Showing posts with label श्रीरामचरितमानस भाग २७. Show all posts
Showing posts with label श्रीरामचरितमानस भाग २७. Show all posts

Sunday, July 12, 2020

ShriRamcharitmans Part 27 श्रीरामचरितमानस भाग २७


ShriRamcharitmans Part 27 श्रीरामचरितमानस भाग २७ 
दोहा १६६ ते १६९ 
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड

दोहा—होहिं बिप्र बस कवन बिधि कहहु कृपा करि सोउ ।
तुम्ह तजि दीनदयाल निज हितू न देखउँ कोउ ॥ १६६ ॥
ते ब्राह्मण कोणत्या प्रकारे वश होऊ शकतील, तेही कृपा करुन मला सांगा. हे दीनदयाळू, तुम्हांला सोडून दुसर्‍या कुणालाही मी आपला हितचिंतक समजत नाही,’ ॥ १६६ ॥
सुनु नृप बिबिध जतन जग माहीं । कष्टसाध्य पुनि होहिं कि नाहीं ॥
अहइ एक अति सुगम उपाई ॥ तहाँ परंतु एक कठिनाई ॥
( तपस्वी म्हणाला, ) ‘ हे राजा, जगात अनेक उपाय आहेत, परंतु ते कष्टसाध्य आहेत आणि त्यामुळे ते सिद्ध होतील किंवा न होतील ( सांगता येत नाहीं. ) एक उपाय फार सोपा आहे, परंतु त्यातही एक अडचण आहे. ॥ १ ॥
मम आधीन जुगुति नृप सोई । मोर जाब तव नगर न होई ॥
आजु लगें अरु जब तें भयउँ । काहू के गृह ग्राम न गयऊँ ॥
हे राजा, ती युक्ती माझ्याजवळ आहे. पण तुझ्या नगरात मला जाता येणार नाही. जेव्हापासून मी उत्पन्न झालो, तेव्हापासून आजपर्यंत मी कुणाच्या घरी किंवा गावी गेलो नाही. ॥ २ ॥
जौं न जाउँ तव होइ अकाजू । बन आइ असमंजस आजू ॥
सुनि महीस बोलेउ मृदु बानी । नाथ निगम असि नीति बखानी ॥
परंतु जर गेलो नाही तर तुझे काम फिसकटेल. आज मी मोठ्या पेचांत सापडलो आहे.’ हे ऐकून राजा मृदु स्वरात म्हणाला, ‘ हे नाथ, वेदांमध्ये असे सांगितले आहे की, ॥ ३ ॥
बड़े सनेह लघुन्ह पर करहीं । गिरि निज सिरनि सदा तृन धरहीं ॥
जलधि अगाध मौलि बह फेनू । संतत धरनि धरत सिर रेनू ॥
मोठी माणसे लहानांच्यावर प्रेम करतातच. पर्वत आपल्या शिरावर नेहमी गवत धारण करतात. खोल समुद्र स्वतःच्या मस्तकावर फेस धारण करतात आणि धरती आपल्या डोक्यावर धूळ धारण करते.’ ॥ ४ ॥
दोहा—अस कहि गहे नरेस पद स्वामी होहु कृपाल ।
मोहि लागि दुख सहिअ प्रभु सज्जन दीनदयाल ॥ १६७ ॥
असे म्हणून राजाने  मुनीचे पाय धरले. ( आणि म्हटले, ) ‘ हे स्वामी, कृपा करा. तुम्ही संत आहात. दीनदयाळ आहात. म्हणून हे प्रभो, माझ्यासाठी एवढा त्रास जरुर सोसा. ॥ १६७ ॥
 जानि नृपहि आपन आधीन । बोला तापस कपट प्रबीना ॥
सत्य कहउँ भूपति सुनु तोही । जग नाहिन दुर्लभ कछु मोही ॥
राजा आपल्या पूर्ण अधीन झाला आहे, हे पाहून कपटी तपस्वी म्हणाला, ‘ हे राजा ! ऐक. मी तुला खरे सांगतो. या जगात मला काहीही कठीण नाही. ॥ १ ॥
अवसि काज मैं करिहउँ तोरा । मन तन बचन भगत तैं मोरा ॥
जोग जुगुति तप मंत्र प्रभाऊ । फलइ तबहिं जब करिअ दुराऊ ॥
मी तुझे काम नक्की करीन. कारण तू कायावाचामनाने माझा भक्त झाला आहेस. परंतु योग, युक्ती आणि मंत्र यांचा प्रभाव गुप्तपणे केल्यावरच फल देतो. ॥ २ ॥
जौं नरेस मैं करौं रसोई । तुम्ह परुसहु मोहि जान न कोई ॥
अन्न सो जोइ जोइ भोजन करई । सोइ सोइ तव आयसु अनुसरई ॥
हे राजा ! मी जर स्वयंपाक केला व तुम्ही तो वाढला, पण मी जर कुणालाही ओळखू आलो नाही, तर मग ते अन्न जो खाईल, तो तो तुमचा आज्ञाधारक होईल. ॥ ३ ॥
पुनि तिन्ह के गृह जेवँइ जोऊ । तव बस होइ भूप सुनु सोऊ ॥
जाइ उपाय रचहु नृप एहू । संबत भरि संकलप करेहू ॥
एवढेच नव्हे, तर त्यांच्या घरीसुद्धा जो कोणी हे भोजन करील, हे राजा, तो सुद्धा तुझ्या अधीन होईल. हे राजा, जाऊन हा उपाय कर आणि वर्षभर भोजन घालण्याचा संकल्प कर. ॥ ४ ॥
दोहा—नित नूतन द्विज सहस सत बरेहु सहित परिवार ।
मैं तुम्हरे संकलप लगि दिनहिं करबि जेवनार ॥ १६८ ॥
नित्य नव्या एक लाख ब्राह्मणांना कुटुंबासह निमंत्रित कर. मी तुझ्या संकल्पापर्यंत ( वर्षभर ) रोज स्वयंपाक करीन. ॥ १६८ ॥
एहि बिधि भूप कष्ट अति थोरें । होइहहिं सकल बिप्र बस तोरें ॥
करिहहिं बिप्र होम मख सेवा । तेहिं प्रसंग सहजेहिं बस देवा ॥
हे राजा,अशा प्रकारे फार थोड्या श्रमाने सर्व ब्राह्मण तुला वश होतील. ब्राह्मण हवन, यज्ञ आणि सेवा-पूजा करतील, त्यामुळे देवसुद्धा सहजपणे वश होतील. ॥ १ ॥
और एक तोहि कहउँ लखाऊ । मैं एहि बेष न आउब काऊ ॥
तुम्हरे उपरोहित कहुँ राया । हरि आनब मैं करि निज माया ॥
मी आणखी एक ओळख तुला सांगून ठेवतो. मी या रुपात कधीही येणार नाही. हे राजा, मी आपल्या मायेने तुझ्या पुरोहिताला इकडे पळवून आणीन. ॥ २ ॥
तपबल तेहि करि आपु समाना । रखिहउँ इहाँ बरष परवाना ॥
मैं धरि तासु बेषु सुनु राजा । सब बिधि तोर सँवारब काजा ॥
तपाच्या शक्तीने त्याला स्वतःसारखा बनवून एक वर्ष येथे ठेवून घेईन आणि हे राजा, मी त्याचे रुप घेऊन सर्व प्रकारे तुझे काम पूर्ण करीन. ॥ ३ ॥
गै निसि बहुत सयन अब कीजे । मोहि तोहि भूप भेंट दिन तीजे ॥
मैं तपबल तोहि तुरग समेता । पहुँचैहउँ सोवतहि निकेता ॥
हे राजा, रात्र फार झाली आहे, आता झोप. आजपासून तिसर्‍या दिवशी माझी-तुझी भेट होईल. तपोबलाने मी तुला घोड्यासह झोपेमध्ये असतानाच घरी पोहोचवीन. ॥ ४ ॥
दोहा—मैं आउब सोइ बेषु धरि पहिचानेहु तब मोहि ।
जब एकांत बोलाइ सब कथा सुनावौं तोहि ॥ १६९ ॥
मी तो पुरोहिताचा वेष घेऊन येईन. जेव्हा एकांतात बोलावून सर्व गोष्टी सांगेन, तेव्हा तू मला ओळखशील.’ ॥ १६९ ॥
सयन कीन्ह नृप आयसु मानी । आसन जाइ बैठ छलग्यानी ॥
श्रमित भूप निद्रा अति आई । सो किमि सोव सोच अधिकाई ॥
राजा ती आज्ञा मानून झोपी गेला आणि तो कपटी तपस्वी आसनावर जाऊन बसला. राजा थकला होता, त्याला फार गाढ झोप आली. पण तो कपटी कसा झोपणार ? त्याला फार काळजी वाटत होती. ॥ १ ॥
कालकेतु निसिचर तहँ आवा । जेहिं सूकर होइ नृपहि भुलावा ॥
परम मित्र तापस नृप केरा । जानइ सो अति कपट घनेरा ॥
त्याच वेळी तेथे कालकेतू नावाचा राक्षस आला. त्याने डुक्कराचे रुप घेऊन राजाची दमछाक केली होती. तो तपस्वी बनलेल्या राजाचा खास मित्र होता आणि कपट विद्येत निष्णात होता. ॥ २ ॥
तेहि के सत सुत अरु दस भाई । खल अति अजय देव दुखदाई ॥
प्रथमहिं भूप समर सब मारे । बिप्र संत सुर देखि दुखारे ॥
त्याला शंभर मुले आणि दहा भाऊ होते. ते फार दुष्ट व अजिंक्य होते. देवांना दुःख देणारे होते. ब्राह्मण, संत आणि देवांना दुःखी झाल्याचे पाहून प्रतापभानूने त्या सर्वांना पूर्वीच युद्धात मारुन टाकले होते. ॥ ३ ॥
तेहिं खल पाछिल बयरु सँभारा । तापस नृप मिलि मंत्र बिचारा ॥
जेहिं रिपु छय सोइ रचेन्हि उपाऊ । भावी बस न जान कछु राऊ ॥
त्या दुष्टाने पूर्वींचे वैर लक्षात घेऊन कपटी तपस्वी-

राजाला भेटून त्याच्याशी सल्लामसलत केली आणि

 शत्रूचा नाश ज्याप्रमाणे होईल, तो उपाय योजला.

 भवितव्यतेच्या अधीन झालेला राजा ( प्रतापभानू ) 

काहीही समजू शकला नाही. ॥ ४ ॥


Custom Search