Saturday, January 16, 2021

Shri RamCharitManas Part 72 श्रीरामचरितमानस भाग ७२

 

Shri RamCharitManas Part 72 
Doha 327 to 329 
श्रीरामचरितमानस भाग ७२ 
दोहा ३२७ ते ३२९ 
श्रीरामचरितमानस बालकाण्ड

छं०—गाथे महामनि मौर मंजुल अंग सब चित चोरहीं ।

पुर नारि सुर सुंदरीं बरहि बिलोकि सब तिन तोरहीं ॥

मनि बसन भूषन वारि आरति करहिं मंगल गावहीं ।

सुर सुमन बरिसहिं सूत मागध बंदि सुजसु सुनावहीं ॥ १ ॥

त्या सुंदर मुकुटामध्ये बहुमूल्य रत्ने गुंफली होती. त्यांचे सर्व अवयव मन हरण करीत होते. नगरातील सर्व स्त्रिया व देवसुंदरी गवताची काडी मोडून दृष्ट काढत होत्या आणि रत्ने,वस्त्रे व दागिने त्यांच्यावरुन ओवाळून टाकून आरत्या करीत होत्या आणि मंगलगान गात होत्या. देव फुले उधळत होते आणि सूत, मागध, भाट कीर्ती गात होते. ॥ १ ॥

कोहबरहिं आने कुअँर कुअँरि सुआसिनिन्ह सुख पाइ कै ।

अति प्रीति लौकिक रीति लागीं करन मंगल गाइ कै ॥

लहकौरि गौरि सिखाव रामहि सीय सन सारद कहैं ।

रनिवासु हास बिलास रस बस जन्म को फलु सब लहैं ॥ २ ॥

सुवासिनी स्त्रिया मोठ्या आनंदाने वधू-वरांना कुलदेवतेपाशी घेऊन आल्या आणि अत्यंत प्रेमाने मंगलगीते गात गात लौकिक रीतीप्रमाणे कुळाचार करु लागल्या. पार्वती श्रीरामांना व सरस्वती सीतेला परस्परांना घास खाऊ घालण्यास शिकवू लागल्या. सर्वांना जन्माचे सारे फळ मिळत होते. ॥ २ ॥

निज पानि मनि महुँ देखिअति मूरति सुरूपनिधान की ।

चालति न भुजबल्ली बिलोकनि बिरह भय बस जानकी ॥

कौतुक बिनोद प्रमोदु प्रेमु न जाइ कहि जानहिं अलीं ।

बर कुअँरि सुंदर सकल सखीं लवाइ जनवासेहि चलीं ॥ ३ ॥

आपल्या हातातील रत्नांमध्ये सुंदर रुपाचे भांडार असलेल्या श्रीरामांचे प्रतिबिंब दिसत होते. ते पाहून सीता दर्शनात विघ्न येऊ नये म्हणून आपली बाहुरुपी लता आणि दृष्टी हलू देत नव्हती. त्या प्रसंगीचे हास्य-विनोद, आणि प्रेम यांचे वर्णन करता येणे शक्य नाही. ते फक्त सख्याच जाणतात. त्यानंतर सर्व सख्या वर-वधूंना घेऊन जानवश्याकडे निघाल्या. ॥ ३ ॥

तेहि समय सुनिअ असीस जहँ तहँ नगर नभ आनँदु महा ।

चिरु जिअहुँ जोरीं चारु चार्‍यो मुदित मन सबहीं म कहा ॥

जोगींद्र सिद्ध मुनीस देव बिलोकि प्रभु दुंदुभि हनी ।

चले हरषि बरषि प्रसून निज निज लोक जय जय जय भनी ॥ ४ ॥

त्यावेळी नगरात आणि आकाशात जिकडे पाहावे तिकडे आशीर्वादाचे शब्द ऐकू येत होते आणि मोठा आनंदी आनंद झालेला होता. सर्वजण प्रसन्न मनाने म्हणत होते की, ही सुंदर चारी जोडपी चिरंजीव होवोत. ‘ योगिराज, सिद्ध, मुनीश्र्वर आणि देव यांनी प्रभू रामचंद्रांना पाहून दुंदुभी वाजविली आणि आनंदाने फुलांचा वर्षाव करीत ‘ जय हो, जय हो, जय हो ‘ असे म्हणत ते आपापल्या लोकी निघून गेले. ॥ ४ ॥

दोहा—सहित बधूटिन्ह कुअँर सब तब आए पितु पास ।

सोभा मंगल मोद भरि उमगेउ जनु जनवास ॥ ३२७ ॥

मग चारी कुमार आपापल्या वधूंसह वडिलांकडे आले. शोभा, मांगल्य आणि आनंद यांनीं जानवास ओसंडत आहे, असे वाटत होते. ॥ ३२७ ॥

पुनि जेवनार भई बहु भॉंती । पठाए जनक बोलाइ बराती ॥

परत पॉंवड़े बसन अनूपा । सुतन्ह समेत गवन कियो भूपा ॥

त्यानंतर अनेक प्रकारचे पाक सिद्ध झाले. जनकांनी वर्‍हाडी मंडळींना बोलाविले. राजा दशरथ हे पुत्रांसह गेले. बहुमोल वस्त्रांच्या पायघड्या घातल्या जात होत्या. ॥ १ ॥

सादर सब के पाय पखारे । जथाजोगु पीढ़न्ह बैठारे ॥

धोए जनक अवधपति चरना । सीलु सनेहु जाइ नहिं बरना ॥

आदरपूर्वक सर्वांचे पाय धुऊन योग्य स्थानी त्यांना पाटावर बसविले. मग जनकांनी दशरथांचे पाय धुतले. त्यांचे शील आणि स्नेह यांचे वर्णन करणे कठीण आहे. ॥ २ ॥

बहुरि राम पद पंकज धोए । जे हर हृदय कमल महुँ गोए ॥

तीनिउ भाइ राम सम जानी । धोए चरन जनक निज पानी ॥

नंतर श्रीशिवांच्या हृदय-कमलांमध्ये गुप्तपणे जी वास करतात ती श्रीरामचंद्रांची चरण-कमले धुतली. अन्य तीन भावांनाही श्रीरामचंद्रांसमान मानून जनकांनी त्यांचे चरणही आपल्या हातांनी धुतले. ॥ ३ ॥

आसन उचित सबहि नृप दीन्हे । बोलि सूपकारी सब लीन्हे ॥

सादर लगे परन पनवारे । कनक कील मनि पान सँवारे ॥

राजा जनकांनी सर्वांना योग्य आसने दिली आणि वाढप्यांना बोलाविले. मोठ्या आदराने पत्रवळी घातल्या गेल्या. त्या रत्नांच्या पानांना सोन्याच्या काड्यांनी टाचून बनविलेल्या होत्या. ॥ ४ ॥

दोहा—सूपोदन सुरभी सरपि सुंदर स्वादु पुनीत ।

छन महुँ सब कें परुसि गे चतुर सुआर बिनीत ॥ ३२८ ॥

चतुर व विनम्र स्वयंपाक्यांनी सुंदर, स्वादिष्ट आणि पवित्र वरणभात आणि त्यावर गाईचे तूप क्षणभरात सर्वांसमोर वाढले. ॥ ३२८ ॥

पंच कवल करि जेवन लागे । गारि गान सुनि अति अनुरागे ॥

भॉंति अनेक परे पकवाने । सुधा सरिस नहिं जाहिं बखाने ॥

 सर्व लोक ‘ प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा आणि समानाय स्वाहा ‘ या मंत्रांचा उच्चार करीत पाच घास घेऊन भोजन करु लागले. जेवताना उणी-दुणी काढण्याचे गाणे ऐकून सर्व प्रेममग्न झाले. अनेक प्रकारची अमृतासारखी स्वादिष्ट पक्वाने वाढली गेली.त्यांचे वर्णन करणे कठीण. ॥ १ ॥

परुसन लगे  सुआर सुजाना । बिंजन बिबिध नाम को जाना ॥

चारि भॉंति भोजन बिधि गाई । एक एक बिधि बरनि न जाई ॥

चतुर वाढपी नाना प्रकारची तोंडी लावणी वाढू लागले, त्यांची नावे कोणास ठाऊक ? चावून खायचे, चोखून खायचे, चाटून खायचे व प्यायचे असे चार प्रकारचे भोजन-पदार्थ सांगिले आहेत. त्यांतील प्रत्येकाचे इतके पदार्  बनविले होते की, सांगता सोय नाही.

छरस रुचिर बिंजन बहु जाती । एक एक रस अगनित भॉंती ॥

जेवँत देहिं मधुर धुनि गारी । लै लै नाम पुरुष अरु नारी ॥

सहा रसांची अनेक प्रकारची स्वादिष्ट तोंडी लावणी होती. एक-एक रसाचे असंख्य प्रकार बनविले होते, भोजन करताना पुरुष व स्त्रिया यांची घेत घेत मधुर स्वरांनी स्त्रिया टोमणे मारीत होत्या.

समय सुहावनि गारि बिराजा । हँसत राउ सुनि सहित समाजा ॥

एहि बिधि सबहीं भोजनु कीन्हा । आदर सहित आचमनु दीन्हा ॥

प्रसंगानुसार चाललेले विनोद शोभून दिसत होते. ते ऐकून राजा दशरथासह सर्व मंडळी हसत होती. अशा प्रकारे सर्वांचे भोजन झाले, मग सर्वांना आदराने हात धुण्यासाठी पाणी दिले गेले. ॥ ४ ॥

दोहा—देइ पान पूजे जनक दसरथु सहित समाज ।

जनवासेहि गवने मुदित सकल भूप सिरताज ॥ ३२९ ॥

मग पान देऊन जनकांनी परिवारासह दशरथांचे पूजन केले. सर्व राजांचे चक्रवर्ती असलेले राजा दशरथ प्रसन्न मनाने जानवश्यात गेले. ॥ ३२९ ॥

नित नूतन मंगल पुर माहीं । निमिष सरिस दिन जामिनि जाहीं ॥

बड़े भोर भूपतिमनि जागे । जाचक गुन गन गावन लागे ॥

जनकपुरामध्ये नित्य नवे मंगल प्रसंग घडत होते. दिवस व रात्र पळभरात निघून जात. भल्या सकाळी राजांचे मुकुटमणी दशरथांना जाग आली. याचक त्यांचे गुण-गान करु लागले. ॥ १ ॥

देखि कुअँर बर बधुन्ह समेता । किमि कहि जात मोदु मन जेता ॥

प्रातक्रिया करि गे गुरु पाहीं । महा प्रमोदु प्रेमु मन माहीं ॥

चारी कुमारांना सुंदर वधूंच्यासह पाहून दशरथांच्या मनात इतका आनंद झाला की, तो कशाही प्रकारे सांगता येत नाही. ते प्रातर्विधी आटोपून गुरु वसिष्ठांकडे गेले. त्यांच्या मनात महान प्रेम व आनंद भरुन राहिला होता. ॥ २ ॥

करि प्रनामु पूजा कर जोरी । बोले गिरा अमिअँ जनु बोरी ॥

तुम्हरी कृपॉं सुनहु मुनिराजा । भयउँ आजु मैं पूरन काजा ॥

राजांनी प्रणाम व पूजन करुन मग हात जोडून अमृतमय वाणीने म्हटले की, ‘ हे मुनिराज, ऐका. आपल्या कृपेमुळे आज मी पूर्णकाम झालो. ॥ ३ ॥

अब सब बिप्र बोलाइ गोसाईं । देहु धेनु सब भॉंति बनाईं ॥

सुनि गुर करि महिपाल बड़ाई । पुनि पठए मुनिबृंद बोलाई ॥

हे स्वामी, आता सर्व ब्राह्मणांना बोलावून त्यांना सर्व तर्‍हेने

 अलंकृत गाई द्या.’ हे ऐकून गुरुंनी राजाची थोरवी वर्णन

 केली आणि मुनिगणांना बोलावणे पाठविले. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: