Thursday, June 16, 2011

Shri Dattateya VajraKavacha Stotram Part 4 of 4

Shri Dattateya VajraKavacha Stotram
This VajraKavacha Stotram is in Sanskrit. This is told to Goddess Parvati by God Shiva for the benefit of the people/devotees of God Dattatreya. I am uploading this Dattateya VajraKavacha Stotram in four parts as it is very long. However every part is important. Hence the devotee of God Dattatreya has to listen / recite all four parts to receive all the benefits described in this last i.e. 4th part (Falashruti).
Falashruti Part 4
Falashruti means what we get after listening / reciting this VajraKavacham. Many of us live in with many difficulties, sufferings, sorrow. These difficulties may be in the form of bad health, fear of something, poverty, unhappiness and want of something to improve the life conditions; hence many of us are always in search of the easiest mean to achieve everything we want. This VajraKavacham of God Dattatreya has a power to give us anything we wish; however one needs to recite/listen this VajraKavacham daily with devotion, concentration and unshakable faith in mind. Put before God Dattatreya what you want and start reciting or listening VajraKavacham.
Goddess Parvati asked God Shiva to tell her: 1) who can recite this VajraKavacham? 2) Where to recite? 3) When to recite? 4) How to recite? And 5) how many times to recite it?
Answers to all above questions are given by God Shiva in this last 4th part of VajraKavacham. Please remember that this VajraKavacham and FalShruti is arisen out of discussion in between Goddess Parvati and God Shiva; so that devotees of God Dattatreya living on this earth become free from their sufferings, difficulties and sorrow.
Dharma (how to live), Artha (Money), Kama (fulfillments of desires) and Moksha (freeness) from bondage of life every thing or all four are achievable by this VajraKavacham. We get good Son/Daughter, Good wife, Good husband, Friends, wealth, all sorts of knowledge, arts, singing, music or anything like that, success in literature, poetry, writings, good memory, gives success/fame in all our endeavourers, makes us free from all our enemies, makes us free from any type/all types of diseases and thus we get good health.
Anybody who doesn’t have a son/daughter has to recite it 10,000/ times. By reciting it 20,000/ times untimely death or accidental death can be avoided. By reciting it 30,000/ times one can receive many siddhies. It is assured in this VajraKavacham that by reciting it many times all our desires are fulfilled.
This VajraKavacham needs to be recited, sitting under the Oudumber (a tree scared to God Dattatreya) tree if we want intelligence, strong memory. This VajraKavacham needs to be recited, sitting under the Bilva (a tree scared to God Shiva) tree if we want money, wealth. This VajraKavacham needs to be recited, sitting under the tamarind (Chinch) tree if we want to perform Shanti-Karma. This VajraKavacham needs to be recited, sitting under the pimpal (Holy fig tree) tree if we want to have a strong health/body, power. This VajraKavacham needs to be recited, sitting under the mango tree if we want a good wife/husband. This VajraKavacham needs to be recited, sitting besides the tulshi (holy basil) tree if we want knowledge. Anybody desirous of success in all his good/social life required to recite it in the temple. By reciting this kavacham one can become God Dattatreya himself as told by God Shiva.
Thus in short as described above is the Falshruti.
Here completes this holy Shri Dattateya VajraKavacha Stotram. It is from Rudrayamal. I request God Dattatreya to bless all the people.
श्री दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्रम् चा भाग ४
अथ फलश्रुती II
पार्वत्युवाच II
एतत्कवचमाहात्म्यं वद विस्तरतो मम I
कुत्र केन कदा जाप्यं किं यज्जाप्यं कथं कथम् II २८ II
उवाच शंभुस्तत्सर्वं पार्वत्या विनयोदितम् I
श्रीशिव उवाच I
श्रुणु पार्वति वक्ष्यामि समाहितमनाविलम् II २९ II
धर्मार्थकाममोक्षाणामिदमेव परायणं I
हस्त्यश्वरथपादातिसर्वैश्वर्यप्रदायकम् II ३० II
पुत्रमित्रकलत्रादिसर्वसंतोषसाधनम् I
वेदशास्त्रादिविद्यानां निधानं परमं हि तत् II ३१ II
संगीतशास्त्रसाहित्यसत्कवित्वविधायकम् I
बुद्धिविद्यास्मृतिप्रज्ञामतिप्रौढिप्रदायकम् II ३२ II
सर्वसंतोषकरणं सर्वदुःखनिवारणम् I
शत्रुसंहारकं शीघ्रं यशःकीर्तिविवर्धनम् I I ३३ II
अष्टसंख्या महारोगाःसन्निपातास्त्रयोदश I
षण्णवत्यक्षिरोगाश्च विंशतिर्मेहरोगकाः II ३४ II
अष्टादश तु कुष्ठानि गुल्मान्यष्टविधान्यपि I
अशीतिर्वातरोगाश्च चत्वारिम्शत्तु पैत्तिकाः II ३५ II
विंशति श्लेष्मरोगाश्च क्षयचातुर्थिकादयः I
मंत्रयंत्रकुयोगाद्याः कल्पतंत्रादिनिर्मिताः I I ३६ II
ब्रह्मराक्षसवेताल कुष्मान्डादिग्रहोद् भवाः I
संघजा देशकालस्थास्तापत्रयसमुत्थिताः II ३७ II
नवग्रहसमुद्भुता महापातकसंभवाः I
सर्वे रोगा प्रणश्यन्ति सहस्रावर्तनाद् ध्रुवम् II ३८ II
अयुतावृत्तिमात्रेण वंध्या पुत्रवती भवेत् I
अयुतद्वितयावृत्त्या ह्यपमृत्युजयो भवेत् II ३९ II
अयुतत्रितयाच्चैव खेचरत्वं प्रजायते I
सहस्रादयुतादर्वाक् सर्व कार्याणि साधयेत् II ४० II
लक्षावृत्त्या कार्यसिद्धिर्भवत्येव न संशयः II ४१ II
विषवृक्षस्यमूलेषु तिष्ठन् वै दक्षिणामुखः I
कुरुते मासमात्रेण वैरिण विकलेंद्रियम् II ४२ II
औदुंबरतरोर्मूले वृध्दीकामेन जाप्यते I
श्रीवृक्षमूले श्रीकामी तिन्तिण्याम् शांतिकर्मणि II ४३ II
ओजस्कामोSश्वत्थमूले स्त्रीकामैः सहकारके I
ज्ञानार्थी तुलसीमूले गर्भ गेहे सुतार्थीभिः II ४४ II
धनार्थीभिस्तु सुक्षेत्रे पशुकामैस्तु गोष्ठके I
देवालये सर्वकामैस्तत्काले सर्वदर्शितम् II ४५ II
नाभिमात्रजले स्थित्वा भानुमालोक्य यो जपेत् I
युद्धे वा शास्त्रवादे वा सहस्रेण जयो भवेत् II ४६ II
कंठमात्रे जले स्थित्वा यो रात्रौ कवचं पठेत् I
ज्वरापस्मारकुष्ठादितापज्वर निवारणम् II ४७ II
यत्र यत्स्यात्स्थिरं यद्दत्प्रसन्नं तन्निवर्तते I
तेन तत्र हि जप्तव्यं ततः सिद्धिर्भवेद्ध्रुवम् II ४८ II
इत्युक्त्वा च शिवो गौर्ये रहस्यं परमं शुभम् I
यः पठेत् वज्रकवचं दत्तात्रेयसमो भवेत् II ४९ II
एवं शिवेन कथितं हिमवत्सुतायै
प्रोक्तं दलादनमुनयेSत्रिसुतेन पूर्वम् I
यः कोSपि वज्रकवचं पठतीह लोके
दत्तोपमश्चरती योगिवरश्चिरायुः II ५० II
इति श्रीरुद्रयामले हिमवत्खंडे मंत्रशास्त्रे उपासनाकांडे शिवविजयसिद्धान्ते
उमामहेश्वरसंवादे श्रीदत्तात्रेयवज्रकवच स्तोत्रं संपूर्णम् II
श्री दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्रम् चा भाग ४
मराठी अर्थ:
२८ ) पार्वतीने विचारले कि, हे शिवा ! या कवचाचे महात्म्य मला विस्ताराने सांगा. कोणी, कोठे व केव्हां याचा जप करावा ? आणि कसा व किती करावा ?
२९ ) श्रीपार्वतीने विनयाने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे श्रीशंभूमहादेवांनी पुढीलप्रमाणे दिले. ते असे म्हणाले की, तुला सर्व स्पष्ट व विस्तृत सांगतो. ते तू श्रवण कर.
३०) धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ या कवचामुळे सहज साध्य होतात. हत्ती, घोडे, रथ व पायदळ इत्यादि सर्व ऐश्वर्य या कवचामुळे मिळते.
३१) पुत्र, मित्र व कलत्र यांचा लाभ होतो. वेदशास्त्रादि सर्व विद्यांचे हे आगर आहे. अर्थात् या श्रीदत्तात्रेय वज्रकवचामुळे सर्व विद्यांचा लाभ होतो.
३२) या वज्रकवचामुळे संगीत व साहित्याचा लाभ होतो. उत्कृष्ट काव्य रचना मनुष्य करू शकतो.धारणाशक्ती, विद्या, स्मरणशक्ती व बुद्धि यात त्याला प्रौढी मिळते.
३३) हे श्रीदत्तात्रेयवज्रकवच सर्व संतोष कारक असून हे सर्व दु:खनाशक आहे. हे वज्रकवच शत्रूंचा शीघ्र नि:पात करणारे असून यश व कीर्ती वाढविणारे आहे.
३४) ह्या श्रीदत्तात्रेयवज्रकवचामुळे आठ प्रकारचे महारोग, तेरा तऱ्हेचे संनिपात, शहाण्णवरीतीचे नेत्ररोग आणि वीस तऱ्हेचे महारोग नष्ट होतात.
३५ ते ३८) ह्या श्रीदत्तात्रेयवज्रकवचामुळे अठरा कुष्टे व आठ प्रकारचा गुल्म (उदररोग विशेष), तसेच ८० वातरोग, ४० पित्तरोग आणि २० कफरोग तसेच क्षयरोग, वातार्थीकादिज्जर, दुष्टमंत्र, दुष्टयंत्र, वाईटयोग वगैरे जे कल्प तंत्रादिकांत सांगितले आहे ते आणि ब्रह्मराक्षस, वेताळ, कुष्मांडादि ग्रहांमुळे होणाऱ्या पीडा, सहभोजन, आसन, वस्त्र धारणादि समुदायोत्पन व्याधी, देशकालोत्पन प्लेग, महामारी त्रिविध तापामुळे होणाऱ्या पीडा, शनी, राहु इत्यादि नवग्रहांच्या पीडा आणि महापातकांमुळे होणारा जाच हे सर्व या श्रीदत्तात्रेयवज्रकवचाच्या हजार आवर्तनाने पूर्ण नष्ट होतात.
३९) या श्रीदत्तात्रेयवज्रकवचाच्या दहा हजार आवर्तनाने वंध्येला पुत्र होतील आणि वीस हजार आवर्तने केल्यास अकालमृत्यू, अपमृत्यू अर्थात् अपघाती मृत्यू टळतो.
४० ते ४१) या श्रीदत्तात्रेयवज्रकवचाच्या तीस हजार आवर्तना नी खेचरत्व, देवत्व म्हणजे गगनांतून चालणे अर्थांत् निराधार गमनशक्ती प्राप्त होईल. सह्स्त्रात्, अयुतात्, अर्वाक्, म्हणजे हजारो पाठांनी म्हणजे लक्षसंख्यादि पाठांनी सगळी कामे सर्व इच्छा पूर्ण होतील. अशाप्रकारे या श्रीदत्तात्रेयवज्रकवचाचे लक्ष पाठ केल्याने कार्यसिद्धी होतेच यात काहीही संशय नाही.
४२) विषवृक्षाच्या (रुई, कुचला वगैरे ) झाडाच्या खाली दक्षिणाभिमुख उभे राहून हे श्रीदत्तात्रेयवज्रकवच जपल्यास शत्रू विकलेंद्रिय, लुळा, पांगळा, मुका, बहिरा, आंधळा वगैरे व दुबळा होतो.
४३) बुद्धिची इच्छा करणाऱ्याने औदुम्बराच्या (उंबराच्या) वृक्षाखाली बसून हे वज्रकवच जपावे. बिल्ववृक्षाच्या मुळाशी बसून लक्ष्मीची इच्छा करणाऱ्याने हे वज्रकवच जपावे. शान्तिकर्मांत चिंचेच्या झाडाखाली बसून हे वज्रकवच जपावे.
४४) ओजस्विता व तेजस्विता इच्छिणाऱ्याने पिंपळाखाली बसून हे वज्रकवच जपावे. पत्नी इच्छिणाऱ्याने आम्रवृक्षाखाली बसून हे वज्रकवच जपावे. ज्ञानेच्छूने तुलसीजवळ बसून हे वज्रकवच जपावे. पुत्रेच्छूने तळघरात बसून हे वज्रकवच जपावे.
४५) धर्मार्थी लोकांनी सुक्षेत्रांत (आपल्या शेतांत वा तीर्थक्षेत्रांत ) या कवचाचा जप करावा. गाई, म्हशी इत्यादि पशूंची इच्छा करणाऱ्यांनी गोठ्यामध्ये बसून हे कवच म्हणावे. सर्वेच्छू लोकांनी म्हणजे वाटेल ते योग्य इच्छा करणाऱ्यानी देवालयांत बसून हे वज्रकवच म्हणावे. अशा रीतीने स्थळ, काल, कामना व जपसंख्या इत्यादि सर्व सांगितले.
४६) नाभीपर्यंत खोल पाण्यांत उभे राहून सूर्याकडे पाहात जो हे वज्रकवच जपेल तो युद्धांत हजारो योद्ध्यांना जिंकेल व शास्त्रवादांत शेकडो पंडीतांना निरुत्तर करेल.
४७) आकंठपाण्यांत उभे राहून रात्री जो हे कवच पठण करील त्याचे ज्वर, फेफरे, कुष्ठादि त्वचारोग व संनिपातज्वर वगैरे सर्व नष्ट होतात.
४८) जेथे ज्याचे चित्त स्थिर व प्रसन्न राहील व हे वज्रकवच म्हणावेसे वाटेल तेथे त्याने या कवचाचा जप करावा. त्यामुळे कार्यसिद्धी निश्चित होते.
४९) असे सांगून पुन्हा श्रीशिवप्रभू श्रीपार्वतीदेवीस असे म्हणाले की, तुला परम मंगल रहस्य म्हणून असे सांगतो की,जो हे वज्रकवच पठण करील तो श्रीदत्तात्रेयांसारखा प्रति दत्तात्रेय होईल.
५०) अशा रीतीने श्रीशिवांनी श्रीपार्वतीला अर्थांत् हिमगिरी कन्यकेला जे सांगितले ते श्रीदलादनमुनींना श्री अत्रिपुत्र श्रीदत्तात्रेयांनी पूर्वीच सांगितले होते. या मृत्यूलोकी जो कोणी हे वज्रकवच पठण करील, तो श्री दत्तात्रेयांप्रमाणेच दीर्घायू होईल, योगीश्रेष्ठ होईल व कोठेही अनिर्बंध संचार करेल.
अशा रीतीने श्रीरुद्रयामलतंत्रांतर्गत हिमवतखंडामधील, मंत्रशास्त्राच्या उपासनाकांडातील शिवविजय सिद्धांतयुक्त असे उमामहेश्वर संवादरूपाने प्रकट झालेले श्रीदत्तात्रेय वज्रकवच स्तोत्र संपूर्ण झाले.

Shri Dattateya VajraKavacha Stotram Part 4 of 4








Custom Search