Friday, August 19, 2022

KikshindhaKanda Part 8 ShriRamCharitManas Doha 21 to Doha 23 किष्किन्धाकाण्ड भाग ८ श्रीरामचरितमानस दोहा २१ ते दोहा २३

 

KikshindhaKanda Part 8
ShriRamCharitManas 
Doha 21 to Doha 23 
किष्किन्धाकाण्ड भाग ८ 
श्रीरामचरितमानस 
दोहा २१ ते दोहा २३

दोहा---एहि बिधि होत बतकही आए बानर जूथ ।

नाना बरन सकल दिसि देखिअ कीस बरुथ ॥ २१ ॥

अशाप्रकारे बोलणे चालले होते, एवढ्यात वानरांच्या झुंडी आल्या. अनेक रंगांचे वानरांचे समूह सर्व दिशांना दिसू लागले. ॥ २१ ॥

बानर कटक उमा मैं देखा । सो मूरुख जो करन चह लेखा ॥

आइ राम पद नावहिं माथा । निरखि बदनु सब होहिं सनाथा ॥

शिव म्हणतात, ‘ हे उमे, वानरांची ती सेना मी पाहिली होती. तिची गणती करणारा महामूर्ख होय. सर्व वानर येऊन श्रीरामांच्या चरणीं मस्तक ठेवत होते, आणि त्यांच्या सौंदर्य-माधुर्य-निधीअसलेल्या श्रीमुखाचे दर्शन घेऊन कृतार्थ होत होते. ॥ १ ॥

अस कपि एक न सेना माहीं । राम कुसल जेहि पूछी नाहीं ॥

यह कछु नहिं प्रभु कइ अधिकाई । बिस्वरुप ब्यापक रघुराई ॥

श्रीरामांनी ज्याची खुशाली विचारली नाही, असा सेनेमध्ये एकही वानर नव्हता. त्यांच्या दृष्टीने ही काही विशेष गोष्ट नव्हती,’ कारण श्रीरघुनाथ हे विश्वरुप आणि सर्वव्यापक आहेत. ॥ २ ॥

ठाड़े जहँ तहँ आयसु पाई । कह सुग्रीव सबहि समुझाई ॥

राम काजु अरु मोर निहोरा । बानर जूथ जाहु चहुँ ओरा ॥

आज्ञा घेऊन सर्वजण जिकडे तिकडे उभे राहिले. तेव्हा सुग्रीवाने सर्वांना समजावून सांगितले की, ‘ हे वानर-समूहांनो, हे श्रीरघुनाथांचे काम आहे आणि माझी तुम्हांला विनंती आहे. तुम्ही चोहीकडे जा, ॥ ३ ॥     

जनकसुता कहुँ खोजहु जाई । मास दिवस महँ आएहु भाई ॥

अवधि मेटि जो बिनु सुधि पाएँ । आवइ बनिहि सो मोहि मराएँ ॥

आणि जाऊन जानकीचा शोध घ्या. हे बंधूंनो, महिन्याभरात परत या. जो महिन्याभराचा काळ घालवून शोध न घेता परत येईल, त्याचा मी वध करीन.’ ॥ ४ ॥

दोहा---बचन सुनत सब बानर जहँ तहँ चले तुरंत ।

तब सुग्रीवँ बोलाए अंगद नल हनुमंत ॥ २२ ॥

सुग्रीवाचे बोलणे ऐकून सर्व वानर निरनिराळ्या दिशांना गेले. तेव्हा सुग्रीवाने अंगद, नल, हनुमान इत्यादी मुख्य-मुख्य योद्ध्यांना बोलावून सांगितले, ॥ २२ ॥

सुनहु नील अंगद हनुमाना । जामवंत मतिधीर सुजाना ॥

सकल सुभट मिलि दच्छिन जाहू । सीता सुधि पूँछेहु सब काढ

‘ हे स्थिर बुद्धी असणार्‍या चतुर नीला, अंगदा, जांबुवंता आणि हनुमाना ! तुम्ही सारे श्रेष्ठ योद्धे मिळून दक्षिणेकडे जा आणि भेटेल त्याला सीतेचा पत्ता विचारा. ॥ १ ॥

मन क्रम बचन सो जतन बिचारेहु । रामचंद्र कर काजु सँवारेहु ॥

भानु पीठि सेइअ उर आगी । स्वामिहि सर्ब भाव छल त्यागी ॥

मन, वचन व कर्माने सीतेचा शोध घेण्याचाच उपाय करा. श्रीरामचंद्रांचे काम पुरे करा. सूर्याचे पाठीमागून व अग्नीचे समोरुन सेवन करावे, परंतु स्वामींची सेवा फसवणूक न करता सर्वभावाने केली पाहिजे. ॥ २ ॥

तजि माया सेइअ परलोका । मिटहिं सकल भवसंभव सोका ॥

देह धरे कर यह फलु भाई । भजिअ राम सब काम बिहाई ॥

विषयांची ममता व आसक्ती सोडून परलोकीचे दिव्यधाम प्राप्त करण्यासाठी भगवत्सेवारुप असलेले साधन केले पाहिजे, त्यामुळे जन्म-मरणरुप भयामुळे उत्पन्न होणारे सर्व दुःख नाहीसे होईल. हे बंधूंनो, सर्व कामना सोडून श्रीरामांचे भजनच केले पाहिजे, हेच देह धारण करण्याचे फल आहे. ॥ ३ ॥

सोइ गुनग्य सोई बड़भागी । जो रघुबीर चरन अनुरागी ॥

आयसु मागि चरन सिरु नाई । चले हरषि सुमिरत रघुराई ॥

जो श्रीरघुनाथंच्या चरणांचा भक्त असतो, तो सद्गुरु जाणणारा आणि मोठ्या भाग्याचा असतो. ‘ मग सर्वजण आज्ञा घेऊन व चरणी मस्तक नमवून श्रीरामचंद्रांचे स्मरण करीत आनंदाने निघाले. ॥ ४ ॥

पाछें पवन तनय सिरु नावा । जानि काज प्रभु निकट बोलावा ॥

परसा सीस सरोरुह पानी । करमुद्रिका दीन्हि जन जानी ॥

सर्वांच्या शेवटी पवनसुत हनुमानाने मस्तक नमविले. कार्याचे महत्व लक्षात आणून प्रभूंनी त्याला जवळ बोलाविले. त्यांनी आपल्या कर-कमलांनी त्याच्या मस्तकाला स्पर्श केला आणि आपला खास सेवक समजून आपल्या हातातील अंगठी काढून त्याला दिली. ॥ ५ ॥

बहु प्रकार सीतहि समुझाएहु । कहि बल बिरहु बेगि तुम्ह आएहु ॥

हनुमत जन्म सुफल करि माना । चलेउ हृदयँ धरि कृपानिधाना ॥

आणि म्हटले, ‘ अनेक प्रकारे सीतेला समजावून सांग आणि माझे सामर्थ्य व विरह हे तिला सांगून तू लवकर परत ये.’ यामुळे हनुमानाला आपला जन्म सार्थक झाल्याचे वाटले आणि प्रभूंना हृदयामध्ये धारण करुन तो निघाला. ॥ ६ ॥

जद्यपि प्रभु जानत सब बाता । राजनीति राखत सुरत्राता ॥

देवांचे रक्षण करणारे प्रभू सर्व गोष्टी जाणतात. परंतु ते राजनीती पाळण्यासाठी व नीतीची मर्यादा राखण्यासाठी सीतेचा शोध घेण्याकरिता वानरांना सर्वत्र पाठवीत आहेत. ॥ ७ ॥

दोहा—चले सकल बन खोजत सरिता सर गिरि खोह ।

राम काज लयलीन मन बिसरा तन कर छोह ॥ २३ ॥

सर्व वानर वन, नदी, तलाव, पर्वतांवरील गुहा यांमध्ये शोधत निघाले, मन श्रीरामांच्या कार्यामध्ये मग्न होते. ते शरीराचे ममत्वही विसरले होते. ॥ २३ ॥

कतहुँ होइ निसिचर सैं भेंटा । प्रान लेहिं एक एक चपेटा ॥

बहु प्रकार गिरि कानन हेरहिं । कोउ मुनि मिलइ ताहि सब घेरहिं ॥

कुठे राक्षस भेटला, तर ते एकेका थपडीने त्यांचे प्राण घेत होते, ते पर्वत व वने याठिकाणी तर्‍हेतर्‍हेने शोधत होते. कुणी मुनी भेटला, तर सीतेचा पत्ता विचारण्यासाठी त्याच्याजवळ कोंडाळे करीत होते. ॥ १ ॥

लागि तृषा अतिसय अकुलाने । मिलइ न जल घन गहन भुलाने ॥

मन हनुमान कीन्ह अनुमाना । मरन चहत सब बिनु जल पाना ॥

इतक्यात तहान लागल्यामुळे सर्व व्याकुळ झाले, परंतु कुठेही पाणी मिळेना. दाट जंगलात सर्वजण भरकटले. हनुमानाला अदाज आला की, पाणी मिळाले नाही तर सर्व मरतील. ॥ २ ॥

चढ़ि गिरि सिखर चहूँ दिसि देखा । भूमि बिबर एक कौतुक पेखा ॥

चक्रबाक बक हंस उड़ाहीं । बहुतक खग प्रबिसहिं तेहि माहीं ॥

त्याने डोंगराच्या शिखरावर जाऊन चोहीकडे पाहिले, तेव्हा त्याला पृथ्वीवर एका गुहेमध्ये एक आश्चर्यजनक गोष्ट दिसली. तिच्यावर पुष्कळ चक्रवाक, बगळे आणि हंस उडत होते आणि पुष्कळ पक्षी त्या गुहेत जात होते. ॥ ३ ॥

गिरि ते उतरि पवनसुत आवा । सब कहुँ लै सोइ बिबर देखावा ॥

आगें कै हनुमंतहि लीन्हा । पैठे बिबर बिलंबु न कीन्हा ॥

पवनकुमार हनुमानाने पर्वतावरुन खाली उतरुन सर्वांना

 ती गुहा दाखविली. सर्वजण हनुमानाला पुढे करुन वेळ

 न घालविता गुहेत घुसले. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: