Showing posts with label श्रीरामचरितमानस भाग २९. Show all posts
Showing posts with label श्रीरामचरितमानस भाग २९. Show all posts

Sunday, July 19, 2020

ShriRamcharitmans Part 29 श्रीरामचरितमानस भाग २९


ShriRamcharitmans Part 29 
श्रीरामचरितमानस भाग २९ 
दोहा १७४ ते १७६
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा—भूपति भावी मिटइ नहिं 
जदपि न दूषन तोर ।
किएँ अन्यथा होइ नहिं 
बिप्रश्राप अति घोर ॥ १७४ ॥
( ब्राह्मण म्हणाले, ) हे राजा, जरी तुझा काही दोष नसला, तरी होणारे चुकत नाही. ब्राह्मणांचा शाप हा फार भयानक असतो. तो टाळला तरी टाळता येत नाही.’ ॥ १७४ ॥
अस कहि सब महिदेव सिधाए । 
समाचार पुरलोगन्ह पाए ॥
सोचहिं दूषन दैवहि देहीं । 
बिरचत हंस काग किय जेहीं ॥
असे म्हणून सर्व ब्राह्मण निघून गेले. नगरवासीयांनी जेव्हा हे वर्तमान ऐकले, तेव्हा ते काळजीत पडले आणि विधात्याला दोष देऊ लागले. विधात्याने हंस बनविण्याऐवजी हंसाचा कावळा करुन टाकला. ( अशा पुण्यात्म्या राजाला देवता बनवावयास हवे होते, तर राक्षस करुन टाकले. ) ॥ १ ॥
उपरोहितहि भवन पहुँचाई । 
असुर तापसहि खबरि जनाई ॥
तेहिं खल जहँ तहँ पत्र पठाए । 
सजि सजि सेन भूप सब धाए ॥
( इकडे ) पुरोहिताला त्याच्या घरी पोहोचविल्यावर असुर कालकेतूने कपटी तपस्व्याला सर्व वार्ता सांगितली. त्या दुष्टाने जिकडे-तिकडे पत्रे पाठविली. त्यामुळे प्रतापभानू राजाचे सर्व शत्रू राजे सेना सज्ज करुन चालून आले. ॥ २ ॥
घेरेन्हि नगर निसान बजाई । 
बिबिध भाँति नित होइ लराई ॥
जूझे सकल सुभट करि करनी । 
बंधु समेत परेउ नृप धरनी ॥
त्यांनी रणभेरी वाजवून नगराला वेढा घातला. सतत तर्‍हेतर्‍हेने लढाया होऊ लागल्या. प्रतापभानूचे सर्व शूर योद्धे लढत-लढत धारातीर्थी पडले. भावाबरोबर राजाही ठार झाला. ॥ ३ ॥
सत्यकेतु कुल कोउ नहिं बाँचा । 
बिप्रश्राप किमि होइ असाँचा ॥
रिपु जिति सब नृप नगर बसाई । 
निज पुर गवने जय जसु पाई ॥
सत्यकेतूच्या कुळातील कोणीही वाचले नाही. ब्राह्मणांचा शाप खोटा कसा ठरणार ? शत्रूला जिंकल्यावर, नगर पुन्हा वसवून सर्व राजे विजय व कीर्ती मिळवून आपपल्या देशी परतले. ॥ ४ ॥
 दोहा—भरद्वाज सुनु जाहि 
जब होइ बिधाता बाम ।
धूरि मेरुसम जनक जम 
ताहि ब्यालसम दाम ॥ १७५ ॥
( याज्ञवल्क्य म्हणतात-) ‘ हे भरद्वाज, विधाता जेव्हा प्रतिकूल होतो, तेव्हा एखादा धूलिकण मेरुपर्वतासारखा ( अवजड व चिरडून टाकणारा ) होतो. प्रत्यक्ष बाप कर्दनकाळ होतो व दोरी सापाप्रमाणे ( दंश करणारी ) होते.  ॥ १७५ ॥
काल पाइ मुनि सुनु सोइ राजा । 
भयउ निसाचर सहित समाजा ॥
दस सिर ताहि बीस भुजदंडा । 
रावन नाम बीर बरिबंडा ॥ 
हे मुनी, ऐका. यथाकाल तोच राजा रावण नावाचा राक्षस झाला. त्याला दहा शिरे व वीस हात होते. तो प्रचंड शूर होता. ॥ १ ॥
भूप अनुज अरिमर्दन नामा । 
भयउ सो कुंभकरन बलधामा ॥
सचिव जो रहा धरमरुचि जासू । 
भयउ बिमात्र बंधु लघु तासु ॥
अरिमर्दन नावाचा जो राजाचा धाकटा भाऊ होता, तो बलाढ्य कुंभकर्ण झाला. त्याचा जो धर्मरुची नावाचा मंत्री होता, तो रावणाचा सावत्र धाकटा भाऊ झाला. ॥ २ ॥
 नाम बिभीषन जेहि जग जाना । 
बिष्नुभगत बिग्यान निधाना ॥
रहे जे सुत सेवक नृप केरे । 
भए निसाचर घोर घनेरे ॥
त्याचे नाव बिभिषण. त्याला सर्व जग जाणते. तो विष्णुभक्त व ज्ञान-विज्ञानाचे भांडार होता. राजाचे जे पुत्र व सेवक होते, ते सर्व फार भयानक राक्षस झाले. ॥ ३ ॥
कामरुप खल जिनस अनेका । 
कुटिल भयंकर बिगत बिबेका ॥
कृपा रहित हिंसक सब पापी । 
बरनि म जाहिं बिस्व परितापी ॥
ते सर्व राक्षस अनेक जातींचे, मनास येईल ते रुप धारण करणारे, दुष्ट, कुटिल, भयंकर, विवेकहीन, निर्दयी, पापी आणि जगाला इतकी यातना देणारे होते की, त्यांचे वर्णन करता येत नाही. ॥ ४ ॥
दोहा--उपजे जदपि पुलस्त्यकुल 
पावन अमल अनूप ।
तदपि महीसुर श्राप 
बस भए सकल अघरुप ॥ १७६ ॥
जरी ते पुलस्त्य ऋषींच्या पवित्र, निर्मल आणि अनुपमेय कुळात जन्मले होते, तरी ब्राह्मणांच्या शापाने ते सर्व पापरुप झाले. ॥ १७६ ॥
कीन्ह बिबिध तप तीनिहुँ भाई । 
परम उग्र नहिं बरनि सो जाई ॥
गयउ निकट तप देखि बिधाता । 
मागहु बर प्रसन्न मैं ताता ॥
तिन्ही भावांनी ( रावण, कुंभकर्ण, बिभिषण ) अनेक प्रकारची इतकी उग्र तपस्या केली की, ती सांगता येणे शक्य नाही. त्यांचे उग्र तप पाहून ब्रह्मदेव त्यांच्याजवळ जाऊन म्हणाले-' बाबांनो, मी प्रसन्न झालो आहे. वर मागा. ॥ १ ॥   
करि बिनती पद गहि दससीसा । 
बोलेउ बचन सुनहु जगदीसा ॥
हम काहू के मरहिं न मारें । 
बानर मनुज जाति दुइ बारें ॥
रावणाने विनयपूर्वक त्यांचे चरण धरले आणि म्हटले, ' हे जगदीश्वर, ऐका. वानर आणि मनुष्य या दोन जाती सोडून कुणीही मारले, तरी मला मरण येऊ नये. ' ( हा वर द्या ) ॥ २ ॥
एवमस्तु तुम्ह बड़ तप कीन्हा । 
मैं ब्रह्माँ मिलि तेहि बर दीन्हा ॥
पुनि प्रभु कुंभकरन पहिं गयऊ । 
तेहि बिलोकि मन बिसमय भयऊ ॥
( शिव म्हणतात-) ' मी आणि ब्रह्मदेवांनी मिळून त्याला वर दिला- " तथास्तु " कारण तू मोठे तप केलेले आहेस. मग ब्रह्मदेव कुंभकर्णाकडे गेले. त्याला पाहून त्यांना मोठे आश्र्चर्य वाटले. ॥ ३ ॥
जौं एहिं खल नित करब अहारु । 
होइहि सब उजारि संसारु ॥
सारद प्रेरि तासु मति फेरी । 
मागेसि नीद मास षट केरी ॥

( ब्रह्मदेवांनी विचार केला की, ) हा दुष्ट नित्य आहार करु लागला तर जग ओसाड होईल. तेव्हा ब्रह्मदेवांनी सरस्वतीला प्रेरणा केली की, याची बुद्धी पालटून टाक. ( त्यामुळे ) त्याने एक दिवसाची जाग व सहा महिन्यांची झोप मागितली. ॥ ४ ॥




Custom Search