Sunday, October 3, 2021

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 44 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग ४४

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 44 
Doha 257 to 262
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग ४४ 
दोहा २५७ आणि २६२

दोहा—सब के उर अंतर बसहु जानहु भाउ कुभाउ ।

पुरज जननी भरत हित होइ सो कहिअ उपाउ ॥ २५७ ॥

तुम्ही सर्वांच्या ह्रदयात निवास करता आणि सर्वांचे चांगले-वाईट भाव जाणता. तेव्हा पुरवासी, माता व भरत यांचे भले होईल, असा उपाय सांगा. ॥ २५७ ॥

आरत कहहिं बिचारि न काऊ । सूझ जुआरिहि आपन दाऊ ॥

सुनि मुनि बचन कहत रघुराऊ । नाथ तुम्हारेहि हाथ उपऊ ॥

दुःखी लोक कधी विचार करुन बोलत नाहीत. जुगार्‍याला आपल्या डावाचाच विचार असतो.’ मुनींचे बोलणे ऐकून श्रीरघुनाथ म्हणू लागले-‘ गुरुवर्य ! उपाय तर तुमच्याच हाती आहे. ॥ १ ॥

सब कर हित रुख राउरि राखें । आयसु किएँ मुदित फुर भाषें ॥

प्रथम जो आयसु मो कहुँ होई । माथें मानि करौं सिख सोई ॥

तुमचे मनोगत राखण्यात व तुमची आज्ञा सत्य मानून प्रसन्नतेने तिचे पालन करण्यामध्येच सर्वांचे हित आहे. प्रथम मला जी आज्ञा असेल, ती मी शिरोधार्य मानून त्याप्रमाणे करीन. ॥ २ ॥

पुनि जेहि कहॅं जस कहब गोसाईं । सो सब भॉंति घटिहि सेवकाईं ॥

कह मुनि राम सत्य तुम्ह भाषा । भरत सनेहँ बिचारु न राखा ॥

तसेच हे स्वामी, तुम्ही ज्याला जसे सांगाल तसेच तो सर्व प्रकारे आज्ञेचे पालन करील. ‘ वसिष्ठ मुनी म्हणू लागले, ‘ हे राम, तुम्ही म्हणता ते खरे आहे. परंतु भरताच्या प्रेमापुढे माझा स्वतंत्र विचार टिकू शकत नाही. ॥ ३ ॥

तेहि तें कहउँ बहोरि बहोरी । भरत भगति बस भइ मति मोरी ॥

मोरें जान भरत रुचि राखी । जो कीजिअ सो सुभ सिव साखी ॥

म्हणून मी वारंवार म्हणतो की, माझी बुद्धी भरताच्या भक्तीच्या अधीन झाली आहे. माझ्या मते भरताची आवड सांभाळून जे काही केले जाईल, भगवान शंकर साक्षीला आहेत, ते सर्व शुभच होईल. ॥ ४ ॥

दोहा—भरत बिनय सादर सुनिअ करिअ बिचारु बहोरि ।

करब साधुमत लोकमत नृपनय निगम निचोरि ॥ २५८ ॥

प्रथम भरताची विनंती आदराने ऐकून घ्या, आणि त्यावर विचार करा. नंतर साधुमत, लोकमत, राजनीती आणि वेदांचे सार काढून त्याप्रमाणे करा.’ ॥ २५७ ॥

गुर अनुरागु भरत पर देखी । राम हृदयँ आनंदु बिसेषी ॥

भरतहि धरम धुरंधर जानी । निज सेवक तन मानस बानी ॥

गुरुंचे भरतावरील प्रेम पाहून श्रीरामांच्या मनास विशेष आनंद झाला. भरत हा धर्मधुरंधर व तन-मन-वचनाने आपला सेवक आहे, असे समजून, ॥ १ ॥

बोले गुर आयस अनुकूला । बचन मंजु मृदु मंगलमूला ॥

नाथ सपथ पितु चरन दोहाई । भयउ न भुअन भरत सम भाई ॥

श्रीरामचंद्र गुरुंच्या आज्ञेला अनुकूल, मनोहर, कोमल व कल्याणाचे मूळ असलेले वचन बोलले-‘ हे गुरुवर्य ! मी तुमची शपथ घेऊन व वडिलांच्या चरणांची आण घेऊन सत्य सांगतो की, विश्वामध्ये भरतासारखा भाऊ कोणी झालाच नाही. ॥ २ ॥

जे गुर पद अंबुज अनुरागी । ते लोकहुँ बेदहुँ बड़भागी ॥

राउर जा पर अस अनुरागू । को कहि सकइ भरत कर भागू ॥

जे लोक गुरुंच्या चरण-कमलांच्या ठायी अनुराग बाळगतात, ते लौकिक दृष्ट्या आणि वैदिक पारमार्थिक दृष्ट्या मोठ्या भाग्याचे होत. मग ज्याच्यावर तुमच्यासारख्या गुरुंचे असे प्रेम आहे, त्या भरताच्या भाग्याची वाखाणणी कोण करु शकेल ? ॥ ३ ॥

लखि लघु बंधु बुद्धि सकुचाई । करत बदन पर भरत बड़ाई ॥

भरतु कहहिं सोइ किएँ भलाई । अस कहि राम रहे अरगाई ॥

लहान भाऊ समजून भरताच्या तोंडावर त्याची प्रशंसा करण्यामध्ये माझ्या बुद्धीला संकोच वाटतो. तरीही मी सांगतो की, भरत जे काही सांगेल, त्याप्रमाणे करणे चांगले होय.’ एवढे बोलून श्रीरामचंद्र गप्प बसले. ॥ ४ ॥

दोहा—तब मुनि बोले भरत सन सब सँकोचु तजि तात ।

कृपासिंधु प्रिय बंधु सन कहहु हृदय कै बात ॥ २५९ ॥

तेव्हा मुनी भरताला म्हणाले, ‘ हे पुत्र ! सगळा संकोच सोडून कृपेचा सागर असलेल्या आपल्या प्रिय भावाला आपल्या मनातील विचार सांग. ‘ ॥ २५९ ॥

सुनि मुनि बचन राम रुख पाई । गुरु साहिब अनुकूल अघाई ॥

लखि अपनें सिर सबु छरु भारु । कहि न सकहिं कछु करहिं बिचारु ॥

मुनींचे वचन ऐकून आणि श्रीरामांचा कल पाहून, आणि ते दोघे आपल्याला अनुकूल असल्याचे पाहून, सर्व ओझे आपल्याच शिरावर आहे, असे भरताला वाटले व तो काही बोलू शकला नाही. विचार करु लागला. ॥ १ ॥

पुलकि सरीर सभॉं भए ठाढ़े । नीरज नयन नेह जल बाढ़े ॥

कहब मोर मुनिनाथ निबाहा । एहि तें अधिक कहौं मैं काहा ॥

पुलकित शरीराने तो सभेत उभा राहिला. कमल-नेत्रांतून प्रेमाश्रूंचा पूर आला. तो म्हणाला, ‘ माझे म्हणणे मुनिनाथांनी सांगून टाकले. यापेक्षा जास्त मी काय बोलू ? ॥ २ ॥

मैं जानउँ निज नाथ सुभाऊ । अपराधिहु पर कोह न काऊ ॥

मो पर कृपा सनेहु बिसेषी । खेलत खुनिस न कबहूँ देखी ॥

मी आपल्या स्वामींचा स्वभाव जाणतो. ते अपराध्यावरही कधी रागवत नाहीत. माझ्यावर तर त्यांची खास कृपा आणि प्रीति आहे. मी खेळामध्येही कधी त्यांना नाराज झालेले पाहिले नाही. ॥ ३ ॥

सिसुपन तें परिहरेउँ न संगू । कबहुँ न कीन्ह मोर मन भंगू ॥

मैं प्रभु कृपा रीति जियँ जोही । हारेहुँ खेलु जितावहिं मोही ॥

मी लहानपणापासून त्यांची सोबत सोडत नाही व त्यांनीही माझे मन कधी दुखवले नाही. मी प्रभूंच्या कृपेची रीत चांगल्या प्रकारे पाहिली आहे. खेळात मी हरलो, तरीही प्रभू मला जिंकू देत. ॥ ४ ॥

दोहा—महूँ सनेह सकोच बस सनमुख कही न बैन ।

दरसन तृपित न आजु लगि पेम पिआसे नैन ॥ २६० ॥

मी प्रेमामुळे व संकोचामुळे कधी त्यांच्यासमोर तोंड उघडले नाही. प्रेमाचे भुकेले माझे नेत्र प्रभूंचे दर्शन घेऊन आजवर कधी तृप्त झाले नाहीत. ॥ २६० ॥

बिधि न सकेउ सहि मोर दुलारा । नीच बीचु जननी मिस पारा ॥

यहउ कहत मोहि आजु न सोभा । अपनीं समझि साधु सुचि को भा ॥

परंतु विधात्याला श्रीरामांचे माझ्यावरील प्रेम सहन झाले नाही. त्याने माझ्या दुष्ट मातेच्या निमित्ताने आम्हा दोघांमध्ये अंतर निर्माण केले हे सांगणेही मला आज शोभत नाही; कारण स्वतःच्या समजुतीने कोणी साधू पवित्र झाला आहे काय ? ॥ १ ॥

मातु मंदि मैं साधु सुचाली । उर अस आनत कोटि कुचाली ॥

फरइ कि कोदव बालि सुसाली । मुकता प्रसव कि संबुक काली ॥

माता दुष्ट आहे आणि मी सदाचारी व साधू आहे, असे मनात आणणे हेच कोट्यावधी दुराचारांसारखे आहे. कदन्नाचे कणीस कधी उत्तम भात उत्पन्न करील काय ? काळा शिंपला कधी मोती उत्पन्न करील काय ? ॥ २ ॥

सपनेहुँ दोसक लेसु न काहू । मोर अभाग उदधि अवगाहू ॥

बिनु समुझें निज अघ परिपाकू । जारिउँ जायँ जननि कहि काकू ॥

स्वप्नातही कुणामध्येच दोषाचा लेशमात्रही नाही. माझे दुर्दैव हाच अथांग समुद्र आहे. मी आपल्या पायांचा परिणाम लक्षात न घेता मातेला कटू वचन बोलून विनाकारण दुखावले. ॥ ३ ॥

हृदयँ हेरि हारेउँ सब ओरा । एकहि भॉंति भलेहिं भल मोरा ।

गुर गोसाइँ साहिब सिय रामू । लागत मोहि नीक परिनामू ॥

मी आपल्या मनाला सर्व बाजूंनी धुंडाळून पाहिले व मी हरलो. माझ्या कल्याणाचा एकहि उपाय सुचत नाही. एकाच प्रकारे निश्चितपणे माझे भले होईल. ते म्हणजे गुरुमहाराज सर्वसमर्थ आहेत आणि श्रीसीताराम माझे स्वामी आहेत. यामुळे परिणाम चांगला होईल, असे मला वाटते. ॥ ४ ॥

दोहा—साधु सभॉं गुर प्रभु निकट कहउँ सुथल सतिभाउ ।

प्रेम प्रपंचु कि झूठ फुर जानहिं मुनि रघुराउ ॥ २६१ ॥

या साधूंच्या सभेमध्ये आणि गुरुजी व स्वामींच्या जवळ या पवित्र तीर्थ-स्थानात मी सत्य भावनेने सांगतो. हे प्रेम आहे की कपट ? खोटे आहे की खरे ? हे सर्वज्ञ मुनी वसिष्ठ आणि अन्तर्यामी श्रीरघुनाथ जाणतात. ॥ २६१ ॥

भूपति मरन पेम पनु राखी । जननी कुमति जगतु सबु साखी ॥

देखि न जाहिं बिकल महतारीं । जरहिं दुसह जर पुर नर नारीं ॥

प्रेमाचा पण पाळून पिताजींचे मरण ओढवणे आणि मातेची दुर्बुद्धी, यांच्या साक्षीला हे जग आहे. माता व्याकूळ आहेत, त्यांना पाहावत नाही. अयोध्यापुरीचे स्त्री-पुरुष दुःसह दुःखाने जळत आहेत. ॥ १ ॥

महीं सकल अनरथ कर मूला । सो सुनि समुझि सहिउँ सब सूला ॥

सुनि बन गवनु कीन्ह रघुनाथा । करिमुनि बेष लखन सिय साथा ॥

बिनु पानहिन्ह पयादेहि पाएँ । संकरु साखि रहेउँ एहि घाएँ ॥

बहुरि निहारि निषाद सनेहू । कुलिस कठिन उर भयउ न बेहू ॥

या सर्व अनर्थांचे मूळ मीच आहे. हे ऐकून आणि जाणून घेतल्यापासून मी सर्व दुःख भोगले आहे. श्रीरघुनाथ, लक्ष्मण आणि सीतेसोबत मुनींचा वेष धारण करुन अनवाणी पायी वनात गेले, हे ऐकून भगवान शंकर साक्षीला आहेत की, हा प्रहार झेलूनही मी जिवंत राहिलो. नंतर निषादराजाचे प्रेम पाहूनही माझे हे वज्राहून कठोर हृदय विदीर्ण झाले नाही. ॥ २-३ ॥

अब सबु आँखिन्ह देखेउँ आई । जिअत जीव जड़ सबइ सहाई ॥

जिन्हहि निरखि मग सॉंपिनि बीछी । तजहिं बिषम बिषु तामस तीछी ॥

आता येथे आल्यावर डोळ्यांनी सर्व पाहिले. माझा हा जड जीव जिवंत राहून मला पिडणार. ज्यांना पाहिल्यावर वाटेतील सर्पीण आणि विंचू हेसुद्धा आपले विष व आपला तीव्र क्रोध सोडून देतात, ॥ ४ ॥

दोहा—तेइ रघुनंदनु लखनु सिय अनहित लागे जाहि ।

तासु तनय तजि दुसह दुख दैउ सहावइ काहि ॥ २६२ ॥

तेच रघुनंदन, लक्ष्मण व सीता हे जिला शत्रू वाटले, त्या कैकेयीचा पुत्र असलेल्या मला सोडून दुःसह दुःख दुसर्‍या कोणाला सतावणार ? ॥ २६२ ॥

सुनि अति बिकल भरत बर बानी । आरति प्रीति बिनय नय सानी ॥

सोक मगन सब सभॉं खभारु । मनहुँ कमल बन परेउ तुसारु ॥

अत्यंत व्याकूळ व दुःख, प्रेम, विनय आणि नीती यांनी भरलेली भरताची वाणी ऐकून सर्व लोक शोक-मग्न झाले. सार्‍या सभेत विषाद पसरला. जणू कमलवनावर हिमपात झाला. ॥ १ ॥

कहि अनेक बिधि कथा पुरानी । भरत प्रबोधु कीन्ह मुनि ग्यानी ॥

बोले उचित बचन रघुनंदू । दिनकर कुल कैरव बन चंदू ॥

तेव्हा ज्ञानी मुनी वसिष्ठांनी अनेक प्रकारच्या प्राचीन कथा सांगून भरताचे समाधान केले. नंतर सूर्यकुलरुपी कुमुदवनाला प्रफुल्ल करणारे चंद्रमा श्रीरघुनाथ योग्य प्रकारे सांगू लागले. ॥ २ ॥

तात जायँ जियँ करहु गलानी । ईस अधीन जीव गति जानी ॥

तीनि काल तिभुअन मत मोरें । पुन्यसिलोक तात तर तोरें ॥

‘ हे भरता ! आपल्या मनात तू विनाकारण अपराधीपणा बाळगत आहेस. जीवाची गती ही ईश्र्वराच्या अधीन आहे, हे जाणून घे. माझ्या मते त्रिकालातील व त्रैलोक्यातील सर्व पुण्यात्मे पुरुष हे तुझ्याहून खालचे आहेत. ॥ ३ ॥

उर आनत तुम्ह पर कुटिलाई । जाइ लोकु परलोकु नसाई ॥

दोसु देहिं जननिहि जड़ तेई । जिन्ह गुर साधु सभा नहिं सेई ॥

मनातही तुझ्यावर आरोप केल्यास इहलोक व परलोक हे

 दोन्हीही नष्ट होतील. ते मूर्ख लोकच कैकेयी मातेला दोष

 देतात की, ज्यांनी गुरु व साधूंचा सत्संग केलेला नाही. ॥

 ४ ॥  


Custom Search

No comments: