Showing posts with label श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड. Show all posts
Showing posts with label श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड. Show all posts

Friday, June 5, 2020

ShriRamcharitmans Part 20 श्रीरामचरितमानस भाग २०


ShriRamcharitmans
  श्रीरामचरितमानस 
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड

दोहा—सहित सहाय सभीत अति मानि हारि मन मैन ।
गहेसि जाइ मुनि चरन तब कहि सुठि आरत बैन ॥ १२६ ॥
तेव्हा कामदेवाने फार घाबरुन व मनात पराजय मान्य करुन आपल्या सहकार्‍यांसह मोठ्या दीनतेने मुनींचे पाय धरले. ॥ १२६ ॥
भयउ न नारद मन कछु रोषा । कहि प्रिय बचन काम परितोषा ॥
नाइ चरन सिरु आयसु पाई । गयउ मदन तब सहित सहाई ॥
नारदांना मुळीच राग आला नाही. त्यांनी गोड शब्दांत कामदेवाचे समाधान केले. तेव्हा मुनींच्या चरणीं मस्तक ठेवून व त्यांची आज्ञा घेऊन आपल्या सहकार्‍यांसह तो परत गेला. ॥ १ ॥
मुनि सुसीलता आपनि करनी । सुरपति सभाँ जाइ सब बरनी ॥
सुनि सब कें मन अचरजु आवा । मुनिहि प्रसंसि हरिहि सिरु नावा ॥
देवराज इंद्राच्या सभेत जाऊन त्याने मुनींचे शील आणि आपले कर्तृत्व सांगितले. ते ऐकून सर्वांना आश्र्चर्य वाटले आणि त्यांनी मुनींची प्रशंसा करीत श्रीहरींना नमन केले. ॥ २ ॥
तब नारद गवने सिव पाहीं । जिता काम अहमिति मन माहीं ॥
मार चरित संकरहि सुनाए । अतिप्रिय जानि महेस सिखाए ॥
मग नारद श्रीशिवांच्याकडे गेले. त्यांच्या मनात अहंकार उत्पन्न झाला की, मी कामदेवाला जिंकले. त्यांनी शिवांना कामदेवाची करणी सांगितली. शिवांनी त्यांना आपला आवडता समजून असा उपदेश दिला, ॥ ३ ॥
बार बार बिनवउँ मुनि तोही । जिमि यह कथा सुनायहु मोही ॥
तिमि जनि हरिहि सुनावहु कबहूँ । चलेहुँ प्रसंग दुराएहु तबहूँ ॥
‘ हे मुनी, मी तुम्हांला वारंवार विनंती करतो की, ही कथा तुम्ही मला जशी सांगितली, तशी भगवान श्रीहरींना कधी सांगू नका. बोलण्याच्या ओघात विषय आला तरीही लपवून ठेवा. ‘ ॥ ४ ॥
दोहा—संभु दीन्ह उपदेस हित नहिं नारदहि सोहान ।
भरद्वाज कौतुक सुनहु हरि इच्छा बलवान ॥ १२७ ॥
श्रीशिवांनी हा त्यांच्या भल्याचा उपदेश केला, परंतु नारदांना तो पटला नाही. हे भरद्वाज, आता गंमत ऐका. श्रीहरींची इच्छा मोठी बलवान आहे. ॥ १२७ ॥
राम कीन्ह चाहहिं सोइ होई । करै अन्यथा अस नहिं कोई ॥
संभु बचन मुनि मन नहिं भाए । तब बिरंचि के लोक सिधाए ॥
श्रीरामचंद्रांना जे करायचे असते, तेच होते. त्याविरुद्ध करु शकेल, असा कोणीही नाही. शिवांचे बोलणें नारदांना रुचले नाही, तेव्हा ते तेथून ब्रह्मलोकी गेले. ॥ १ ॥
एक बार करतल बर बीना । गावत हरि गुन गान प्रबीना ॥
छीरसिंधु गवने मुनिनाथा । जहँ बस श्रीनिवास श्रुनिवास श्रुतिमाथा ॥
एकदा गानविद्येत कुशल असलेले मुनिनाथ नारद हाती सुंदर वीणा घेऊन हरिगुण गात-गात क्षीरसागरात गेले. तेथे मूर्तिमंत वेदान्ततत्त्व असलेले लक्ष्मीनिवास भगवान नारायण राहतात. ॥ २ ॥  
हरषि मिले उठि रमानिकेता । बैठे आसन रिषिहि समेता ॥
बोले बिहसि चराचर राया । बहुते दिनन कीन्हि मुनि दाया ॥
भगवान लक्ष्मीकांत उभे राहून नारदांना आनंदाने भेटले आणि ते ऋषी नारदांसोबत आसनावर बसले. चराचराचे स्वामी भगवान हसून म्हणाले, ‘ हे मुनी, आज बर्‍याच दिवसांनी ( येण्याची ) दया केली. ॥ ३ ॥
काम चरित नारद सब भाषे । जद्यपि प्रथम बरजि सिवँ राखे ॥
अति प्रचंड रघुपति कै माया । जेहि न मोह अस को जग जाया ॥
जरी श्रीशिवांनी नारदांना पूर्वीच ‘ हे सांगू नका, ‘ अशी सूचना केली होती, तरीही त्यांनी कामदेवाची सर्व करणी भगवंतांना सांगितली. श्रीरघुनाथांची माया मोठी प्रबळ असते. ती मोहित करु शकणार नाही, असा या जगांत कोण जन्मला आहे ? ॥ ४ ॥
दोहा—रुख बदन करि बचन मृदु बोले श्रीभगवान ।
तुम्हरे सुमिरन तें मिटहिं मोह मार मद मान ॥ १२८ ॥
भगवान तटस्थपणे वरवर कोमल स्वरात म्हणाले की, ‘ हे मुनिराज, तुमचे स्मरण केल्यानेही इतरांचे मोह. काम, मद व अभिमान हे नाहीसे होतात. ( मग तुमच्याबद्दल काय बोलायचे ? ) ॥ १२८ ॥
सुनु मुनि मोह होइ मन ताकें । ग्यान बिराग हृदय नहिं जाकें ॥
ब्रह्मचरज ब्रत रत मतिधीरा । तुम्हहि कि करइ मनोभव पीरा ॥
हे मुनी, ज्याच्या हृदयात ज्ञान-वैराग्य नसते, त्याच्या मनात मोह येतो. तुम्हीतर ब्रह्मचर्यव्रतामध्ये तत्पर आणि मोठ्या धीरबुद्धीचे आहात. तुम्हांला कामदेव कधी त्रास देऊ शकेल काय ?’ ॥ १ ॥
नारद कहेउ सहित अभिमाना । कृपा तुम्हारि सकल भगवाना ॥
करुनानिधि मन दीख बिचारी । उर अंकुरेउ गरब तरु भारी ॥
नारदांनी मोठ्या अभिमानाने म्हटले की, ‘ भगवन ही सर्व तुमची कृपा आहे. ‘ करुणानिधान भगवंतांनी मनात विचार करुन पाहिले की, यांच्या मनात प्रचंड गर्वाच्या वृक्षाचा अंकुर उत्पन्न झाला आहे. ॥ २ ॥
बेगि सो मैं डारिहउँ उखारी । पन हमार सेवक हितकारी ॥
मुनि कर हित मम कौतुक होई । अवसि उपाय करबि मैं सोई ॥
सेवकांचे हित करणे हे माझे ब्रीद आहे. तेव्हा मी तो अंकुर ताबडतोप उपटून टाकतो. मुनींचे कल्याण आणि माझा गंमतीचा खेळ होईल, असा उपाय आपण अवश्य करावा. ॥ ३ ॥
तब नारद हरि पद सिर नाई । चले हृदयँ अहमिति अधिकाई ॥
श्रीपति निज माया तब प्रेरी । सुनहु कठिन करनी तेहि केरी ॥
तेव्हा नारद भगवंताच्या चरणी मस्तक ठेवून निघाले. त्यांच्या मनात अभिमान अधिकच वाढला होता. तेव्हा लक्ष्मीपती भगवंतांनी आपल्या मायेला प्रेरित केले. तिची करणी किती दुस्तर असते ते पाहा. ॥ ४ ॥
दोहा—बिरचेउ मग महुँ नगर तेहिं सत जोजन बिस्तार ।
श्रीनिवासपुर तें अधिक रचना बिबिध प्रकार ॥ १२९ ॥
तिने ( हरिमायेने ) वाटेत शंभर योजनांचे ( चारशे कोसाचे ) नगर रचले. त्या नगरातील विविध रचना विष्णूंच्या वैकुंठापेक्षाही अधिक सुंदर होत्या. ॥ १२९ ॥
बसहिं नगर सुंदर नर नारी । जनु बहु मनसिज रति तनुधारी ॥
तेहिं पुर बसइ सीलनिधि राजा । अगनित हय गय सेन समाजा ॥
त्या नगरीत इतके सुंदर स्त्रि-पुरुष राहात होते की, जणू कामदेव व रती हेच मानवदेह धारण केलेले असावेत. त्या नगरीत शीलनिधी नावाचा राजा राहात होता. त्याच्याकडे असंख्य घोडे, हत्ती व सैन्याची दले होती. ॥ १ ॥
सत सुरेस सम बिभव बिलासा । रुप तेज बल नीति निवासा ॥
बिस्वमोहनी तासु कुमारी । श्री बिमोह जिसु रुपु निहारी ॥
त्याचे वैभव आणि विलास शंभर इंद्रासमान होते. तो स्वतः रुप, तेज, बल आणि नीतीचे घर होता. त्याला विश्र्वमोहिनी नावाची एक रुपवती कन्या होती, तिचे रुप पाहून लक्ष्मीनेसुद्धा मोहित व्हावे. ॥ २ ॥
सोइ हरिमाया सब गुन खानी । सोभा तासु कि जाइ बखानी ॥
करइ स्वयंबर सो नृपबाला । आए तहँ अगनित महिपाला ॥
ती सर्व गुणांची खाण भगवंतांची मायाच होती. तिच्या शोभेचे वर्णन कसे करता येईल ? ती राजकुमारी स्वयंवर करु इच्छित होती. त्यासाठी तेथे अगणित राजे आले होते. ॥ ३ ॥
मुनि कौतुकी नगर तेहिं गयऊ । पुरबासिन्ह सब पूछत भयऊ ॥
सुनि सब चरित भूपगृहँ आए । करि पूजा नृप मुनि बैठाए ॥

नारद मुनी कुतूहलाने त्या नगरीत गेले आणि नगरवासीयांकडे त्यांनी विचारपूस केली. सर्व वार्ता ऐकल्यावर ते राजाच्या महालात आले. राजाने त्यांची पूजा करुन त्यांना आसनावर बसविले. ॥ ४ ॥
दोहा—आनि देखाई नारदहि भूपति राजकुमारि ।
कहहु नाथ गुन दोष सब एहि के हृदयँ  बिचारि ॥ १३० ॥
नंतर राजाने राजकुमारीला आणून नारदांना दाखविले. ( आणि विचारले ) ‘ हे नाथ, तुम्ही विचार करुन हिचे सर्व गुण-दोष सांगा.’ ॥ १३० ॥
देखि रुप मुनि बिरति बिसारी । बडी बार लगि रहे निहारी ॥
लच्छन तासु बिलोकि भुलाने । हृदयँ हरष नहिं प्रगट बखाने ॥
तिचे रुप पाहून नारद मुनी वैराग्य विसरुन गेले आणि बराच वेळ तिच्याकडे बघतच राहिले. तिची लक्षणे पाहून मुनी स्वतःला विसरुन गेले आणि मनात हर्षित झाले. परंतु प्रकटपणे त्यांनी लक्षणे सांगितली नाहीत. ॥ १ ॥
जो एहि बरइ अमर सोइ होई । समरभूमि तेहि जीत न कोई ॥
सेवहिं सकल चराचर ताही । बरइ सीलनिधि कन्या जाही ॥
( त्या लक्षणांचा विचार करुन ते मनात म्हणाले ) जो हिच्याशी विवाह करील, तो अमर होईल आणि रणभूमीमध्ये त्याला कोणी जिंकू शकणार नाही. ही शीलनिधीची कन्या ज्याला वरील, सर्व चराचर त्याची सेवा करील. ॥ २ ॥
लच्छन सब बिचारि उर राखे । कछुक बनाइ भूप सन भाषे ॥
सुता   सुलच्छन कहि नृप पाहीं । नारद चले सोच मन माहीं ॥
ती सर्व लक्षणें मुनींनी मनात ठेवली आणि राजाला त्यांनी आपल्या मनाने काही लक्षणे सांगितली. राजाला मुलीची सुलक्षणे सांगून नारद निघून गेले. परंतु त्यांच्या मनात असे आले की, ॥ ३ ॥
करौं जाइ सोइ जतन बिचारी । जेहि प्रकार मोहि बरै कुमारी ॥
जप तप कछु न होइ तेहि काला । हे बिधि मिलइ कवन बिधि बाला ॥

आता जाऊन असा उपाय करावा की, ही कन्या मलाच 

मिळेल. यावेळी जप, तप करुन काही होणार नाही. हे 

विधात्या, ही कन्या मला कशी बरे मिळेल ? ॥ ४ ॥


Custom Search

ShriRamcharitmans Part 19 श्रीरामचरितमानस भाग १९


ShriRamcharitmans 
श्रीरामचरितमानस 
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा—असुर मारि थापहिं सुरन्ह राखहिं निज श्रुति सेतु ।
जग बिस्तारहिं बिसद जस राम जन्म कर हेतु ॥ १२१ ॥
ते असुरांना ठार मारुन देवांची स्थापना करतात, आपल्या ( श्वासरुप असलेल्या ) वेदांच्या मर्यादेचे रक्षण करतात आणि जगामध्ये आपली उज्ज्वल कीर्ती पसरवितात. श्रीरामचंद्रांच्या अवताराचे हे कारण आहे. ॥ १२१ ॥
सोइ जस गाइ भगत भव तरहीं । कृपासिंधु जन हित तनु धरहीं ॥
राम जनम के हेतु अनेका । परम बिचित्र एक तें एका ॥
ते यशोगान कर-करुन भक्तजन भवसागर तरुन जातात. कृपासागर भगवान भक्तांच्या हितासाठी देह धारण करतात. श्रीरामचंद्रांनी जन्म घेण्याचीअनेक कारणे आहेत. ती एकाहून एक विलक्षण आहेत. ॥ १ ॥
जनम एक दुइ कहउँ बखानी । सावधान सुनु सुमति भवानी ॥
द्वारपाल हरि के प्रिय दोऊ । जय अरु बिजय जान सब कोऊ ॥
हे बुद्धिमती भवानी, त्यांपैकी एक-दोन जन्मांचे वर्णन मी विस्ताराने करतो. तू लक्षपूर्वक ऐक. श्रीहरींचे जय व विजय नावाचे दोन प्रिय द्वारपाल आहेत. त्यांना सर्वजण जाणतात. ॥ २ ॥
बिप्र श्राप तें दूनउ भाई । तामस असुर देह तिन्ह पाई ॥
कनककसिपु अरु हाटकलोचन । जगत बिदित सुरपति मद मोचन ॥
त्या दोन भावांना सनकादिकांच्या शापाने असुरांचे तामसी देह मिळाले. एकाचे नाव होते हिरण्यकशिपु आणि दुसर्‍याचे हिरण्याक्ष. त्यांनी इंद्राची गुर्मी उतरविली होती, हे सर्व जगाला ठाऊक आहे. ॥ ३ ॥
बिजई समर बीर बिख्याता । धरि बराह बपु एक निपाता ॥
होइ नरहरि दूसरा पुनि मारा । जन प्रहलाद सुजस बिस्तारा ॥
युद्धामध्ये विजय मिळविणारे ते विख्यात वीर होते. यांपैकी हिरण्याक्षाला भगवंतानी वराहाचे शरीर धारण करुन मारले. नंतर हिरण्यकशिपूचा नरसिंह रुप धारण करुन वध केला आणि आपला भक्त प्रल्हाद याची उत्तम कीर्ती पसरविली. ॥ ४
दोहा—भए निसाचर जाइ तेइ महाबीर बलवान ।
कुंभकरन रावन सुभट सुर बिजई जग जान ॥ १२२ ॥
पुढे ते ( दोघे ) देवांना जिंकणारे आणि बडे योद्धे असलेले रावण आणि कुंभकर्ण नावाचे मोठे बलवान व महावीर राक्षस झाले. त्यांना संपूर्ण जग जाणते. ॥ १२२ ॥
मुकुत न भए हते भगवाना । तीनि जनम द्विज बचन प्रवाना ॥
एक बार तिन्ह के हित लागी । धरेउ सरीर भगत अनुरागी ॥
भगवंतांकडून मारले गेल्यावरही ते दोघे ( हिरण्याक्ष व हिरण्यकशिपू ) मुक्त झाले नाहीत. कारण ब्राह्मणांच्या शापाचा परिणाम तीन जन्मांचा होता, म्हणून ते मुक्त झाले नाहीत. त्यांना तीन जन्म घ्यावे लागले. तेव्हा भक्तप्रेमी भगवंतांनी त्यांच्या कल्याणासाठी पुन्हा एकदा अवतार घेतला. ॥ १ ॥
कस्यप आदिति तहाँ पितु माता । दसरथ कौसल्या बिख्याता ॥
एक कलप एहि बिधि अवतारा । चरित पवित्र किए संसारा ॥
त्या अवतारामध्ये कश्यप आणि अदिती हे त्यांचे माता-पिता होते. तेच पुढे दशरथ व कौसल्या या नावाने प्रसिद्ध झाले. एका कल्पात अशाप्रकारे त्यांनीं अवतार घेऊन जगामध्ये पवित्र लीला केल्या. ॥ २ ॥ २ ॥
एक कलप सुर देखि दुखारे । समर जलंधर सन सब हारे ॥
संभु कीन्ह संग्राम अपारा । दनुज महाबल मरइ न मारा ॥
एका कल्पात जलंधर दैत्याकडून पराजित झाल्यामुळे सर्व देव दुःखी झालेले पाहून शिवांनी त्याच्याशी घनघोर युद्ध केले, परंतु तो महाबली दैत्य मारुनही मरत नव्हता. ॥ ३ ॥
परम सती असुराधिप नारी । तेहिं बल ताहि न जितहिं पुरारी ॥
त्या दैत्यराजाची पत्नी मोठी पतिव्रता होती. तिच्या प्रतापामुळे त्रिपुरासुरासारख्या अजेय शत्रूचा नाश करणारे शिवसुद्धा त्याला जिंकू शकले नाहीत. ॥ ४ ॥
दोहा—छल करि टारेउ तासु ब्रत प्रभु सुर कारज कीन्ह ।
जब तेहिं जानेउ मरम तब श्राप कोप करि दीन्ह ॥ १२३ ॥
तेव्हा प्रभूने कपटाने तिच्या पातिव्रत्याचा भंग करुन देवांचे काम फत्ते केले. जेव्हा तिला हे रहस्य सनजले, तेव्हा तिने रागाने भगवंतांना शाप दिला. ॥ १२३ ॥
तासु श्राप हरि दीन्ह प्रमाना । कौतुकनिधि कृपाल भगवाना ॥
तहाँ जलंधर रावन भयऊ । रन हति राम परम पद दयऊ ॥
लीलाधर कृपाळू हरींनी त्या स्त्रीचा शाप प्रमाण मानून स्वीकारला. तोच जलंधर त्या कल्पामध्ये रावण झाला. त्याला श्रीरामचंद्रांनी युद्धात मारुन परमपद दिले. ॥ १ ॥
एक जनम कर कारन एहा । जेहि लगि राम धरी नरदेहा ॥
प्रति अवतार कथा प्रभु केरी । सुनु मुनि बरनी कबिन्ह घनेरी ॥
एका जन्माचे हे कारण होते. त्यासाठी श्रीरामांनी मनुष्यदेह धारण केला. हे भरद्वाज मुनी, ऐका. प्रभूंच्या प्रत्येक अवताराची कथा कवींनी नानाप्रकारे वर्णन केलेली आहे. ॥ २ ॥
नारद श्राप दीन्ह एक बारा । कलप एक तेहि लगि अवतारा ॥
गिरिजा चकित भईं सुनि बानी । नारद बिष्नुभगत पुनि ग्यानी ॥
एकदा नारदांनी शाप दिला,म्हणून त्यासाठी एका कल्पात भगवंतांचा अवतार झाला. ‘ ही गोष्ट ऐकून पार्वती मोठी चकित झाली. ( आणि ती म्हणाली ) ‘ नारद तर विष्णुभक्त आणि ज्ञानी आहेत. ॥ ३ ॥
कारन कवन श्राप मुनि दीन्हा । का अपराध रमापति कीन्हा ॥
यह प्रसंग मोहि कहहु पुरारी । मुनि मन मोह आचरज भारी ॥
मग नारदमुनींनी भगवंतांना का शाप दिला ? लक्ष्मीपती भगवंतांनी त्यांच काय अपराध केला होता ? हे नाथ ! ती कथा मला सांगा. नातदमुनींच्या मनातही मोह उत्पन्न झाला, ही मोठी आश्र्चर्याची गोष्ट आहे. ‘ ॥ ४ ॥
दोहा—बोले बिहसि महेस तब ग्यानी मूढ न कोइ ।
जेहि जस रघुपति करहिं जब सो तस तेहि छन होइ ॥ १२४ ( क ) ॥
तेव्हा महादेव हसत-हसत म्हणाले, ‘ कोणी ज्ञानी नाही, आणि मूर्खही नाही. श्रीरघुनाथ ज्याला जसे बनवितात, त्याक्षणी तो तसा बनतो. ‘ ॥ १२४ ( क ) ॥
सो—कहउँ राम गुन गाथा भरद्वाज सादर सुनहु ।
भव भंजन रघुनाथ भजु तुलसी तजि मान मद ॥ १२४ ( ख ) ॥
( याज्ञवल्क्य म्हणतात--) ‘ हे भरद्वाज, मी श्रीरामचंद्रांच्या गुणांची कथा सांगतो, ती तुम्ही आदराने ऐका. ‘ तुलसीदास म्हणतात, ‘ मान व मद सोडून जन्म-मृत्यूचा नाश करणार्‍या श्रीरामांना भजा. ‘ ॥ १२४ ( ख ) ॥
हिमगिरि गुहा एक अति पावनि । बह समीप सुरसरी सुहावनि ॥
आश्रम परम पुनीत सुहावा । देखि देवरिषि मन अति भावा ॥
हिमालय पर्वतामध्ये एक मोठी पवित्र गुहा होती. तिच्या जवळून सुंदर गंगा वाहात होती. तो परम पवित्र आश्रम पाहून नारदांच्या मनाला अतिशय आनंद झाला. ॥ १ ॥
निरखि सैल सरि बिपिन बिभागा । भयउ रमापति पद अनुरागा ॥
सुमिरत हरिहि श्राप गति बाधी । सहज बिमल मन लागि समाधी ॥
पर्वत, नदी आणि वनाचे ( सुंदर ) विभाग पाहून नारदांना लक्ष्मीकांत भगवंतांविषयी प्रेम वाटू लागले. भगवंतांचे स्मरण करताच त्यांच्या ( नारदांच्या ) शापाची गती ( दक्ष प्रजापतीने नारदांना शाप दिला होता, म्हणून ते एका जागी थांबू शकत नव्हते. ) थांबली आणि त्यांचे मन स्वभावतःच निर्मळ असल्यामुळे त्यांची समाधी लागली. ॥ २ ॥
मुनि गति देखि सुरेस डेराना । कामहि बोलि कीन्ह सनमाना ॥
सहित सहाय जाहु मम हेतू । चलेउ हरषि हियँ जलचरकेतू ॥
नारदांची स्थिती पाहून देवराज इंद्र घाबरला. त्याने कामदेवाला बोलावून त्याचा आदर-सत्कार केला, ( आणि म्हटले ) ‘ माझ्या कल्याणासाठी तू आपल्या साहाय्यकांसह ( नारदांची समाधी भंग करण्यास ) जा. ‘ ( हे ऐकून ) कामदेव मनात प्रसन्न होऊन निघाला. ॥ ३ ॥
सुनासीर मन महुँ असि त्रासा । चहत देवरिषि मम पुर बासा ॥
जे कामी लोलुप जग माहीं । कुटिल काक इव सबहि डेराहीं ॥
इंद्राच्या मनात भीती वाटत होती की, देवर्षी नारदांना माझ्या पुरी ( अमरावती ) चे राज्य हवे आहे. जगामध्ये जे कामी व लोभी असतात, ते दुष्ट कावळ्याप्रमाणे सर्वांना घाबरतात. ॥ ४ ॥
दोहा—सूख हाड लै भाग सठ स्वान निरखि मृगराज ।
छीनि लेइ जनि जान तिमि सुरपतिहि न लाज ॥ १२५ ॥
ज्याप्रमाणे मूर्ख कुत्रा सिंहाला पाहून वाळलेले हाड तोंडात धरुन पळत सुटतो. त्या मूर्खाला वाटते की, आपले हाडूक सिंह पळवून नेईल, त्याप्रमाणे इंद्राला ( नारद आपले राज्य हिरावून घेतील, असा विचार करताना ) लाज वाटली नाही. ॥ १ ॥
तेहि आश्रमहिं मदन जब गयऊ । निज मायाँ बसंत निरमयऊ ॥
कुसुमित बिबिध बिटप बहुरंगा । कूजहिं कोकिल गुंजहिं भृंगा ॥
जेव्हा कामदेव त्या आश्रमात गेला, तेव्हा त्याने आपल्या मायेने तेथे वसंतऋतू उत्पन्न केला. त्यामुळे नानातर्‍हेच्या वृक्षांवर रंगीबेरंगी फुले उमलली. त्यांच्यावर बसून कोकिळा कुहूकुहू करु लागल्या आणि भ्रमर गुंजारव करु लागले. ॥ १ ॥
चली सुहावनि त्रिबिध बयारी । काम कृसानु बढावनिहारी ॥
रंभादिक सुरनारि नबीना । सकल असमसर कला प्रबीना ॥
कामाग्नी भडकाविणार्‍या तीन प्रकारच्या ( शीतल, मंद व सुगंधी ) हवेच्या लहरी वाहू लागल्या. रंभा इत्यादी कामकलेमध्ये निपुण असलेल्या सर्व नवयौवना देवांगना-॥ २ ॥
करहिं गान बहु तान तरंगा । बहुबिधि क्रीडहिं पानि पतंगा ॥
देखि सहाय मदन हरषाना । कीन्हेसि पुनि प्रपंच बिधि नाना ॥
अनेक प्रकारच्या ताना घेत गाऊ लागल्या आणि हातात चेंडू घेऊन नाना प्रकारचे खेळ खेळू लागल्या. कामदेव आपल्या या साहाय्यकांना पाहून प्रसन्न झाला आणि त्याने नाना प्रकारचे मायाजाल पसरले. ॥ ३ ॥
काम कल कछु मुनिहि न ब्यापी । निज भयँ डरेउ मनोभव पापी ॥
सीम कि चाँपि सकइ कोउ तासू । बड रखवार रमापति जासू ॥

परंतु कामदेवाची कोणतीही कला मुनींवर प्रभाव टाकू 

शकली नाही. तेव्हा तो पापी कामदेव स्वतःच्या 
नाशाच्या भीतीने घाबरुन गेला. लक्ष्मीपती भगवंत ज्याचे रक्षक असतील त्याची धर्ममर्यादा कोण भंग करु शकेल बरे ? ॥ ४ ॥


Custom Search

Thursday, May 21, 2020

ShriRamCharitManas Part 17 श्रीरामचरितमानस भाग १७


ShriRamCharitManas Part 17 
श्रीरामचरितमानस भाग १७ 
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
ShriRamCharitManas Part 17
श्रीरामचरितमानस भाग १७ 
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा—मगन ध्यान रस दंड जुग पुनि मन बाहेर कीन्ह ।
 रघुपति चरित महेस तब हरषित बरनै लीन्ह ॥ १११ ॥
शिव दोन घटका ध्यानाच्या आनंद-रसात मग्न झाले, नंतर त्यांनी बळेच मन आवरले आणि ते प्रसन्न चित्ताने श्रीरघुनाथांचे चरित्र वर्णन करु लागले. ॥ १११ ॥
झूठेउ सत्य जाहि बिनु जानें । जिमि भुजंग बिनु रजु पहिचानें ॥
जेहि जानें जग जाइ हेराई । जागें जथा सपन भ्रम जाई ॥
‘ जे जाणल्याविना खोटेसुद्धा खरे वाटते, जसा दोरीवर सापाचा भ्रम होतो आणि जे जाणल्यावर जगताचा लोप होतो, जसे जागे झाल्यावर स्वप्नाचा भ्रम नाहीसा होतो. ॥ १ ॥
बंदउँ बालरुप सोइ रामू । सब सिधि सुलभ जपत जिसु नामू ॥
मंगल भवन अमंगल हारी । द्रवउ सो दसरथ अजिर बिहारी ॥
( हा श्र्लोक म्हणजे श्रीरामचरितमानसमध्ये जे अनेक मंत्र आहेत त्यापैकी एक महत्वाचा मंत्र आहे. पुढे येतील तसे आपल्याला समजतीलच. )   
त्या श्रीरामचंद्रांच्या बालरुपाला मी वंदन करतो. त्यांचे नाव जपल्यामुळे सर्व सिद्धी सहजपणे प्राप्त होतात. मंगलाचे धाम असणारे, अमंगलाचे हरण करणारे आणि दशरथाच्या अंगणामध्ये खेळणारे ते बालरुप असलेले श्रीराम माझ्यावर कृपा करोत. ‘ ॥ २ ॥
करि प्रनाम रामहि त्रिपुरारी । हरषि सुधा सम गिरा उचारी ॥
धन्य धन्य गिरिराजकुमारी । तुम्ह समान नहिं कोउ उपकारी ॥
त्रिपुरासुराचा वध करणारे शिव श्रीरामांना प्रणाम करुन आनंदाने अमृतमय वाणीने म्हणाले, ‘ हे गिरिराजकुमारी ! तू धन्य आहेस. खरेच धन्य आहेस. तुझ्यासारखा उपकार करणारा कोणीही नाही. ॥ ३ ॥
पूँछेहु रघुपति कथा प्रसंगा । सकल लोक जग पावनि गंगा ॥
तुम्ह रघुबीर चरन अनुरागी । कीन्हिहु प्रस्न जगत हित लागी ३
तू श्रीरामांची कथा विचारलीस. ती कथा जगाला पावन करणार्‍या गंगेसमान सर्व लोकांना पावन करणारी आहे. श्रीरामांच्या चरणी तुझे प्रेम आहे. त्यामुळे तू जगाच्या कल्याणासाठीच प्रश्र्न विचारले आहेस. ॥ ४ ॥
दोहा—राम कृपा तें पारबति सपनेहुँ तव मन माहिं ।
सोक मोह संदेह भ्रम मम बिचार कछु नाहिं ॥ ११२ ॥
हे पार्वती, श्रीरामांच्या कृपेमुळे तुझ्या मनात स्वप्नातही शोक, मोह, संदेह आणि भ्रम काहीही नाही, असे मला वाटते. ॥ ११२ ॥
तदपि असंका कीन्हिहु सोई । कहत सुनत सब कर हित होई ॥
जिन्ह हरिकथा सुनी नहिं काना । श्रवन रंध्र अहिभवन समाना ॥
तरीही तू तीच पूर्वीची शंका उपस्थित केलीस, हा प्रसंग सांगण्याने-ऐकण्याने सर्वांचे कल्याण होईल. ज्यांनी आपल्या कानांनी भगवंताची कथा ऐकली नाही, त्यांची कानांची भोके सापाच्या बिळाप्रमाणे आहेत. ॥ १ ॥
 नयनन्हि संत दरस नहिं देखा । लोचन मोरपंख कर लेखा ॥
ते सिर कटु तुंबरि समतूला । जे न नमत हरि गुर पद मूला ॥
ज्यांनी आपल्या डोळयांनी संतांचे दर्शन घेतले नाही, त्यांचे डोळे मोराच्या पंखावर दिसणार्‍या नकली डोळ्यांच्या श्रेणीत येतात. जे मस्तक श्रीहरींच्या आणि श्रीगुरुंच्या चरणी झुकत नाही, ते कडू भोपळ्यासमान होय. ॥ २ ॥   
जिन्ह हरिभगति हृदयँ नहिं आनी । जीवत सव समान तेइ प्रानी ॥
जो नहिं करइ राम गुन गाना । जीह सो दादुर जीह समाना ॥
ज्यांच्या हृदयांत भगवंताच्या भक्तीला स्थान नाही, ते प्राणी जिवंत मुडद्याप्रमाणे होत. जी जीभ श्रीरामांच्या गुणांचे गायन करीत नाही, ती बेडकाच्या जीभेप्रमाणे होय. ॥ ३ ॥
कुलिस कठोर निठुर सोइ छाती । सुनि हरिचरित न जो हरषाती ॥
गिरिजा सुनहु राम कै लीला । सुर हित दनुज बिमोहनसीला ॥
भगवंतांचे चरित्र ऐकून आनंदित होत नाही, ते हृदय वज्रासारखे कठोर व निष्ठुर होय, हे पार्वती, श्रीरामचंद्रांची लीला ऐक. ती देवांचे कल्याण करणारी आणि विशेषतः दैत्यांना मोहित करणारी आहे. ॥ ४ ॥
दोहा—रामकथा सुरधेनु सम सेवत सब सुख दानि ।
सतसमाज सुरलोक सब को सुनै अस जानि ॥ ११३ ॥
कामधेनू ही सेवा केल्यावर सर्व सुखे प्राप्त करुन देते, तशी ही रामकथा आहे आणि सत्पुरुषांचा समुदाय हाच सर्व देवांचा लोक होय. असे पाहिल्यावर कोण बरे ही कथा ऐकणार नाही ? ॥ ११३ ॥
रामकथा सुंदर कर तारी । संसय बिहग उडावनिहारी ॥
रामकथा कलि बिटप कुठारी । सादर सुनु गिरिराजकुमारी ॥
संदेहरुपी पक्ष्यांना हुसकून लावणार्‍या टाळीप्रमाणे श्रीरामांची कथा हातांची सुंदर टाळी आहे. रामकथा ही कलियुगरुपी वृक्षाला तोडणारी कुर्‍हाड आहे. हे गिरिराजकुमारी ! तू ही कथा आदराने ऐक. ॥ १ ॥
राम नाम गुन चरित सुहाए । जनम करम अगनित श्रुति गाए ॥
जथा अनंत राम भगवाना । तथा कथा कीरति गुन नाना ॥
श्रीरामचंद्रांची सुंदर नामे, गुण, चरित्र, जन्म आणि कर्म हे सर्व अगणित असल्याचे वेदांनी प्रतिपादित केले आहे. ज्याप्रमाणे भगवान श्रीराम हे अनंत आहेत, त्याप्रमाणे त्यांच्या कथा, कीर्ती आणि गुण हे सुद्धा अनंत आहेत. ॥ २ ॥
तदपि जथा श्रुत जसि मति मोरी । कहिहउँ देखि प्रीति अति तोरी ॥
उमा प्रस्न तव सहज सुहाई । सुखद संतसंमत मोहि भाई ॥
तरीही तुझे ( त्याविषयी ) अत्यंत प्रेम पाहून जे काही मी ऐकले आहे आणि जशी माझी बुद्धी आहे, त्यानुसार मी तुला सांगतो. हे पार्वती, तुझा प्रश्र्न स्वभावतः सुंदर, सुखदायक आणि संतसंमत आहे व मलाही तो फार आवडला. ॥ ३ ॥
एक बात नहिं मोहि सोहानी । जदपि मोह बस कहेहु भवानी ॥
तुम्ह जो कहा राम कोउ आना । जेहि श्रुति गाव धरहिं मुनि ध्याना ॥
परंतु हे पार्वती, एक गोष्ट मात्र मला आवडली नाही, जरी ती तू मोहामुळे म्हणालीस. तू असे म्हणालीस की, वेद ज्यांचे गुणगान करतात आणि मुनिजन ज्यांचे ध्यान करतात, ते राम कुणी दुसरे आहेत काय ? ॥ ४ ॥
दोहा—कहहिं सुनहिं अस अधम नर ग्रसे जे मोह पिसाच ।
पाषंडी हरि पद बिमुख जानहिं झूठ न साच ॥ ११४ ॥
जे मोहरुपी पिशाचाने झपाटले आहेत, नास्तिक आहेत, भगवंतांच्या चरणांशी विन्मुख आहेत आणि खरे-खोटे ज्यांना मुळीच माहीत नाही, असे अधम मनुष्यच अशाप्रकारे सांगत-ऐकत असतात. ॥ ११४ ॥
अग्य अकोबिद अंध अभागी । काई बिषय मुकुर मन लागी ॥
लंपट कपटी कुटिल बिसेषी । सपनेहुँ संतसभा नहिं देखी ॥
जे अज्ञानी, मूर्ख, आंधळे आणि भाग्यहीन आहेत, ज्यांच्या मनोरुपी आरशावर विषयरुपी मळ साचला आहे, जे व्यभिचारी, कपटी व मोठे दुष्ट आहेत आणि ज्यांनी कधी स्वप्नातही संतांचे दर्शन घेतले नाही; ॥ १ ॥
कहहिं ते बेद असंमत बानी । जिन्ह कें सूझ लाभु नहिं हानी ॥
मुकुर मलिन अरु नयन बिहीना । राम रुप देखहिं किमि दीना ॥
ज्यांना आपली लाभ-हानी कळत नाही, तेच लोक असे वेदविरोधी बोलत असतात. ज्यांचा हृदयरुपी आरसा मलिन आहे आणि जे नेत्रहीन आहेत, ते बिचारे श्रीरामांचे रुप कसे पाहणार ? ॥ २ ॥
जिन्ह कें अगुन न सगुन बिबेका । जल्पहिं कल्पित बचन अनेका ॥
हरिमाय बस जगत भ्रमाहीं । तिन्हहि कहत कछु अघटित नाहीं ॥
ज्यांना निर्गुण-सगुण याचा काहीही विवेक नाही. जे अनेक कपोलकल्पित गोष्टी बडबडत असतात, जे श्रीहरींच्या मायेला वश होऊन जन्म-मृत्युच्या फेर्‍यांत भटकत असतात, त्यांना काहीही बरळणे अशक्य नाही. ॥ ३ ॥
बातुल भूत बिबस मतवारे । ते नहिं बोलहिं बचन बिचारे ॥
जिन्ह कृत महामोह मद पाना । तिन्ह कर कहा करिअ नहिं काना ॥
ज्यांना ( सन्निपात, उन्माद इत्यादी ) वायुरोगाने झपाटले आहे, ज्यांना भूताने पछाडले आहे आणि ज्यांनी नशापाणी केले आहे, असे लोक काही विचार करुन बोलत नाहीत. ज्यांनी महामोहरुपी मदिरा ढोसली आहे, त्यांचे काहीही ऐकू नये. ॥ ४ ॥
सो—अस निज हृदयँ बिचारि तजु संसय भजु राम पद ।
सुनु गिरिराज कुमारि भ्रम तम रबि कर बचन मम ॥ ११५ ॥
मनांत असा विचार करुन संशय सोडून दे आणि श्रीरामचंद्रांच्या चरणांची सेवा कर. हे पार्वती, भ्रमरुपी अंधकाराचा नाश करण्यासाठी सूर्याच्या किरणांप्रमाणे असणारे माझे हे बोल ऐक. ॥ ११५ ॥
सगुनहि अगुनहि नहिं कछु भेदा । गावहिं मुनि पुरान बुध बेदा ॥
अगुन अरुप अलख अज जोई । भगत प्रेम बस सगुन सो होई ॥
मुनी, पुराणे, पंडित आणि वेद हे सर्व सांगतात की, सगुण आणि निर्गुण यांच्यामध्ये कोणताही भेद नाही. जो निर्गुण, निराकार, अव्यक्त आणि अजन्मा आहे, तोच भक्तांच्या प्रेमाला वश होऊन सगुण बनतो. ॥ १ ॥
जो गुन रहित सगुन सोइ कैसें । जल हिम उपल बिलग नहिं जैसें ॥
जासु नाम भ्रम तिमिर पतंगा । तेहि किमि कहिअ बिमोह प्रसंगा ॥
जो निर्गुण तोच सगुण कसा, हे समजून घे. ज्याप्रमाणे पाणी व पाण्याची गार यात भेद नाही. भ्रमरुपी अंधकार नष्ट करण्यासाठी ज्यांचे नांव सूर्य आहे, त्यांच्याबाबतीत मोह कसा उद्भवू शकेल ? ॥ २ ॥
राम सच्चिदानंद दिनेसा । नहिं तहँ मोह निसा लवलेसा ॥
सहज प्रकासरुप भगवाना । नहिं तहँ पुनि बिग्यान बिहाना ॥
श्रीरामचंद्र हे सच्चिदानंदस्वरुप सूर्य आहेत. तेथे मोहरुपी रात्रीचा लवलेशही नाही. ते स्वभावतःच प्रकाशरुप आणि षड्गुणैश्वर्ययुक्त भगवान आहेत, तेथे तर विज्ञानरुपी प्रातःकालही होत नाही. ( अज्ञानरुपी रात्र असेल तरच विज्ञानरुपी प्रातःकाल होणार. भगवान तर नित्य ज्ञानस्वरुप आहेत. ) ॥ ३ ॥
हरष बिषाद ग्यान अग्याना । जीव धर्म अहमिति अभिमाना ॥
राम ब्रह्म ब्यापक जग जाना । परमानंद परेस पुराना ॥
हर्ष, शोक, ज्ञान, अज्ञान, अहंता आणि अभिमान या सर्व 

बाबी जीवाचे स्वभाव आहेत. श्रीरामचंद्र हे तर व्यापक 

ब्रह्म, परमानंदस्वरुप, परात्पर प्रभू आणि पुराणपुरुष 

आहेत, ही गोष्ट सार्‍या जगाला ठाऊक आहे. ॥ ४ ॥


Custom Search