Tuesday, July 21, 2020

Dnyaneshwari Adhyay 2 Part 15 ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग १५


Dnyaneshwari Adhyay 2 Part 15 
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग १५
ज्ञानेश्र्वरी दुसरा ओव्या ३५१ ते ३७५
म्हणोनि आपुलीं आपणपेया । जरी यें इंद्रियें येती आया ।
तरी अधिक कांहीं धनंजया । सार्थक असे ॥ ३५१ ॥
३५१) म्हणून आपल्याला आपलीं ही इंद्रियें जर आकळतां येतील तर, अर्जुना, दुसरें कांहीं त्याहून मिळवावयाचें आहे काय ?  
देखें कूर्म जियापरी । उवाइला अवयव पसरी ।
ना तरी इच्छावशें आवरी । आपणपेंचि ॥ ३५२ ॥
३५२) पाहा, ज्याप्रमाणें कांसव प्रसन्न झालें असतां आपलें हातपाय इत्यादिक अवयव पसरतें किंवा मनांत आल्यास आपोआप आंत आखडून घेतें; 
तैसीं इंद्रियें आपैतीं होती । जयाचें म्हणितलें करिती ।
तयाची प्रज्ञा जाण स्थिती । पातली असे ॥ ३५३ ॥
३५३) त्याप्रमाणें ज्याचीं इंद्रियें ताब्यांत असतात व तो म्हणेल तसें करतात, त्याची बुद्धि स्थिर झालेली आहे, असे समज.
आतां आणिक एक गहन । पूर्णाचें चिन्ह ।
अर्जुना तुज सांगेन । परिस पां ॥ ३५४ ॥   
३५४) आतां आणखी एक पूर्णावस्थेला पोंचलेल्या पुरुषाचें गूढ ( सहसा लक्षांत न येणारें ) लक्षण तुला सांगतों; ऐक.
देखें भूतजात निदेलें । तेथेंचि जया पाहलें ।
आणि जीव जेथ चेइले । तेथ निद्रितु जो ॥ ३५५ ॥
३५५) पाहा, सर्व मनुष्यें ज्या आत्मस्वरुपाच्या ठिकाणीं निजलेलीं ( अज्ञानी ) असतात, त्या ठिकाणीं ज्याला उजाडलेलें असतें ( म्हणजे ज्याला आत्मज्ञान झालेलें असतें ); आणि जीव ज्या ( देहादि प्रपंचाच्या ) ठिकाणीं जागे ( विषयसुख अनुभवणारे ) असतात, त्या ठिकाणीं तो निजलेला ( विषयनिवृत्त ) असतो,
तोचि तो निरुपाधि । अर्जुना तो स्थिरबुद्धि ।
तोचि जाणें निरवधि । मुनीश्र्वर ॥ ३५६ ॥
३५६) तोच तो खरा निरुपाधि होय. अर्जुना, त्याचीच बुद्धि स्थिर झालेली आहे आणि तोच अखंड मुनीश्र्वर आहे, असें समज.
पार्था आणीकही परी । तो जाणों येईल अवधारीं ।
जैसी अक्षोभता सागरीं । अखंडित ॥ ३५७ ॥
३५७) अर्जुना, आणखी एका प्रकारानें त्याला ओळखतां येईल. तो प्रकार ऐक. जशी समुद्रांत निरंतर शांतता असते,
जरी सरिताओघ समस्त । परिपूर्ण होऊनि मिळत ।
तरी अधिक नोहे ईषत् । मर्यादा न संडी ॥ ३५८ ॥  
३५८) जरी सर्व नद्यांचे प्रवाह तुडुंब भरुन ( त्या समुद्राला ) मिळतात, तरी तो त्यामुळें जराहि फुगत नाहीं व आपली मर्यादा थोडीहि सोडीत नाहीं,   
ना तरी ग्रीष्मकाळीं सरिता । शोषूनि जाती समस्ता ।
परी न्यून नव्हे पार्था । समुद्र जैसा ॥ ३५९ ॥
३५९) किंवा, उन्हाळ्याच्या वेळीं जरी सर्व नद्या आटून गेल्या. ( जरी त्यास एकहि नदी मिळाली नाहीं, ) तरी त्या वेळीं अर्जुना, समुद्र जसा मुळींच कमी होत नाहीं,
तैसा प्राप्तीं ऋद्धिसिद्धी । तयासि क्षोभु नाहीं बुद्धी ।
आणि न पवतां न बाधी । अधृति तयातें ॥ ३६० ॥
३६०) त्याप्रमाणें ऋद्धिसिद्धि प्राप्त झाल्या असतांहि, त्याचें मन ( हर्षानें ) उचंबळत नाहीं आणि त्या जर प्राप्त झाल्या नाहींत, तर अधैर्याची त्याला बाधा होत नाहीं.
सांगें सूर्याचां घरीं । प्रकाशु काय वातीवेरी ।
कीं न लविजे तरी अंधारीं । कोंडेल तो ॥ ३६१ ॥
३६१) सांग बरें, सूर्याच्या घरीं प्रकाशाला दिवा लागतो का ? आणि दिवा लावला नाहीं तर तो सूर्य अंधारानें कोंडून जाईल का ?
देखें ऋद्धिसिद्धि तयापरी । आली गेली से न करी ।
तो विगुंतला असे अंतरीं । महासुखीं ॥ ३६२ ॥
३६२) पाहा. त्याप्रमाणें ऋद्धिसिद्धि आल्या का गेल्या, याचें त्याला भानहि नसतें. तो अंतःकरणानें महासुखांत निमग्न असतो.
जो आपुलेनि नागरपणें । इंद्रभुवनातें पाबळें म्हणे ।
तो केवि रंजे पालिवणें । भिल्लांचेनि ॥ ३६३ ॥
३६३) जो आपल्या ऐश्र्वर्यापुढें इंद्रभुवनालाहि तुच्छ समजतो, तो भिल्लांच्या पालांच्या खोपटांत कसा रमेल ?
जो अमृतासि ठी ठेवी । तो जैसा कांजी न सेवी ।
तैसा स्वसुखानुभवी । न भोगी ऋद्धि ॥ ३६४ ॥
३६४) जो अमृताला नांवें ठेवतो, तो ज्याप्रमाणें कांजीला हात लावीत नाहीं, त्याप्रमाणें ज्याला आत्मसुखाचा अनुभव आला, तो ऋद्धीचा भोग घेत नाहीं. 
पार्था नवल हें पाहीं । जेथ स्वर्गसुख लेखनीय नाहीं ।
तेथ ऋद्धिसिद्धि कायी । प्राकृता होती ॥ ३६५ ॥  
३६५) अर्जुना, काय आश्र्चर्य आहे पाहा ! जेथें स्वर्गसुखाची खिजगणती नाहीं, तेथें बापड्या ऋद्धिसिद्धींचा काय पाड !
ऐसा आत्मबोधें तोषला । जो परमानंदें पोखला ।
तोचि स्थिरप्रज्ञु भला । वोळका तूं ॥ ३६६ ॥
३६६) असा जो आत्मज्ञानानें तुष्ट झालेला व परमानंदानें पुष्ट झालेला आहे, तोच खरा स्थिरबुद्धि आहे, असें तू जाण.
तो अहंकारातें दंडुनी । सकळ कामु सांडोनी ।
विचरे विश्र्व होऊनि । विश्र्वाचि माजीं ॥ ३६७ ॥
३६७) तो अहंकाराला घालवून सर्व कामना सोडून व ( अनुभवाच्या अंगानें ) जगद्रूप बनून जगांत वावरतो. 
हे ब्रह्मस्थिति निःसीम । जे अनुभवितां निष्काम ।
पातले परब्रह्म । अनायासें ॥ ३६८ ॥
३६८) ही ब्रह्मस्थिति अमर्याद आहे. जे निष्काम पुरुष हिचा अनुभव घेतात, ते अनायासें परब्रह्माला पोंचतात.
जे चिद्रूपीं मिळतां । देहांतीची व्याकुळता ।
आड ठाकों न शके चित्ता । प्राज्ञा जया ॥ ३६९ ॥
३६९) कारण कीं, चिद्रूपीं ( ज्ञानरुपीं ) मिळाल्यावर प्राण जाते वेळीं होणारी व्याकुळता ( चित्ताची तळमळ ) ज्या ब्रह्मस्थितीमुळें ज्ञान्याच्या चित्तांत लुडबुड करीत नाहीं,  
तेचि हे स्थिति । स्वमुखें श्रीपति ।
सांगत अर्जुनाप्रति । संजयो म्हणे ॥ ३७० ॥
३७०) तीच ही स्थिति, श्रीकृष्णानें स्वमुखानें अर्जुनास सांगितली, असें संजय म्हणाला.
ऐसें कृष्णवाक्य ऐकिलें । तेथ अर्जुनें मनीं म्हणितलें ।
आतां आमुचियाचि काजा आलें । उपपत्ती इया ॥ ३७१ ॥
३७१) असें श्रीकृष्णाचें बोलणें ऐकून अर्जुनानें असें मनांत म्हटलें कीं, आतां ( देवाच्या ) ह्या विचारसरणीनें आमचेंच ( आयते ) कार्य झालें. 
जें कर्मजात आघवें । एथ निराकारिलें देवें ।
तरी पारुषलें म्यां झुंजावें । म्हणूनियां ॥ ३७२ ॥
३७२) कारण कीं, जेवढें कर्म म्हणून आहे, तेवढें सर्व देवानें निषधिलें ( त्याज्य ठरविलें ) तर मग माझें युद्ध करणें आयतेंच थांबलें.
ऐसा श्रीअच्युताचिया बोला । चित्तीं धनुर्धरु उवायिला ।
आतां प्रश्र्नु करील भला । आशंकोनियां ॥ ३७३ ॥
३७३) श्रीकृष्णाचें बोलणें ऐकून अर्जुन आपल्या चित्तांत असा प्रसन्न झाला. यापुढें त्याच्या मनांत शंका येऊन तो ( श्रीकृष्णाला ) चांगला प्रश्र्न करील. 
तो प्रसंगु असे नागरु । जो सकळ धर्मासि आगरु ।
कीं विवेकामृतसागरु । प्रांतहीनु ॥ ३७४ ॥
३७४) तो प्रसंग मोठा बहारीचा आहे. ( जणूं काय तो ) सर्व धर्माचे आगरच किंवा विचाररुपी अमृताचा अमर्याद सागरच आहे ! 
जो आपण सर्वज्ञनाथु । निरुपिता होईल श्रीअनंतु ।
ते ज्ञानदेवो सांगेल मातु । निवृत्तिदासु ॥ ३७५ ॥
३७५) सर्व ज्ञान्यांचा शिरोमणि जो श्रीकृष्ण तोच स्वतः जें निरुपण करील, ती हकीकत निवृत्तिनाथांचा शिष्य ज्ञानदेव सांगेल.  
॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानसंन्यासयोगो नाम द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥
( श्र्लोक ७२, ओव्या ३७५ ) 

॥ ॐ सच्चिदानन्दार्पणमस्तु ॥


Custom Search

Dnyaneshwari Adhyay 2 Part 14 ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग १४


Dnyaneshwari Adhyay 2 Part 14 
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग १४ 
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा ओव्या ३२६ ते ३५०

जैसें जात्यंधा पळणी पावे । मग ते काकुळती सैरा धांवे ।
तैसे बुद्धीसि होती भवें । धनुर्धरा ॥ ३२६ ॥
३२६) जसा जन्मांध पळापळींत सांपडला म्हणजे निरुपायानें दीन होऊन सैरावैरा धांवू लागतो, तसें अर्जुना, बुद्धीला मग भ्रांति होते,   
ऐसा स्मृतिभ्रंशु घडे । मग सर्वथा बुद्धि अवघडे ।
तेथ समूळ हें उघडे । ज्ञानजात ॥ ३२७ ॥
३२७) अशा रीतीनें स्मृतीला भ्रंश झाला, म्हणजे मग बुद्धीची सर्व प्रकारें कुचंबणा होते; त्याप्रसंगीं जेवढें म्हणून ज्ञान आहे, तेवढें सर्व समूळ नष्ट होतें.
चैतन्याचां भ्रंशीं । शरीरा दशा जैशी ।
पुरुषा बुद्धिनाशीं । होय देखें ॥ ३२८ ॥
३२८) प्राण निघून गेलें असतां शरीराची जशी दशा होते, त्याप्रमाणें बुद्धीचा नाश झाला असतां पुरुषाची तशी स्थिती होते, असें समज.
म्हणोनि आइकें अर्जुना । जैसा विस्फुलिंग लागे इंधन ।
मग तो प्रौढ जालिया त्रिभुवना । पुरों शके ॥ ३२९ ॥
३२९) म्हणून अर्जुना, ऐक, लाकडाला ठिणगी लागली व ती एकदा कां भडकली म्हणजे त्रिभुवनाला ( जाळण्याला ) ज्याप्रमाणें तीं समर्थ होते, 
तैसें विषयांचें ध्यान । जरी विपायें वाहे मन ।
तरी येसणें हें पतन । गिंवसीत पावे ॥ ३३० ॥
३३०) त्याप्रमाणें विषयांचें चिंतन मनाकडून चुकून ( अल्पहि ) जरी झालें, तरी एवढें हें ( मोठें ) पतन शोधीत येतें. 
म्हणोनि विषय हे आघवे । सर्वथा मनौनि सांडावे । 
मग रागद्वेष स्वभावें । नाशतील ॥ ३३१ ॥
३३१) म्हणून हे सर्व विषय पूर्णपणें मनांतूनच काढून टाकावे, मग रागद्वेष आपोआप नष्ट होतील.  
पार्था आणिक एक । जरी नाशले रागद्वेष । 
तरी इंद्रियां विषयीं बाधक । रमतां नाहीं ॥ ३३२ ॥
३३२) अर्जुना, आणिक एक गोष्ट ( ऐक ). रागद्वेषांचा ( एकदां ) नाश झाल्यावर ( मग ) इंद्रियें विषयांत जरी ( कदाचित् ) रममाण झालीं तरी ( ते विषय ) बाधक होत नाहीत. 
जैसा सूर्य आकाशगतु । रश्मिकरीं जगातें स्पर्शतु ।
तरी संगदोषें काय लिंपतु । तेथिंचेनि ॥ ३३३ ॥
३३३) ज्याप्रमाणें आकाशांत असलेला सूर्य जगाला आपल्या किरणरुपी हातांनी स्पर्श करतो, पण त्या संगदोषानें लिप्त होतो काय ?
तैसा इंद्रियार्थीं उदासीन । आत्मरसेंचि निर्भिन्न ।
जो कामक्रोधविहीन । होऊनि असे ॥ ३३४ ॥
३३४) त्याप्रमाणें जो विषयांच्या ठिकाणीं अनासक्त, आत्मानंदांत तल्लीन व कामक्रोधरहित झालेला असतो;   
तरी विषयांतुही कांहीं । आपणपेंवाचुनि नाहीं ।
मग विषय कवण कायी । बाधितील कवणा ॥ ३३५
३३५) आणि विषयांतहि ( ज्याला ) आत्मस्वरुपावांचून दुसरें कांही दिसत नाहीं, त्याला कसले काय ? आणि कसली कोणाला बाधा करणार ?
जरी उदकें उदकीं बुडिजे । कां अग्नि आगी पोळिजे ।
तरी विषयसंगें आप्लविजे । परिपूर्ण तो ॥ ३३६ ॥
३३६) जर पाणी पाण्यांत बुडेल किंवा अग्नि आगीनें पोळेल, तर ( मात्र ) तो पूर्णावस्थेला पावलेला पुरुष विषयांच्या संगतीनें लिप्त होईल.  
ऐसा आपणचि केवळ । होऊनि असे निखळ ।
तयाची प्रज्ञा अचळ । निभ्रांत मानीं ॥ ३३७ ॥
३३७) असा जो केवळ शुद्ध आत्मस्वरुप होऊन राहतो, त्याची बुद्धि स्थिर झालेली आहे, असें तूं निःसंशय समज.  
देखें अखंडित प्रसन्नता । आथी जेथ चित्ता । 
तेथ रिगणें नाहीं समस्तां । संसारदुःखां ॥ ३३८ ॥
३३८) पाह, जेथे चित्ताला निरंतर प्रसन्नता असते, तेथें कोणत्याहि संसार-दुःखाचा प्रवेश होत नाही.
जैसा अमृताचा निर्झरु । प्रसवे जयाचा जठरु ।
तया क्षुधेतृषेचा अडदरु । कहींचि नाहीं ॥ ३३९ ॥
३३९) ज्याप्रमाणें अमृताचा झरा ज्याच्या पोटांतच उत्पन्न होतो, त्याला तहानभुकेची भीति कधीं नसते;
तैसे हृदय प्रसन्न होये । तरी दुःख कैचें कें आहे ।
तेथ आपैसी बुद्धि राहे । परमात्मरुपीं ॥ ३४० ॥
३४०) त्याप्रमाणें अंतःकरण प्रसन्न झालें तर मग दुःख कसलें, आणि कोठलें ? त्या वेळीं परमात्मस्वरुपाच्या ठिकाणीं बुद्धि सहजच स्थिर होते.
जैसा निवातीचा दीपु । सर्वथा नेणे कंपु ।
तैसा स्थिरबुद्धि स्वस्वरुपु । योगयुक्तु ॥ ३४१ ॥ 
ज्याप्रमाणे वारा नसलेल्या ठिकाणीं असलेल्या दिव्याची ज्योत मुळींच हालत नाहीं, त्याप्रमाणें योगयुक्त पुरुष स्वस्वरुपीं स्थिर बुद्धीनें राहतो.  
ये युक्तीचि कडसणी । नाहीं जयाचां अंतःकरणीं ।
तो आकळिला जाण गुणीं । विषयादिकीं ॥ ३४२ ॥
३४२) योगयुक्त होऊन राहाण्याचा हा विचार ज्याच्या अंतःकरणांत नाहीं, त्याला ( शब्दादि ) विषय ( आपल्या ) पाशांनीं जखडून टाकतात.   
तया स्थिरबुद्धि पार्था । कहीं नाहीं सर्वथा ।
आणि स्थैर्याची आस्था । तेही नुपजे ॥ ३४३ ॥
३४३) अर्जुना, त्याची बुद्धि स्थिर तर केव्हांच होत नाहीं आणि तशी बुद्धि स्थरतेची उत्कट इच्छाहि त्याच्या मनांत उत्पन्न होत नाहीं. 
निश्र्चळत्वाची भावना । जरी नव्हेचि देखें मना ।
तरी शांति केवी अर्जुना । आपु होय ॥ ३४४ ॥
३४४) आणि पाहा, निश्चलत्वाची नुसती कल्पनाहि जर त्याच्या मनाला शिवत नाहीं, तर अर्जुना, त्याला शांतीचा लाभ कसा होणार ? 
आणि जेथ शांतीचा जिव्हाळा नाहीं । तेथ सुख विसरोनि न रिगे कहीं ।
जैसा पापियाचां ठायीं । मोक्षु न वसे ॥ ३४५ ॥
ज्याप्रमाणें पापी मनुष्याच्या ठिकाणी मोक्षाचा वास नसतो, त्याप्रमाणें जेथें शांतीचा ओलावा नाहीं, तेथें सुख चुकूनसुद्धां कधीं पाय टाकीत नाहीं.
देखें अग्निमाजी घापती । तियें बिजें जरी विरुढती ।
तरी अशांता सुखप्राप्ती । घडों शके ॥ ३४६ ॥
३४६) पाहा, विस्तवांत घातलेलें ( भाजलेलें ) बीं जर उगवेल, तर शांतिहीन पुरुषाला सुखप्राप्ती होऊ शकेल. 
म्हणोनि अयुक्तपण मनाचें । तेंचि सर्वस्व दुःखाचें ।
या कारणें इंद्रियांचें । दमन निकें ॥ ३४७ ॥
३४७) म्हणून मनाची चंचलता हेंच दुःखाचें सार आहे; याकरितां इंद्रियांचा निग्रह करावा, हे चांगलें.
ये इंद्रियें जें जें म्हणती । तें तेंचि जे पुरुष करिती ।
ते तरलेचि न तरती । विषयसिंधु ॥ ३४८ ॥
३४८) हीं इंद्रियें जें जें म्हणतील , तेंच जे पुरुष करतात ( इंद्रियांच्या नादानें जे वागतात, ते विषयसागराच्या पलीकडे पैलतीरापर्यंत गेले असले, तरी ते खरोखर गेले नाहींत, ( असे समजावें ). 
जैसी नाव थडिये ठाकितां । जरी वरपडी होय दुर्वाता ।
तरी चुकलाही मागौता । अपावो पावे ॥ ३४९ ॥
३४९) ज्याप्रमाणें नाव तीराला लागल्यावरहि जर वादळांत सांपडली, तर ज्या अपायाला ती चुकवून आली, तोच अपाय तिला पुन्हां पोंचतो.  
तैसीं प्राप्तेंही पुरुषें । इंद्रियें लाळिलीं जरी कौतुकें ।
तरी आक्रमिला देख दुःखें । सांसारिकें ॥ ३५० ॥

३५०) पाहा, त्याप्रमाणें आत्मप्राप्ति झालेल्या पुरुषानें जर इंद्रियांचे सहज लाड केले, तर तो देखील पुन्हा संसारदुःखानें व्यापला जातो.   


Custom Search

Dnyaneshwari Adhyay 2 Part13 ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग १३


Dnyaneshwari Adhyay 2 Part13
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग १३ 
ज्ञानेश्र्वरी दुसरा ओव्या ३०१ ते ३२५
 कां कूर्म जियापरी । उवाइला अवेव पसरी ।
ना इच्छावशें आवरी । आपुले आपण ॥ ३०१ ॥
३०१) किंवा ज्याप्रमाणें कासव खुषींत असतांना आपलें अवयव पसरतें, किंवा मनाला वाटल्यास आपल्या आपण आवरुन घेतें;
तैसीं इंद्रियें आपैतीं होती । जयाचें म्हणितलें करिती ।
तयाची प्रज्ञा जाण स्थिती । पातलीं असे ॥ ३०२ ॥
३०२) त्याप्रमाणें ज्याची इंद्रियें ताब्यांत असतात व तीं तों जें म्हणेल तें करतात , त्याची बुद्धि स्थिर झालेली आहे, असें समज.
आतां अर्जुना आणिकही एक । सांगेन ऐकें कवतिक ।
या विषयांतें साधक । त्यजिती नियमें ॥ ३०३ ॥
३०३) अर्जुना, आतां आणखी एक नवलाईची गोष्ट सांगतों, ऐक. जे साधक निग्रहानें विषयांचा त्याग करतात,  
श्रोत्रादि इंद्रियें आवरिती । परि रसने नियमु न करिती ।
ते सहस्त्रधा कवळिजती । विषयीं इहीं ॥ ३०४
३०४) ( जे ) श्रोत्रादि इंद्रियें आवरतात, पण जिभेला आळा घालीत नाहींत, त्यांना हे विषय हजारों प्रकारांनीं घेरुन टाकतात.
जैसी वरिवरी पालवी खुडिजे । आणि मुळीं उदक घालिजे ।
तरी कैसेनि नाशु निपजे । तया वृक्षा ॥ ३०५ ॥
३०५) ज्याप्रमाणें एखाद्या झाडाची वरवरची पालवी खुडून टाकली पण मुळाला पाणी घातलें, तर त्या झाडाचा नाश कसा होणार ?
तो उदकाचेनि बळें अधिकें । जैसा आडवेनि आंगें फांकें ॥
तैसा मानसीं विषो पोखे । रसनाद्वारें ॥ ३०६ ॥
३०६) तें झाड पाण्याच्या जोरावर आडव्या अंगानें ज्याप्रमणें अधिक विस्तारतें, त्याप्रमाणें रसनेंद्रियांच्या द्वारानें विषयवासना मनांत पोसतात.  
येरां इंद्रियां विषय तुटे । तैसा नियमूं न ये रस हटें ।
जे जीवन हें न घटे । येणेंविण ॥ ३०७ ॥
३०७) ( ज्याप्रमाणें ) इतर इंद्रियांचे विषय तुटतात, त्याप्रमाणें हा ( जिभेचा ) विषय ( रस ) निग्रहानें तोडतां येत नाहीं; कारण त्यावांचून जगणें व्हावयाचें नाहीं. 
मग अर्जुना स्वभावें । ऐसियाही नियमातें पावे ।
जैं परब्रह्म अनुभवें । होऊनि जाइजे ॥ ३०८ ॥
३०८) पण अर्जुना, जेव्हां ( साधक ) अपरोक्षानुभव घेऊन परब्रह्म होऊन जातो, तेव्हां ( त्याला ) अशाहि रसनेंचें सहज नियमन करतां येतें. 
तैं शरीरभाव नासती । इंद्रियें विषय विसरती ।
जैं सोहंभावप्रतीति । प्रकट होय ॥ ३०९ ॥
३०९) ज्या वेळीं तें ब्रह्म मी आहे असा अनुभव येतो, त्या वेळी शरीराचे काम-क्रोधादि विकार नष्ट होतात आणि इंद्रियें आपले विषय विसरतात. 
येर्‍हवीं तरी अर्जुना । हें आया नये साधना।
जे राहाटताती जतना । निरंतर ॥ ३१० ॥
३१०) एर्‍हवीं अर्जुना, हीं इंद्रियें साधनानां दाद देत नाहींत. जे ( ती इंद्रियें उच्छृखल होऊं नयेत म्हणून ) ती स्वाधीन ठेवण्याकरितां खटपट करतात; 
( एरवीं, हे अर्जुना, ( बुद्धि स्थिर होण्याकरितां ) प्रयत्न करीत असलेल्या विवेकी पुरुषांचेहि मन उच्छृंखल इंद्रियें बलानें ( विषयांकडे ) ओढतात. ) 
जयातें अभ्यासाची घरटी । यमनियमांची ताटी ।
जे मनातें सदा मुठी । धरुनि आहाती ॥ ३११ ॥
३११) ( जे आपल्यावर ) अभ्यासाचा पहारा ठेवतात, यमनियमांचें ( मनाला ) कुंपण घालतात व जे मनाला नेहमीं मुठींत धरुन असतात;  
तेही किजती कासाविसी । या इंद्रियांची प्रौढी ऐसी ।
जैसी मंत्रज्ञातें विवसी । भुलवी कां ॥ ३१२ ॥
३१२) त्या साधकांनादेखील ( हीं इंद्रियें ) अगदीं कासावीस करुन टाकतात. ह्या इंद्रियांचा प्रताप हा असा आहे. ज्याप्रमाणें हडळ मांत्रिकाला चकविते; 
देखें विषय हे तैसे । पावती ऋद्धिसिद्धिचेनि मिषें ।
मग आकळिती स्पर्शें । इंद्रियांचेनी ॥ ३१३ ॥
३१३) त्याप्रमाणें पाहा, हे विषय ऋद्धिसिद्धिंच्या रुपानें प्राप्त होतात आणि मग तें इंद्रियांच्या द्वारें ( साधकाच्या मनाला ) ग्रासून टाकतात.
तिये संधी मन जाये । मग अभ्यासीं ठोठावलें ठाये ।
ऐसे बळकटपण आहे । इंद्रियांचें ॥ ३१४ ॥
३१४) अशा पेंचांत मन सांपडलें, म्हणजे तें मन आभ्यासाच्या कामीं पंगू होऊन राहतें. ( त्याचा अभ्यास जागच्या जागीं राहतो. )
म्हणोनि आइकें पार्था । यांतें निर्दळी जो सर्वथा ।
सर्व विषयीं आस्था । सांडूनिया ॥ ३१५ ॥
३१५) म्हणून अर्जुना, ऐक. सर्व विषयांवरील आसक्ति सोडून यांचें ( ( इंद्रियांचें ) जो सर्वस्वी दमन करतो; 
तोचि तूं जाण । योगनिष्ठेसी कारण ।
जयाचें विषयसुखें अंतःकरण । झकवेना ॥ ३१६ ॥
३१६) ज्याचें अंतःकरण विषयसुखाच्या लालसेनें फसलें जात नाहीं, तोच पुरुष योगनिष्ठेला अधिकारी आहे, असे तूं समज.
जो आत्मबोधयुक्तु । होऊनि असे सततु ।
जो मातें हृदयाआंतु । विसंबेना ॥ ३१७ ॥
३१७) तो आत्मज्ञानानें निरंतर संपन्न असतो. त्याचप्रमाणें मला अंतःकरणांत कधीं विसरत नाहीं.
एर्‍हवीं बाह्य विषय तरी नाहीं । परी मानसीं होईल जरी कांहीं ।
तरी साद्यंतुचि हा पाहीं । संसारु असे ॥ ३१८ ॥
३१८) एरवीं ( एखाद्यानें ) बाह्यतः विषयांचा त्याग केला, पण मनांत जर कांहीं विषय ( वासना ) असतील तर हा संपूर्ण संसार त्याला आहेच, असें समज.
जैसा का विषाचा लेशु । घेतलियां होय बहुवसु ।
मग निभ्रांत करी नाशु । जीवितासि ॥ ३१९ ॥
३१९) ज्याप्रमाणें विषाचा एक थेंब घेतला, तरी तो फार होतो, आणि मग निःसंशय प्राणांची हानि करतो;
तैसी या विषयांची शंका । मनीं वसती देखा ।
घातु करी अशेखा । विवेकजाता ॥ ३२० ॥
३२०) त्याचप्रमाणें पाहा, या विषयांचें नुसते सूक्ष्म संस्कार जरी मनांत राहिले, तरी ते संपूर्ण विचारमात्राचा घात करतात. 
जरी हृदयीं विषय स्मरती । तरी निसंगाही आपजे संगती ।
संगीं प्रगटे मूर्ति । अभिलाषाची ॥ ३२१ ॥
३२१) अंतःकरणांत विषयांची जर नुसती आठवण असेल, तर, संग टाकलेल्यासहि पुन्हां विषयासक्ति येऊन चिकटते व त्या विषयासक्तिमुळें विषयप्राप्तीची इच्छा प्रगट होते.
जेथ कामु उपजला । तेथ क्रोधु आधींचि आला ।
क्रोधीं असे ठेविला । संमोह जाणें ॥ ३२२ ॥
३२२) जेथें काम उत्पन्न होतो, तेथें क्रोधानें आपलें बिर्‍हाड अगोदरच ठेवलेलें असतें, आणि जेथें क्रोध आला तेथें कार्याकार्याविषयीं अविचार ठेवलेला आहेच, असे समज.
संमोहा जालिया व्यक्ति । तरी नाशु पावे स्मृति ।
चंडवातें ज्योति । आहत जैसी ॥ ३२३ ॥
३२३) ज्याप्रमाणें सोसाट्याच्या वार्‍यांत दिवा नाहींसा होतो, त्याप्रमाणें संमोहाची स्वारी प्रकट झाल्यावर स्मृति नाश पावते.
कां अस्तमानीं निशी । जैसी सूर्यतेजातें ग्रासी ।
तैसी दशा स्मृतिभ्रंशीं । प्राणियांसी ॥ ३२४ ॥
३२४) किंवा सूर्य मावळावयाच्या वेळेला रात्र सूर्यतेजाला ज्याप्रमाणें गिळून टाकते, त्याप्रमाणें स्मृति नाहींशी झाली म्हणजे प्राण्यांची दुर्दशा होते. 
मग अज्ञानांध केवळ । तेणें आप्लविजे सकळ ।
तेथ बुद्धि होय व्याकुळ । हृदयामा जीं॥ ३२५ ॥

३२५) मग सर्वत्र अज्ञानाचा केवळ अंधार होतो व त्याचेच आवरण सर्वांवर पडतें, अशा वेळीं हृदयांत बुद्धि व्याकूळ होते,




Custom Search

Dnyaneshwari Adhyay 2 Part 12 ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग १२


Dnyaneshwari Adhyay 2 Part 12 
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग १२
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा ओव्या २७६ ते ३००
म्हणोनि बुद्धियोगु सधरु । तेथ अर्जुना होईं स्थिरु ।
मनें करीं अव्हेरु । फळहेतूचा ॥ २७६ ॥  
२७६) म्हणून भक्तियोग हाच भक्कम पायावर उभारलेला आहे. त्यावर अर्जुना, तूं आपले मन स्थिर कर व मनानें फलाशेचा त्याग कर.
जे बुद्धियोगा योजिले । तेचि पारंगत जाहले ।
इहीं उभय संबंधीं सांडिले । पापपुण्यीं ॥ २७७ ॥ 
२७७) जें बुद्धियोगाचा आश्रय करतात, तेच संसारसागराच्या पलीकडे जातात; त्यांचीच पाप व पुण्य दोहोंच्याहि बंधांतून सुटका होते.  
ते कर्मीं तरी वर्तती । परी कर्मफळ नातळती ।
आणि यातायाती लोपती । अर्जुना तयां ॥ २७८ ॥
२७८) ते ( निष्काम कर्मयोगी ) कर्मे तर करतात, पण कर्मफलाला ( मनानेहि ) शिवत नाहीत. म्हणून अर्जुना, जन्ममरणाच्या त्यांच्या येरझारा बंद पडतात.
मग निरामयभरित । पावती पद अच्युत ।
ते बुद्धियोगयुक्त । धनुर्धरा ॥ २७९ ॥
२७९) मग अर्जुना, ते बुद्धियोगाचें आचरण करणारे लोक ( सर्व उपद्रवरहित म्हणून ) ब्रह्मानंदानें ओथंबलेले व कधींहि न ढळणारें असें पद पावतात.   
तूं ऐसा तैं होसी । जैं मोहातें या सांडिसी ।
आणि वैराग्य मानसीं । संचरेल ॥ २८० ॥
२८०) अर्जुना, ज्या वेळेला हा मोह तूं टाकशील आणि तुझ्या मनांत वैराग्याचा संचार होईल, त्या वेळेला तूं असा होशील.
मग निष्कळंक गहन । उपजेल आत्मज्ञान । 
तेणें निचाडें होईल मन । अपैसें तुझें ॥ २८१ ॥
२८१) मग शुद्ध व गंभीर असें आत्मज्ञान ( तुझ्या ठिकाणीं ) उत्पन्न होईल व त्यायोगानें तुझें मन सहजच निरिच्छ होईल. 
तेथ आणिल कांहीं जाणावें । कां मागिलातें स्मरावें ।
हें अर्जुना आघवें । पारुषेल ॥ २८२ ॥
२८२) तेथें ( तशी तुझी स्थिति झाल्यावर ) आणखी ( पुढें ) कांहीं समजून घ्यावें किंवा जें ( कांहीं ज्ञान ) मागें मिळविलें, तें पुन्हां आठवावें, हें सर्व अर्जुना, केवळ जागच्या जागीं राहील. 
इंद्रियांचिया संगती । जिये पसरु होतसे मती ।
ते स्थिर होईल मागुती । आत्मस्वरुपीं ॥ २८३ ॥
२८३) इंद्रियांच्या संगतीनें जी बुद्धि फांकते, ती पुन्हा आपल्या स्वरुपाच्या ठिकाणीं स्थिर होईल.
समाधिसुखीं केवळ । जैं बुद्धि होईल निश्र्चळ ।
तैं पावसी तूं सकळ । योगस्थिति ॥ २८४ ॥
२८४) मग केवळ समाधीच्या सुखांत ( शुद्ध आत्मसुखाच्या ठिकाणीं ) ज्या वेळेला बुद्धि स्थिर होईल, त्या वेळेला संपूर्ण निष्काम कर्मयोग तुझ्या हातांत आला, असें समज. 
तेथ अर्जुन म्हणे देवा । हाचि अभिप्रावो आघवा ।
मी पुसेन आतां सांगावा । कृपानिधि ॥ २८५ ॥
२८५) त्या वेळीं अर्जुन म्हणाला, देवा, हाच सर्व अभिप्राय मी आतां विचारतों; हे करुणासागरा, तो तूं सांग.
मग अच्युत म्हणे सुखें । जें किरीटी तुज निकें ।
तें पूस पां उन्मेखें । मनाचेनि ॥ २८६ ॥
२८६) मग श्रीकृष्ण म्हणाला, ‘ अर्जुना, तुला जें योग्य वाटेल , तें मोकळ्या मनानें खुशाल विचार. ‘
या बोला पार्थें । म्हणिलें सांग पां श्रीकृष्णातें ।
काय म्हणिपे स्थितप्रज्ञातें । वोळखों केवीं ॥ २८७ ॥
२८७) या बोलन्यावर अर्जुनानें श्रीकृष्णाला म्हटलें, देवा, स्थितप्रज्ञाला ( ज्याची बुद्धि स्थिर झाली त्याला ) काय म्हणतात व त्याला ओळखावें कसें ? सांग बरें ! 
आणि स्थिरबुद्धि जो म्हणिजे । तो कैसां चिन्हीं जाणिजे ।
जो समाधिसुख भुंजे । अखंडित ॥ २८८ ॥
२८८) आणि ज्याला स्थिरबुद्धि म्हणतात व जो समाधिसुखाचा निरंतर अनुभव घेतो; त्याला कोणत्या लक्षणांनी ओळखावें ? 
तो कवणे स्थिती असे । कैसेनि रुपीं विलसे । 
देवा सांगावें हें ऐसें । लक्ष्मीपती ॥ २८९ ॥
२८९) तो कोणत्या स्थितीत असतो, कोणत्या प्रकारें वागतो, हे लक्ष्मीपति श्रीकृष्णा, मला सांगावें.
तव परब्रह्मअवतरणु । जो षड्गुणाधिकरणु ।
तो काय तेथ नारायणु । बोलतु असे ॥ २९० ॥
२९०) तेव्हां ऐश्र्वर्यादि सहा गुणांचें आश्रयस्थान असा जो श्रीकृष्ण, तो काय बोलतां झाला, ( तें ऐका ).
 म्हणे अर्जुना परियेसीं । जो हा अभिलाषु प्रौढ मानसीं ।
तो अंतराय स्वसुखेंसी । करीत असे ॥ २९१ ॥
२९१) ( श्रीकृष्ण ) म्हणाला, अर्जुना ऐक, मनांत जी उत्कट विषयासक्ति असते, ती आत्मसुखांत अडथळा आणते. 
जो सर्वदा नित्यतृप्तु । अंतःकरणभरितु ।
परी विषयामाजी पतितु । जेणें संगें कीजे ॥ २९२ ॥
२९२) जो सदा तृप्त असतो, ज्याचें अंतःकरण नेहमी आनंदानें भरलेलें असतें, परंतु अशा जीवात्म्याचेंहि ज्याच्या ( कामाच्या ) संमतीनें विषयांमध्यें पतन होतें,  
तो कामु सर्वथा जाये । जयाचें आत्मतोषीं मन राहे।
तोचि स्थितप्रज्ञु होये । पुरुष जाणें ॥ २९३ ॥
२९३) जो काम ज्याचा सर्वथैव गेलेला असतो व ज्याचें मन ( निरंतर ) आत्मसुखांत ( निमग्न ) राहातें, तोच पुरुष स्थितप्रज्ञ होय असें समज. 
नाना दुःखीं प्राप्तीं । जयासी उद्वेगु नाहीं चित्तीं ।
आणि सुखाचीया आर्ती । अडपैजेना ॥ २९४ ॥ 
२९५) कितीहि दुःखें प्राप्त झाली, तरी ज्याचें चित्त खिन्न होत नाहीं, आणि जो सुखाच्या अभिलाषेनें कधीं अडकला जात नाहीं, 
अर्जुना तयांचा ठायीं । कामक्रोधु सहजें नाहीं ।  
आणि भयातें नेणें कहीं । परिपूर्ण तो ॥ २९५ ॥ 
२९५) अर्जुना, त्याच्या ठिकाणीं स्वभावतःच कामक्रोध नसतात आणि त्याला भय हें केव्हांच माहीत नसतें; ( असा ) तो परिपूर्ण होय.
ऐसा जो निरवधि । तो जाण पां स्थिरबुद्धि ।
जो निरसूनि उपाधि । भेदरहितु ॥ २९६ ॥
२९६) असा जो अमर्याद आहे व जो ( देहप्रपंचादि ) उपाधि सोडून भेदरहित झालेला असतो, तो स्थिरबुद्धि होय, असे समज.
जो सर्वत्र सदा सरिसा । परिपूर्ण चंदु कां जैसा ।
अघमोत्तम प्रकाशा-। माजीं न म्हणे ॥ २९७ ॥
२९७) परिपूरण चंद्र आपला प्रकाश देतांना हा उत्तम, हा अधम, असें ज्याप्रमाणें म्हणत नाहीं, त्याप्रमाणें जो सदा सर्वत्र सारखा ( समबुद्धिनें ) वागतो;
ऐसी अनवच्छिन्न समता । भूतमात्रीं सदयता ।
आणि पालटु नाहीं चित्ता । कवणे वेळे ॥ २९८ ॥
२९८) ( ज्याच्या ठिकाणीं ) अशी अखंड समान व भूतमात्राविषयीं सदयता असते, आणि कोणत्याहि वेळीं ज्याच्या चित्तांत पालट म्हणून कसा तो नाही,
गोमटें कांहीं पावे । तरी संतोषें तेणें नाभिभवे ।
जो ओखटेनि नागवे । विषादासी ॥ २९९ ॥
२९९) कांहीं चांगले प्राप्त झालें, तरी त्यापासून होणार्‍या संतोषाचा पगडा ज्याच्या मनावर बसत नाहीं व वाईट गोष्ट झाल्यामुळें जो खिन्नतेच्या तावडींत सांपडत नाही; 
ऐसा हरिखशोकरहितु । जो आत्मबोधभरितु ।
तो जाण पां प्रज्ञायुक्तु । धनुर्धरा ॥ ३०० ॥

३००) त्याप्रमाणें जो हर्षशोकरहित असतो व आत्मज्ञानानें संपन्न असतो, तो स्थिरबुद्धि होय, असें अर्जुना जाण.




Custom Search

Sunday, July 19, 2020

BhadraKali Stutihi भद्रकालीस्तुतिः


BhadraKali Stutihi 
भद्रकालीस्तुतिः
This is BhadraKali Stuti. It is in Sanskrit and is done by Brahmdev and God Vishnu. This is from MahaBhagat Mahapuran. This stuti is for our protection. God Brahma and God Vishnu have also asked for the Blessing and protection from Goddess BhadraKli.
BhadraKali Stutihi
भद्रकालीस्तुतिः
ब्रह्मविष्णु ऊचतुः
नमामि त्वां विश्वकर्त्रीं परेशीं 
नित्यामाद्यां सत्यविज्ञानरुपाम् ।
वाचातीतां निर्गुणां चातिसूक्ष्मां
ज्ञानातीतां शुद्धविज्ञानगम्याम् ॥ १ ॥
ब्रह्मा और विष्णु बोले—सर्वसृष्टिकारिणी, परमेश्र्वरी, सत्यविज्ञानरुपा, नित्या, आद्याशक्ति ! आपको हम प्रणाम करते हैं । आप वाणीसे परे हैं, निर्गुण और अति सूक्ष्म हैं, ज्ञानसे परे और शुद्ध विज्ञानसे प्राप्य हैं  ॥ १ ॥    
पूर्णां शुद्धां विश्वरुपां सुरुपां
देवीं वन्द्यां विश्ववन्द्यामपि त्वाम् ।
सर्वान्तःस्थामुत्तमस्थानसंस्था-
मीड़े कालीं विश्वसम्पालयित्रीम् ॥ २ ॥
आप पूर्णा, शुद्धा, विश्वरुपा,सुरुपा, वन्दनीया तथा विश्ववन्द्या हैं । आप सबके अन्तःकरणमें वास करती हैं एवं सारे संसारका पालन करती हैं । दिव्य स्थाननिवासिनी आप भगवती महाकालीको हमारा प्रणाम हैं । ॥ २ ॥  
मायातीतां मायिनीं वापि मायां 
भीमां श्यामां भीमनेत्रां सुरेशीम् ।
विद्यां सिद्धां सर्वभूताशयस्था-
मीडे कालीं विश्वसंहारकर्त्रींम् ॥ ३ ॥
महामायास्वरुपा आप मायामयी तथा मायासे अतीत हैं; आप भीषण श्यामवर्णवाली, भयंकर नेत्रोंवाली परमेश्र्वरी हैं । आप सिद्धियोंसे सम्पन्न, विद्यास्वरुपा, समस्त प्राणियोंके हृदयप्रदेशमें निवास करनेवाली तथा सृष्टिका संहार करनेवाली हैं, आप महाकालीको हमारा नमस्कार हैं । ॥ ३ ॥   
नो ते रुपं वेत्ति शीलं न धाम 
नो वा ध्यानं नापि मन्त्रं महेशि ।
सत्तारुपे त्वां प्रपद्ये शरण्ये 
विश्वाराध्ये सर्वलोकैखेतुम् ॥ ४ ॥
महेश्वरी ! हम आपके रुप, शील, दिव्य धाम ध्यान अथवा मन्त्रको नहीं जानते । शरण्ये ! विश्वाराध्ये ! हम सारी सृष्टिकी कारणभूता और सत्तास्वरुपा आपकी शरणमें हैं । ॥ ४ ॥ 
द्यौस्ते शीर्षं नाभिदेशो नभश्च 
चक्षूंषि ते चन्द्रसूर्यानलास्ते ।
उन्मेषास्ते सुप्रबोधो दिवा च
रात्रिर्मातश्चक्षुषोस्ते निमेषम् ॥ ५ ॥
मातः द्युलोक आपका सिर है, नभोमण्डल आपका नाभिप्रदेश है । चन्द्र, सूर्य और अग्नि आपके त्रिनेत्र हैं, आपका जगना ही सृष्टिके लिये दिन और जागरणका हेतु है और आपका आँखें मूँद लेना ही सृष्टिके लिये रात्रि है ॥ ५ ॥  
वाक्यं देवा भूमिरेषा नितम्बं 
पादौ गुल्फं जानुजङ्घस्तत्वधस्ते ।
प्रीतिर्धर्मोऽधर्मकार्यं  हि कोपः 
सृष्टिर्बोधः संहृतिस्ते तु निद्रा ॥ ६ ॥
देवता आपकी वाणी हैं, यह पृथ्वी आपका नितम्बप्रदेश तथा पाताल आदि नीचेके भाग आपके जङ्घा, जानु, गुल्फ और चरण हैं । धर्म आपकी प्रसन्नता और अधर्मकार्य आपके कोपके लिये है । आपका जागरण ही इस संसारकी सृष्टि है और आपकी नीद्रा ही इसका प्रलय है । ॥ ६ ॥ 
अग्निर्जिह्वा ब्राह्मणास्ते मुखाब्जं 
संध्ये द्वे ते भ्रूयुगं विश्वमूर्तिः ।
श्वासो वायुर्बाहवो लोकपालाः 
क्रीडा सृष्टिः संस्थितिः संहृतिस्ते ॥ ७ ॥
अग्नि आपकी जिह्वा है, ब्राह्मण आपके मुखकमल हैं । दोनों संध्याएँ आपकी दोनों भ्रुकुटियाँ हैं, आप विश्वरुपा है, वायु आपका श्वास है, लोकपाल आपके बाहु हैं और इस संसारकी सृष्टि, स्थिति तथा संहार आपकी लीला है ॥ ७ ॥   
एवंभूतां देवि विश्वात्मिकां त्वां 
कालीं वन्दे ब्रह्मविद्यास्वरुपाम् ।
मातः पूर्णे ब्रह्मविज्ञानगम्ये 
दुर्गेऽपारे साररुपे प्रसीद ॥ ८ ॥
पूर्णे ! ऐसी सर्वस्वरुपा आप महाकालीको हमारा प्रणाम है । आप ब्रह्मविद्यास्वरुपा हैं । ब्रह्मविज्ञानसे ही आपकी प्राप्ति सम्भव है । सर्वसाररुपा, अनन्तस्वरुपिणी माता दुर्गे ! आप हमपर प्रसन्न हों । ॥ ८ ॥  
॥ इति श्रीमहाभागवते महापुराणे ब्रह्मविष्णुकृता भद्रकालीस्तुतिः सम्पूर्णा ॥
॥ इस प्रकार श्रीमहाभागवत महापुराणके अंतर्गत ब्रह्मा और विष्णुद्वारा की गयी भद्रकालीस्तुति सम्पूर्ण हुई ॥
BhadraKali Stutihi 
भद्रकालीस्तुतिः


Custom Search

ShriRamcharitmans Part 29 श्रीरामचरितमानस भाग २९


ShriRamcharitmans Part 29 
श्रीरामचरितमानस भाग २९ 
दोहा १७४ ते १७६
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा—भूपति भावी मिटइ नहिं 
जदपि न दूषन तोर ।
किएँ अन्यथा होइ नहिं 
बिप्रश्राप अति घोर ॥ १७४ ॥
( ब्राह्मण म्हणाले, ) हे राजा, जरी तुझा काही दोष नसला, तरी होणारे चुकत नाही. ब्राह्मणांचा शाप हा फार भयानक असतो. तो टाळला तरी टाळता येत नाही.’ ॥ १७४ ॥
अस कहि सब महिदेव सिधाए । 
समाचार पुरलोगन्ह पाए ॥
सोचहिं दूषन दैवहि देहीं । 
बिरचत हंस काग किय जेहीं ॥
असे म्हणून सर्व ब्राह्मण निघून गेले. नगरवासीयांनी जेव्हा हे वर्तमान ऐकले, तेव्हा ते काळजीत पडले आणि विधात्याला दोष देऊ लागले. विधात्याने हंस बनविण्याऐवजी हंसाचा कावळा करुन टाकला. ( अशा पुण्यात्म्या राजाला देवता बनवावयास हवे होते, तर राक्षस करुन टाकले. ) ॥ १ ॥
उपरोहितहि भवन पहुँचाई । 
असुर तापसहि खबरि जनाई ॥
तेहिं खल जहँ तहँ पत्र पठाए । 
सजि सजि सेन भूप सब धाए ॥
( इकडे ) पुरोहिताला त्याच्या घरी पोहोचविल्यावर असुर कालकेतूने कपटी तपस्व्याला सर्व वार्ता सांगितली. त्या दुष्टाने जिकडे-तिकडे पत्रे पाठविली. त्यामुळे प्रतापभानू राजाचे सर्व शत्रू राजे सेना सज्ज करुन चालून आले. ॥ २ ॥
घेरेन्हि नगर निसान बजाई । 
बिबिध भाँति नित होइ लराई ॥
जूझे सकल सुभट करि करनी । 
बंधु समेत परेउ नृप धरनी ॥
त्यांनी रणभेरी वाजवून नगराला वेढा घातला. सतत तर्‍हेतर्‍हेने लढाया होऊ लागल्या. प्रतापभानूचे सर्व शूर योद्धे लढत-लढत धारातीर्थी पडले. भावाबरोबर राजाही ठार झाला. ॥ ३ ॥
सत्यकेतु कुल कोउ नहिं बाँचा । 
बिप्रश्राप किमि होइ असाँचा ॥
रिपु जिति सब नृप नगर बसाई । 
निज पुर गवने जय जसु पाई ॥
सत्यकेतूच्या कुळातील कोणीही वाचले नाही. ब्राह्मणांचा शाप खोटा कसा ठरणार ? शत्रूला जिंकल्यावर, नगर पुन्हा वसवून सर्व राजे विजय व कीर्ती मिळवून आपपल्या देशी परतले. ॥ ४ ॥
 दोहा—भरद्वाज सुनु जाहि 
जब होइ बिधाता बाम ।
धूरि मेरुसम जनक जम 
ताहि ब्यालसम दाम ॥ १७५ ॥
( याज्ञवल्क्य म्हणतात-) ‘ हे भरद्वाज, विधाता जेव्हा प्रतिकूल होतो, तेव्हा एखादा धूलिकण मेरुपर्वतासारखा ( अवजड व चिरडून टाकणारा ) होतो. प्रत्यक्ष बाप कर्दनकाळ होतो व दोरी सापाप्रमाणे ( दंश करणारी ) होते.  ॥ १७५ ॥
काल पाइ मुनि सुनु सोइ राजा । 
भयउ निसाचर सहित समाजा ॥
दस सिर ताहि बीस भुजदंडा । 
रावन नाम बीर बरिबंडा ॥ 
हे मुनी, ऐका. यथाकाल तोच राजा रावण नावाचा राक्षस झाला. त्याला दहा शिरे व वीस हात होते. तो प्रचंड शूर होता. ॥ १ ॥
भूप अनुज अरिमर्दन नामा । 
भयउ सो कुंभकरन बलधामा ॥
सचिव जो रहा धरमरुचि जासू । 
भयउ बिमात्र बंधु लघु तासु ॥
अरिमर्दन नावाचा जो राजाचा धाकटा भाऊ होता, तो बलाढ्य कुंभकर्ण झाला. त्याचा जो धर्मरुची नावाचा मंत्री होता, तो रावणाचा सावत्र धाकटा भाऊ झाला. ॥ २ ॥
 नाम बिभीषन जेहि जग जाना । 
बिष्नुभगत बिग्यान निधाना ॥
रहे जे सुत सेवक नृप केरे । 
भए निसाचर घोर घनेरे ॥
त्याचे नाव बिभिषण. त्याला सर्व जग जाणते. तो विष्णुभक्त व ज्ञान-विज्ञानाचे भांडार होता. राजाचे जे पुत्र व सेवक होते, ते सर्व फार भयानक राक्षस झाले. ॥ ३ ॥
कामरुप खल जिनस अनेका । 
कुटिल भयंकर बिगत बिबेका ॥
कृपा रहित हिंसक सब पापी । 
बरनि म जाहिं बिस्व परितापी ॥
ते सर्व राक्षस अनेक जातींचे, मनास येईल ते रुप धारण करणारे, दुष्ट, कुटिल, भयंकर, विवेकहीन, निर्दयी, पापी आणि जगाला इतकी यातना देणारे होते की, त्यांचे वर्णन करता येत नाही. ॥ ४ ॥
दोहा--उपजे जदपि पुलस्त्यकुल 
पावन अमल अनूप ।
तदपि महीसुर श्राप 
बस भए सकल अघरुप ॥ १७६ ॥
जरी ते पुलस्त्य ऋषींच्या पवित्र, निर्मल आणि अनुपमेय कुळात जन्मले होते, तरी ब्राह्मणांच्या शापाने ते सर्व पापरुप झाले. ॥ १७६ ॥
कीन्ह बिबिध तप तीनिहुँ भाई । 
परम उग्र नहिं बरनि सो जाई ॥
गयउ निकट तप देखि बिधाता । 
मागहु बर प्रसन्न मैं ताता ॥
तिन्ही भावांनी ( रावण, कुंभकर्ण, बिभिषण ) अनेक प्रकारची इतकी उग्र तपस्या केली की, ती सांगता येणे शक्य नाही. त्यांचे उग्र तप पाहून ब्रह्मदेव त्यांच्याजवळ जाऊन म्हणाले-' बाबांनो, मी प्रसन्न झालो आहे. वर मागा. ॥ १ ॥   
करि बिनती पद गहि दससीसा । 
बोलेउ बचन सुनहु जगदीसा ॥
हम काहू के मरहिं न मारें । 
बानर मनुज जाति दुइ बारें ॥
रावणाने विनयपूर्वक त्यांचे चरण धरले आणि म्हटले, ' हे जगदीश्वर, ऐका. वानर आणि मनुष्य या दोन जाती सोडून कुणीही मारले, तरी मला मरण येऊ नये. ' ( हा वर द्या ) ॥ २ ॥
एवमस्तु तुम्ह बड़ तप कीन्हा । 
मैं ब्रह्माँ मिलि तेहि बर दीन्हा ॥
पुनि प्रभु कुंभकरन पहिं गयऊ । 
तेहि बिलोकि मन बिसमय भयऊ ॥
( शिव म्हणतात-) ' मी आणि ब्रह्मदेवांनी मिळून त्याला वर दिला- " तथास्तु " कारण तू मोठे तप केलेले आहेस. मग ब्रह्मदेव कुंभकर्णाकडे गेले. त्याला पाहून त्यांना मोठे आश्र्चर्य वाटले. ॥ ३ ॥
जौं एहिं खल नित करब अहारु । 
होइहि सब उजारि संसारु ॥
सारद प्रेरि तासु मति फेरी । 
मागेसि नीद मास षट केरी ॥

( ब्रह्मदेवांनी विचार केला की, ) हा दुष्ट नित्य आहार करु लागला तर जग ओसाड होईल. तेव्हा ब्रह्मदेवांनी सरस्वतीला प्रेरणा केली की, याची बुद्धी पालटून टाक. ( त्यामुळे ) त्याने एक दिवसाची जाग व सहा महिन्यांची झोप मागितली. ॥ ४ ॥




Custom Search

ShriRamcharitmans Part 28 श्रीरामचरितमानस भाग २८


ShriRamcharitmans Part 28 
श्रीरामचरितमानस भाग २८ 
दोहा १७० ते १७३
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा—रिपु तेजसी अकेल अपि 
लघु करि गनिअ न ताहु ।
अजहुँ देत दुख रबि ससिहि 
सिर अवसेषित राहु ॥ १७० ॥
तेजस्वी शत्रू एकटा असला, तरी त्याला लहान समजू नये. पाहा. ज्याचे फक्त शिर उरले आहे, तो राहू अजूनही सूर्य-चंद्राला छळत असतो. ॥ १७० ॥
तापस नृप निज सखहि निहारी । 
हरषि मिलेउ ऊठि भयउ सुखारी ॥
मित्रहि कहि सब कथा सुनाई । 
जातुधान बोला सुख पाई ॥
तपस्वी-राजा आपल्या मित्राला पाहून प्रसन्न झाला. उठून तो त्याला भेटला. त्याला फार आनंद झाला होता. त्याने आपल्या मित्राला ( कालकेतूला ) सर्व गोष्टी सांगितल्या, तेव्हा तो राक्षस आनंदित होऊन म्हणाला, ॥ १ ॥
अब साधेउँ रिपु सुनहु नरेसा । 
जौं तुम्ह कीन्ह मोर उपदेसा ॥
परिहरि सोच रहहु तुम्ह सोई । 
बिनु औषध बिआधि बिधि खोई ॥
‘ हे राजा, जेव्हा तू माझ्या म्हणण्याप्रमाणे इतके काम केले आहेस, तर आता मी शत्रूला ताब्यात घेतलेच, असे समज. आता तू काळजी सोडून झोप. विधात्याने औषधाविना रोग बरा केला आहे. ॥ २ ॥
कुल समेत रिपु मूल बहाई । 
चौथें दिवस मिलब मैं आई ॥
तापस नृपहि बहुत परितोषी । 
चला महाकपटी अतिरोषी ॥
शत्रूला त्याच्या कुळासह मुळापासून उध्वस्त करुन आजपासून चौथ्या दिवशी मी येऊन तुला भेटेन.’ ( अशा प्रकारे ) तपस्वी राजाला मोठा दिलासा देऊन महामायावी आणि अत्यंत रागीट राक्षस तेथून निघाला. ॥ ३ ॥
भानुप्रतापहि बाजि समेता । 
पहुँचाएसि छन माझ निकेता ॥
नृपहि नारि पहिं सयन कराई । 
हयगृहँ बाँधेसि बाजि बनाई ॥
त्याने राजा प्रतापभानूला घोड्यासह एका क्षणात घरी पोहोचविले आणि राजाला राणीजवळ झोपवून घोड्याला पागेत नीट बांधून ठेवले. ॥ ४ ॥
दोहा—राजा के उपरोहितहि 
हरि लै गयउ बहोरि ।
लै राखेसि गिरि खोह महुँ 
मायाँ करि मति भोरि ॥ १७१ ॥
नंतर तो तेथील राजाच्या पुरोहिताला उचलून घेऊन गेला. आपल्या मायेने त्याच्या बुद्धीत भ्रम उत्पन्न करुन त्याने त्याला पर्वताच्या गुहेत आणून ठेवले. ॥ १७१ ॥
आपु बिरचि उपरोहित रुपा । 
परेउ जाइ तेहि सेज अनूपा ॥
जागेउ नृप अनभएँ बिहाना । 
देखि भवन अति अचरजु माना ॥
तो स्वतः पुरोहिताचे रुप घेऊन त्याच्या सुंदर अंथरुणावर जाऊन झोपला. राजा सकाळ होण्यापूर्वीच जागा झाला आणि आपले घर पाहून थक्क झाला. ॥ १ ॥
मुनि महिमा मन महुँ अनुमानी । 
उठेउ गवँहिं जेहिं जान न रानी ॥
कानन गयउ बाजि चढ़ि तेहीं । 
पुर नर नारि न जानेउ केहीं ॥
मुनीच्या महिम्याचा अंदाज येऊन राणीला कळू नये म्हणून तो हळूच उठला. नंतर त्याच्या घोड्यावर बसून वनात निघून गेला. नगरातील कोणाही स्त्री-पुरुषाला हे कळलेसुद्धा नाही. ॥ २ ॥
गएँ जाम जुग भूपति आवा । 
घर घर उत्सव बाज बधावा ॥
उपरोहितहि देख जब राजा । 
चकित बिलोक सुमिरि सोइ काजा ॥
दोन प्रहर उलटल्यावर राजा परत आला. घरोघरी उत्सव साजरा होऊ लागला आणि मंगल गाणी गाइली जाऊ लागली. जेव्हा राजाने पुरोहिताला पाहिले, तेव्हा तो आपल्या त्या कार्याची आठवण करीत आश्र्चर्याने पाहू लागला. ॥ ३ ॥
जुग सम नृपहि गए दिन तीनी । 
कपटी मुनि पद रह मति लीनी ॥
समय जानि उपरोहित आवा । 
नृपहि मते सब कहि समुझावा ॥
राजाचे तीन दिवस जणू तीन युगांप्रमाणे गेले. त्याची बुद्धी कपटी मुनीच्या चरणी लागून राहिली होती. ठरल्यावेळी पुरोहित ( बनलेल राक्षस ) आला आणि राजाबरोबर त्याच्या झालेल्या गुप्त मसलतीप्रमाणे त्याने आपले विचार त्याला समजावून सांगितले. ॥ ४ ॥
नृप हरषेउ पहिचानि गुरु 
भ्रम बस रहा न चेत ॥
बरे तुरत सत सहस 
बर बिप्र कुटुंब समेत ॥ १७२ ॥
( ठरल्याप्रमाणे ) गुरुला ( त्या रुपात ) ओळखल्यामुळे राजा आनंदित झाला. तो भ्रमित झाल्यामुळे सारासार विचार उरला नाही की, हा तपस्वी मुनी आहे की कालकेतू राक्षस. त्याने लागलीच एक लाख उत्तम ब्राह्मणांना कुटुंबासह निमंत्रण दिले. ॥ १७२ ॥
उपरोहित जेवनार बनाई । 
छरस चारि बिधि जसि श्रुति गाई ॥
मायामय तेहिं कीन्हि रसोई । 
बिंजन बहु गनि सकइ न कोई ॥ 
कपटी पुरोहिताने वेदांत सांगितल्याप्रमाणे षड्रसपूर्ण ( भक्ष्य, भोज्य, लेह्य व चोष्य असे ) चार प्रकारचे भोजन बनविले. त्याने मायेने स्वयंपाक तयार केला आणि इतकी तोंडी लावणी बनविली की, त्यांची गणती करता येणार नाही. ॥ १ ॥
बिबिध मृगन्ह कर आमिष राँधा । 
तेहि महुँ बिप्र माँसु खल साँधा ॥
भोजन कहुँ सब बिप्र बोलाए । 
पद पखारि सादर बैठाए ॥
अनेक प्रकारच्या पशूंचे मांस शिजविले आणि त्या दुष्टाने त्यामध्ये ब्राह्मणांचे मांस मिसळले. सर्व ब्राह्मणांना जेवायला बोलाविले आणि त्यांचे पाय धुऊन त्यांना आदराने आसनावर बसविले. ॥ २ ॥       
परुसन जबहिं लाग महिपाला । 
भै अकासबानी तेहि काला ॥
बिप्रबृंद उठि उठि गृह जाहू । 
है बड़ि हानि अन्न जनि खाहू ॥
राजा वाढू लागला, इतक्यात ( कालकेतूने केलेली ) आकाशवाणी झाली, ‘ हे ब्राह्मणांनो, उठून आपापल्या घरी जा. हे अन्न खाऊ नका. हे खाल्ल्यास मोठा अनर्थ होईल. ॥ ३ ॥
भयउ रसोईं भूसुर माँसू । 
सब द्विज उठे मानि बिस्वासू ॥
भूप बिकल मति मोहँ भुलानी । 
भावी बस न आव मुख बानी ॥
स्वयंपाक घरात ब्राह्मणांचे मांस शिजविले आहे,’ आकाशवाणीवर विश्र्वास ठेवून सर्व ब्राह्मण उठले. राजा व्याकूळ झाला. त्याची बुद्धी भ्रमामुळे भुलून गेली होती. भवितव्यामुळे त्याच्या तोंडून एक शब्दही निघाला नाही. ॥ ४ ॥
दोहा—बोले बिप्र सकोप तब 
नहिं कछु कीन्ह बिचार ।
जाइ निसाचर होहु नृप 
मूढ़ सहित परिवार ॥ १७३ ॥
तेव्हा ब्राह्मण कोणताही विचार न करता पानावरुन उठून रागाने म्हणाले, ‘ मूर्ख राजा, तू कुटुंबासह राक्षस हो, ॥ १७३ ॥
छत्रबंधु तैं बिप्र बोलाई । 
घालै लिए सहित समुदाई ॥
ईस्वर राखा धरम हमारा । 
जैहसि तैं समेत परिवारा ॥
अरे नीच क्षत्रिया, तू परिवारासह ब्राह्मणांना बोलावून त्यांना तू भ्रष्ट करु इच्छित होतास. परमेश्र्वरानेच आमच्या धर्माचे रक्षण केले. आता तू परिवारासह नष्ट होशील. ॥ १ ॥
संबत मध्य नास तव होऊ । 
जलदाता न रहिहि कुल कोऊ ॥
नृप सुनि श्राप बिकल अति त्रासा । 
भै बहोरि बर गिरा अकासा ॥
एक वर्षात तुझा नाश होईल. तुझ्या कुळात पाणी देणारेही कोणी उरणार नाही. ‘ शाप ऐकून राजा भयाने अत्यंत व्याकूळ झाला. नंतर खरी आकाशवाणी झाली. ॥ २ ॥
बिप्रहु श्राप बिचारि न दीन्हा । 
नहिं अपराध भूप कछु कीन्हा ॥
चकित बिप्र सब सुनि नभबानी । 
भूप गयउ जहँ भोजन खानी ॥
‘ हे ब्राह्मणांनो, तुम्ही विचार करुन शाप दिला नाही. राजाने कोणताही अपराध केलेला नाही.’ ही आकाशवाणी ऐकून सर्व ब्राह्मण चकित झाले. तेव्हा राजा स्वतः भोजन बनविले होते, त्या ठिकाणी गेला. ॥ ३ ॥
तहँ न असन नहिं बिप्र सुआरा । 
फिरेउ राउ मन सोच अपारा ॥
सब प्रसंग महिसुरन्ह सुनाई । 
त्रसित परेउ अवनीं अकुलाई ॥

तेथे पाहिले तर स्वयमपाकही नव्हता आणि तो ब्राह्मण स्वयंपाकीही नव्हता. राजा अतिशय उद्विग्न होऊन परत आला. त्याने ब्राह्मणांना सर्व वार्ता सांगितली आणि भयभीत व व्याकूळ होऊन त्याने भूमीवर लोटांगण घातले. ॥ ४ ॥


Custom Search