Sunday, February 19, 2023

Lanka Kanda Part 3 Doha 5 to 7 लङ्काकाण्ड भाग ३ दोहा ५ ते ७

 

Lanka Kanda Part 3 
ShriRamCharitManas 
Doha 5 to 7 
लङ्काकाण्ड भाग ३ 
श्रीरामचरितमानस 
दोहा ५ ते ७

दोहा---बॉंध्यो बननिधि नीरनिधि जलधि सिंधु बारीस ।

सत्य तोयनिधि कंपति उदधि पयोधि नदीस ॥ ५ ॥

‘ वननिधी, नीरनिधि, जलधी, सिंधू, वारीश, तोयनिधी, कंपाती, उदधी, पयोधी, नदीश याला खरोखरंच बांधले आहे ? ‘ ॥ ५ ॥

निज बिकलता बिचारि बहोरी । बिहँसि गयउ गृह करि भय भोरी ॥

मंदोदरीं सुन्यो प्रभु आयो । कौतुकहीं पाथोधि बँधायो ॥

मग आपली व्याकुळता जाणून वर वर हसत, भय विसरुन रावण महालात गेला. जेव्हा मंदोदरीने हे ऐकले की, प्रभू रामचंद्र आले आहेत आणि सहजासहजी समुद्राला बांध घातला आहे. ॥ १ ॥

कर गहि पतिहि भवन निजआनी । बोली परम मनोहर बानी ॥

चरन नाइ सिरु अंचलु रोपा । सुनहु बचन पिय परिहरि कोपा ॥

तेव्हा ती पतीचा हात पकडून आपल्या महालात घेऊन गेली आणि मधुर वाणीने म्हणाली. ती त्याचे पाय धरुन पदर पसरुन म्हणाली, ‘ हे प्रियतम, क्रोध सोडून माझे म्हणणे ऐका. ॥ २ ॥

नाथ बयरु कीजे ताही सों । बुधि बल सकिअ जीति जाही सों ॥

तुम्हहि रघुपतिहि अंतर कैसा । खलु खद्योत दिनकरहि जैसा ॥

हे नाथ, ज्याला बुद्धी व बळाने जिंकता येईल त्याच्याशीच वैर करावे. पण तुमच्यात आणि श्रीरघुनाथ यांच्यात अंतर आहे, ते काजवा व सूर्याप्रमाणे. ॥ ३ ॥

अति बल मधु कैटभ जेहिं मारे । महाबीर दितिसुत संघारे ॥

जेहिं बलि बॉंधि सहसभुज मारा । सोइ अवतरेउ हरन महि भारा ॥

ज्यांनी विष्णुरुपाने अत्यंत बलवान अशा मधू व कैटभ दैत्यांना मारले आणि वराह व नृसिंहरुपाने महान शूर, दितीचे पुत्र हिरण्याक्ष व हिरण्यकशिपू यांचा संहार केला, ज्यांनी वामनरुपाने बलीला बांधून टाकले आणि परशुरामरुपाने सहस्रबाहुला मारले, तेच भगवान पृथ्वीचा भार हरण करण्यासाठी रामरुपाने प्रकट झाले आहेत. ॥ ४ ॥

तासु बिरोध न कीजिअ नाथा । काल करम जिव जाकें हाथा ॥

ज्यांच्या अधीन काल, कर्म व जीव आहेत, हे नाथ, त्यांचा विरोध पत्करु नका. ॥ ५ ॥

दोहा--- रामहि सौंपि जानकी नाइ कमल पद माथ ।

सुत कहुँ राज समर्पि बन जाइ भजिअ रघुनाथ ॥ ६ ॥

श्रीरामांना शरण जाऊन त्यांना जानकी समर्पण करा आणि तुम्ही पुत्राला राज्य देऊन, वनात जाऊन श्रीरामांचे भजन करा. ॥ ६ ॥

नाथ दीनदयाल रघुराई । बाघउ सनमुख गएँ न खाई ॥

चाहिअ करन सो सब करि बीते । तुम्ह सुर असुर चराचर जीते ॥

हे नाथ, श्रीरघुनाथ हे दीनांवर दया करणारे आहेत. शरण गेल्यावर वाघसुद्धा खात नाही. तुम्हांला जे काहीकरायचे होते, ते तुम्ही केलेले आहे. तुम्ही देव, राक्षस व चराचर सर्वांना जिंकले आहे. ॥ १ ॥

संत कहहिं असि नीति दसानन । चौथेंपन जाइहि नृप कानन ॥

तासु भजनु कीजिअ तहँ भर्ता । जो कर्ता पालक संहर्ता ॥

हे नाथ, वृद्धापकाळी राजाने वनात जायला हवे. अशी नीती संत सांगतात. वनात तुम्ही सृष्टीची रचना, पालन व संहार करणार्‍या श्रीरामांचे भजन करावे. ॥ २ ॥        

सोइ रघुबीर प्रनत अनुरागी । भजहु नाथ ममता सब त्यागी ॥

मुनिबर जतनु करहिं जेहि लागी । भूप राजु तजि होहिं बिरागी ॥

हे नाथ, तुम्ही विषयांची सर्व ममता सोडून शरणागतावर प्रेम करणार्‍या भगवंतांचे भजन करा. ज्यांच्यासाठी श्रेष्ठ मुनी साधना करतात आणि राजेसुद्धा राज्य सोडून वैरागी होतात, ॥ ३ ॥

सोइ कोसलाधीस रघुराया । आयउ करन तोहि पर दाया ॥

जौं पिय मानहु मोर सिखावन । सुजसु होइ तिहुँ पुर अति पावन ॥

तेच कोसलाधीश श्रीरघुनाथ तुमच्यावर दया करण्यास आले आहेत. हे प्रियतम, जर तुम्ही माझे म्हणणे मान्य कराल, तर तुमची अत्यंत पवित्र व सुंदर कीर्ती तिन्ही लोकी पसरेल. ‘ ॥ ४ ॥

दोहा---अस कहि नयन नीर भरि गहि पद कंपित गात ।

नाथ भजहु रघुनाथहि अचल होइ अहिवात ॥ ७ ॥

असे म्हणत नेत्रांमधून अश्रू ढाळत आणि पतीचे चरण धरुन थरथरा कापत असलेल्या मंदोदरीने म्हटले, “ हे नाथ, श्रीरघुनाथांचे भजन करा. त्यामुळे माझे सौभाग्य अखंड राहील. “ ॥ ७ ॥  

तब रावन मयसुता उठाई । कहै लाग खल निज प्रभुताई ॥

सुनु तैं प्रिया बृथा भय माना । जग जोधा को मोहि समाना ॥

तेव्हा मंदोदरीला उठवून तो दुष्ट तिला आपली महती सांगू लागला, ‘ हे प्रिये, तू विनाकारण भीती बाळगतेस. माझ्यासारखा योद्धा जगात कोण आहे, ते सांग. ॥ १ ॥

बरुन कुबेर पवन जम काला । भुजबल जितेउँ सकल दिगपाला ॥

देव दनुज नर सब बस मोरें । कवन हेतु उपजा भय तोरें ॥

वरुण, कुबेर, वायू, यमराज इत्यादी दिक् पालांना व कालालाही मी आपल्या भुजबळाने जिंकले आहे. देव, दानव, मनुष्य सर्व माझ्या अधीन आहेत. मग तुला ही भीती का वाटते ? ‘ ॥ २ ॥

नाना बिधि तेहि कहेसि बुझाई । सभॉं बहोरि बैठ सो जाई ॥

मंदोदरीं हृदयँ अस जाना । काल बस्य उपजा अभिमाना ॥

मंदोदरीने पुष्कळ प्रकारे समजावून सांगितले, तरी रावणाने तिचे काही ऐकले नाही, मग तो सभेत जाऊन बसला. मंदोदरीला कळून चुकले की, कालाच्या अधीन असल्यामुळे पतीला अभिमान झालेला आहे. ॥ ३ ॥

सभॉं आइ मंत्रिन्ह तेहिं बूझा । करब कवन बिधि रिपु सैं जूझा ॥

कहहिं सचिव सुनु निसिचर नाहा । बार बार प्रभु पूछहु काहा ॥

कहहु कवन भय करिअ बिचारा । नर कपि भालु अहार हमारा ॥

सभेत आल्यावर रावणाने मंत्र्यांना विचारले की, शत्रूबरोबर कशा प्रकारे युद्ध करावे ? मंत्री म्हणाले, ‘ हे राक्षसराज ! ऐका. आपण हे वारंवार काय विचारता ? सांगा तरी, असे कोणते मोठे भय उत्पन्न झालेआहे की ज्याचा विचार करावा ? मनुष्य व वानर हे तर आपले भोजन आहेत. ‘ ॥ ४-५ ॥




Custom Search

1 comment:

Mnj koch said...

It's my Pleasure to Visit This Site Again and Again For Bhakti Sangeet