Monday, May 10, 2021

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 26 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग २६

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 26 
Doha 149 to 154 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड २६ 
दोहा १४९ ते १५४
दोहा--सखा रामु सिय लखनु जहँ तहॉं मोहि पहुँचाउ ।
नाहिं त चाहत चलन अब प्रान कहउँ सतिभाउ ॥ १४९ ॥
हे सख्या, श्रीराम, जानकी आणि लक्ष्मण जेथे आहेत, तेथे मलाही घेऊन चल. नाहीतर मी खरे सांगतो की, माझे प्राण आता जाऊ इच्छितात. ॥ १४९ ॥
पुनि पुनि पूँछत मंत्रिहि राऊ । प्रियतम सुअन सँदेस सुनाऊ ॥
करहि सखा सोइ बेगि उपाऊ । रामु लखनु सिय नयन देखाऊ ॥
राजे वारंवार मंत्र्याला विचारत होते, ' मला प्रियतम पुत्रांची वार्ता सांग. हे मित्रा, श्रीराम, लक्ष्णण आणि सीता हे मला माझ्या डोळ्यांनी पाहता येतील, असा उपाय ताबडतोब कर.' ॥ १ ॥
सचिव धीर धरि कह मृदु बानी । महाराज तुम्ह पंडित ग्यानी ॥
बीर सुधीर धुरंधर देवा । साधु समाजु सदा तुम्ह सेवा ॥
मन घट्ट करुन मंत्री कोमल वाणीने म्हणाला, ' महाराज, तुम्ही पंडित व ज्ञानी आहात. तुम्ही नेहमी सत्संग लाभ घेतला आहे. ॥ २ ॥
जनम मरन सब दुख सुख भोगा । हानि लाभु प्रिय मिलन बियोगा ॥
काल करम बस होहिं गोसाईं । बरबस राति दिवस की नाईं ॥
जन्म-मरण, सुख-दुःखाचे भोग, हानि-लाभ, प्रियजनांचा संयोग-वियोग, हे सर्व काही, हे स्वामी ! काल व कर्म यांच्या अधीन असल्यामुळे रात्र व दिवस यांच्याप्रमाणें अनिवार्यपणे येत असते. ॥ ३ ॥
सुख हरषहिं जड़ दुख बिलखाहीं । दोउ सम धीर धरहिं मन माहीं ॥
धीरज धरहु बिबेकु बिचारी । छाड़िअ सोच सकल हितकारी ॥
मूर्ख लोक सुखात हर्षित होतात व दुःखात रडतात. परंतु धीर पुरुष आपल्या मनामध्ये दोन्ही गोष्टी समान असल्यामुचे मानतात. हे सर्वांचे रक्षक असलेले महाराज ! तुम्ही विवेकपू्र्ण विचार करुन धैर्य धरा आणि शोक सोडून द्या. ॥ ४ ॥
दोहा--प्रथम बासु तमसा भयउ दूसर सुरसरि तीर ।
न्हाइ रहे जलपानु करि सिय समेत दोउ बीर ॥ १५० ॥
श्रीरामांचा पहिला मुल्काम तमसा नदीच्या तटावर झाला. दुसरा गंगा तटावर झाला. सीतेसह दोन्ही बंधू त्यादिवशी स्नान करुन फक्त पाणी पिऊन राहिले. ॥ १५० ॥
केवट कीन्हि बहुत सेवकाई । सो जामिनि सिंगरौर गवॉंई ॥
होत प्रात बट छीरु मगावा । जटा मुकुट निज सीस बनावा ॥
निषादराजाने पुष्कळ सेवा केली. ती रात्र शृंगवरपुरामध्ये घालविली. दुसर्‍या दिवशी सकाळ होताच वडाचा चीक मागविला व श्रीराम व लक्ष्मणाने आपल्या शिरावर जटाजूट तयार केले. ॥ १ ॥
राम सखॉं तब नाव मगाई । प्रिया चढ़ाइ चढे रघुराई ॥
लखन बान धनु धरे बनाई । आपु चढ़े प्रभु आयसु पाई ॥
नंतर श्रीरामचंद्रांचे मित्र निषादराज याने नाव मागवली. प्रथम प्रिय सीतेला नावेत चढवून नंतर श्रीरघुनाथ चढले. लक्ष्मणाने धनुष्य-बाण सज्ज केले व प्रभू श्रीरामांची आज्ञा मिलताच तो नावेत चढला. ॥ २ ॥
बिकल बिलोकि मोहि रघुबीरा । बोले मधुर बचन धरि धीरा ॥
तात प्रनामु तात सन कहेहू । बार बार पद पंकज गहेहू ॥
मी व्याकूळ झालो, हे पाहून श्रीरामांनीं मोठ्या धीराने मधुर शब्दांत म्हटले, ' हे तात, बाबांना माझा प्रणाम सांगावा आणि माझ्यातर्फे वारंवार त्यांचे चरण-कमल धरावे. ॥ ३ ॥
करबि पायँ परि बिनय बहोरी । तात करिअ जनि चिंता मोरी ॥
बन मग मंगल कुसल हमारें । कृपा अनुग्रह पुन्य तुम्हारें ॥
पुन्हां त्यांचे पाय धरुन विनंती करावी की, " बाबा ! तुम्ही माझी काळजी करु नका. तुमच्या कृपेने आणि पुण्याईने वनात व वाटेत आमचे कल्याणच होईल. ॥ ४ ॥ 
छं०--तुम्हरें अनुग्रह तात कानन जात सब सुखु पाइहौं ।
प्रतिपालि आयसु कुसल देखन पाय पुनि फिरि आइहौं ॥
जननीं सकल परितोषि परि परि पायँ करि बिनती घनी ।
तुलसी करेहु सोइ जतनु जेहिं कुसली रहहिं कोसलधनी ॥
तात ! तुमच्या अनुग्रहामुळे मला वनात असताना सर्व प्रकारचे सुख मिळेल. तुमच्या आज्ञेचे व्यवस्थित पालन करुन तुमच्या चरणांचे दर्शन घेण्यासाठी सुखरुपपणे आम्ही परत येऊ. सर्व मातांचे पाय धरुन त्यांचे समाधान करावे आणि त्यांना विनंती करावी की ( तुलसीदास म्हणतात ) कोसलपती खुशाल राहतील, असा प्रयत्न तुम्ही करीत राहावे. 
सो०--गुर सन कहब सँदेसु बार बार पद पदुम गहि ।
करब सोइ उपदेसु जेहिं न सोच मोहि अवधपति ॥ १५१ ॥
वारंवार चरण-कमल धरुन वसिष्ठ गुरुंना निरोप सांगावा की, अयोध्यपतींनी आमची काळजी करु नये, असाच त्यांना त्यांनी उपदेश करावा. ॥ १५१ ॥
पुरजन परिजन सकल निहोरी । तात सुनाएहु बिनती मोरी ॥ 
सोइ सब भॉंति मोर हितकारी । जातें रह नरनाहु सुखारी ॥
हे तात, सर्व पुरवासीयांना व कुटुंबीयांना विनंती करावी की, ज्याच्या प्रयत्नाने महाराज सुखी होतील, तोच मनुष्य सर्व प्रकारे माझा हितकारी असेल. ॥ १ ॥
कहब सँदेसु भरत के आएँ । नीति न तजिअ राजपदु पाएँ ॥
पालेहु प्रजहि करम मन बानी । सेएहु मातु सकल सम जानी ॥
भरत आल्यावर त्याला माझा निरोप सांगावा की, राजाचे पद मिळाल्यावर नीती सोडू नकोस. कर्म, वचन आणि मन यांनी प्रजेचे पालन कर आणि सर्व मातांना समान मानून त्यांची सेवा कर. ॥ २ ॥
ओर निबाहेहु भायप भाई । करि पितु मातु सुजन सेवकाई ॥
तात भॉंति तेहि राखब राऊ । सोच मोर जेहिं करै न काऊ ॥
आणि हे बंधू, पिता, माता व स्वजनांची सेवा करुन त्यांच्यावर शेवटपर्यंत प्रेम करावे, तसेच राजांनी कधी माझी काळजी करु नये अशा प्रकारे त्यांना सांभाळावे. ॥ ३ ॥
लखन कहे कछु बचन कठोरा । बरजि राम पुनि मोहि निहोरा ॥        
बार बार निज सपथ देवाई । कहबि न तात लखन लरिकाई ॥
लक्ष्मण काहीसे कठोर बोलला, परंतु श्रीरामांनी त्याला आवरुन मला विनंती केली आणि वारंवार स्वतःची शपथ घालून सांगितले की, ' हे तात, लक्ष्मणाचा बालिशपणा तेथे सांगू नका. ' ॥ ४ ॥
दोहा--कहि प्रनामु कछु कहन लिय सिय भइ सिथिल सनेह ।
थकित बचन लोचन सजल पुलक पल्लवित देह ॥ १५२ ॥
सीता प्रणाम करुन काही सांगू लागली. परंतु प्रेमाधिक्यामुळे ती अवघडून गेली. तिची वाणी रुद्ध झाली. डोळ्यांमध्ये पाणी आले आणि शरीर रोमांचित झाले. ॥ १५२ ॥
तेहि अवसर रघुबर रुख पाई । केवट पारहि नाव चलाई ॥
रघुकुलतिलक चले एहि भॉंती । देखउँ ठाढ़ कुलिस धरि छाती ॥
त्यावेळी श्रीरामांचा संकेत मिळताच नावाड्याने पलीकडे जाण्यासाठी नाव सोडली. अशा प्रकारे रघुवंशतिलक श्रीराम निघाले आणि मी छातीवर दगड ठेवून उभ्या उभ्या पाहात राहिलो. ॥ १ ॥
मैं आपन किमि कहौं कलेसू । जिअत फिरेउँ लेइ राम सँदेसू ॥
अस कहि सचिव बचन रहि गयऊ । हानि गलानि सोच बस भयऊ ॥
मी श्रीरामांचा हा निरोप घेऊन जिवंतपणे परत आलो. माझे दुःख मी कसे सांगू ?' असे म्हणत तो झालेल्या हानीच्या क्लेशामुळे व काळजीमुळे तसाच गप्प राहिला. ॥ २ ॥
सूत बचन सुनतहिं नरनाहू । परेउ धरनि उर दारुन दाहू ॥
तलफत बिषम मोह मन मापा । माजा मनहुँ मीन कहुँ व्यापा ॥
सुमंत्राचे बोलणे ऐकताच राजे जमिनीवर कोसळले. त्यांच्या हृदयांत आग भडकली. ते तडफडू लागले, त्यांचे मन भीषण मोहामुळे व्याकूळ झाले. जणू माशाला पहिल्याच पावसाचे पाणी बाधले होते. ॥ ३ ॥
करि बिलाप सब रोवहिं रानी । महा बिपति किमि जाइ बखानी ॥
सुनि बिलाप दुखहू दुखु लागा । धीरजहू कर धीरजु भागा ॥ 
सर्व राण्या आक्रोश करीत रडू लागल्या. त्या महान संकटाचे वर्णन कसे करता येईल ? त्या वेळचा विलाप ऐकून दुःखालाही दुःख झाले आणि धैर्याचे धैर्यही गळून गेले. ॥ ४ ॥
दोहा--भयउ कोलाहलु अवध अति सुनि नृप राउर सोरु ।
बिपुल बिहग बन परेउ निसि मानहु कुलिस कठोरु ॥ १५३ ॥
राजाच्या अंतःपुरातील रडण्याचा आवाज ऐकून अयोध्येमध्ये मोठा कोलाहल माजला. जणू पक्ष्यांच्या विशाल वनात रात्रीच्या वेळी कठोर वीज कोसळली होती. ॥ १५३ ॥
प्रान कंठगत भयउ भुआलू । मनि बिहीन जनु ब्याकुल ब्यालू ॥
इंद्रीं सकल बिकल भइँ भारी । जनु सर सरसिज बनु बिनु बारी ॥
राजाचे प्राण कंठाशी आले. जणू मण्याविना साप मरणासन्न झाला होता. सर्व इंद्रिये फार व्याकूळ झाली. पाण्याविना तलावातील कमळे कोमेजून जावीत तशी. ॥ १ ॥
कौसल्यॉं नृपु दीख मलाना । रबिकुल रबि अँथयउ जियँ जाना ॥
उर धरि धीर राम महतारी । बोली बचन समय अनुसारी ॥ 
राजाला फार दुःखी झाल्याचे पाहून कौसल्येने जाणले की, ' आता सूर्यकुलातील सूर्य अस्ताला चालला आहे.' तेव्हा श्रीरामांची माता कौसल्या ही मन घट्ट करुन प्रसंगानुरुप म्हणाली, ॥ २ ॥
नाथ समुझि मन करिअ बिचारु । राम बियोग पयोधि अपारु ॥
करनधार तुम्ह अवध जहाजू । चढ़ेउ सकल प्रिय पथिक समाजू ॥
' हे नाथ, तुम्ही मनात विचार करा की, श्रीरामांचा वियोग हा अपार समुद्र आहे. अयोध्या ही जहाज आहे आणि तुम्ही त्याचे कर्णधार आहात. सर्व प्रजा, कुटुंबीय व प्रियजन हे जहाजातील प्रवासी आहेत. ॥ ३ ॥
धीरजु धरिअ त पाइअ पारु । नाहिं त बूड़िहि सबु परिवरु ॥
जौं जियँ धरिअ बिनय पिय मोरी । रामु लखनु सिय मिलहिं बहोरी ॥
तुम्ही धीर धराल, तर सर्वजण तरुन जातील. नाहीतर सर्व परिवार बुडून जाईल. हे प्रिय स्वामी, माझी विनंती मान्य कराल, तर श्रीराम, लक्ष्मण, सीता हे परत येऊन भेटतील. ' ॥ ४ ॥
दोहा--प्रिया बचन मृदु सुनत नृपु चितयउ आँखि उघारि ।
तलफत मीन मलीन जनु सींचत सीतल बारि ॥ १५४ ॥
प्रिय पत्नी कौसल्येचे हे मृदु बोलणें ऐकून राजांनी डोळे उघडून पाहिले. जणू तडफडणार्‍या बिचार्‍या मासोळीवर कुणी तरी शितल जल शिंपडले. ॥ १५४ ॥
धरि धीरजु उठि बैठ भुआलू । कहु सुमंत्र कहँ राम कृपालू ॥
कहॉं लखनु कहँ रामु सनेही । कहँ प्रिय पुत्रबधू बैदेही ॥
धीर धरुन राजे उठून बसले आणि म्हणाले, ' सुमंत्रा, कृपाळू श्रीराम कुठे आहे, ते सांग. लक्ष्मण कोठे आहे ? स्नेही राम कोठे आहे आणि माझी लाडकी सून जानकी कोठे आहे ?' ॥ १ ॥
बिलपत राउ बिकल बहु भॉंती । भइ जुग सरिस सिराति न राती ॥
तापस अंध साप सुधि आई । कौसल्यहि सब कथा सुनाई ॥
महाराज व्याकूळ होऊन अनेक प्रकारे विलाप करीत होते. ती रात्र युगाप्रमाणे मोठी वाटत होती. सरता सरत नव्हती. राजांना श्रवणकुमाराचा पिता आंधळा तपस्वी याच्या शापाची आठवण आली. त्यांनी ती सर्व कथा कौसल्येला सांगितली. ॥ २ ॥
भयउ बिकल बरनत इतिहासा । राम रहित धिग जीवन आसा ॥
सो तनु राखि करब मैं काहा । जेहिं न प्रेम पनु मोर निबाहा ॥
त्या घटनेचे वर्णन करता करता राजे व्याकूळ झाले आणि म्हणू लागले की, ' श्रीरामाविना जगण्याच्या आशेचा धिक्कार असो. ज्याने आपल्या प्रेमाचा पण निभावून नेला नाही, ते शरीर ठेवून मी काय करु ? ॥ ३ ॥
हा रघुनंदन प्रान पिरीते । तुम्ह बिनु जिअत बहुत दिन बीते ॥
हा जानकी लखन हा रघुबर । हा पितु हित चित चातक जलधर ॥
हे रघुकुलाला आनंद देणार्‍या माझ्या प्राणप्रिय रामा, तुझ्याविना जगून बरेच दिवस झाले. हे जानकी, लक्ष्मणा, हे रघुवीरा, हे पित्याच्या चित्तरुपी चातकाचे समाधान करणार्‍या मेघांनो, ' ॥ ४ ॥



Custom Search

No comments: