Thursday, February 10, 2022

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 55 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग ५५

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 55 
Doha 323 to 326 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग ५५ 
दोहा ३२३ ते ३२६

दोहा—सुनि सिख पाइ असीस बड़ि गनक बोलि दिनु साधि ।

सिंघासन प्रभु पादुका बैठारे निरुपाधि ॥ ३२३ ॥

हे ऐकून, आज्ञा घेऊन व मोठा आशीर्वाद मिळवून भरताने ज्योतिष्यांना बोलाविले आणि चांगला मुहूर्त पाहून प्रभूंच्या चरणपादुका निर्विघ्नपणे सिंहासनावर विराजमान केल्या. ॥ ३२३ ॥

राम मातु गुर पद सिरु नाई । प्रभु पद पीठ रजायसु पाई ॥

नंदिगावँ करि परन कुटीरा । कीन्ह निवासु धरम धुर धीरा ॥

नंतर श्रीरामांची माता कौसल्या आणि गुरुजींच्या चरणांना नतमस्तक होऊन व प्रभूंच्या चरणपादुकांची आज्ञा घेऊन धर्माची धुरा धारण करण्यामध्ये धैर्यशील असलेल्या भरताने नंद्रीग्रामात पर्णकुटी बनविली आणि तेथे तो राहू लागला. ॥ १ ॥

जटाजूट सिर मुनिपट धारी । महि खनि कुस सॉंथरी सँवारी ॥

असन बसन बासन ब्रत नेमा । करत कठिन रिषिधरम सप्रेम ॥

शिरावर जटाजूट आणि शरीरावर वल्कले धारण करुन त्याने पृथ्वी खोदून तिच्यामध्ये कुशांचे आसन घातले. भोजन, वस्त्रे, भांडी, व्रते, नियम या गोष्टींमध्ये तो ऋषींच्या कठीण धर्माचे श्रद्धापूर्वक आचरण करु लागला. ॥ २ ॥

भूषन बसन भोग सुख भूरी । मन तन बचन तजे तिन तूरी ॥

अवध राजु सुर राजु सिहाई । दसरथ धनु सुनि धनदु लजाई ॥

दागिने-कपडे आणि इतर अनेक प्रकारचे सुखभोग यांचा त्याने कायावाचामनाने प्रतिज्ञापूर्वक त्याग केला. ज्या अयोध्येच्या राज्याचा इंद्रालाही हेवा वाटे आणि जेथील राजा दशरथ यांच्या संपत्तीबद्दल ऐकून कुबेरही ओशाळून जात असे, ॥ ३ ॥    

तेहिं पुर बसत भरत बिनु रागा । चंचरीक जिमि चंपक बागा ॥

रमा बिलासु राम अनुरागी । तजत बमन जिमि जन बड़भागी ॥

त्याच अयोध्यापुरीमध्ये भरत असा अनासक्त बनून निवास करीत होता की, ज्याप्रमाणे सोनचाफ्याच्या बागेत भ्रमर चाफ्याजवळ फिरकत नाही. श्रीरामचंद्रांचे प्रेमी मोठे भाग्यवान पुरुष असतात. ते लक्ष्मीच्या विलासाचा वमनाप्रमाणे त्याग करतात. ॥ ४ ॥

दोहा—राम पेम भाजन भरतु बड़े न एहिं करतूति ।

चातक हंस सराहिअत टेंक बिबेक बिभूति ॥ ३२४ ॥

मग भरत हा तर प्रत्यक्ष श्रीरामचंद्रांचा आवडता होता. तो या भोगैश्वर्याच्या त्यागाच्या बळावर मोठा झाला नव्हता. ( तर श्रीराम येईपर्यंत त्यागाने राहण्याचा निग्रह व धर्माधर्मविवेक या दोन गुणांमुळे भरत श्रेष्ठ ठरला होता. ) पृथ्वीवरील पाणी न पिण्याचा हट्ट धरुन बसलेल्या चातकाची आणि नीर-क्षीर-विवेकाची शक्ती असलेल्या हंसाचीच प्रशंसा होत असते. ॥ ३२४ ॥

देह दिनहुँ दिन दूबरि होई । घटइ तेजु बलु मुखछबि सोई ॥

नित नव राम प्रेम पनु पीना । बढ़त धरम दलु मनु न मलीना ॥

भरताचे शरीर तर दिवसेंदिवस दुबळे होत होते. पण बळ व तेज वाढत होते. मुखावरील कांतीही वाढत होती. रामप्रेमाचा निश्र्चय नित्य नवीन व पुष्ट होत होता. धर्मनिष्ठा वाढत होती. त्यामुळे मनात श्रीरामभक्ती दिवसेंदिवस वाढत होती. ॥ १ ॥   

जिमि जलु निघटत सरद प्रकासे । बिलसत बेतस बनज बिकासे ॥

सम दम संजम नियम उपासा । नखत भरत हिय बिमल अकासा ॥

ज्याप्रमाणे शरदऋतूच्या येण्याने पाणी स्वच्छ होते, आकाशही स्वच्छ होते. आणि कमळे विकसित होतात. तसे शम, दम, संयम, नियम, उपवास इत्यादी भरताच्या निर्मळ हृदयरुपी आकाशातील तारांगण प्रकाशित होत होते. ॥ २ ॥

ध्रुव बिस्वासु अवधि राका सी । स्वामि सुरति सुरबीथि बिकासी ॥

राम पेम बिधु अचल अदोषा । सहित समाज सोह नित चोखा ॥

त्या आकाशातील ध्रुवतारा विश्वासच होता. चौदा वर्षांचा अवधीचे ध्यान हा पौर्णिमेचा चंद्र होता. स्वामी श्रीरामचंद्र यांची स्मृती ही आकाशगंगेप्रमाणे प्रकाशित होती. राम-प्रेम हाच नित्य राहणारा अधळ व कलंकरहित चंद्र होता. तो आपलया समाजरुपी नक्षत्रांसह शोभत होता. ॥ ३ ॥    

भरत रहनि समुझनि करतूती । भगति बिरति गुन बिमल बिभूती ॥

बरनत सकल सुकबि सकुचाहीं । सेस गनेस गिरा गमु नाहीं ॥

भरताची राहणी, समजूत, करणी, भक्ती, वैराग्य, निर्मळ गुण आणि ऐश्र्वर्य यांचे वर्णन करण्यास सर्व मोठमोठ्या कवींना संकोच वाटतो. कारण तेथे स्वतः शेष, गणेश व सरस्वतीसुद्धा पोहोचू शकत नाहीत. ॥ ४ ॥

दोहा—नित पूजत प्रभु पॉंवरी प्रीति न हृदयँ समाति ।

मागि मागि आयसु करत राज काज बहु भॉंति ॥ ३२५ ॥

भरत प्रभूंच्या पादुकांची नित्य पूजा करी. त्याच्या हृदयात प्रेम मावत नव्हते. पादुकांची आज्ञा मागूनच तो सर्व प्रकारचा राज्यकारभार करीत असे. ॥ ३२५ ॥

पुलक गात हियँ सिय रघुबीरु । जीह नामु जप लोचन नीरु ॥

लखन राम सिय कानन बसहीं । भरतु भवन बसि तप तनु कसहीं ॥

त्याचे शरीर पुलकित असे. कारण त्याच्या हृदयात श्रीसीताराम होते. जीभ राम-नाम जपत असे. नेत्रांमध्ये प्रेमाश्रू भरलेले असत. लक्ष्मण, श्रीराम आणि सीता हे तर वनात निवास करतात, परंतु भरत घरात राहूनच तपाद्वारे शरीर कृश करीत होता. ॥ १ ॥

दोउ दिसि समुझि कहत सबु लोगू । सब बिधि भरत सराहन जोगू ॥

सुनि ब्रत नेम साधु सकुचाहीं । देखि दसा मुनिराज लजाहीं ॥

दोन्हीकडची स्थिती समजून आल्यावर सर्व लोक म्हणत की, ‘ भरत सर्वप्रकारे प्रशंसनीय आहे. त्याचे व्रत आणि नियम ऐकून साधु-संतांनाही संकोच वाटे आणि त्याची प्रेमनिष्ठा पाहून मुनिराजांनाही लज्जा वाटे. ॥ २ ॥

परम पुनीत भरत आचरनू । मधुर मंजु मुद मंगल करनू ॥

हरन कठिन कलि कलुष कलेसू । महामोह निसि दलन दिनेसू ॥

भरताचे परम पवित्र चरित्र हे मधुर, सुंदर, आनंदायक व मांगल्य करणारे आहे. कलियुगातील पापे व कठीण क्लेश यांचे हरण करणारे आहे. महामोहरुपी रात्रीचा नाश करणार्‍या सूर्यासारखे आहे. ॥ ३ ॥

पाप पुंज कुंजर मृगराजू । समन सकल संताप समाजू ॥

जन रंजन भंजन भव भारु । राम सनेह सुधाकर सारु ॥

हे चरित्र पापसमूहरुपी हत्तींसाठी सिंह आहे. सर्व तापांच्या समुदायाचा नाश करणारे आहे. भक्तांना आनंद देणारे आहे आणि सांसारिक दुःखांचा भंग करणारे व श्रीरामप्रेमरुपी चंद्रम्यातून स्रवणारे अमृत आहे. ॥ ४ ॥

छं०—सिय राम प्रेम पियूष पूरन होत जनमु न भरत को ।

मुनि मन अगम जम नियम सम दम बिषम ब्रत आचरत को ॥

दुख दाह दारिद दंभ दूषन सुजस मिस अपहरत को ।

कलिकाल तुलसी से सठन्हि हठि राम सनमुख करत को ॥    

श्रीसीतारामांच्या प्रेमरुपी अमृताने परिपूर्ण असलेल्या भरताचा जन्म जर झाला नसता तर मुनींच्या मनालाही अगम्य असलेले यम, नियम, शम, दम इत्यादी कठीण व्रताचे आचरण कुणी केले असते ? दुःख, संताप, दरिद्रता, दंभ इत्यादी दोषांचे आपल्या उत्तम कीर्तीच्या निमित्ताने कोणी हरण केले असते ? आणि कलिकाळात, तुलसीदासासारख्या अभक्तांना बळेच श्रीरामांच्याकडे वळविले असते ?

सो०---भरत चरित करि नेमु तुलसी जो सादर सुनहिं ॥

सीय राम पद पेमु अवसि होइ भव रस बिरति ॥ ३२६ ॥

तुलसीदास म्हणतात, जे कोणी भरताचे चरित्र नियमाने आदरपूर्वक ऐकतील त्यांना निश्र्चितपणे श्रीसीतारामांच्या चरणी प्रेम उत्पन्न होईल आणि सांसारिक विषयरसाविषयी वैराग्य वाटू लागेल. ॥ ३२६ ॥

मासपारायण, एकविसावा विश्राम

इति श्रीमद्रामचरितमानसे सकलकलिकलुषविध्वंसने द्वितीयः सोपानः समाप्तः ॥

कलियुगांतील संपूर्ण पापांचा विध्वंस करणार्‍या श्रीरामचरितमानसाचा हा दुसरा सोपान समाप्त झाला.

( अयोध्याकाण्ड समाप्त )  



Custom Search

No comments: