Friday, February 14, 2020

Kahani Hartalikechi कहाणी हरतालिकेची


Kahani Hartalikechi  
is in Marathi. It is told to Goddess Devi by God Shuva.Ladies perform this Vrata in BhadraPada Masa to get a good husband.
कहाणी हरतालिकेची
एके दिवशी शंकर-पार्वती कैलासपर्वतावर बसली होती. पार्वतीने शंकरांना विचारले की, महाराज सर्व व्रतात चांगल व्रत कोणते ? ज्यात श्रम थोडे व फळ पुष्कळ उत्तम मिळते ? तसे व्रत असेल तर मला सांगा.  तसेच मी कोणत्या पुण्याईने आपले पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हां शंकर म्हणाले, जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहांत सूर्य श्रेष्ठ, चार वर्णांत ब्राह्मण श्रेष्ठ, देवांत विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्व व्रतांत श्रेष्ठ व्रत आहे.
ते तुला सांगतो. तेच व्रत तू पूर्व जन्मी हिमालय पर्वतावर केलेस आणि त्याच पुण्याईने तू मला प्राप्त झालीस. ते व्रत ऐक.
हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावे. ते पूर्वी तू कसं केलेस ते मी तुला आता सांगतो. मी तुला प्राप्त व्हावे म्हणून तू लहानपणी मोठे तप केलेस. चौसष्ट वर्षे तर तू झाडाची पाने खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडलांना फार दुःख झाले व अशा या आपल्या कन्येला कोणाला द्यावे ? अशी त्यांना काळजी लागून राहिली. एकदा तिथे नारद मुनी आले. हिमालयाने त्यांची पूजा केली. येण्याचे कारण मोठ्या नम्रतेने त्यांना विचारले. तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या आता उपवर झाली आहे. ती विष्णुला द्यावी. तो तिला योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे मागणी घालण्यास पाठविले आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. नंतर नारद तेथून निघून विष्णुकडे आले. सर्व हकिगत विष्ंणुंना सांगितली.       
नारद गेल्यानंतर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली. ती तुला रुचली नाही. तू रागावलीस असे पाहून तुझ्या सखीने तुझ्या रागावण्याचे कारण विचारले. तेव्हा तू सांगितलस की, महादेवावाचून मला दुसरा पती करणे नाही.असा माझा निश्र्चय आहे. असे असूनही माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे.ह्याला काय उपाय करावा? 
मग तुझ्या सखीने तुला एका घोर अरण्यात नेले. तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा दिसली. त्या गुहेत जाऊन तू माझे लिंग पार्वतीसह स्थापन केलेस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलेस. त्या तुझ्या पुण्याने माझे इथले आसन हलले. नंतर मी तिथे आलो. तुला दर्शन दिले व वर मागण्यास सांगितले. तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही. मी ही गोष्ट मान्य केली व गुप्त झालो. 
पुढे दुसर्‍या दिवशी ती  व्रतपूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याच पारण केलेस. 
इतक्यात तुझे वडिल तिथे आले. त्यांनी तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले. मग तू त्यांना सर्व हकिगत सांगितलीस. मग त्यांनी तुला मलाच देण्याचे वचन दिले. मग तुम्ही घरी गेलात. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले. अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका  व्रत असे म्हणतात.
व्रताचा विधि--ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचे असेल, त्या ठिकाणी तोरण बांधावे, केळीचे खांब लावून ती जागा सुशोभित करावी. रांगोळी घालावी. पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावे. षोडशोपचारांनी त्याची पूजा करावी. मनोभावे त्याची प्रार्थना करावी. उपवास करावा. नंतर ही कहाणी करावी. जागरण करावे. या व्रताने प्राणी पापांपासून मुक्त होतो. साता जन्मांचे पातक नाहीसे होते. राज्य मिळते. स्रियांचे सौभाग्य वाढते. ह्या दिवशी काहीं खाल्ले तर सात जन्म वंध्यत्व येते. दळिद्र येते. पुत्रशोक होतो. कहाणी झाल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावे. दुसरे दिवशी उत्तरपूजा करुन व्रताचे विसर्जन करावे. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाब्राह्मणांचे द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण.            

Monday, February 3, 2020

ShriMahaMrytyunJaya Kavacham श्रीमहामृत्युंजयकवचम्


ShriMahaMrytyunJaya Kavacham 
ShriMahamrutyunJay Kavacham is in Sanskrit. It is from Mahamrutyunjay Kalp. It is arises from Parvati-Ishwar discussion. Ishwar means God Shiva told this to Goddess Parvati, when she asked him about it.
श्रीमहामृत्युंजयकवचम् 
श्रीदेव्युवाच 
भगवन् सर्वधर्मज्ञ सृष्टिस्थिति लयात्मक ।
मृत्युंजयस्य देवस्य कवचं मे प्रकाशय ॥ १ ॥
श्रीईश्र्वर उवाच 
श्रृणुदेवी प्रवक्ष्यामि कवचं सर्वसिद्धिदम् ।
मार्कण्डेयोऽपियद्धृत्वा चिरजीवी व्यजायत ॥ २ ॥
तथैव सर्व दिक्पाला अमरत्वमवाप्नुयुः ।
कवचस्य ऋषिर्ब्रह्मा छन्दोऽनुष्टुवुदाहृतम् ॥ ३ ॥
मृत्युंजयः समुद्दिष्टो देवता पार्वतीपतिः ।
देहारोग्य बलायुष्ट्वे विनियोगः प्रकीर्तितः ॥ ४ ॥
ॐ त्रयंबकं मे शिरः पातु, ललाटं मे यजामहे ।
सुगंधि पातु हृदयं, जठरं पुष्टिवर्धनम् ॥ ५ ॥
नाभिर्भ्रुवारुकमिव पातु मां पार्वतीपतिः ।
बंधनादूरुयुग्मं मे पातु, कामाङ्ग शासनः ॥ ६ ॥
मृत्योर्जानुयुगं पातु दक्षयज्ञ विनाशनः ।
जङ्घायुग्मं च मुक्षीय पातु मां चंद्रशेखरः ॥ ७ ॥
मामृताच्च पदद्वन्द्वं पातु सर्वेश्वरोहरः ।
अंसौ मे श्रीशिवः पातु नीलकंठश्च पार्श्वयोः ॥ ८ ॥
ऊर्ध्वमेव सदापातु, सोमसूर्याग्निलोचनः ।
अधःपातु सदाशंभु सर्वापद विनिवारणः ॥ ९ ॥
वारुण्यामर्धनारीशो वायव्यां पातु शंकरः ।
कपर्दी पातु कौबेर्यामैशान्यां ईश्र्वरोऽवतु ॥ १० ॥
ईशानःसलिले पायादघोरः पातु कानने ।
अंतरिक्षे वामदेवः पायात्तत्पुरुषो भुवि ॥ ११ ॥
श्रीकण्ठः शयने पातु भोजने नीललोहितः ।
गमने त्र्यंबकः पातु सर्व कार्येषु सुव्रतः ॥ १२ ॥
सर्वत्र सर्व देहं मे सदा मृत्युंजयोऽवतु ।
इति ते कथितं दिव्यं कवचं सर्वकामदम् ॥ १३ ॥       
सर्व रक्षाकरं सर्वे ग्रहपीडा निवारणम् ।
दुःखनाशनं पुण्यमायुरारोग्यदायकम् ॥ १४ ॥
त्रिसंध्यं यः पठेदेतन्मृत्युस्तस्य न विद्यते ।
लिखितं भुर्जपत्रे तु य इदं मे व्यधारयेत् ॥ १५ ॥
तं दृष्टैव पलायन्ते भूतप्रेतपिशाचकाः ।
डाकिन्यश्चैव योगिन्यः सिद्धगंधर्व राक्षसाः ॥ १६ ॥
बालग्रहादिदोषादि नश्यन्ति तस्य दर्शनात् ।
उपग्रहाश्चैव मारीभयं  चौराभिचारिणः ॥ १७ ॥
इदं कवचमायुष्यं कथितं तव सुंदरि ।
न दातव्यं प्रयत्नेन न प्रकाश्यं कदाच न ॥ १८ ॥
॥ इति महामृत्युंजयकल्पे श्रीदेवीश्वरसंवादे महामृत्युंजय कवचम् संपूर्णम् ॥
याचा पाठ केल्याने किंवा हे कवच धारण केल्याने सर्व अशुभ गोष्टींचा नाश होतो. शुभ गोष्टी प्राप्त होतात असे सांगितले जाते.साधकांनी स्वतःच अनुभव घ्यावा.  
ShriMahaMrytyunJaya Kavacham श्रीमहामृत्युंजयकवचम्  


Custom Search