Saturday, November 28, 2020

Shri RamCharitManas Part 64 श्रीरामचरितमानस भाग ६४

 

Shri RamCharitManas Part 64
Doha 288 to 292
श्रीरामचरितमानस भाग ६४
दोहा २८८ ते २९२
श्रीरामचरितमानस बालकाण्ड

सौरभ पल्लव सुभग सुठि किए नीलमनि कोरि ।

हेम बौर मरकत घवरि लसत पाटमय डोरि ॥ २८८ ॥

नीलमणी कोरुन अत्यंत सुंदर आंब्याची पाने बनविली होती. सोन्यापासून आंब्याचा मोहोर तयार केला होता आणि रेशमाच्या दोरीने बांधून पाचूच्या फळांचे बनविलेले गुच्छ शोभून दिसत होते. ॥ २८८ ॥

रचे रुचिर बर बंदनिवारे । मनहुँ मनोभवँ फंद सँवारे ॥

मंगल कलस अनेक बनाए । ध्वज पताक पट चमर सुहाए ॥

अशी सुंदर व उत्तम तोरणे बनविली होती की, जणू कामदेवाने फासे सजवून ठेवले असावेत. अनेक मंगल-कलश, सुंदर ध्वज, पताका, पडदे आणि चवर्‍या बनविल्या होत्या. ॥ १ ॥

दीप मनोहर मनिमय नाना । जाइ न बरनि बिचित्र बिताना ॥

जेहिं मंडप दुलहिनि बैदेही । सो बरनै असि मति कबि केही ॥

रत्नांनी बनविलेल्या सुंदर दिव्यांमुळे त्या विलक्षण मंडपाचे वर्णनच करता येणे अशक्य होते. ज्या मंडपामध्ये जानकी नवरी बनून येणार त्याचे वर्णन करु शकण्याची बुद्धी कुणा कवीमध्ये असेल ? ॥ २ ॥

दूलहु रामु रुप गुन सागर । सो बितानु तिहुँ लोक उजागर ॥

जनक भवन कै सोभा जैसी । गृह गृह प्रति पुर देखिअ तैसी ॥

ज्या मंडपामध्ये रुप व गुणांचा सागर श्रीरामचंद्र वर म्हणून असतील, तो त्रैलोक्यात प्रसिद्धच असायला हवा. जनकांच्या महालाची जशी शोभा होती, तशीच शोभा नगरातील प्रत्येक घरात दिसत होती. ॥ ३ ॥

जेहिं तेरहुति तेहि समय निहारी । तेहि लघु लगहिं भुवन दस चारी ॥

जो संपदा नीच गृह सोहा । सो बिलोकि सुरनायक मोहा ॥

त्यावेळी ज्याने मिथिला प्रदेश पाहिला, त्याला चौदा भवनही तुच्छ वाटले. जनकपुरातील दरिद्री लोकांच्या घरातही त्यावेळी जी संपत्ती शोभत होती, ती पाहून इंद्रसुद्धा मोहून जात होता. ॥ ४ ॥

दोहा—बसइ नगर जेहिं लच्छि करि कपट नारि बर बेषु ।

तेहि पुर कै सोभा कहत सकुचहिं सारद सेषु ॥ २८९ ॥

ज्या नगरीत प्रत्यक्ष लक्ष्मीने मानवी स्त्रीचे सुंदर रुप धारण करुन निवास केलेला आहे, त्या नगरीच्या शोभेचे वर्णन करण्यास सरस्वती आणि शेष हेसुद्धा संकोच करतात. ॥ २८९ ॥

पहुँचे दूत राम पुर पावन । हरषे नगर बिलोकि सुहावन ॥

भूप द्वार तिन्ह खबरि जनाई । दसरथ नृप सुनि लिए बोलाई ॥

जनकाचे दूत श्रीरामचंद्रांची पवित्र नगरी अयोध्येमध्ये पोहोचले. सुंदर नगर पाहून ते आनंदित झाले. राजद्वारावर जाऊन त्यांनी निरोप पाठविला. राजा दशरथांनी तो ऐकताच दूतांना बोलावून घेतले. ॥ १ ॥

करि प्रनामु तिन्ह पाती दीन्ही । मुदित महीप आपु उठि लीन्ही ॥

बारि बिलोचन बॉंचत पाती । पुलक गात आई भरि छाती ॥

दूतांनी प्रणाम करुन पत्र दिले. प्रसन्न होऊन राजांनी ते स्वतः उठून घेतले. पत्र वाचताना त्यांच्या नेत्रांमध्ये प्रेम व आनंदाचे अश्रू आले. शरीर रोमांचित झाले आणि ऊर भरुन आला. ॥ २ ॥

रामु लखनु उर कर बर चीठी । रहि गए कहत न खाटी मीठी ॥

पुनि धरि धीर पत्रिका बॉंची । हरषी सभा बात सुनि सॉंची ॥

हृदयामध्ये राम व लक्ष्मण आहेत, हातात सुंदर पत्र आहे. राजा ते हातात घेऊन तसेच राहिले. बरे-वाईट काहीच बोलता येईना, म्हणून स्तब्ध राहिले. नंतर धैर्य धरुन त्यांनी पत्र वाचले. संपूर्ण सभा सत्य ऐकून हर्षित झाली. ॥ ३ ॥

खेलत रहे तहॉं सुधि पाई । आए भरतु सहित हित भाई ॥

पूछत अति सनेहँ सकुचाई । तात कहॉं तें पाती आई ॥

भरत आपल्या मित्रांसोबत व बंधू शत्रूघ्नसोबत जेथे खेळत होते, तेथे वर्तमान समजताच ( राजा दशरथांजवळ ) येऊन पोहोचले. फार प्रेमाने संकोच वाटून त्यांनी विचारले, बाबा, पत्र कुठून आले आहे ? ॥ ४ ॥

दोहा—कुसल प्रानप्रिय बंधु दोउ अहहिं कहहु केहिं देस ।

सुनि सनेह साने बचन बाची बहुरि नरेस ॥ २९० ॥

आमचे प्राणप्रिय दोन्ही भाऊ खुशाल आहेत ना ? ते कोणत्या देशात आहेत ? ‘ ते स्नेहपूर्ण वचन ऐकून राजांनी पुन्हा पत्र वाचले. ॥ २९० ॥

सुनि पाती पुलके दोउ भ्राता । अधिक सनेहु समात न गाता ॥

प्रीति पुनीत भरत कै देखी । सकल सभॉं सुखु लहेउ बिसेषी ॥

पत्रातील मजकूर ऐकून दोघे भाऊ रोमांचित झाले. प्रेम इतके दाटून आले होते की, मनात मावत नव्हते. भरताचे पवित्र प्रेम पाहून संपूर्ण सभा सुखावून गेली. ॥ १ ॥

तब नृप दूत निकट बैठारे । मधुर मनोहर बचन उचारे ॥

भैआ कहहु कुसल दोउ बारे । तुम्ह नीकें निज नयन निहारे ॥

मग राजांनी दूतांना जवळ बसवून घेऊन मन मोहून टाकणार्‍या मधुर शब्दांत विचारले. बंधूंनो, दोघे मुलगे खुशाल आहेत ना ? तुम्ही त्यांना आपल्या डोळ्यांनी नीट पाहिले आहे ना ? ॥ २ ॥

स्यामल गौर धरें धनु भाथा । बय किसोर कौसिक मुनि साथा ॥

पहिचानहु तुम्ह कहहु सुभाऊ । प्रेम बिबस पुनि पुनि कह राऊ ॥

सवळ्या व गोर्‍या रंगाचे ते दोघे धनुष्य व भाते धारण करतात, किशोर वयाचे आहेत, विश्र्वामित्र मुनींच्या सोबत आहेत. तुम्ही त्यांना ओळखत आहात, तर त्यांचा स्वभाव सांगा बरे ! ‘ अशाप्रकारे प्रेमविवश होऊन महाराज दूतांना विचारु लागले. ॥ ३ ॥

जा दिन तें मुनि गए लवाई । तब तें आजु सॉंचि सुधि पाई ॥

कहहु बिदेह कवन बिधि जाने । सुनि प्रिय बचन दूत मुसुकाने ॥

‘ अरे बाबांनो, ज्या दिवसापासून मुनी त्यांना घेऊन गेले आहेत, तेव्हापासून आजच आम्हांला त्यांची वार्ता समजत आहे. जनक महाराजांनी त्यांना कसे ओळखले ? ‘ हे प्रेमाचे बोलणे ऐकून दूतांना हसू आले. ॥ ४ ॥

दोहा—सुनहु महीपति मुकुट मनि तुम्ह सम धन्य न कोउ ।

रामु लखनु जिन्ह के तनय बिस्व बिभूषन दोउ ॥ २९१ ॥

ते म्हणाले, ‘ हे राजांचे मुकुटमणी, ऐका. तुमच्यासारखा धन्य कोणी नाही. राम-लक्ष्मणांसारखे पुत्र तुम्हांला आहेत. कारण विश्वाला ललामभूत असे ( ते आहेत. ). ॥ २९१ ॥

पूछन जोगु न तनय तुम्हारे । पुरुषसिंघ तिहु पुर उजिआरे ॥

जिन्ह के जस प्रताप कें आगे । ससि मलीन रबि सीतल लागे ॥

आपल्या पुत्रांबद्दल विचारण्याची गरजच नाही. ते पुरुषसिंह तिन्ही लोकांना प्रकाशस्वरुप आहेत. त्यांच्या कीर्तीपुढे चंद्र मलिन आणि प्रतापापुढे चंद्र शीतल वाटतो. ॥ १ ॥

तिन्ह कहँ कहिअ नाथ किमि चीन्हे । देखिअ रबि कि दीप कर लीन्हे ॥

सीय स्वयंबर भूप अनेका । समिटे सुभट एक तें एका ॥

हे नाथ, तुम्ही विचारले की, त्यांना राजा जनकांनी कसे ओळखले. हातात दिवा घेऊन सूर्याला पाहावे लागते काय ? सीतेच्या स्वयंवरात अनेक राजे आणि एकापेक्षा एक मोठे योद्धे एकत्र जमले होते. ॥ २ ॥

संभु सरासनु काहुँ न टारा । हारे सकल बीर बरिआरा ॥

तीनि लोक महँ जे भटमानी । सभा कै सकति संभु धनु भानी ॥

परंतु भगवान शिवांचे धनुष्य कोणीही हलवू शकले नाही. सर्व बलवान हरले. तिन्ही लोकांत जे वीरतेची घमेंड बाळगणारे होते, त्या सर्वांची शक्ती शिव-धनुष्याने मोडीत काढली. ॥ ३ ॥

सकइ उठाइ सरासुर मेरु । सोउ हियँ हारि गयउ करि फेरु ॥

जेहिं कौतुक सिवसैलु उठावा । सोउ तेहि सभॉं पराभउ पावा ॥

सुमेरु पर्वत उचलू शकणारा ‘ बाणासुर ‘सुद्धा मनातून पराजित होऊन प्रदक्षिणा घालून निघून गेला. ज्याने मजेने कैलास पर्वत उचलला होता, तो रावणसुद्धा सभेमध्ये पराभूत झाला. ॥ ४ ॥

दोहा—तहॉं राम रघुबंसमनि सुनिअ महा महिपाल ।

भंजेउ चाप प्रयास बिनु जिमि गज पंकज नाल ॥ २९२ ॥

हे महाराज, ऐका. तेथे रघुवंशरत्न श्रीरामचंद्रांनी विनासायास शिव-धनुष्य असे मोडून टाकले की, ज्याप्रमाणे हत्ती कमळाचा देठ तोडून टाकतो. ॥ २९२ ॥

सुनि सरोष भृगुनायकु आए । बहुत भॉंति तिन्ह आँखि देखाए ॥

देखि राम बलु निज धनु दीन्हा । करि बहु बिनय गवनु बन कीन्हा ॥

धनुष्य मोडल्याचे ऐकताच परशुराम रागारागाने आले त्या दोघांवर ताव काढू लागले. शेवटी त्यांनी श्रीरामांचे सामर्थ्य लक्षात येताच आपले धनुष्य त्यांना दिले व अनेक प्रकारे त्यांना विनवून स्वतः वनात गमन केले. ॥ १ ॥

राजन रामु अतुलबल जैसें । तेज निधान लखनु पुनि तैसें ॥

कंपहिं भूप बिलोकत जाकें । जिमि गज हरि किसोर के ताकें ॥

हे राजन, ज्याप्रमाणे श्रीरामचंद्र अतुलनीय बलवान आहेत, तसेच तेजो निधान लक्ष्मणसुद्धा आहेत. ज्याप्रमाणे हत्ती एखाद्या सिंहाच्या छाव्याची नजर पडताच कापू लागतात, त्याप्रमाणे श्रीराम-लक्ष्मण यांनी पाहताच राजे लोक घाबरत होते. ॥ २ ॥

देव देखि तव बालक दोऊ । अब न आँखि तर आवत कोऊ ॥

दूत बचन रचना प्रिय लागी । प्रेम प्रताप बीर रस पागी ॥

हे देव, तुमचे दोन्ही मुलगे पाहिल्यावर आता नजरेत दुसरे कोणी भरतच नाहीत. ‘ प्रेम, प्रताप आणि वीर-रसाने ओथंबलेले दूतांचे वर्णन सर्वांना खूप आवडले. ॥ ३ ॥

सभा समेत राउ अनुरागे । दूतन्ह देन निछावरि लागे ॥

कहि अनीति ते मूदहिं काना । धरमु बिचारि सबहिं सुखु माना ॥

ते ऐकून संपूर्ण सभा व राजा दशरथ प्रेमामध्ये बुडून गेले 

आणि दूतांची प्रशंसा करु लागले. ते पाहून ‘ आमची 

प्रशंसा नीतिविरुद्ध आहे’ असे म्हणत दूत आपले कान 

बंद करु लागले. त्यांचे धर्मानुकूल आचरण पाहून सर्वांना 

आनंद वाटला. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: