Wednesday, July 20, 2022

KikshindhaKanda Part 4 ShriRamCharitManas Doha 7 to Doha 11 किष्किन्धाकाण्ड भाग ४ श्रीरामचरितमानस दोहा ७ ते दोहा ११

 

KikshindhaKanda Part 4 ShriRamCharitManas 
Doha 7 to Doha 11 
किष्किन्धाकाण्ड भाग ४ 
श्रीरामचरितमानस 
दोहा ७ ते दोहा ११

दोहा—कह बाली सुनु भीरु प्रिय समदरसी रघुनाथ ।

जौं कदाचि मोहि मारहिं तौ पुनि होउँ सनाथ ॥ ७ ॥

वाली म्हणाला, ‘ हे घाबरट प्रिये, ऐकून ठेव. श्रीरघुनाथ हे समदर्शी आहेत. जर कदाचित त्यांनी मला मारले, तर मला परमपद मिळेल. ‘ ॥ ७ ॥

अस कहि चला महा अभिमानी । तृन समान सुग्रीवहि जानी ॥

भिरे उभौ बाली अति तर्जा । मुठिका मारि महाधुनि गर्जा ॥

असे म्हणून तो अहंकारी वाली सुग्रीवाला गवताप्रमाणे तुच्छ मानून भिडला आणि त्याला ठोसा देऊन त्याने मोठ्याने गर्जना केली. ॥ १ ॥

तब सुग्रीव बिकल होइ भागा । मुष्टि प्रहार बज्र सम लागा ॥

मैं जो कहा रघुबीर कृपाला । बंधु न होइ मोर यह काला ॥

तेव्हा सुग्रीव व्याकूळ होऊन पळाला. त्याला ठोसा हा वज्रासारखा लागला. सुग्रीवाने येऊन सांगितले की, ‘ हे कृपाळू रघुवीर, मी तुम्हांला पूर्वीच सांगितले होते की, वाली हा माझा भाऊ नव्हे, काळ आहे. ‘ ॥ २ ॥

एकरुप तुम्ह भ्राता दोऊ । तेहि भ्रम तें नहिं मारेउँ सोऊ ॥

कर परसा सुग्रीव सरीरा । तनु भा कुलिस गई सब पीरा ॥

श्रीराम म्हणाले, ‘ तुम्हां भावांचे एकसारखे रुप आहे. त्यामुळे मी त्याला मारु शकलो नाही. ‘ मग श्रीरामांनी सुग्रीवाच्या शरीराला आपल्या हाताचा स्पर्श केला, त्यामुळे त्याचे शरीर वज्रासारखे झाले आणि शरीर-पीडा नाहीशी झाली. ॥ ३ ॥

मेली कंठ सुमन कै माला । पठवा पुनि बल देइ बिसाला ॥

पुनि नाना बिधि भई लराई । बिटप ओट देखहिं रघुराई ॥

मग श्रीरामांनी सुग्रीवाच्या गळ्यात फुलांची माळ घातली आणि त्याला प्रोत्साहन देऊन पाठविले. दोघांमध्ये अनेक प्रकारे युद्ध सुरु झाले. श्रीराम वृक्षाआडून ते पाहात होते. ॥ ४ ॥

दोहा—बहु छल बल सुग्रीव कर हियँ हारा भय मानि ।

मारा बालि राम तब हृदय माझ सर तानि ॥ ८ ॥

सुग्रीवाने पुष्कळ आक्रमक पवित्रे घेऊन पाहिले, परंतु शेवटी भयामुळे तो हतोत्साह झाला. तेव्हा श्रीरामांनी बाण खेचून वालीच्या छातीवर मारला. ॥ ८ ॥

परा बिकल महि सर के लागें । पुनि उठि बैठ देखि प्रभु आगें ॥

स्याम गात सिर जटा बनाएँ । अरुन नयन सर चाप चढ़ाएँ ॥

बाण लागताच वाली व्याकूळ होऊन खाली पडला. परंतु प्रभु रामांना पाहून तो उठून बसला. भगवंतांचे श्यामल शरीर आहे, मस्तकावर जटा आहेत. नेत्र लालसर आहेत. धनुष्य-बाण सज्ज केलेले आहेत. ॥ १ ॥

पुनि पुनि चितइ चरन चित दीन्हा । सुफल जन्म माना प्रभु चीन्हा ॥

हृदयँ प्रीति मुख बचन कठोरा । बोला चितइ राम की ओरा ॥

वालीने वारंवार भगवंतांच्याकडे पाहून चित्त त्यांच्या चरणीं लावले. प्रभूंना ओळखल्यामुळे त्याला आपला जन्म सफळ झाल्याचे वाटले. त्याच्या मनात प्रेम होते, परंतु मुखात कठोर शब्द होते. तो श्रीरामांच्याकडे पाहात म्हणाला, ॥ २ ॥

धर्म हेतु अवतरेहु गोसाईं । मारेहु मोहि ब्याध की नाईं ॥

मैं बैरी सुग्रीव पिआरा । अवगुन कवन नाथ मोहि मारा ॥

‘ हे स्वामी, तुम्ही धर्मच्या रक्षणासाठी अवतार घेतला आहे, तर मग व्याधाप्रमाणे मला लपून का मारले ? तुम्हांला मी वैरी आणि सुग्रीव प्रिय का ? हे नाथ कोणत्या दोषाकरिता तुम्ही मला मारले ? ‘ ॥ ३ ॥

अनुज बधू भगिनी सुत नारी । सुनु सठ कन्या सम ए चारी ॥

इन्हहि कुदृष्टि बिलोकइ जोई । ताहि बधें कछु पाप न होई ॥

श्रीराम म्हणाले, ‘ हे मूर्खा, ऐकून घे. लहान भावाची पत्नी, बहीण, मुलची स्त्री आणि कन्या या चारीही सारख्या आहेत. यांच्याकडे जो वाईट नजरेने पाहातो, त्याला मारण्यात कोणतेही पाप नसते. ॥ ४ ॥

मूढ़ तोहि अतिसय अभिमाना । नारि सिखावन करसि न काना ॥

मम भुज बल आश्रित तेहि जानी । मारा चहसि अधम अभिमानी ॥

हे मूर्खा, तुला फार अभिमान आहे. तू आपल्या पत्नीच्या बोलण्यावर लक्ष दिले नाहीस. सुग्रीव हा माझ्या बाहुबलाचा आश्रित आहे. हे माहीत असूनही अरे अधमा, गर्विष्ठ, तू त्याला ठार मारणार होतास. ॥ ५ ॥

दोहा—सुनहु राम स्वामी सन चल न चातुरी मोरि ।

प्रभु अजहूँ मैं पापी अंतकाल गति तोरि ॥ ९ ॥

वाली म्हणाला, ‘ हे श्रीराम, स्वामीपुढे माझे शहाणपण चालू शकणार नाही. पण हे प्रभो, ( मला सांगा, ) अंतकाळी तुमचा आश्रय मिळूनही मी पापी राहिलो का ?’ ॥ ९ ॥

सुनत राम अति कोमल बानी । बालि सीस परसेउ निज पानी ॥

अचल करौं तनु राखहु प्राना । बालि कहा सुनु कृपानिधाना ॥

वालीची ती अत्यंत मृदुवाणी ऐकून श्रीरामांनी त्याच्या मस्तकाला आपल्या हाताचा स्पर्श केला आणि म्हटले, ‘ मी तुझे शरीर दृढ करतो, तुझे प्राण वाचतील.’ वाली म्हणाला, ‘ हे कृपानिधान, ऐकून घ्या. ॥ १ ॥

जन्म जन्म मुनि जतनु कराहीं । अंत राम कहि आवत नाहीं ॥

जासु नाम बल संकर कासी । देत सबहि सम गति अबिनासी ॥

मुनिगण जन्मोजन्मी अनेक प्रकारचे साधन करीत असतात. तरीही अंतकाळी त्यांच्या तोंडून रामनाम येत नाही. ज्यांच्या नावाच्या बळावर शंकर हे काशीतील सर्वांना समानपणे मुक्ती देतात, ॥ २ ॥

मम लोचन गोचर सोइ आवा । बहुरि कि प्रभु अस बनिहि बनावा ॥

ते श्रीराम प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांसमोर आले आहेत. हे प्रभो, अशी संधी पुन्हा येईल काय ? ॥ ३ ॥

छंद—सो नयन गोचर जासु गुन नित नेति कहि श्रुति गावहीं ।

जिति पवन मन गो निरस करि मुनि ध्यान कबहुँक पावहीं ॥

मोहि जानि अति अभिमान बस प्रभु कहेउ राखु सरीरही ।

अस कवन सठ हठि काटि सुरतरु बारि करिहि बबूरही ॥ १ ॥

श्रुती ‘ नेति-नेति ‘ म्हणून ज्यांचे गुणगान करतात, आणि प्राण व मन जिंकून इंद्रियांना विषयांपासून विरक्त बनवून मुनिगण ध्यानामध्ये ज्यांची क्वचितच एक झलक मिळवू शकतात, तेच तुम्ही प्रभू प्रत्यक्ष माझ्याम समोर प्रकट आहात. तुम्ही मला अत्यंत अभिमानी मानून म्हटले की, ‘ तू शरीर सोडू नकोस. परंतु जाणूनबुजून कल्पवृक्ष तोडून बाभळीचे कुंपण कोण मूर्ख करील ? ( म्हणजेच मोक्ष देणार्‍या तुम्हाला सोडून या नश्र्वर शरीराचे रक्षण कोण करील ? ) ॥ १ ॥

अब नाथ करि करुना बिलोकहु देहु जो बर मागऊँ ।

जेहिं जोनि जन्मौं कर्म बस तहँ राम पद अनुरागऊँ ॥

यह तनय मम सम बिनय बल कल्यानप्रद प्रभु लीजिऐ ।

गहि बाँह सुर नर नाह आपन दास अंगद कीजिऐ ॥

हे नाथ, आता माझ्यावर दयादृष्टी करा आणि मी जो वर मागतो तो द्या. मी कर्मामुळे ज्या योनीत जन्म घेईन, तेथे हे श्रीरामा, तुमच्या चरणी प्रेम करीत राहावे. हे कल्याणप्रद प्रभो, हा माझा अंगद विनय व बल या बाबतीत माझ्यासारखाच आहे. याचा स्वीकार करा आणि हे देव व मनुष्य यांचे नाथ, याचा हात धरुन याला आपला दास बनवा.’ ॥ २ ॥

दोहा—राम चरन दृढ़ प्रीति करि बालि कीन्ह तनु त्याग ।

सुमन माल जिमि कंठ ते गिरत न जानइ नाग ॥ १० ॥

श्रीरामांच्या चरणी दृढ प्रेम ठेवून वालीने, हत्ती जसा गळ्यातील पुष्पमाला खाली पडल्याचे जाणत नाही, त्याप्रमाणे सहजपणे शरीराचा त्याग केला.॥ १० ॥

राम बालि निज धाम पठावा । नगर लोग सब ब्याकुल धावा ॥

नाना बिधि बिलाप कर तारा । छूटे केस न देह सँभारा ॥

श्रीरामांनी बालीला आपल्या परमधामी पाठविले. नगरातील सर्व लोक व्याकूळ होऊन धावत आले. वालीची पत्नी तारा ही अनेक प्रकारे विलाप करु लागली. तिचे केस विस्कटले होते आणि तिला देहाची शुद्ध नव्हती. ॥ १ ॥

तारा बिकल देखि रघुराया । दीन्ह ग्यान हरि लीन्ही माया ॥

छिति जल पावक गगन समीरा । पंच रचित अति अधम सरीरा ॥

तारा व्याकूळ झाल्याचे पाहून श्रीरघुनाथांनी तिला ज्ञान दिले व तिचे अज्ञान हरण केले. ते म्हणाले, ‘ पृथ्वी, जल, अग्नी, आकाश आणि वायू या पंचतत्त्वांनी हे अत्यंत तुच्छ शरीर बनलेले आहे. ॥ २ ॥

प्रगट सो तनु तव आगें सोवा । जीव नित्य केहि लगि तुम्ह रोवा ॥

उपजा ग्यान चरन तब लागी । लीन्हेसि परम भगति बर मागी ॥

ते वालीचे शरीर तर तुझ्यासमोर प्रत्यक्ष झोपलेले आहे, आणि जीव हा नित्य आहे. मग तू कशासाठी रडतेस ? ‘ जेव्हा ज्ञान उत्पन्न झाले, तेव्हा ती भगवंतांच्या चरणी लागली आणि तिने परम भक्तीचा वर मागितला. ॥ ३ ॥

उमा दारु जोषित की नाईं । सबहि नचावत रामु गोसाईं ॥

तब सुग्रीवहि आयसु दीन्हा । मृतक कर्म बिधिवत सब कीन्हा ॥

शिव म्हणतात, ‘ हे उमे, स्वामी राम सर्वांना कठपुतळीप्रमाणे नाचवीत असतात. ‘ त्यानंतर श्रीरामांनी आज्ञा केली आणि सुग्रीवाने विधिपूर्वक वालीचे सर्व अंत्यकर्म केले. ॥ ४ ॥

राम कहा अनुजहि समुझाई । राज देहु सुग्रीवहि जाई ॥

रघुपति चरन नाइ करि माथा । चले सकल प्रेरित रघुनाथा ॥

तेव्हा श्रीरामचंद्रांनी लक्ष्मणाला समजावून म्हटले, ‘ तू जाऊन सुग्रीवाला राज्य दे.’ श्रीरघुनाथांच्या आज्ञेने सर्व लोक श्रीरघुनाथांच्या चरणीं नतमस्तक होऊन निघून गेले. ॥ ५ ॥

दोहा---लछिमन तुरत बोलाए पुरजन बिप्र समाज ।

राजु दीन्ह सुग्रीव कहँ अंगद कहँ जुबराज ॥ ११ ॥

लक्ष्मणाने लगेच सर्व नगरवासीयांना व ब्राह्मण मंडळींना बोलावून घेतले आणि त्यांच्यासमोर सुग्रीवाला राज्य व अंगदाला युवराजपद दिले. ॥ ११ ॥

उमा राम सम हित जग माहीं । गुरु पितु मातु बंधु प्रभु नाहीं ॥

सुर नर मुनि सब कै यह रीती । स्वारथ लागि करहिं सब प्रीती ॥

‘ हे पार्वती, जगामध्ये श्रीरामांच्यासारखा अकारण हित करणारा गुरु, पिता, माता, बंधू आणि स्वामी असा दुसरा कोणी नाही. देव, मनुष्य आणि मुनी या सर्वांची रीत अशीच आहे की, स्वार्थासाठीच सर्व प्रेम करतात. ॥ १ ॥

बालि त्रास ब्याकुल दिन राती । तन बहु ब्रन चिंतॉं जर छाती ॥

सोइ सुग्रीव कीन्ह कपिराऊ । अति कृपाल रघुबीर सुभाऊ ॥

जो सुग्रीव रात्रंदिवस वालीच्या भीतीने व्याकूळ असे, ज्याच्या शरीरावर बर्‍याच जखमा झाल्या होत्या आणि ज्याची छाती चिंतेने जळत होती, त्या सुग्रीवाला श्रीरामांनी वानरांचा राजा बनविले. श्रीरामचंद्रांचा स्वभाव अत्यंत कृपाळू आहे. ॥ २ ॥

जानतहूँ अस प्रभु परिहरहीं । काहे न बिपति जाल नर परहीं ॥

पुनि सुग्रीवहि लीन्ह बोलाई । बहु प्रकार नृपनीति सिखाई ॥

हे जाणूनही जे लोक अशा प्रभूला सोडून देतात, ते विपत्तींच्या जाळ्यात का अडकणार नाहीत ? मग श्रीरामांनी सुग्रीवाला बोलावून घेतले आणि अनेक प्रकारे राजनीती शिकविली. ॥ ३ ॥

कह प्रभु सुनु सुग्रीव हरीसा । पुर न जाउँ दस चारि बरीसा ॥

गत ग्रीषम बरषा रितु आई । रहिहउँ निकट सैल पर छाई ॥

मग प्रभु म्हणाले, ‘ हे वानरराज सुग्रीवा, मी चौदा वर्षे कोणत्याही गावात जाणार नाही. ग्रीष्मऋतू जाऊन वर्षाऋतू आला. आता मी येथे जवळच पर्वतावर राहीन. ॥ ४ ॥

अंगद सहित करहु तुम्ह राजू । संतत हृदयँ धरेहु मम काजू ॥

जब सुग्रीव भवन फिरि आए । रामु प्रबरषन गिरि पर छाए ॥

अंगदासह तू राज्य कर. माझे काम नेहमी लक्षात ठेव.’

 त्यानंतर सुग्रीव घरी परतला, तेव्हा श्रीराम प्रवर्षण

 पर्वतावर जाऊन राहिले. ॥ ५ ॥



Custom Search

KikshindhaKanda Part 3 ShriRamCharitManas Doha 5 to Doha 6 किष्किन्धाकाण्ड भाग ३ श्रीरामचरितमानस दोहा ५ ते दोहा ६

 

KikshindhaKanda Part 3 ShriRamCharitManas 
Doha 5 to Doha 6 
किष्किन्धाकाण्ड भाग ३ 
श्रीरामचरितमानस 
दोहा ५ ते दोहा ६

दोहा---सखा बचन सुनि हरषे कृपासिंधु बलसींव ।

कारन कवन बसहु बन मोहि कहहु सुग्रीव ॥ ५ ॥

तेव्हा कृपेचे समुद्र आणि बलाची परिसीमा असणारे श्रीराम मित्र सुग्रीवाचे बोलणे ऐकून हर्षित झाले. ते म्हणाले, ‘ हे सुग्रीवा, तू वनात का राहातोस, ते मला सांग. ‘ ॥ ५ ॥

नाथ बालि अरु मैं द्वौ भाई । प्रीति रही कछु बरनि न जाई ॥

मयसुत मायावी तेहि नाऊँ । आवा सो प्रभु हमरें गाऊँ ॥

सुग्रीव म्हणाला, ‘ हे नाथ, वाली व मी दोघे भाऊ आहोत. आम्हा दोघांमध्ये अतिशय प्रेम होते. हे प्रभो, मय दानवाचा एक पुत्र होता. त्याचे नाव मायावी होते. तो एकदा आमच्या गावी आला. ॥ १ ॥

अर्ध राति पुर द्वार पुकारा । बाली रिपु बल सहइ न पारा ॥

धावा बालि देखि सो भागा । मैं पुनि गयउँ बंधु सँग लागा ॥

त्याने अर्ध्या रात्री नगरद्वारावर येऊन युद्धाचे आव्हान दिले. वालीला शत्रूचे आव्हान सहन झाले नाही. तो धावत गेला. त्याला पाहाताच तो मायावी पळून गेला. मीसुद्धा भावासोबत गेलो. ॥ २ ॥

गिरिबर गुहॉं पैठ सो जाई । तब बालीं मोहि कहा बुझाई ॥

परिखेसु मोहि एक पखवारा । नहिं आवौं तब जानेसु मारा ॥

तो मायावी एका पर्वताच्या गुहेमध्ये लपला. तेव्हा मला वालीने सांगितले की, ‘ एक पंधरवडा होईपर्यंत वाट बघ. जर मी तेवढ्या दिवसांत परत आलो नाही, तर मी मारला गेलो, असे समज.’ ॥ ३ ॥

मास दिवस तहँ रहेउँ खरारी । निसरी रुधिर धार तहँ भारी ॥

बालि हतेसि मोहि मारिहि आई । सिला देइ तहँ चलेउँ पराई ॥

हे श्रीराम ! मी महिनाभर तेथे राहिलो. त्या गुहेतून रक्ताचा मोठा प्रवाह बाहेर आला. तेव्हा मी समजलो की, त्या मायावीने वालीला मारले. आता तो येऊन मला मारेल, म्हणून मी तेथे गुहेच्या द्वारावर मोठी शिळा लावून पळून आलो. ॥ ४ ॥

मंत्रिन्ह पुर देखा बिनु साईं । दीन्हेउ मोहि राज बरिआईं ॥

बाली ताहि मारि गृह आवा । देखि मोहि जियँ भेद बढ़ावा ॥

मंत्र्यांनी नगराला राजा नाही, म्हणून मला आग्रह करुन राज्य दिले. नंतर वाली त्या मायावीला मारुन घरी परत आला. मला सिंहासनावर बसल्याचे पाहून त्याच्या मनात विकल्प वाढला. ( त्याला वाटले की, राज्याच्या लोभाने मीच गुहेच्या तोंडावर शिळा बसवून आलो व येथे येऊन राजा बनलो. ॥ ५ ॥

रिपु सम मोहि मारेसि अति भारी । हरि लीन्हेसि सर्बसु अरु नारी ॥

ताकें भय रघुबीर कृपाला । सकल भुवन मैं फिरेउँ बिहाला ॥

त्याने मला शत्रूप्रमाणे खूप मारले आणि माझे सर्वस्व व माझी स्त्री हिरावून घेतली. हे कृपाळू रघुवीरा, त्याच्या भयामुळे मी सर्व लोकांत वाईट परिस्थितीत फिरत राहिलो. ॥ ६ ॥

इहॉं साप बस आवत नाहीं । तदपि सभीत रहउँ मन माहीं ॥

सुनि सेवक दुख दीनदयाला । फरकि उठीं द्वै भुज बिसाला ॥

तो शापामुळे येथे येत नाही, तरीही मनातून मी भयभीत असतो.’ सेवकाचे दुःख ऐकून दीनांवर दया करणार्‍या श्रीरघुनाथांच्या दोन्ही भुजा स्फुरु लागल्या. ॥ ७ ॥   

दोहा---सुनु सुग्रीव मारिहउँ बालिहि एकहिं बान ।

ब्रह्म रुद्र सरनागत गएँ न उबरिहिं प्रान ॥ ६ ॥

ते म्हणाले, ‘ हे सुग्रीवा, ऐक. मी एका बाणाने वालीला मारीन. ब्रह्मदेव आणि रुद्र यांना जरी तो शरण गेला, तरी त्याचे प्राण वाचणार नाहीत. ॥ ६ ॥

जे न मित्र दुख होहिं दुखारी । तिन्हहि बिलोकत पातक भारी ॥

निज दुख गिरि सम रज करि जाना । मित्रक दुख रज मेरु समाना ॥

जे लोक मित्राच्या दुःखाने दुःखी होत नाहीत, त्यांना पाहिल्यानेही मोठे पाप लागते. आपल्या पर्वतासमान दुःखाला रजःकणाप्रमाणे समजून मित्राच्या रजःकणाप्रमाणे असलेल्या दुःखाला सुमेरुप्रमाणे मानावे. ॥ १ ॥

जिन्ह कें असि मति सहज न आई । ते सठ कत हठि करत मिताई ॥

कुपथ निवारि सुपंथ चलावा । गुन प्रकटै अवगुनन्हि दुरावा ॥

ज्यांना स्वभावतःच अशी बुद्धी नसते, ते मूर्ख बळेच कुणाशीही मैत्री का करतात ? त्याने मित्राला वाईट मार्गापासून चांगल्या मार्गावर आणावे व त्याचे गुण प्रकट करुन अवगुण लपवावेत, हा खर्‍या मित्राचा धर्म आहे. ॥ २ ॥

देत लेत मन संक न धरई । बल अनुमान सदा हित करई ॥

बिपति काल कर सतगुन नेहा । श्रुति कह संत मित्र गुन एहा ॥

देण्या-घेण्याबद्दल मनात शंका बाळगू नये. आपल्या शक्तीप्रमाणे त्याचे नेहमी हित करावे. संकटकाळी तर शंभरपट स्नेह करावा. वेद म्हणतात की, उत्तम मित्राची ही लक्षणे आहेत. ॥ ३ ॥

आगें कह मृदु बचन बनाई । पाछें अनहित मन कुटिलाई ॥

जाकर चित अहि गति सम भाई । अस कुमित्र परिहरेहिं भलाई ॥

जो समोर कृत्रिम गोड बोलतो व माघारी निंदा करतो आणि मनात कपट ठेवतो, हे बंधो, त्याचे मन सापाच्या चालीप्रमाणे वाकडे असते. अशा कृत्रिमाला टाळणेच चांगले. ॥ ४ ॥

सेवक सठ नृप कृपन कुनारी । कपटी मित्र सूल सम चारी ॥

सखा सोच त्यागहु बल मोरें । सब बिधि घटब काज मैं तोरें ॥

मूर्ख सेवक, कंजूष राजा, कुलता स्त्री आणि कपटी मित्र हे चौघे काट्याप्रमाणे दुःख देणारे असतात. हे मित्रा ! माझ्या बळावर आता तू चिंता सोडून दे. मी सर्व प्रकारे तुला मदत करीन.’ ॥ ५ ॥

कह सुग्रीव सुनहु रघुबीरा । बालि महाबल अति रनधीरा ॥

दुंदुभि अस्थि ताल देखराए । बिनु प्रयास रघुनाथ ढहाए ॥

सुग्रीव म्हणाला, ‘ हे रघुवीर ! ऐका. वाली हा अत्यंत बलवान आणि मोठा रणधीर आहे. ‘ नंतर सुग्रीवाने रामांना दुंदुभी राक्षसाची हाडे आणि ताल वृक्ष दाखविले. श्रीरघुनाथांनी सहजासहजी ते पाडले. ॥ ६ ॥

देखि अमित बल बाढ़ी प्रीती । बालि बधब इन्ह भइ परतीती ॥

बार बार नावइ पद सीसा । प्रभुहि जानि मन हरष कपीसा ॥

श्रीरामांचे हे अपरिमित बळ पाहून सुग्रीवाला श्रीरामांविषयी वाटणारे प्रेम वाढले आणि हे वालीचा वध नक्की करतील, असा त्याला विश्वास वाटू लागला. तो वारंवार श्रीरामांच्या चरणीं नतमस्तक होऊ लागला. प्रभूंचे खरे स्वरुप कळल्याने सुग्रीव मनातून आनंदित झाला होता.

उपजा ग्यान बचन तब बोला । नाथ कृपॉं मन भयउ अलोला ॥

सुख संपति परिवार बड़ाई । सब परिहरि करिहउँ सेवकाई ॥

जेव्हा तो भानावर आला, तेव्हा म्हणाला, ‘ हे नाथ, तुमच्या कृपेमुळे माझे मन शांत झाले. सुख, संपत्ती, परिवार व मोठेपणा सोडून मी तुमचीच सेवा करीत राहीन. ॥ ८ ॥   

ए सब रामभगति के बाधक । कहहिं संत तव पद अवराधक ॥

सत्रु मित्र सुख दुख जग माहीं । मायाकृत परमारथ नाहीं ॥

कारण सुख-संपत्ती इत्यादी रामभक्तीच्या विरोधी आहेत, असे संत सांगतात. जगाला जितके मित्र व शत्रू आहेत आणि सुख-दुःखादी द्वंद्वे आहेत, ती सर्वच्या सर्व मायारचित असून परमार्थतः खरी नाहीत. ॥ ९ ॥

बालि परम हित जासु प्रसादा । मिलेहु राम तुम्ह समन बिषादा ॥

सपनें जेहि सन होइ लराई । जागें समुझत मन सकुचाई ॥

हे श्रीरामा ! वाली हा तर माझा परम हितकारी आहे. कारण त्याच्या करणीमुळे शोकाचा नाश करणारे तुम्ही मला मिलालात आणि आता स्वप्नातही जरी त्याच्याशी लढाई झाली, तरी जागे झाल्यावर माझ्या मनाला संकोच वाटेल. ॥ १० ॥

अब प्रभु कृपा करहु एहि भॉंती । सब तजि भजनु करौं दिन राती ॥

सुनि बिराग संजुत कपि बानी । बोले बिहँसि रामु धनुपानी ॥

हे श्रीराम, आता माझ्यावर अशी कृपा करा की, सर्व सोडून रात्रंदिवस मी तुमचे भजन करीत राहीन.’ सुग्रीवाची ती वैराग्ययुक्त वाणी ऐकून हाती धनुष्य धारण केलेले श्रीराम हसत म्हणाले, ॥ ११ ॥

जो कछु कहेहु सत्य सब सोई । सखा बचन मम मृषा न होई ॥

नट मरकट इव सबहि नचावत । रामु खगेस बेद अस गावत ॥

‘ तू जे सांगितलेस ते सर्व सत्य आहे. परंतु हे मित्रा, माझे बोलणे मिथ्या नसते. वाली मारला जाईल व राज्य तुला मिळेल. ‘ काकाभुशुंडी म्हणतात, ‘ पक्ष्यांच्या राजा गरुडा ! माकडवाल्याच्या माकडाप्रमाणे श्रीराम सर्वांना नाचवितात, असे वेद म्हणतात. ॥ १२ ॥

लै सुग्रीव संग रघुनाथा । चले चाप सायक गहि हाथा ॥

तब रघुपति सुग्रीव पठावा । गर्जेसि जाइ निकट बल पावा ॥

त्यानंतर सुग्रीवाला बरोबर घेऊन हातात धनुष्य धारण करुन श्रीरघुनाथ निघाले. मग रघुनाथांनी सुग्रीवाला वालीकडे पाठविले. श्रीरामांचे बळ मिळाल्यामुळे वालीजवळ जाऊन त्याने गर्जना केली. ॥ १३ ॥

सुनत बालि क्रोधातुर धावा । गहि कर चरन नारि समुझावा ॥

सुनु पति जिन्हहि मिलेउ सुग्रीवा । ते द्वौ बंधु तेज बल सींवा ॥

ती ऐकताच वाली क्रोधाने धावून गेला. त्याची पत्नी तारा हिने त्याचे पाय धरुन समजाविले की, हे नाथा, ऐकून घ्या. सुग्रीव ज्यांना भेटला आहे, ते दोघे भाऊ पराक्रमी व बळाची परिसीमा आहेत. ॥ १४ ॥

कोसलेस सुत लछिमन रामा । कालहु जीति सकहिं संग्रामा ॥

ते कोसलपती दशरथाचे पुत्र राम व लक्ष्मण युद्धामध्ये

 काळालाही जिंकू शकतात. ‘ ॥ १५ ॥



Custom Search

KikshindhaKanda Part 2 ShriRamCharitManas Doha 2 to Doha 4 किष्किन्धाकाण्ड भाग २ श्रीरामचरितमानस दोहा २ ते दोहा ४

 

KikshindhaKanda Part 2
ShriRamCharitManas
Doha 2 to Doha 4
किष्किन्धाकाण्ड भाग २
श्रीरामचरितमानस 
दोहा २ ते दोहा ४

दोहा---एकु मैं मंद मोहबस कुटिल हृदय अग्यान ।

पुनि प्रभु मोहि बिसारेउ दीनबंधु भगवान ॥ २ ॥

एक तर मी मंद, दुसरे म्हणजे मोहान्ध. तिसरे हृदयाने कुटिल व अज्ञानी आहे. शिवाय हे दीनबंधू भगवान ! तुम्हीही मला तुमचा विसर पाडलात. ॥ २ ॥

जदपि नाथ बहु अवगुन मोरें । सेवक प्रभुहि परै जनि भोरें ॥

नाथ जीव तव मायॉं मोहा । सो निस्तरइ तुम्हारेहिं छोहा ॥

हे नाथ, जरी माझ्यामध्ये अनेक अवगुण असले, तरी मला तुमचा विसर पडू नये. हे नाथ, जीव तुमच्या मायेने मोहित असतात, ते तुमच्याच कृपेने मुक्त होऊ शकतात. ॥ १ ॥

ता पर मैं रघुबीर दोहाई । जानउँ नहिं कछु भजन उपाई ॥

सेवक सुत पति मातु भरोसें । रहइ असोच बनइ प्रभु पोसें ॥

त्याशिवाय हे रघुवीर, मी तुमची शपथ घेऊन सांगतो की, मी भजन-साधन हे काहीही जाणत नाही. सेवक हा स्वामीच्या व पुत्र मातेच्या भरवशावर निश्चिंत असतो. त्यामुळे प्रभूला सेवकाचे पालन-पोषण करावेच लागते.’ ॥ २ ॥

अस कहि परेउ चरन अकुलाई । निज तनु प्रगटि प्रीति उर छाई ॥

तब रघुपति उठाइ उर लावा । निज लोचन जल सींचि जुड़ावा ॥

असे म्हणून हनुमान व्याकूळ होऊन प्रभूंच्या चरणी पडला. त्याने आपले खरे स्वरुप प्रकट केले. त्याच्या हृदयामध्ये प्रेमाचे भरते आले. तेव्हा प्रभूंनी त्याला उठवून हृदयाशी धरले आणि आपल्या प्रेमाश्रूंचा वर्षाव करुन त्याला भिजविले. ॥ ३ ॥

सुनु कपि जियँ मानसि जनि ऊना । तैं मम प्रिय लछिमन ते दूना ॥

समदरसी मोहि कह सब कोऊ । सेवक प्रिय अनन्यगति सोऊ ॥

प्रभू म्हणाले, ‘ हे हनुमाना, कष्टी होऊ नकोस. तू मला लक्ष्मणापेक्षाही अधिक प्रिय आहेस. सर्वजण मला समदर्शी म्हणतात. मला कोणी प्रिय किंवा अप्रिय नाही. परंतु मला भक्त फार आवडतो. कारण त्याला माझ्याशिवाय दुसर्‍या कोणाचा आधार नसतो. ॥ ४ ॥          

दोहा—सो अनन्य जाकें असि मति न टरइ हनुमंत ।

मैं सेवक सचराचर रुप स्वामि भगवंत ॥ ३ ॥

आणि हे हनुमाना, आपण सेवक असून चराचर जग आपले स्वामी भगवान यांचे रुप आहे, अशी ज्याची बुद्धी कधी ढळत नाही, तोच अनन्य समजावा.’ ॥ ३ ॥

देखि पवनसुत पति अनुकूला । हृदयँ हरष बीती सब सूला ॥

नाथ सैल पर कपिपति रहई । सो सुग्रीव दास तव अहई ॥

स्वामी आपल्यावर प्रसन्न आहेत, असे पाहून पवनकुमार हनुमानाच्या मनात हर्ष दाटला आणि त्याचे सर्व दुःख नाहीसे झाले. तो म्हणाला, ‘ हे नाथ, या पर्वतावर वानरराज सुग्रीव राहातो. तो तुमचा दास आहे. ॥ १ ॥

तेहि सन नाथ मयत्री कीजे । दीन जानि तेहि अभय करीजे ॥

सो सीता कर खोजा कराइहि । जहँ तहँ मरकट कोटि पठाइहि ॥

हे नाथ, त्याच्याशी मैत्री करा आणि त्याला दीन समजून निर्भय करा. तो सर्व कोट्यावधी वानरांना पाठवील व सीतेचा शोध लावेल.॥ २ ॥

एहि बिधि सकल कथा समुझाई । लिए दुऔं जन पीठि चढ़ाई ॥

जब सुग्रीवँ राम कहुँ देखा । अतिसय जन्म धन्य करि लेखा ॥

अशाप्रकारे सर्व गोष्टी समजावून हनुमानाने श्रीराम-लक्ष्मण या दोघांना आपल्या पाठीवर घेतले. जेव्हा सुग्रीवाने श्रीरामचंद्रांना पाहिले, तेव्हा त्याला आपला जन्म अतिशय धन्य झाला असे वाटले. ॥ ३ ॥

सादर मिलेउ नाइ पद माथा । भेंटेउ अनुज सहित रघुनाथा ॥

कपि कर मन बिवार एहि रीती । करिहहिं बिधि मो सन ए प्रीती ॥

सुग्रीव श्रीरामांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना आदराने भेटला. श्रीराम-लक्ष्मणांनी त्याला आलिंगन दिले. सुग्रीव मनात म्हणत होता, हे दैवा ! हे माझ्यावर प्रेम करतील काय ? ॥ ४ ॥

दोहा---तब हनुमंत उभय दिसि की सब कथा सुनाइ ।

पावक साखी देइ करि जोरी प्रीति दृढ़ाइ ॥ ४ ॥

तेव्हा हनुमानाने दोन्ही बाजूंच्या सर्व गोष्टी सांगून अग्नीला साक्षी ठेवून त्यांची मैत्री दृढ केली. ॥ ४ ॥

कीन्हि प्रीति कछु बीच न राखा । लछिमन राम चरित सब भाषा ॥

कह सुग्रीव नयन भरि बारी । मिलिहि नाथ मिथिलेसकुमारी ॥

दोघांनीही मनःपूर्वक परस्परांवर प्रेम केले, काहीही अंतर ठेवले नाही. तेव्हा लक्ष्मणाने श्रीरामांची सारी हकीगत सांगितली. तेव्हा सुग्रीवाने डोळ्यांत पाणी आणून सांगितले की, ‘ हे नाथ, मिथिलेशकुमारी जानकी नक्की मिळेल. ॥ १ ॥

मंत्रिन्ह सहित इहॉं एक बारा । बैठ रहेउँ मैं करत बिचारा ॥

गगन पंथ देखी मैं जाता । परबस परी बहुत बिलपाता ॥

मी एकदा येथे मंत्रांसह बसून विचारविनिमय करीत होतो, तेव्हा मी शत्रूच्या ताब्यात पडून खूप विलाप करीत असलेल्या सीतेला आकाशमार्गाने जाताना पाहिले होते. ॥ २ ॥

राम राम हा राम पुकारी । हमहि देखि दीन्हेउ पट डारी ॥

मागा राम तुरत तेहिं दीन्हा । पट उर लाइ सोच अति कीन्हा ॥

आम्हांला पाहून तिने ‘ हे राम, हे राम ‘ असे म्हणत उपवस्त्र टाकले होते. श्रीरामांनी ते मागितले, तेव्हा सुग्रीवाने लगेच ते दिले. ते वस्त्र हृदयापाशी धरुन श्रीरामचंद्रांनी फार शोक केला. ॥ ३ ॥

कह सुग्रीवा सुनहु रघुबीरा । तजहु सोच मन आनहु धीरा ॥

सब प्रकार करिहउँ सेवकाई । जेहि बिधि मिलिहि जानकी आई ॥

सुग्रीव म्हणाले, ‘ हे रघुवीर, काळजी सोडून द्या आणि धीर

 बाळगा. मी सर्व प्रकारे तुमची सेवा करीन. त्यामुळे

 जानकी येऊन तुम्हांला भेटेल. ॥ ४ ॥



Custom Search