Showing posts with label श्रीरामचरितमानस भाग २५. Show all posts
Showing posts with label श्रीरामचरितमानस भाग २५. Show all posts

Saturday, July 11, 2020

ShriRamcharitmans Part 25 श्रीरामचरितमानस भाग २५


ShriRamcharitmans Part 25 श्रीरामचरितमानस भाग २५ 
दोहा १५८ ते १६१ 
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा—भूपति तृषित बिलोकि तेहिं सरबरु दीन्ह देखाइ ।
मज्जन पान समेत हय कीन्ह नृपति हरषाइ ॥ १५८ ॥
राजा तहानलेला पाहून मुनीने त्याला सरोवर दाखविले. प्रतापभानूने आनंदाने घोड्यासह त्यात स्नान करुन पाणी पिऊन घेतले. ॥ १५८ ॥
गै श्रम सकल सुखी नृप भयऊ । निज आश्रम तापस लै गयऊ ॥
आसन दीन्ह अस्त रबि जानी । पुनि तापस बोलेउ मृदु बानी ॥
त्याचा थकवा दूर झाला, त्याला बरे वाटले. मग तो तपस्वी त्याला आपल्या आश्रमात घेऊन गेला. सूर्यास्ताची वेळ झाल्याचे पाहून राजाला बसण्यास आसन देऊन तपस्व्याने कोमल शब्दांत त्याला विचारले, ॥ १ ॥
को तुम्ह कस बन फिरहु अकेलें । सुंदर जुबा जीव परहेलें ॥
चक्रबर्ति के लच्छन तोरें । देखत दया लागि अति मोरें ॥
‘ तुम्ही कोण आहात ? सुंदर तरुण असतांना जिवाची पर्वा न करता वनात एकटे का फिरत आहत ? तुमच्या ठिकाणी चक्रवर्ती राजाची लक्षणे पाहून मला तुमची कीव येते.’ ॥ २ ॥
नाम प्रतापभानु अवनीसा । तासु सचिव मैं सुनहु मुनीसा ॥
फिरत अहेरें परेउँ भुलाई । बड़ें भाग देखेउँ पद आई ॥
राजा म्हणाला, ‘ हे मुनीश्र्वरा. ऐका. प्रतापभानू नावाचा एक राजा आहे, त्याचा मी मंत्री आहे. शिकारीसाठी फिरताना वाट चुकलो आहे. सुदैवाने येथे आल्यामुळे तुमच्या चरणांचे दर्शन घडले. ॥ ३ ॥
हम कहँ दुर्लभ दरस तुम्हारा । जानत हौं कछु भल होनिहारा ॥
कह मुनि तात भयउ अँधिआरा । जोजन सत्तरि नगरु तुम्हारा ॥
मला तुमचे दुर्लभ दर्शन झाल्याने असे वाटते की, आता काही चांगले घडणार आहे. ‘ मुनी म्हणाला, ‘ अरे बाबा, अंधार झालेला आहे. तुझे नगर येथून सत्तर योजने दूर आहे. ॥ ४ ॥
दोहा—निसा घोर गंभीर बन पंथ न सुनहु सुजान ।
बसहु आजु अस जानि तुम्ह जाएहु होत बिहान ॥ १५९ ( क) ॥
हे शहाण्या गृहस्था ! माझे ऐक. घोर अंधारी रात्र आहे. जंगल घनदाट आहे, वाट नाही, म्हणून तू आज येथेच थांब. सकाळ झाल्यावर जा.’ ॥ १५९ ( क ) ॥
तुलसी जसि भवतब्यता तैसी मिलइ सहाइ ।
आपुनु आवइ ताहि पहिं ताहि तहाँ लै जाइ ॥ १५९ ( ख ) ॥
तुलसीदास म्हणतात की, नशिबात जसे घडणार असते, तशीच घटना घडते. एक तर तुम्ही आपणहून तिच्याजवळ जाता, किंवा ती तुम्हांला तेथे घेऊन जाते. ॥ १५९ ( ख ) ॥
भलेहिं नाथ आयसु धरि सीसा । बाँधि तुरग तरु बैठ महीसा ॥
नृप बहु भाँति प्रसंसेउ ताही । चरन बंदि निज भाग्य सराही ॥
( राजा म्हणाला, ) ‘ हे स्वामी ! फार छान. ‘ असे म्हणून त्याची आज्ञा मानून राजाने घोड्याला एका झाडाला बांधले आणि तो बसला. राजाने त्या मुनीची खूप प्रशंसा केली आणि त्याच्या चरणी वंदन करुन तो आपल्या भाग्याची वाखाणणी करु लागला. ॥ १ ॥
पुनि बोलेउ गिरा सुहाई । जानि पिता प्रभु करउँ ढिठाई ॥
मोहि मुनीस सुत सेवक जानी । नाथ नाम निज कहहु बखानी ॥
नंतर तो गोड वाणीने म्हणाला की, ‘ हे प्रभो, मी तुम्हांला पित्याप्रमाणे समजून हे साहस करतो. हे मुनीश्र्वर, मला आपला पुत्र आणि सेवक समजून आपले नाव, गाव सविस्तर सांगा. ‘ ॥ २ ॥
तेहि न जान नृप नृपहि सो जाना । भूप सुहृद सो कपट सयाना ॥
बैरी पुनि छत्री पुनि राजा । छल बल कीन्ह चहइ निज काजा ॥
राजाने त्या कपटी मुनीला ओळखले नाही, परंतु त्याने ( मुनीने ) राजाला ओळखले होते. राजाचे मन सरळ होते आणि तो मुनी कपट करण्यात चतुर होता. एकतर तो वैरी होता, त्यात क्षत्रिय जातीचा, शिवाय राजा. तो कपटाने आपले काम करु पाहात होता. ॥ ३ ॥
समुझि राजसुख दुखित अराती । अवाँ अनल इव सुलगइ छाती ॥
सरल बचन नृप के सुनि काना । बयर सँभारि हृदयँ हरषाना ॥
तो ( मुनिवेषधारी ) शत्रू आपल्या राज्यसुखाची आठवण करीत दुःखी होता. त्याचे मन कुंभाराच्या आव्याप्रमाणे आतून भाजून निघत होते. राजाचे साधे-भोळे शब्द ऐकून आणि आपले वैर मनात धरुन तो आनंदात होता. ॥ ४ ॥
दोहा—कपट बोरि बानी मृदुल बोलेउ जुगुति समेत ।
नाम हमार भिखारि अब निर्धन रहित निकेत ॥ १६० ॥
तो कपटाने मोठ्या युक्तीने कोमल वाणीने म्हणाला, ‘ आता आमचे नाव ‘ भिकारी ‘ आहे, कारण आम्ही निर्धन व घर-दार नसलेले आहोत.’ ॥ १६० ॥
कह नृप जे बिग्यान निधाना । तुम्ह सारिखे गलित अभिमाना ॥
सदा रहहिं अपनपौ दुराएँ । सब बिधि कुसल कुबेष बनाएँ ॥
राजा म्हणाला, ‘ तुमच्यासारखे जे विज्ञानी व निरभिमानी असतात, ते आपले खरे स्वरुप नेहमी लपवून ठेवतात. कारण दीन वेष धारण करुन राहण्यातच सर्व प्रकारचे कल्याण आहे. ( प्रकटपणे संतवेष असल्यास मान-सन्मान होण्याची शक्यता असते आणि मानामुळे पतन घडण्याची ) ॥ १ ॥
तेहि तें कहहिं संत श्रुति टेरें । परम अकिंचन प्रिय हरि केरें ॥
तुम्ह सम अधन भिखारि अगेहा । होत बिरंचि सिवहि संदेहा ॥
यामुळेच संत व वेद उच्च स्वराने म्हणतात की, परम अकिंचन ( पूर्णपणे अहंकार, ममता व मानरहित ) लोकच भगवंतांना आवडतात. तुमच्यासारखे निर्धन, भिकारी आणि गृहहीन लोक पाहून ब्रह्मदेव व शिव यांनाही संदेह होतो ( की हे खरे संत आहेत की भिकारी. ॥ २ ॥
जोसि सोसि तव चरन नमामी । मो पर कृपा करिअ अब स्वामी ॥
सहज प्रीति भूपति कै देखी । आपु बिषय बिस्वास बिसेषी ॥
तुम्ही जे असाल ते असा. मी तुमच्या चरणी नमस्कार करतो. हे स्वामी, आता मजवर कृपा करा. ‘ आपल्यावरचे राजाचे सरळ प्रेम आणि आपल्याविषयीचा त्याचा विश्र्वास पाहून, ॥ ३ ॥
सब प्रकार राजहि अपनाई । बोलेउ अधिक सनेह जनाई ॥
सुनु सतिभाउ कहउँ महिपाला । इहाँ बसत बीते बहु काला ॥
सर्व प्रकारे राजाला आपल्या वश करुन घेऊन मोठे प्रेम दाखवीत तो ( कपटी तपस्वी ) म्हणाला, ‘ हे राजा, ऐक. मी तुला खरे सांगतो. की, मला येथे राहून बराच काळ लोटला. ॥ ४ ॥
दोहा—अब लगि मोहि न मिलेउ कोउ मैं न जनावउँ काहु ।
लोकमान्यता अनल सम कर तप कानन दाहु ॥ १६१ ( क ) ॥
आजपर्यंत मला कोणी भेटले नाही आणि मीही कुणाला भेटत नाही. कारण जगात प्रतिष्ठा ही अग्नीप्रमाणे आहे. ती तपरुपी वन भस्म करुन टाकले,’ ॥ १६१ ( क ) ॥
सो०—तुलसी देखि सुबेषु भूलहिं मूढ़ न चतुर नर ।
सुंदर केकिहि पेखु बचन सुधा सम असन अहि ॥ १६१ ( ख ) ॥
तुलसीदास म्हणतात की, ‘ सुंदर वेष पाहून मूर्खच नव्हे, तर चतुर मनुष्यसुद्धा फसतात. सुंदर मोर बघा ना ! त्याचे बोल अमृतासारखे असतात आणि आहार मात्र सापाचा असतो.’ ॥ १६१ ( ख ) ॥
तातें गुपुत रहउँ जग माहीं । हरि तजि किमपि प्रयोजन नाहीं ॥
प्रभु जानत सब बिनहिं जनाएँ । कहहु कवनि सिधि लोक रिझाएँ ॥
कपट-स्वामी म्हणाला की,’ यासाठी मी जगापासून लपून राहातो. श्रीहरींना सोडून कुणाशी काहीही संबंध ठेवीत नाही. प्रभू हे तर न सांगताच सर्व जाणतात. मग सांग. जगाला प्रसन्न केल्याने कसली सिद्धी मिळणार ? ॥ १ ॥
तुम्ह सुचि सुमति परम प्रिय मोरें । प्रीति प्रतीति मोहि पर तोरें ॥
अब जौं तात दुरावउँ तोही । दारुन दोष घटइ अति मोही ॥
तू पवित्र व सद्बुद्धिचा आहेस. त्यामुळे तू मला फार आवडतोस आणि तुझे प्रेम व विश्वास माझ्यावर आहे. म्हणून बाबा रे ! आता जर  मी तुझ्यापासून काही लपवून ठेवीन, तर मला भयंकर पाप लागेल. ‘ ॥ २ ॥
जिमि जिमि तापसु कथइ उदासा । तिमि तिमि नृपहि उपज बिस्वासा ॥
देखा स्वबस कर्म मन बानी । तब बोला तापस बगध्यानी ॥
तो तपस्वी जसजशा उदासीनतेच्या गोष्टी बोलत होता, तसातसा राजाला जास्त विश्वास वाटू लागला. जेव्हा त्या बगळ्याप्रमाणे ध्यान लावणार्‍या ( कपटी ) मुनीने राजाला कायावाचामनाने सर्व प्रकारे आपल्याला वश झाल्याचे पाहिले, तेव्हा तो म्हणाला, ॥ ३ ॥
नाम हमार एकतनु भाई । सुनि नृप बोलेउ पुनि सिरु नाई ॥
कहहु नाम कर अरथ बखानी । मोहि सेवक अति आपन जानी ॥
‘ हे बंधो, आमचे नांव एकतनू आहे. ‘ हे ऐकून राजाने 

मस्तक नम्र करुन म्हटले, ‘ मला आपला अत्यंत प्रेमी 

सेवक समजून आपल्या नावाचा अर्थ समजावून सांगा.

॥ ४ ॥


Custom Search