Monday, November 14, 2022

SunderKanda Part 6 Doha 13 to Doha 15 सुंदरकाण्ड भाग ६ दोहा १३ ते दोहा १५

 

SunderKanda Part 6 
ShriRamCharitManas 
Doha 13 to Doha 15 
सुंदरकाण्ड भाग ६ 
श्रीरामचरितमानस 
दोहा १३ ते दोहा १५

दोहा—कपि के बचन सप्रेम सुनि उपजा मन बिस्वास ।

जाना मन क्रम बचन यह कृपासिंधु कर दास ॥ १३ ॥

हनुमानाचे प्रेमळ बोलणे ऐकून सीतेच्या मनात विश्वास वाटू लागला. हा कायावाचामनाने कृपासागर रघुनाथांचा दास आहे, हे तिने जाणले. ॥ १३ ॥

हरिजन जानि प्रीति अति गाढ़ी । सजल नयन पुलकावलि बाढ़ी ॥

बूड़त बिरह जलधि हनुमाना । भयहु तात मो कहुँ जलजाना ॥

भगवंतांचा सेवक आहे, असे समजल्यावर सीतेला त्याच्याबद्दल खूप प्रेम वाटू लागले. नेत्रांमध्ये अश्रू दाटून आले आणि शरीर अत्यंत पुलकित झाले. सीता म्हणाली, ‘ हे वत्स, हनुमाना, विरहसागरात बुडत असलेल्या मला वाचवण्यासाठी तू जहाज बनून आलास. ॥ १ ॥

अब कहु कुसल जाउँ बलिहारी । अनुज सहित सुख भवन खरारी ॥

कोमलचित कृपाल रघुराई । कपि केहि हेतु धरी निठुराई ॥

मी तुझ्यावरुन जीव ओवाळून टाकते. आता लहान बंधू लक्ष्मणासह खर राक्षसाचे शत्रू, सुखधाम असलेल्या प्रभूंचे क्षेम-कुशल सांग. श्रीरघुनाथ हे तर कोमल हृदयाचे व कृपाळू आहेत. मग हे हनुमाना, माझ्यावरच ते काय म्हणून निष्ठुर झाले ? ॥ २ ॥

सहज बानि सेवक सुखदायक । कबहुँक सुरति करत रघुनायक ॥

कबहुँ नयन मम सीतल ताता । होइहहिं निरखि स्याम मृदु गाता 

सेवकाला सुख देणे हे त्यांचे ब्रीद आहे. ते श्रीरघुनाथ कधी माझी आठवण काढतात काय ? हे तात, त्यांचे कोमल सावळे रुप पाहून माझे नेत्र कधी तृप्र होतील काय ? ॥ ३ ॥

बचनु न आव नयन भरे बारी । अहह नाथ हौं निपट विसारी ॥

देखि परम बिरहाकुल सीता । बोला कपि मृदु बचन बिनीता ॥

सीतेच्या मुखातून शब्द फुटत नव्हता. नेत्रांमध्ये विरहाचे अश्रू भरुन आले. ती दुःखाने म्हणाली, ‘ हे नाथ, तुम्ही मला अगदीच विसरुन गेलात.’ सीतेला विरहाने अतिशय व्याकूळ झाल्याचे पाहून हनुमान कोमल व नम्र वाणीने म्हणाला, ॥ ४ ॥

मातु कुसल प्रभु अनुज समेता । तव दुख दुखी सुकृपा निकेता ॥

जनि जननी मानहु जियँ ऊना । तुम्ह ते प्रेमु राम कें दूना ॥

‘ हे माते, सुंदर कृपेचे धाम असलेले प्रभू बंधू लक्ष्मणासह सुखरुप आहेत, परंतु ते तुझ्या दुःखामुळे दुःखी आहेत. हे माते, मनात दुःख करु नकोस. श्रीरामांच्या मनात तुझ्याहून दुप्पट प्रेम आहे. ॥ ५ ॥

दोहा—रघुपति कर संदेस अब सुनु जननी धरि धीर ।

अस कहि कपि गदगद भयउ भरे बिलोचन नीर ॥ १४ ॥

हे माते, आता धीर धरुन श्रीरामांचा निरोप ऐक. ‘ असे म्हणून हनुमान प्रेमाने सद्गदित झाला. त्याच्या डोळ्यात प्रेमाश्रू दाटले. ॥ १४ ॥

कहेउ राम बियोग तव सीता । मो कहुँ सकल भए बिपरीता ॥

नव तरु किसलय मनहुँ कृसानू । कालनिसा सम निसि ससि भानू ॥

हनुमान म्हणाला, ‘ श्रीरामचंद्रांनी सांगितले आहे की, हे सीते, तुझ्या वियोगामुळे माझ्यासाठी सर्व पदार्थ प्रतिकूल झालेले आहेत. वृक्षांची नवीन कोमल पालवी जणू अग्नीसारखी, रात्र ही कालरात्रीसारखी, चंद्र सूर्यासारखा, ॥ १ ॥

कुबलय बिपिन कुंतबन सरिसा । बारिद तपत तेल जनु बरिसा ॥

जे हित रहे करत तेइ पीरा । उरग स्वास सम त्रिबिध समीरा ॥

आणि कमळांची वने ही भाल्यांच्या वनासारखी झालेली आहेत. मेघ जणू उकळते तेल ओतत आहेत. जे हितकारक होते ते आता सतावू लागले आहेत. त्रिविध हवा सापाच्या फुत्कारासारखी विषारी व गरम झाली आहे. ॥ २ ॥

कहेहू तें कछु दुख घटि होई । काहि कहौं यह जान न कोई ॥

तत्व प्रेम कर मम अरु तोरा । जानत प्रिया एकु मनु मोरा ॥

मनातले दुःख सांगून टाकल्याने काहीसे कमी होते, पण सांगू कुणाला ? माझे हे दुःख कुणी जाणत नाही. हे प्रिये, माझ्या व तुझ्या प्रेमाचे रहस्य एक माझे मनच जाणते. ॥ ३ ॥

सो मनु सदा रहत तोहि पाहीं । जानु प्रीति रसु एतनेहि माहीं ॥

प्रभु संदेसु सुनत बैदेही । मगन प्रेम तन सुधि नहिं तेही ॥

आणि ते तर नेहमी तुझ्याजवळ असते. बस्स, माझ्या प्रेमाचे सार एवढ्यातच काय ते समज.’ प्रभूंचा निरोप ऐकताच जानकी प्रेम-मग्न झाली. ती देहभान विसरली. ॥ ४ ॥

कह कपि हृदयँ धीर धरु माता । सुमिरु राम सेवक सुखदाता ॥

उर आनहु रघुपति प्रभुताई । सुनि मम बचन तजहु कदराई ॥

हनुमान म्हणाला, ‘ हे माते, मनात धीर धर आणि सेवकांना सुख देणार्‍या श्रीरामांचे स्मरण कर. श्रीरघुनाथांची प्रभुता आठव आणि माझे बोलणे ऐकून भय सोडून दे. ॥ ५ ॥

दोहा---- निसिचर निकर पतंग सम रघुपति बान कृसानु ।

              जननी हृदयँ धीर धरु जरे निसाचर जानु ॥ १५ ॥

राक्षसांचे समूह हे पतंग-कीटकांप्रमाणे आहेत आणि रघुनाथांचे बाण हे अग्नीसारखे आहेत. हे माते, धीर धर आणि राक्षस जळून खाक झाले, असे समज. ॥ १५ ॥

जौं रघुबीर होति सुधि पाई । करते नहिं बिलंबु रघुराई ॥

राम बान रबि उएँ जानकी । तम बरुथ कहँ जातुधान की ॥

श्रीरामांना जर तुझी वार्ता कळली असती, तर त्यांनी उशीर लावला नसता. हे जानकी, रामबाणरुपी सूर्य उदित झाल्यावर राक्षस-सेनारुपी अंधकार कसा राहील ? ॥ १ ॥

अबहिं मातु मैं जाउँ लवाई । प्रभु आयसु नहिं राम दोहाई ॥

कछुक दिवस जननी धरु धीरा । कपिन्ह सहित अइहहिं रघुबीरा ॥

हे माते, मी तुला आत्ता येथून घेऊन जाईन, परंतु श्रीरामांची शपथ सांगतो, मला प्रभूंची तशी आज्ञा नाही. म्हणून हे माते, आणखी काही दिवस धीर धर. श्रीरामचंद्र वानरांसह येथे येतील, ॥ २ ॥

निसिचर मारि तोहि लै जैहहिं । तिहुँ पुर नारदादि जसु गैहहिं ॥

हैं सुत कपि सब तुम्हहि समाना । जातुधान अति भट बलवाना ॥

आणि राक्षसांना मारुन तुला घेऊन जातील. नारदादी ऋषि-मुनी तिन्ही लोकांमध्ये त्यांची कीर्ती गातील. ‘ सीता म्हणाली, हे वत्सा, सर्व वानर तुझ्यासारखेच लहान-लहान असणार. राक्षस हे तर बलवान योद्धे आहेत. ॥ ३ ॥

मोरें हृदय परम संदेहा । सुनि कपि प्रगट कीन्हि निज देहा ॥

कनक भूधराकार सरीरा । समर भयंकर अतिबल बीरा ॥

म्हणून माझ्या मनात मोठी शंका येते की, तुझ्यासारखे वानर राक्षसंना कसे जिंकतील ? ‘ हे ऐकून हनुमानाने आपले रुप प्रकट केले. सुवर्ण पर्वत सुमेरुच्या आकाराचे ते अत्यंत विशाल शरीर होते. ते युद्धामध्ये शत्रूंच्या हृदयात धडकी भरणारे अत्यंत बलवान व वीर होते. ॥ ४ ॥

सीता मन भरोस तब भयऊ । पुनि लघु रुप पवनसुत लयऊ ॥

ते पाहून सीतेला खात्री पटली. हनुमानाने पुन्हा आपले

 छोटे रुप धारण केले. ॥ ५ ॥



Custom Search

No comments: