Friday, April 2, 2021

AyodhyaKanda Part 15 अयोध्याकाण्ड भाग १५

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 15 
Doha 83 to 88 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग १५ 
दोहा ८३ ते ८८

दोहा—हय गय कोटिन्ह केलिमृग पुरपसु चातक मोर ।

पिक रथांग सुक सारिका सारस हंस चकोर ॥ ८३ ॥

कोट्यावधी घोडे, हत्ती, खेळण्यासाठी पाळलेली हरणे, नगरातील गाई, बैल, बकरी इत्यादी पशू, चातक मोर, कोकिळ, चक्रवाक, पोपट, मैना, सारस, हंस, चकोर, ॥ ८३ ॥

राम बियोग बिकल सब ठाढ़े । जहँ तहँ मनहुँ चित्र लिखि काढ़े ॥

नगरु सफल बनु गहबर भारी । खग मृग बिपुल सकल नर नारी ॥

हे सर्व श्रीरघुनाथांच्या वियोगामुळे व्याकुळ होऊन चित्रात काढल्यासारखे इकडे तिकडे स्तब्ध उभे होते. नगर जणू फळांनी भरलेले घनदाट जंगल होते. नगरवासी सर्व स्त्री-पुरुष हे पुष्कळसे पशु-पक्षी होते. ॥ १ ॥

बिधि कैकई किरातिनि कीन्ही । जेहिं दव दुसह दसहुँ दिसि दीन्ही ॥

सहि न सके रघुबर बिरहागी । चले लोग सब ब्याकुल भागी ॥

विधात्याने कैकेयीला भिल्लीण बनविले. तिने दाही दिशांना दुःसह वणवा पेटवून दिला. श्रीरामचंद्रांच्या विरहाची ही आग लोक सहन करु शकले नाहीत. सर्व लोक व्याकूळ होऊन पळून गेले. ॥ २ ॥

सबहिं बिचारु कीन्ह मन माहीं । राम लखन सिय बिनु सुखु नाहीं ॥

जहॉं रामु तहँ सबुइ समाजु । बिनु रघुबीर अवध नहिं काजू ॥

सर्वांनी मनांत विचार केला की, श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्याविना सुख नाही. जिथे श्रीराम राहतील, तेथेच सर्व समाज राहील. श्रीरामचंद्रांच्याविना अयोध्येमध्ये आमचे काही काम नाही. ॥ ३ ॥

चले साथ अस मंत्रु दृढ़ाई । सुर दुर्लभ सुख सदन बिहाई ॥

राम चरन पंकज प्रिय जिन्हही । बिषय भोग बस करहिं कि तिन्हही ॥

असा पक्का विचार करुन व देवांनाही दुर्लभ अशी सुखे नांदणारी घरे सोडून सर्वजण श्रीरामांच्याबरोबर निघाले. ज्यांना श्रीरामांची चरण-कमले प्रिय आहेत, त्यांना कधी विषयभोग वश करु शकतील काय ? ॥ ४ ॥

दोहा—बालक बृद्ध बिहाइ गृहँ लगे लोग सब साथ ।

तमसा तीर निवासु किय प्रथम दिवस रघुनाथ ॥ ८४ ॥

मुले व म्हातारे-कोतारे यांना घरांत सोडून सर्व लोक श्रीरामांच्याबरोबर निघाले. पहिल्या दिवशी श्रीरघुनाथांनी तमसा नदीच्या किनार्‍यावर निवास केला. ॥ ८४ ॥

रघुपति प्रजा प्रेमबस देखी । सदय हृदयँ दुखु भयउ बिसेषी ॥

करुनामय रघुनाथ गोसॉंई । बेगि पाइअहिं पीर पराई ॥

प्रजेचे प्रेम पाहून श्रीरघुनाथांचे कृपाळू मन अतिशय द्रवले. प्रभू श्रीरघुनाथ करुणामय आहेत. दुसर्‍याची पीडा त्यांना चटकन जाणवते. ॥ १ ॥

कहि सप्रेम मृदु बचन सुहाए । बहुबिधि राम लोग समुझाए ॥

किए धरम उपदेस घनेरे । लोग प्रेम बस फिरहिं न फेरे ॥

प्रेमयुक्त कोमल व सुंदर वचने बोलून श्रीरामांनी पुष्कळ प्रकारे लोकांना समजावले आणि बराच धर्मविषयक उपदेश केला. परंतु प्रेमामुळे लोक परत पाठविले, तरी ते परतत नव्हते. ॥ २ ॥

सीलु सनेहु छाड़ि नहिं जाई । असंमजस बस भे रघुराई ॥

लोग सोग श्रम बस गए सोई । कछुक देवमायॉं मति मोई ॥

शील व स्नेह सोडता येत नाही. श्रीरघुनाथ गोंधळून गेले. शोक व थकवा यांमुळे लोक झोपी गेले आणि देवांच्या काहीशा मायेमुळे त्यांची बुद्धी मोहित झाली. ॥ ३ ॥

जबहिं जाम जुग जामिनि बीती । राम सचिव सन कहेउ सप्रीती ॥

खोज मारि रथु हॉंकहु ताता । आन उपायँ बनिहि नहिं बाता ॥ ]

दोन प्रहर रात्र झाली, तेव्हां श्रीरामचंद्रांनी प्रेमाने मंत्री सुमंत्राला सांगितले की, ‘ तात, चाकोर्‍या दिसून येणार नाहीत, अशा रीतीने रथ हाका. याखेरीज दुसरा उपाय नाही.’ ॥ ४ ॥

दोहा—राम लखन सिय जान चढ़ि संभु चरन सिर नाइ ।

सचिवँ चलायउ तुरत रथु इत उत खोज दुराइ ॥ ८५ ॥

शमकरांच्या चरणीं मस्तक नमवून श्रीराम, लक्ष्मण व सीता हे रथावर बसले. मंत्र्याने लगेच इकडे तिकडे खुणा लपवत छपवत रथ हाकला.

जागे सकल लोग भएँ भोरु । गे रघुनाथ भयउ अति सोरु ॥

रथ कर खोज कतहुँ नहिं पावहिं । राम राम कहि चहुँ दिसि धावहिं ॥

सकाळ होताच सर्व लोक जागे झाले. मोठा गोंधळ उडाला की, श्रीरघुनाथ कोठे गेले ? कुठेही रथाचा पत्ता लागेना.सर्वजण ‘ हाय राम, हाय राम ‘ असा पुकारा करीत चोहीकडे धावले. ॥ १ ॥

मनहुँ बारिनिधि बूड़ जहाजू । भयउ बिकल बड़ बनिक समाजू ॥

एकहि एक देहिं उपदेसू । तजे राम हम जानि कलेसू ॥

जसे समुद्रां जहाज बुडाले की, व्यापारी लोक हवालदील होतात. एक दुसर्‍याला ते सांगू लागले की, आपणा सर्वांना क्लेश होतील, म्हणून श्रीरामचंद्र न सांगता निघून गेले.

निंदहिं आपु सराहहिं मीना । धिग जीवनु रघुबीर बिहीना ॥

जौं पै प्रिय बियोगु बिधि कीन्हा । तौ कस मरनु न मागें दीन्हा ॥

ते सर्व आपली निंदा करु लागले व पाण्याविना मरणार्‍या माशांची प्रशंसा करु लागले. ते म्हणू लागले की, ‘ श्रीरामांच्याविना आपल्या जिण्याचा धिक्कार असो. विधात्याने जर प्रिय व्यक्तीचा वियोग आमच्या नशिबी ठेवला होता, तर आम्ही मागितल्यावर आम्हांला मरण का दिले नाही ? ॥ ३ ॥

एहि बिधि करत प्रलाप कलापा । आए अवध भरे परितापा ॥

बिषम बियोगु न जाइ बखाना । अवधि आस सब राखहिं प्राना ॥

अशा रीतीने अनेक प्रकारे प्रलाप करीत ते दुःखाने भरलेल्या अयोध्येला आले. त्यांच्या भयंकर वियोगाच्या अवस्थेचे वर्णन करणे कठीण आहे. चौदा वर्ष संपण्याची आशा करीत, ते प्राण बाळगून होते. ॥ ४ ॥

राम दरस हित नेम ब्रत लगे करन नर नारि ।

मनहुँ कोक कोकी कमल दीन बिहीन तमारि ॥ ८६ ॥

सर्व स्त्री-पुरुष श्रीरामांच्या दर्शनासाठी नियम व व्रत करु लागले. ज्याप्रमाणे चक्रवाक जोडपे आणि कमळ हे सूर्याविना दीन होतात, त्याप्रमाणे सर्वजण दीनवाणे झाले. ॥ ८६ ॥

सीता सचिव सहित दोउ भाई । सृंगबेरपुर पहुँचे जाई ॥

उतरे राम देवसरि देखी । कीन्ह दंडवत हरषु बिसेषी ॥

सीता व मंत्री यांच्यासह दोघे बंधू शृंगवेरपुरला पोहोचले. तेथे गंगानदी पाहून श्रीराम रथांतून उतरले आणि मोठ्या आनंदाने त्यांनी तिला दंडवत घातला. ॥ १ ॥

लखन सचिवँ सियँ किए प्रनामा । सबहि सहित सुखु पायउ रामा ॥

गंग सकल मुद मंगल मूला । सब सुख करनि हरनि सब मूला ॥

लक्ष्मण, सुमंत्र व सीतेनेही गंगेला प्रणाम केला. श्रीरामांसह सर्वांना गंगा पाहून सुख वाटले. गंगा ही सर्व आनंदाचे व मांगल्याचे मूळ आहे. ती सर्व सुखे देणारी व सर्व पीडा हरण करणारी आहे. ॥ २ ॥

कहि कहि कोटिक कथा प्रसंगा । रामु बिलोकहिं गंग तरंगा ॥

सचिवहि अनुजहि प्रियहि सुनाई । बिबुध नदी महिमा अधिकाई ॥

अनेक कथा-प्रसंग सांगत श्रीराम गंगेच्या लहरी पाहू लागले. त्यांनी सुमंत्र. लक्ष्मण व सीतेला गंगेचा महिमा सांगितला. ॥ ३ ॥

मज्जनु कीन्ह पंथ श्रम गयऊ । सुचि जलु पिअत मुदित मन भयऊ ॥

सुमिरत जाहि मिटइ श्रम भारु । तेहि श्रम यह लौकिक ब्यवहारु ॥

त्यानंतर सर्वांनी स्नान केले. त्यामुळे प्रवासाचा शीण नाहींसा झाला आणि पवित्र जल पिण्यामुळे त्यांचे मन प्रसन्न झाले. ज्यांच्या फक्त स्मरणाने जन्म-मरणाचे श्रम नष्ट होतात, त्या श्रीरामांना ‘ श्रम ‘ झाले असे म्हणणे हा फक्त लौकिक व्यवहार आहे. ॥ ४ ॥

दोहा—सुद्ध सच्चिदानंदमय कंद भानुकुल केतु ।

चरित करत नर अनुहरत संसृति सागर सेतु ॥ ८७ ॥

त्रिगुणातीत व मायातीत दिव्य मंगलविग्रह व सच्चिदानंदस्वरुप असलेले सूर्यकुलाचे ध्वज भगवान श्रीराम हे मनुष्याप्रमाणे लीला अशी करतात की, ती संसाररुपी समुद्र तरुन जाण्यासाठी सेतूसारखी आहे. ॥ ८७ ॥

यह सुधि गुहँ निषाद जब पाई । मुदित लिए प्रिय बंधु बोलाई ॥

लिए फल मूल भेंट भरि भारा । मिलन चलेउ हियँ हरषु अपारा ॥

जेव्हा निषादराज गुहाला श्रीरामांच्या आगमनाची वार्ता कळली, तेव्हा त्याने आनंदित होऊन आपल्या आप्तांना व बंधु-बांधवांना बोलावले आणि भेट म्हणून देण्यासाठी फळे, कंदमुळे घेऊन तो दर्शनासाठी निघाला. त्याच्या मनाला अपार आनंद झाला होता. ॥ १ ॥

करि दंडवत भेंट धरि आगें । प्रभुहि बिलोकत अति अनुरागें ॥

सहज सनेह बिबस रघुराई । पूँछी कुसल निकट बैठाई ॥

त्याने येऊन दंडवत केला आणि श्रीरामांच्यासमोर भेटी ठेवून मोठ्या प्रेमाने तो प्रभूंना पाहू लागला. श्रीरामांनी स्वाभाविक प्रेमाने निषादराजाला आपल्याजवळ बसवून घेऊन खुशाली विचारली. ॥ २ ॥

नाथ कुसल पद पंकज देखें । भयउँ  भागभाजन जन लेखें ॥

देव धरनि धनु धामु तुम्हारा । मैं जनु नीचु सहित परिवारा ॥

गुह म्हणाला, ‘ हे नाथ, तुमच्या चरणांच्या दर्शनानेच सर्व कुशल आहे. आज माझी गणना भाग्यवान पुरुषांमध्ये होत आहे. हे देवा, माझी जमीन, धन आणि घर हे सर्व तुमचेच आहे. मी सहकुटुंब तुमचा तुच्छ सेवक आहे. ॥ ३ ॥

कृपा करिअ पुर धारिअ पाऊ । थापिय जनु सबु लोगु सिहाऊ ॥

कहेहु सत्य सबु सखा सुजाना । मोहि दीन्ह पितु आयसु आना ॥

आता कृपा करुन माझ्या शृंगवरपुरात येऊन, या दासाची प्रतिष्ठा वाढवा. त्यामुळे सर्वजण माझ्या भाग्याची प्रशंसा करु लागतील. ‘ श्रीराम म्हणाले, ‘ हे सज्जन मित्रा ! तू म्हणतोस ते सर्व खरे आहे, परंतु वडिलांनी मला वेगळीच आज्ञा दिलेली आहे. ॥ ४ ॥           

दोहा—बरष चारिदस बासु बन मुनि ब्रत बेषु अहारु ।

ग्राम बासु नहिं उचित सुनि गुहहि भयउ दुखु भारु ॥ ८८ ॥

त्यानुसार मला चौदा वर्षे मुनिव्रत व मुनिवेष धारण करुन मुनींच्यासारखा आहार करुन वनात राहायचे आहे. गावामध्ये राहाणे योग्य नव्हे. ‘ हे ऐकून गुहाला मोठे दुःख झाले. ॥ ८८ ॥

राम लखन सीय रुप निहारी । कहहिं सप्रेम ग्राम नर नारी ॥

ते पितु मातु कहहु सखि कैसे । जिन्ह पठए बन बालक ऐसे ॥

श्रीराम, लश्र्मण व सीता यांची रुपे पाहून गावातील लोक प्रेमाने चर्चा करु लागले. कोणी म्हणत होता की, ‘ हे सखी, ज्यांनी या सुकुमार बालकांना वनात धाडले, ते माता-पिता आहेत तरी कसले ?’ ॥ १ ॥

एक कहहिं भल भूपति कीन्हा । लोयन लाहु हमहि बिधि दीन्हा ॥

तब निषादपति उर अनुमाना । तरु सिंसुपा मनोहर जाना ॥

कोणी म्हणत होता, राजांनी चांगले केले. या निमित्ताने ब्रह्मदेवाने आमच्या डोळ्यांचे पारणे फेडले. ‘ निषादराजाने मनात विचार केला की, अशोकवृक्षाखाली यांना राहाण्यास योग्य जागा आहे. ॥ २ ॥

लै रघुनाथहि ठाउँ देखावा । कहेउ राम सब भॉंति सुहावा ॥

पुरजन करि जोहारु घर आए । रघुबर संध्या करन सिधाए ॥

त्याने श्रीरघुनाथांना नेऊन ती जागा दाखविली. श्रीरामांनी ती पाहून म्हटले की, ही जागा सर्वप्रकारे छान आहे. पुरवासी लोक त्यांना वंदन करुन घरी परतले आणि श्रीराम संध्या-वंदन करण्यास गेले. ॥ ३ ॥

गुहँ सँवारि सॉंथरी डसाई । कुस किसलयमय मृदुल सुहाई ॥

सुचि फल मूल मधुर मृदु जानी । दोना भरि भरि राखेसि पानी ॥

गुहाने यावेळी कुश व कोमल पानांची कोमल आणि सुंदर

 पथारी पसरली. आणि पवित्र, मधुर व कोमल अशी

 फळे, कंदमुळे व पाणी आणून ठेवले. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: