Sunday, November 13, 2022

SunderKanda Part 2 Doha 2 and Doha 3 सुंदरकाण्ड भाग २ दोहा २ आणि दोहा ३

 

SunderKanda Part 2 
ShriRamCharitManas 
Doha 2 and Doha 3 
सुंदरकाण्ड भाग २ 
श्रीरामचरितमानस 
दोहा २ आणि दोहा ३

दोहा—राम काजु सबु करिहहु तुम्ह बल बुद्धि निधान ।

आसिष देइ गई सो हरषि चलेउ हनुमान ॥ २ ॥

तू बल-बुद्धीचे निधान असल्यामुळे प्रभूंचे सर्व कार्य सिद्धीस नेशील. ‘ असा आशीर्वाद देऊन ती निघून गेली. मग हनुमान आनंदाने पुढे निघाला. ॥ २ ॥

निसिचरि एक सिंधु महुँ रहई । करि माया नभु के खग गहई ॥

जीव जंतु जे गगन उड़ाहीं । जल बिलोकि तिन्ह कै परिछाहीं ॥

गहइ छाहँ सक सो न उड़ाई । एहि बिधि सदा गगनचर खाई ॥

सोइ छल हनूमान कहँ कीन्हा । तासु कपटु कपि तुरतहिं चीन्हा ॥

समुद्रामध्ये एक राक्षसी राहात होती. आकाशात उडणार्‍या पक्ष्यांना ती आपल्या मायावी शक्तीने पकडत असे. जे जीव-जंतु आकाशात उडत असत, त्यांची सावली ती पाण्यात पाहात असे व ती सावली पकडत असे, त्यामुळे प्राण्यांना उडता येत नसे. ते पाण्यात पडत. अशाप्रकारे ती आकाशात उडणार्‍या प्राण्यांना खात असे. तिने तसेच कपट हनुमानाशीही केले. त्याने तिचे कपट लगेच ओळखले. ॥ १-२ ॥

ताहि मारि मारुतसुत बीरा । बारिधि पार गयउ मतिधीरा ॥

तहॉं जाइ देखी बन सोभा । गुंजत चंचरीक मधु लोभा ॥

धीर बुद्धीचा वीर हनुमान तिला ठार मारुन समुद्रापलीकडे गेला. त्याला वनाची शोभा दिसली. मधाच्या लोभाने भ्रमर गुंजारव करीत होते. ॥ ३ ॥

नाना तरु फल फूल सुहाए । खग मृग बृंद देखि मन भाए ॥

सैल बिसाल देखि एक आगें । ता पर धाइ चढ़ेउ भय त्यागें ॥

त्या वनात अनेक प्रकारचे वृक्ष फळा-फुलांनी बहरलेले होते. ते फार शोभून दिसत होते. तेथील पशु-पक्ष्यांचे समूह पाहून हनुमानाचे मन प्रसन्न होऊन गेले. त्याला समोर एक विशाल पर्वत दिसला. तो निर्भयपणें उडी मारुन त्या पर्वतावर चढला. ॥ ४ ॥    

उमा न कछु कपि कै अधिकाई । प्रभु प्रताप जो कालहि खाई ॥

गिरि पर चढ़ि लंका तेहिं देखी । कहि न जाइ अति दुर्ग बिसेषी ॥

शिव म्हणतात, ‘ हे उमे, यामध्ये वानर हनुमानाचा काही मोठेपणा नाही. जो काळाचाही काळ आहे, हा किल्ला कल्पनेहून फारच मोठा आहे. ॥ ५ ॥

अति उतंग जलनिधि चहु पासा । कनक कोट कर परम प्रकासा ॥

तो अत्यंत उंच होता. त्याच्या चारी बाजूंना समुद्र होता. किल्ल्याच्या सोन्याच्या तटबंदीचा मोठा पसरलेला होता. ॥ ६ ॥          

छं० कनक कोट बिचित्र मनि कृत सुंदरायतना घना ।

चउहट्ट हट्ट सुबट्ट बीथीं चारु पुर बहु बिधि बना ॥

गज बाजि खच्चर निकर पदचर रथ बरुथन्हि को गनै ।

बहुरुप निसिचर जूथ अतिबल सेन बरनत नहिं बनै ॥ १ ॥

ती चित्रविचित्र रत्नांनी जडविलेली सोन्याची तटबंदी होती. तिच्या आतल्या बाजूस सुंदर सुंदर घरे होती. तेथे चौक, बाजार, सुंदर मार्ग व गल्ली-बोळ होते. सुंदर नगर नाना प्रकारे सजविलेले होते. हत्ती, घोडे व खेचरांच्या झुंडी, तसेच पायदळ आणि रथांचे समूह यांची गणना कोण करु शकेल ? अनेक रुपांमध्ये राक्षसांची सैन्यदले होती आणि त्या बलवान सेनेचे वर्णन करणेच कठीण. ॥ १ ॥

बन बाग उपबन बाटिका सर कूप बापीं सोहहीं ।

नर नाग सुर गंधर्ब कन्या रुप मुनि मन मोहहीं ॥

कहुँ माल देह बिसाल सैल समान अतिबल गर्जहीं ।

नाना अखारेन्ह भिरहिं बहुबिधि एक एकन्ह तर्जहीं ॥ २ ॥

वने, बागा, उपवने, फुलवाड्या, तलाव, विहिरी आणि आड शोभत होते. मनुष्यकन्या, नागकन्या, देवकन्या व गंधर्वकन्या या आपल्या सौंदर्याने मुनींच्या मनालाही भुरळ पाडणार्‍या होत्या. कुठे पर्वतासारख्या विशाल शरीराचे बलवान मल्ल गर्जना करीत होते. ते अनेक आखाड्यांमध्ये अनेक प्रकारे एकमेकांशी भिडून आव्हान देत होते. ॥ २ ॥

करि जतन भट कोटिन्ह बिकट तन नगर चहुँ दिसि रच्छहीं ।

कहुँ महिष मानुष धेनु खर अज खल निसाचर भच्छहीं ॥

एहि लागि तुलसीदास इन्ह की कथा कछु एक है कही ।

रघुबीर सर तीरथ सरीरन्हि त्यागि गति पैहहिं सही ॥ ३ ॥

भयानक शरीराचे कोट्यावधी राक्षस काळजीपूर्वक नगराची चारी बाजूंनी रखवाली करीत होते.दुष्ट राक्षस, कुठे म्हशी, गाई, गाढवे व बकर्‍या मारुन खात होते. तुलसीदासाने हे सर्व थोडक्यात एवढ्यासाठीच सांगितले आहे की, प्रभू श्रीरामांच्या बाणरुपी तीर्थामध्ये आपला देह विसर्जित करुन हे सर्वजण निश्चितपणे परमगती प्राप्त करणार आहेत. ॥ ३ ॥       

दोहा—पुर रखवारे देखि बहु कपि मन कीन्ह बिचार ।

अति लघु रुप धरौं निसि नगर करौं पइसार ॥ ३ ॥

नगराचे बहुसंख्य रखवालदार पाहून हनुमानाने मनात विचार केला की, आता छोटे रुप धरावे आणि रात्रीच्या वेळी नगरात प्रवेश करावा. ॥ ३ ॥

मसक समान रुप कपि धरी । लंकहि चलेउ सुमिरि नरहरी ॥

नाम लंकिनी एक निसिचरी । सो कह चलेसि मोहि निंदरी ॥

हनुमान अतिशय छोटे रुप घेऊन मनुष्य लीला करणार्‍या श्रीरामचंद्रांचे स्मरण करुन लंकेला निघाला. लंकेच्या दारावर लंकिनी नावाची एक राक्षसी राहात होती. ती म्हणाली, ‘ माझी उपेक्षा करुन मला न विचारता कुठे निघालास ? ॥ १ ॥

जानेहि नहीं मरमु सठ मोरा । मोर अहार जहॉं लगि चोरा ॥

मुठिका एक महा कपि हनी । रुधिर बमत धरनीं ढनमनी ॥

हे मूर्खा, तुला माझे रहस्य कुठे ठाऊक आहे ? जितके चोर असतात, ते माझा आहार बनतात.’ हनुमानाने तिला एक ठोसा दिला, त्यामुळे ती रक्त ओकत जमिनीवर पडली. ॥ २ ॥

पुनि संभारि उठी सो लंका । जोरि पानि कर बिनय ससंका ॥

जब रावनहि ब्रह्म बर दीन्हा । चलत बिरंचि कहा मोहि चीन्हा ॥

ती लंकिनी स्वतःला सावरत पुन्हा उठली आणि भीतीने हात जोडून विनंती करु लागली. ती म्हणाली, ‘ ब्रह्मदेवांनी रावणाला जेव्हा वर दिला होता, तेव्हा जाताना त्यांनी मला राक्षसांच्या नाशाची खूण सांगितली होती की, ॥ ३ ॥

बिकल होसि तैं कपि के मारे । तब जानेसु निसिचर संघारे ॥

तात मोर अति पुन्य बहूता । देखेउँ नयन राम कर दूता ॥

जेव्हा तू वानराने मारल्यावर व्याकूळ होशील, तेव्हा तू  राक्षसांचा संहार झाला, असे समज ‘. मी श्रीरामचंद्रांच्या दूताला आपल्या डोळ्यांनी पाहिले, हे माझे मोठे पुण्य होय. ॥ ४ ॥   

 


Custom Search

No comments: