, ‘ चंद्रामधून एखादे वेळी अग्नी प्रकट होईल, पण नारदांचे वचन खोटे ठरणार नाही. ॥ ४ ॥
दोहा—प्रिया सोचु परिहरहु सबु सुमिरहु श्रीभगवान ।
पारबतिहि निरमयउ जेहिं सोइ करिहि कल्यान ॥ ७१ ॥
हे प्रिये सर्व काळजी सोडून भगवंताचे स्मरण कर. ज्यांनी पार्वतीला निर्मिले आहे. तेच तिचे कल्याण करतील. ॥ ७१ ॥
अब जौं तुम्हहि सुता पर नेहू । तौ अस जाइ सिखावनु देहू ॥
करै सो तपु जेहिं मिलहिं महेसू । आन उपायँ न मिटिहि कलेसू ॥
तुझे कन्येवर प्रेम आहे, तेव्हा जाऊन तिला उपदेश कर की, शिव मिळतील, असे तप कर. दुसर्‍या कोणत्याही उपायाने हे क्लेश दूर होणार नाहीत. ॥ १ ॥
नारद बचन सगर्भ सहेतु । सुंदर सब गुन निधि बृषकेतू ॥
अस बिचारि तुम्ह तजहु असंका । सबहि भॉंति संकरु अकलंका ॥
नारदांचे बोलणे रहस्यपूर्ण आणि सकारण आहे. भगवान शिव हे सर्व गुणांचे भांडार आहेत. असा विचार करुन तू ( मिथ्या ) संशय टाकून दे. शिव हे सर्वप्रकारे निष्कलंक आहेत. ॥ २ ॥
सुनि पति बचन हरषि मन माहीं । गई तुरत उठि गिरिजा पाहीं ॥
उमहि बिलोकि नयन भरे बारी । सहित सनेह गोद बैठारी ॥
पतीचे बोलणे ऐकून मैना प्रसन्न झाली आणि उठून लगेच पार्वतीजवळ गेली. पार्वतीला पाहून तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिने तिला आपल्या मांडीवर प्रेमाने बसविले. ॥ ३ ॥
बारहिं बार लेति उर लाई । गदगद कंठ न कछु कहि जाई ॥
जगत मातु सर्बग्य भवानी । मातु सुखद बोलीं मृदु बानी ॥
मग वारंवार ती पार्वतीला हृदयाशी कवटाळू लागली. प्रेमामुळे मैनेचा गळा भरुन आला. त्यामुळे तिला काही बोलता येत नव्हते. जगज्जननी भवानी ही तर सर्वज्ञ होती. ( आईच्या मनाची स्थिती ओळखून ) ती आईला सुख देणार्‍या कोमल वाणीने म्हणाली, ॥ ४ ॥
दोहा--सुनहि मातु मैं दीख अस सपन सुनावउँ तोहि ।
सुंदर गौर सुबिप्रबर अस उपदेसेउ मोहि ॥ ७२ ॥
आई, ऐक. मी तुला सांगते की, मी एक स्वप्न पाहिले. मला एका सुंदर गौरवर्ण श्रेष्ठ ब्राह्मणाने असा उपदेश दिला आहे, ॥ ७२ ॥
करहि जाइ तपु सैलकुमारी । नारद कहा सो सत्य बिचारी ॥
मातु पितहि पुनि यह मत भावा । तपु सुखप्रद दुख दोष नसावा ॥
‘ हे पार्वती, नारदांनी जे सांगितले आहे, ते खरे मानून तू जाऊन तप कर. शिवाय ही गोष्ट तुझ्या माता-पित्यालाही आवडली आहे. तप हे सुख देणारे आणि दुःख-दोषांचा नाश करणारे आहे. ॥ १ ॥
तपबल रचइ प्रपंचु बिधाता । तपबल बिष्नु सकल जग त्राता ॥
तपबल संभु करहिं संघारा । तपबल सेषु धरइ महिभारा ॥
तपाच्या बळानेच ब्रह्मदेव सृष्टीची रचना करतात. तपाच्या बळावरच विष्णू सर्व जगाचे पालन करतात. तपाच्या बळानेच शंभू ( रुद्ररुपाने जगाचा ) संहार करतात आणि तपानेच शेष पृथ्वीचा भार धारण करतो. ॥ २ ॥
तप अधार सब सृष्टि भवानी । करहि जाइ तपु अस जियँ जानी ॥
सुनत बचन बिसमित महतारी । सपन सुनायउ गिरिहि हँकारी ॥
हे भवानी, संपूर्ण सृष्टी ही तपाच्या आधारे उभी आहे, हे मनात ओळखून तू जाऊन तप कर.’ ही गोष्ट ऐकून माता मैनेला आश्र्चर्य वाटले आणि तिने हिमवानास बोलावून ते स्वप्न सांगितले. ॥ ३ ॥
मातु पितहि बहुबिधि समुझाई । चलीं उमा तप हित हरषाई ॥
प्रिय परिवार पिता अरु माता । भए बिकल मुख आव न बाता ॥
माता-पिता यांना पुष्कळ प्रकारे समजावून मोठ्या आनंदाने पार्वती तप करण्यास निघाली. प्रिय कुटुंबीय, पिता आणि माता सर्व व्याकूळ झाले. कोणाच्याही तोंडून शब्द फुटेना. ॥ ४ ॥
दोहा—बेदसिरा मुनि आइ तब सबहि कहा समुझाइ ।
पारबती महिमा सुनत रहे प्रबोधहि पाइ ॥ ७३ ॥
त्यावेळी वेदशिरा मुनींनी येऊन सर्वांना समजावले. पार्वतीचा महिमा ऐकल्यावर सर्वांना समाधान वाटले. ॥ ७३ ॥
उर धरि उमा प्रानपति चरना । जाइ बिपिन लागीं तपु करना ॥
अति सुकुमार न तनु तप जोगू । पति पद सुमिरि तजेउ सबु भोगु ॥
पार्वती प्राणप्रिय पतीचे चरण हृदयामध्ये धारण करुन वनामध्ये जाऊन तप करु लागली. पार्वतीचे अत्यंत सुकुमार शरीर तपासाठी योग्य नव्हते, तरीही पतीच्या चरणांचे स्मरण करीत, तिने सर्व भोग सोडून दिले. ॥ १ ॥
नित नव चरन उपज अनुरागा । बिसरी देह तपहिं मनु लागा ॥
संबत सहस मूल फल खाए । सागु खाइ सत बरष गवॉंए ॥
( तिच्या मनात ) पतीच्या चरणी नित्य नवे प्रेम उपजू लागले आणि तपामध्ये तिचे मन असे गुंतले की, ती देहभान विसरुन गेली. एक हजार वर्षे तिने कंदमुळे व फळे खाल्ली आणि नंतर शंभर वर्षे तिने भाजीपाला खाऊन घालविली. ॥ २ ॥
कछु दिन भोजनु बारि बतासा । किए कठिन कछु दिन उपबासा ॥
बेल पाती महि परइ सुखाई । तीनि सहस संबत सोइ खाई ॥
काही दिवस तिने जल आणि वायूचे सेवन केले. नंतर काही दिवस कठोर उपवास केला. बेलाची पाने सुकून जी जमिनीवर पडत, ती तिने तीन हजार वर्षे भक्षण केली. ॥ ३ ॥
पुनि परिहरे सुखानेउ परना । उमहि नामु तब भयउ अपरना ॥
देखि उमहि तप खीन सरीरा । ब्रह्मगिरा भै गगन गभीरा ॥
नंतर सुकलेली पानेसुद्धा खाणे तिने सोडून दिले. त्यामुळे पार्वतीचे नाव ‘ अपर्णा ‘ पडले. तपामुळे उमेचे शरीर क्षीण झाल्याचे पाहून आकाशातून गंभीर ब्रह्मवाणी झाली. ॥ ४ ॥                   
दोहा—भयउ मनोरथ सुफल तव सुनु गिरिराजकुमारि ।
परिहरु दुसह कलेस सब अब मिलिहहिं त्रिपुरारि ॥ ७४ ॥
‘ हे पर्वतराज-कुमारी, ऐक. तुझे मनोरथ पूर्ण झाले. आता तू सर्व कठीण तपाचे क्लेश सोडून दे. आता तुला शिव भेटतील. ॥ ७४ ॥
अस तपु काहुँ न कीन्ह भवानी । भए अनेक धीर मुनि ग्यानी ॥
अब उर धरहु ब्रह्म बर बानी । सत्य सदा संतत सुचि जानी ॥
हे भवानी, धैर्यवान मुनी आणि ज्ञानी पुष्कळ होऊन गेले, परंतु असे ( कठोर ) तप कुणी केले नाही. आता तू या श्रेष्ठ ब्रह्मदेवाची वाणी सदा सत्य व निरंतर पवित्र मानून आपल्या मनात बाळग. ॥ १ ॥
आवै पिता बोलावन जबहीं । हठ परिहरि घर जाएहु तबहीं ॥
मिलहिं तुम्हहि जब सप्त रिषीसा । जानेहु तब प्रमान बागीसा ॥
जेव्हा तुझे वडील तुला बोलवायला येतील, तेव्हा हट्ट सोडून घरी जा. जेव्हा तुला सप्तर्षी भेटतील , तेव्हा ही वाणी खरी समज. ॥ २ ॥
सुनत गिरा बिधि गगन बखानी । पुलक गात गिरिजा हरषानी ॥
उमा चरित सुंदर मैं गावा । सुनहु संभु कर चरित सुहावा ॥
आकाशातून सांगितली गेलेली ही ब्रह्मदेवांची वाणी ऐकून पार्वती प्रसन्न झाली आणि हर्षामुळे तिचे शरीर रोमांचित झाले. ( याज्ञवल्क्य मुनी भरद्वाज मुनींना म्हणाले की, ) मी पार्वतीचे सुंदर चरित्र ऐकविले. आता श्रीशिवांचे सुंदर चरित्र ऐका. ॥ ३ ॥
जब तें सतीं जाइ तनु त्यागा । तब तें सिव मन भयउ बिरागा ॥
जपहिं सदा रघुनायक नामा । जहँ तहँ सुनहिं राम गुन ग्रामा ॥    
जेव्हा सतीने ( दक्षाच्या यज्ञात ) जाऊन शरीर त्याग केला, तेव्हापासून श्रीशिवांच्या मनांत वैराग्य उत्पन्न झाले होते. ते नेहमी श्रीरामांचे नाम जपू लागले आणि जिकडे-तिकडे जाऊन श्रीरामांच्या गुणांच्या कथा श्रवण करु लागले. ॥ ४ ॥
दोहा—चिदानंद सुखधाम सिव बिगत मोह मद काम ।
 बिचरहिं महि धरि हृदयँ हरि सकल लोक अभिराम ॥ ७५ ॥
चिदानंद, सुख-धाम, मोह-मद—कामरहित भगवान शंकर सर्व लोकांना आनंद देणार्‍या भगवान श्रीरामांना हृदयामध्ये धारण करुन ( ध्यानमग्न अवस्थवस्थेंत ) पृथ्वीवर संचार करु लागले. ॥ ७५ ॥
कतहुँ मुनिन्ह उपदेसहिं ग्याना । कतहुँ राम गुन करहिं बखाना ॥
जदपि अकाम तदपि भगवाना । भगत बिरह दुख दुखित सुजाना ॥
कुठे ते मुनींना ज्ञानाचा उपदेश करीत, तर कुठे श्रीरामांच्या गुणांचे वर्णन करीत होते. जरी ज्ञानी शिव हे निष्काम आहेत, तरीही ते आपल्या भक्ताला ( सतीला ) झालेल्या वियोगाच्या दुःखामुळे दुःखी होते. ॥ १ ॥
एहि बिधि गयउ कालु बहु बीती । नित नै होइ राम पद प्रीती ॥
नेमु प्रेमु संकर कर देखा । अबिचल हृदयँ भगति कै रेखा ॥
अशा रीतीने बराच काळ लोटला. श्रीरामचरणांवरील प्रेम दिवसेंदिवस वाढत होते. श्रीशंकरांचे कठोर नियम, अनन्य प्रेम व अंतःकरणातील अढळ भक्ती जेव्हा श्रीरामांनी पाहिली, ॥ २ ॥
प्रगटे रामु कृतग्य कृपाला । रुप सील निधि तेज बिसाला ॥
बहु प्रकार संकरहि सराहा । तुम्ह बिनु अस ब्रतु को निरबाहा ॥
तेव्हा कृतज्ञ, कृपाळु, रुप-शीलाचे भांडार, अत्यंत तेजःपुंज भगवान श्रीराम प्रगट झाले. त्यांनी पुष्कळ प्रकारे श्रीशिवांची वाखाणणी केली आणि म्हटले, ‘ तुमच्याशिवाय असे ( कठीण ) व्रत कोण करु शकणार ? ॥ ३ ॥
बहुबिधि राम सिवहि समुझावा । पारबती कर जन्मु सुनावा ॥
अति पुनीत गिरिजा कै करनी । बिस्तर सहित कृपानिधि बरनी ॥
श्रीरामांनी अनेक प्रकारे शिवांचे सांत्वन केले आणि पार्वतीच्या जन्माची वार्ता सांगितली. कृपानिधान श्रीरामांनी पार्वतीच्या अत्यंत पवित्र कृतीचे विस्ताराने वर्णन केले. ॥ ४ ॥
दोहा—अब बिनती मम सुनहु सिव जौं मो पर निज नेहु ।
जाइ बिबाहहु सैलजहि यह मोहि मागें देहु ॥ ७६ ॥
नंतर ते शिवांना म्हणाले, ‘ हे शंकरा, जर तुमचे माझ्यावर ( खरेच ) प्रेम असेल तर आता माझी विनंती ऐका. माझी इच्छा आहे की, तुम्ही जाऊन पार्वतीचे पाणीग्रहण करावे.’ ॥ ७६ ॥
कह सिव जदपि उचित अस नाहीं । नाथ बचन पुनि मेटि न जाहीं ॥
सिर धरि आयसु करिअ तुम्हारा । परम धरमु यह नाथ हमारा ॥
शिव म्हणाले, ‘ जर हे योग्य नाही, तरी स्वामींचे म्हणणे मला टाळता येणार नाही. हे नाथ ! तुमची आज्ञा शिरसावंद्य करणे, हाच माझा परम धर्म आहे. ॥ १ ॥
मातु पिता गुर प्रभु कै बानी । बिनहिं बिचार करिअ सुभ जानी ॥
तुम्ह सब भॉंति परम हितकारी । अग्या सिर पर नाथ तुम्हारी ॥
माता, पिता, गुरु आणि स्वामी यांचे सांगणे काहीही विचार न करता कल्याणकारक समजून मान्य करायला हवे. शिवाय तुम्ही तर माझे परम हितकारी आहात. म्हणून हे नाथ ! तुमची आज्ञा मला शिरसावंद्य आहे. ॥ २ ॥
प्रभु तोषेउ सुनि संकर बचना । भक्ति बिबेक धर्म जुत रचना ॥
कह प्रभु हर तुम्हार पन रहेऊ । अब उर राखेहु जो हम कहेऊ ॥
शंकरांची भक्ती, ज्ञान व धर्म यांनी युक्त असे बोलणे ऐकून श्रीराम प्रसन्न झाले. प्रभु म्हणाले, ‘ हे हरा, तुमची प्रतिज्ञा पूर्ण झाली. आता मी जे सांगितले आहे, ते लक्षांत ठेवा.’ ॥ ३ ॥
अंतरधान भए अस भाषी । संकर सोइ मूरति उर राखी ॥
तबहिं सप्तरिषि सिव पहिं आए । बोले प्रभु अति बचन सुहाए ॥
असे म्हणून श्रीराम अंतर्धान पावले. शिवांनी त्यांची ती मूर्ती आपल्या हृदयांत धारण करुन ठेवली. त्याचवेळी सप्तर्षी शिवांच्याकडे आले. प्रभु महादेवांनी त्यांना गोड शब्दात सांगितले, ॥ ४ ॥
दोहा—पारबती पहिं जाइ तुम्ह प्रेम परिच्छा लेहु ।
गिरिहि प्रेरि पठएहु भवन दूरि करेहु संदेहु ॥ ७७ ॥
तुम्ही पारवतीकडे जाऊन तिच्या प्रेमाची पारख करुन घ्या आणि हिमाचलाला सांगून ( त्यांना पार्वतीस आणण्यास पाठवा व ) पार्वतीला घरी पाठवून द्या आणि त्यांच्या मनांतील संशय दूर करा. ॥ ७७ ॥
रिषिन्ह गौरि देखी तहँ कैसी । मूरतिमंत तपस्या जैसी ॥
बोले मुनि सुनु सैलकुमारी । करहु कवन कारन तपु भारी ॥
सप्तर्षींनी ( तेथे जाऊन पाहिले ) तर पार्वती जणू मूर्तिमंत तपस्याच होती. मुनी म्हणाले, हे शैलकुमारी, ऐक. तू कशासाठी इतके कठोर तप करीत आहेस ? ॥ १ ॥
केहि अवराधहु का तुम्ह चहहू । हम सन सत्य मरमु किन कहहू ॥
कहत बचन मनु अति सकुचाई । हँसिहहु सुनि हमारि जडताई ॥
तू कोणाची आराधना करीत आहेस आणि तुझी इच्छा काय आहे ? आम्हाला आपले गुपित खरे खरे का सांगत नाहीस ? ( पार्वती म्हणाली, ) ‘ सांगताना मनात मोठा संकोच वाटतो. तुम्ही माझा मूर्खपणा ऐकून हसाल. ॥ २ ॥
मनु हठ परा न सुनइ सिखावा । चहत बारि पर भीति उठावा ॥
नारद कहा सत्य सोइ जाना । बिनु पंखन्ह हम चहहिं उडाना ॥
माझ्या मनाने हट्ट धरला आहे, काही केल्या ते ऐकत नाही आणि पाण्यावर भिंत उभी करावी, असे त्याला वाटते. नारदांनी जे सांगितले होते, ते खरे मानून मी पंखाविना उडू इच्छिते. ॥ ३ ॥
देखहु मुनि अबिबेकु हमारा । चाहिअ सदा सिवहि भरतारा ॥
मुनींनो, तुम्ही माझा वेडेपणा पाहा की, शिवांना आपला पती बनविण्याची माझी कामना आहे. ‘ ॥ ४ ॥


Custom Search

No comments: