Showing posts with label Shree Navanath Bhaktisar. Show all posts
Showing posts with label Shree Navanath Bhaktisar. Show all posts

Tuesday, February 2, 2016

Shree Navanatha Bhaktisar Adhyay 14 Part 2/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय चौदावा ( १४ ) भाग २/२


Shree Navanatha Bhaktisar Adhyay 14 
Mainavati received the Brahmdyana from her guru Jalindar. Now she thought that her son Gopichand should also receive the true knowledge from her guru. So she advised him that the main purpose of our life is to receive true knowledge. Gopichand's father was also a brave king, handsome however when time came his body went to ash within no time. Lord of Death is waiting. Hence Gopichand should obtain the knowledge from guru Jalindar. Gopichand told her that he knows that Mainavati is telling all this to him for his benefit. However he has not found a guru who would be of that much knowledge. Further this is not the right time to leave the kingdom and his family members. However he is not declining what Mainavati had told him. He will do it at appropriate time. Loomavanti was very favorite wife of King Gopichand. She was listening what Mainavati was telling Gopichand. She thought that Gopichand will leave the kingdom. She was selfish as such she wanted that Gopichand should not leave the kingdom. She told Gopichand that Mainavati and Jalindar had made a plot so that Gopichand would go out of Kingdom and then Jalindar would along with Mainavati would leave there as they wish and become head of the kingdom. This was a lie and Gopichand believed it and thrown Jalindar into a deep pit. However Jalindar knew what was going to happen in future hence he kept quiet and done nothing. What happen next will be told to us by Malu who is son of Dhudi from Narahari Family in the Next Adhyay 15.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय चौदावा ( १४ ) भाग २/२
ऐसें ऐकोनि मातेचें वचन । बोलता झाला त्रिलोचननंदन ।
म्हणे माते तयासी शरण । जालिया योग्यता फिरावें ॥ १०१ ॥
सकळ टाकूनि सुखसंपत्ति । राजवैभव दारासुती ।
आप्तवर्गादि सोयरेजाती । टाकूनि योग कैसा करावा कीं ॥ १०२ ॥
द्वादशवरुषें मातें । भोगूं दे सकळ वैभवातें ।
मग शरण रिघूनि त्यातें । योगालागीं कशीन कीं ॥ १०३ ॥
कशीन तरी परी कैसा । मिरवीन ब्रह्मांडांत ठसा ।
कीं उत्तानपादराजसुतापरी । शिक्का जगामाजी मिरवीन ॥ १०४ ॥
माता म्हणे बाळा परियेसीं । पळ घडी भरंवसा नाहीं देहासी ।
तेथे संवत्सर म्हणतां द्वादशी । देखिले कोणी बाळका ॥ १०५ ॥
चित्त वित्त आणि जीवित्व आपुलें । अचळ नोहे अशाश्वत ठेलें ।
क्षणैक काय होईल न कळे । क्षणभंगुर वर्ततसे ॥ १०६ ॥
बा रे उदकावरील बुडबुडा । कोण पाहील अशाश्वत चाडा ।
वंध्यापुत्रें घेतला वाडा । मृगजळा केवीं तृषार्त ॥ १०७ ॥
तेवीं वारे सहजस्थितीं । बोलतां न ये अशाश्वती ।
स्वप्नप्रवाहीं इंद्रपदासी । भोगीत खरे न मानावें ॥ १०८ ॥
तन्न्याय अभासपर । सकळ मिरवतसे चराचर ।
त्यांतूनि कोणीएक रणशूर । शाश्वतपदा मिरवितसे ॥ १०९ ॥
शुक दत्तात्रेय कपिलमुनी । व्यास वसिष्ठाची मांडणी ।
प्रल्हादादिक भागवतधर्मी । ऐसे कोणी निवडिले ॥ ११० ॥
नाहींतरी होताती थोडीं । सकळ बांधिली प्रपंचवेडीं ।
परी यमरायाच्या रक्षकवाडी । एकसरां कोंडिलीं ॥ १११ ॥
म्हणूनि बा रे सांगते तुज । शाश्वत नोहे काळ समस्त ।
कोणे घडी घडेल केउत । अक्कलकळा कळेना ॥ ११२ ॥
ऐसा बोध माता करितां । लुमावंती तयाची कांता ।
गुप्तवेषें श्रवण करितां । हाय हाय म्हणतसे ॥ ११३ ॥
म्हणे माता नोहे पापिणी । पुत्रासी योजिती पुत्रकाचणी ।
ऐसी राज्यविभवमांडणी । जोग देऊं म्हणतसे ॥ ११४ ॥
तरी राज्यासी आली विवशी । उपाय काय करावा यासी । 
रामासारिखा पुत्र वनवासीं । कैकैयीनें धाडिला ॥ ११५ ॥
स्वभ्रताराचा घेतला प्राण । चतुर्थपुत्रा लाविलें रानोरान ।
तन्न्याय आम्हांकारणें । देव क्षोभला वाटतसे ॥ ११६ ॥  
दुष्ट स्वप्न दृष्टीं येतां । तर्की मानिती विनाश चित्ता ।
म्हणतां प्रवेशली दुःखव्यथा । तरी देव क्षोभतात ॥ ११७ ॥
दासदासी आपुले हाती । आज्ञेमाजी सकळ वर्तती । 
ते अवज्ञा करोनि उत्तर देती । तरी देव क्षोभला जाणावें ॥ ११८ ॥
सहज ठेविलें धनमांदुस । पुढें काढूं जातां कार्यास ।
तें न सांपडे ठेविल्यास । तरी देवक्षोभ जाणिजे ॥ ११९ ॥
सभेस्थानीं सत्यार्थगोष्टी । करितां अनृत वाटे चावटी ।
लोक बैसती चेष्टेपाठी । तरी देवक्षोभ जाणिजें ॥ १२० ॥
आपुलें धन लोकांवरी सांचे । तें मागूं जातां स्वयें वाचे ।
ते म्हणती काय घेतले तुझ्या बापाचें । तरी देवक्षोभ जाणिजे ॥ १२१ ॥    
आपुली विद्या तीव्रशस्त्र । शत्रुकाननीं विनाशपात्र । 
ती कार्यार्थ न मिरवे स्वतंत्र । तरी देवक्षोभ जाणावा ॥ १२२ ॥
नसतां वांकुडें पाऊल कांहीं । नागविला जाय राजप्रवाहीं ।
नसत्या कळीं बैसल्या ठायीं । तरी देवक्षोभ जाणिजे ॥ १२३ ॥ 
आपुला शत्रु प्रतापापुढें । मिरवी जैसा अति बापुडें ।
त्या शरण रिघतां आपुल्या चाडें । तरी देवक्षोभ जाणिजे ॥ १२४ ॥
लोकां उपकार केला विशेष । तेचि लोक मानिती आपुला त्रास ।
पाहूं नका म्हणती मुखास । तरी देवक्षोभ जाणिजे ॥ १२५ ॥
नसता अधिमधीं उतरा । नसतीच विघ्ने येती घरा ।
तेंचि करणे परिहारा । देवक्षोभ जाणिजे ॥ १२६ ॥
गृहींचे मनुष्य मुष्टींत सकळ । असूनि वाढे गृहांत कळ ।
आपुलें न चाले कांहींच बळ । तरी देवक्षोभ जाणिजे ॥ १२७ ॥
तरी हेचि नीति उपदेश । माता करीत आहे पुत्रास ।
तरी बरवें नोहे हा विनाश । जगामाजी मिरवेल ॥ १२८ ॥
तरी ह्या द्वंद्वसुखाची कहाणी । पेटेल महावडवानळ वन्ही ।
राजवैभव हें अब्धिपाणी । भस्म करील निश्र्चयें ॥ १२९ ॥
ऐसा विचार करुनि मानसीं । लुमावंती प्रवेशे स्वसदनासी ।
येरीकडे मैनावतीसी । उत्तर देत नरेंद्र ॥ १३० ॥
म्हणे माय वो तव कामनीं । ऐसेंचि आहे वेधक मनीं ।
तंव त्या स्वामीची करणी । निजदृष्टीं पाहीन वो ॥ १३१ ॥
माझें मजलागीं हित । तें द्यावया असेल सामर्थ्य ।
शोध शोधितां भक्तिपंथ । सहज दृष्टीं पडेल वो ॥ १३२ ॥
मग मी सोडूनि सकळांस । तनधनमन ओपीन त्यास ।
तूं येथून वाईट चित्तास । सहसा न मानीं जननीये ॥ १३३ ॥
ऐसें वदोनि समाधानीं । नृप गेला स्नानालागोनी ।
येरी कडे अंतःपुरसदनीं । काय करी लुमावंती ॥ १३४ ॥
परम आवडत्या स्रिया पांचसात । तयांच्या आज्ञेंत नृपनाथ ।
पट्टराणिया प्रीतीवंत । सदा सर्वदा वर्तती ॥ १३५ ॥
तयांसी पाठवूनि परिचारिका । बोलाविल्या सद्विवेका ।
त्यांत लुमावंती मुख्य नायिका । पट्टराणी रायाची ॥ १३६ ॥
वेगें मांडुनि कनकासन । बैसविल्या प्रीतींकरुन । 
तांबुलादि पुढें ठेवून । वृत्तांत सांगे रायाचा ॥ १३७ ॥
बाई वो बाई विपरीत करणी । मैनावती राजजननी ।
विक्षेप पेटला तियेचे मनीं । काय सांगूं तुम्हांतें ॥ १३८ ॥
कोण गावांत आला हेला । जालिंदर ऐसें म्हणती त्याला ।
त्याचा अनुग्रह देऊनियां रायाला । जोग देऊं म्हणतसे ॥ १३९ ॥
ऐसें वर भोगवी माता सुत । निश्र्चय करुनि केला घटपटीत ।
रायासी बोधितां श्रवणीं मात । सकळ झाली वो बाई ॥ १४० ॥
मग राजवैभव सकळ नासलें । स्तंभ भंगल्या सदन पडिलें ।
मुळींचि अर्कालागीं गिळिलें । मग अंधकार सर्वस्वीं ॥ १४१ ॥
मग आपण अष्टविंशती सती । असूनि काय करावी माती ।
परचक्र येऊनि सकळ संपत्ति । विनाशातें पावे हो ॥ १४२ ॥
परी येउते अर्थाअर्थी । कैसी करावी ती युक्ती ।
सांगावी आधीं योजूनि सकळ सबळ मतीं । केलिया कारण मोडावे ॥ १४३ ॥
अगे वन्ही म्हणूं नये लहान । तो क्षणें जाळील सकळ सदन ।
तरी त्यातें करुनि सिंचन । विझवूनियां टाकावा ॥ १४४ ॥
उशा घातला विखार । मग सुखनिद्रा केवीं येणार ।
विष भेदूनि गेल्या जठर । जीवित्व काय वांचेल ॥ १४५ ॥
तरी प्रथमचि सारासार । करुनि मोडावा सकळ प्रकार ।
ऐसी बुद्धि रचूनि सार । सुखसंपत्ति भोगा कीं ॥ १४६ ॥
ऐसी ऐकूनि तियेची उक्ती । मग तर्कवितर्क करिती त्या युवती ।
नानाबुद्धि विलाप दाविती । परी निश्र्चय न घडे कोणाचा ॥ १४७ ॥
यापरी विशाळबुद्धी युवती । विचार काढी लुमावंती ।
की येअर्थी दिसे एक मजप्रती । सुढाळपणीं नेटका ॥ १४८ ॥
आपुल्या गावांत जालिंदर । जोगी आहे वैराग्यपर ।
तरी तयाचा अपाय करुनि थोर । निर्दाळावा सर्वस्वीं ॥ १४९ ॥
निर्दाळावा तरी कैसे रीतीं । तयाच्या भक्तीसी मैनावती ।
आहे तरी राजयाप्रती । निवेदावें कुडे भावें ॥ १५० ॥
तरी तो तुमचा वसवसा । ग्रीवे मिरवितसे भयार्थ फांसा ।
म्हणूनि युक्ति रचिली मानसा । गाढपणीं ऐकावी कीं ॥ १५१ ॥
निवेदावें तरी कैसें । काम न आवरे मैनावतीस ।
म्हणूनि चित्तीं उदास । जालिंदर भोगितसे ॥ १५२ ॥
जालिंदराचा अनुग्रह देऊन । जोगी करावा राजियाकारण ।
मग करुनि पाठवावा तीर्थाटन । अथवा तपाचे कारणीं ॥ १५३ ॥
मग तो गेलिया दूर देशीं । गृहीं आणूनि जालिंदरासी ।
बैसवोनि राज्यासनासी । सकळ सुख भोगावें ॥ १५४ ॥
ऐसें सांगूनि सकळ रायातें । उदय करावा कोपानळातें ।
मग सहजविधि जालिंदरनाथ । भस्म होईल त्यामाजी ॥ १५५ ॥
जैसे विषय अति गोड । गोडचि म्हणूनि करावा पुड ।
मग तें मिरवे शत्रुचाड । द्वंद्वसुख वाटावया ॥ १५६ ॥
ऐसा विचार करुनी गोमटा । जात्या झाल्या त्या वरवंटा ।
येरी सांगे राजपटा । गोपीचंद मिरवला ॥ १५७ ॥
राजकारणीं अपार वार्ता । रागरंग कुशळता । 
मानरंजनीं नृपनाथा । दिवस लोटूनि पैं गेला ॥ १५८ ॥
मग निशाउदय तममांडणी । तेही प्रहर गेली यामिनी ।
मग पाकशाळेंत भोजन करुनी । अंतःपुरीं संचरला ॥ १५९ ॥
संचरला परी लुमावंती । तिच्याचि गेला सदनाप्रती ।
तिने पाहुनी राजाधिपती । कनकासनी बैसविला ॥ १६० ॥
उचलोनि परमभक्तीं मांदार । बैसला आहे मंचकावर ।
गौरवूनि षोडशोपचार । प्रेमडोहीं बुडविला ॥ १६१ ॥
मग तो राव होऊनि निर्भर । रतिसुखाचा करुनि आदर ।
यावरी गजगामिनी जोडूनि कर । बोलती झाली रायातें ॥ १६२ ॥
हे महाराज प्रतापतरणीं । एक वार्ता ऐकली कानीं ।
परी वदतां भय कीं मनीं । संचरत आहे महाराजा ॥ १६३ ॥
जरी न बोलावें ठेवूनी गुप्त । तरी महाअनर्थाचा पर्वत दिसत ।
वदूं तंव तरी भयांत । चित्त गुंडाळा घेतसे ॥ १६४ ॥
ऐसा उभय पाहतां अर्थ । भ्रांतीमाजीं पडलें चित्त ।
तरी सुख सुखशब्दाचा सरुनि वात । वार्ता अवघड महाराजा ॥ १६५ ॥
ऐसें ऐकूनि राव बोलत । म्हणे सकळ सोडूनि भयातें ।
निर्विकार कवण अर्थ । असेल तैसें कळविजे ॥ १६६ ॥
येरी म्हणे द्याल भाष्य । तरी चित्त सोडील भयदरीस । 
मग खरें खोटें बरें रत्नास । तुम्हांलागीं अर्पिन तें ॥ १६७ ॥ 
ऐसें वचन नृप ऐकतां । मग करतळभाष्य झाला देता ।
म्हणे मम दर्पभयाची व्यथा । सोडूनि वार्ता बोल कीं ॥ १६८ ॥
येरी म्हणे जी एक कुडें । मातेनें रचिलें तुम्हांपुढें ।
जालिंदर योगी विषयपांडें । वश्य केला आहे की ॥ १६९ ॥
परी तुमचा भयाचा संदर्प । अंगीं विरला विषयकंदर्प ।
तेणेंकरुनि बुद्धी कुरुप । तिनें वरिली आहे जी ॥ १७० ॥
तुम्हांसी अनुग्रह देऊनि त्याचा । वेष द्यावा योगीयाचा ।
मग तीर्थाटनीं योग तुमचा । बोळवावें तुम्हांतें ॥ १७१ ॥
तुम्ही गेलिया तपाकारण । दूरदेशीं विदेशाकारण । 
मग जालिंदराप्रती आणून । राज्यासनीं ओपावा ॥ १७२ ॥
ऐसें प्रकरणीं सहजस्थिती । श्रुत मात झालें आम्हांप्रती ।
परी आमुचे सौभाग्यनीतीं । भाग्यार्क दिव्य जाहले ॥ १७३ ॥
आमचें कुंकुम होतें अचळ । म्हणोनि दृष्टीं आले ऐसे फळ ।
यापरी तुम्हा नृपाळ । वाईट बरें विलोका ॥ १७४ ॥
ऐसी ऐकोनि तियेची वार्ता । उचंबळला क्रोधानळाच्या माथां ।
मग अनर्थानळाच्या शाखा दावितां । भयंकररुपी जाहलासे ॥ १७५ ॥
मग तो क्रोध न वदवे वाणी । प्रत्यक्ष आला वडवानळ अग्नी ।
नाथ जालिंदर समुद्रपाणी । प्राशावया क्षोभला ॥ १७६ ॥
मग तो उठोनि तैसेचि गतीं । बाहेर जाय तो नृपती ।
मंत्री बोलावूनि सेवकांहातीं । जालिंदरा पाहों चला ॥ १७७ ॥
शीघ्र आणोनि कामाठ्यांसी । गर्ती योजिली कूपासरसी ।
नाथ जालिंदर ते उद्देशीं । तयामाजी लोटिला ॥ १७८ ॥
अश्र्वलीद न गणती । तेथें सर्वत्र पडली होती ।
ती लोटूनि गर्तेवरती । नाथजती बुजविला ॥ १७९ ॥
ऐसें गुप्त करोनि प्रकरण । राव सेवी आपुलें स्थान ।
परी सेवकां ठेविलें सांगोन । मात बोलूं नका ही ॥ १८० ॥
जरी होतां मुखलंपट । मम श्रोत्रीं आलिया नीट ।
त्याचें करीन सपाट । यमलोकीं मिरवीन कीं ॥ १८१ ॥
ऐसी ऐकूनि भयंकर वार्ता । दर्पसिंह तो योजूनि माथां ।
रागेला परी सेवकचित्ता । धुसधुसी मिरवीतसे ॥ १८२ ॥
इतुके प्रकरणीं मध्ययामिनी । झाली म्हणूनि नेणती जनीं ।
अर्कोदयीं पाहिला स्वामी । म्हणती उठोनि गेला असे ॥ १८३ ॥
एक म्हणती त्याचें येथें काय । स्वइच्छे बसावें वाटेल तेथ ।
हा ग्राम नव्हे आणिक राय । ग्रामवस्तीं विराजला ॥ १८४ ॥
ऐशी बहुतांची बहुत वाणी । प्रविष्ट झाली जगालागोनी ।
कीं जालिंदर गेला येथूनी । महीं भ्रमण करावया ॥ १८५ ॥
ऐसी वार्ता नगरलोकीं । उठली ऐकूनि परिचारिकी ।
त्या जाऊनि सद्विवेकी । मैनावतीसी सांगती ॥ १८६ ॥
कीं महाराज आपला गुरु । वस्तुफळाचा कल्पतरु ।
उठोनि गेला कोठें दुरु । महीं भ्रमण करावया ॥ १८७ ॥
ऐसें ऐकोनि मैनावती । असंतोषली परम चित्तीं ।
म्हणे मम सुताचे दैवाप्रती । लाभ नाहीं आतुडला ॥ १८८ ॥
ऐसें म्हणोनि संकोचित । नेत्रीं प्रेमाश्रु ढाळीत । 
येरीकडे जालिंदरनाथ कैसे स्थितीं राहिला ॥ १८९ ॥
तरी अवश्य भविष्य जाणणार । आणि मैनावतीचा लोभ अपार ।
आणि शत्रुमित्र पाहणार । एकरुपीं समत्वें ॥ १९० ॥
नातरी परम प्रतापी वासरमणी । क्षणें टाकील ब्रह्मांड जाळोनि ।
तो भद्र ज्याची विपर्यासकरणी । तुष्ट कैसा राहिला ॥ १९१ ॥
जो द्वंद्वातीत मूर्तिमंत । दंभरहित स्वरुपीं मिरवत ।
ममता निःसंग विरहित । कार्याकार्य जाणोनी ॥ १९२ ॥
असो गर्तेमाजी यतिनाथ । वज्रासनातें घालोनि खालतें ।
आकाशास्त्र प्रेरुनि भोंवतें । स्वस्थचित्तीं बैसला ।॥ १९३ ॥
आकाशास्त्र असतां भोंवतें । लीद मिरवे सभोंवतें ।
यापरी आकाशास्त्र माथां । वज्रास्त्र स्थापिलें ॥ १९४ ॥
तेणेंकरोनि अधरस्थळीं । लीद मिरविली आहे शिरीं ।
येरीकडे अंतःपुरीं । जनवार्ता समजली ॥ १९५ ॥
नाथ जालिंदर गेला निघोन । मग सकळ स्रियांचे झालें समाधान ।
बरें झालें म्हणती निधान । येऊनि पहुडल्या सेजेसी ॥ १९६ ॥
यापरी पुढें सुरस । धुंडीसुत सांगेल श्रोतुयांस ।
तरी सर्व श्रोतीं टाकूनि आळस । अवधान द्यावें पुढारां ॥ १९७ ॥
मालू धुंडी नरहरि वंशीं । कथा वदेल नवरसी ।
परी वारंवार श्रोत्यांसीं । कृपा अवधान मागतसे ॥ १९८ ॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार । संमत गोरक्षकाव्य किमयागार । 
सदा परिसोत भाविक चतुर । चतुर्दशाध्याय गोड हा ॥ १९९ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

॥ श्रीनवनाथभक्तिसार चतुर्दशाध्याय संपूर्ण ॥ 
Shree Navanatha Bhaktisar Adhyay 14 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय चौदावा ( १४ )


Custom Search

Monday, November 16, 2015

Shree Navanath Bhaktisar adhyay 7 Part 1/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सातवा ( ७ ) भाग १/२


Shree Navanath Bhaktisar adhyay 7 
Shree Navanath Bhaktisar adhyay 7 is in Marathi. Machchhinda and Veerbhadra met at Hareshwar. Veerbhadra insulted Machchhindra, his Guru and NathPanth. Hence Machchhindra was very angry and he called Veerbhadra for a fight. Machchhindra and Veerbhadra who was son of God Shiva, had a war in which Veerbhadra was defeated by Machchhindra. All Gods were also there watching their fight. When Machchhindra used a Maya astra (wepon). the effect would have been the end of everything. As such they requested him to stop Maya astra further destruction. Machchhindra uphelled their request and used Vasanik (another) astra to stop Mya astra from causing further destruction. Gods were pleased and they gave him many astras. They took him to the heaven with them as he wished to have a bath in pious Mankarnika river. He was in the heaven for seven years and came back to the earth to visit other pious places and visited Vajra Bhagavati. Then he proceeded to Ayodhya. In Ayodhya interesting things happened which will be told to us in Next adhyay 8 by Malu who is Son of Dhundi and is from Narahari family.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सातवा ( ७ ) भाग १/२ 
श्रीगणेशायनमः ॥
जयजयाजी पंकजाक्षा । कमलापते कमलपत्राक्षा ।
अचगुणरुपा गुणसर्वेशा । महादक्षा रघुत्तमा ॥ १ ॥
हे कमळमित्रकुळभूषणा । रावणांतका रघुनंदना ।
पुढें बोलवीं ग्रंथरचना । जेणें श्रोतयां सुख वाटे ॥ २ ॥
मागिले अध्यायीं कथा सुरस । काळिका देवी मच्छिंद्रास ।
प्रसन्न होऊनि वरदानास । साबरीविद्या आतुली ॥ ३ ॥
तेथूनि आला हरेश्र्वरासी । गदातीर्थस्नानउद्देशीं ।
स्नान करुनि पर्वतासी । प्रदक्षिणा आरंभिली ॥ ४ ॥
सवेंचि येतां मच्छिंद्रनाथ । तो वीरभद्र पातला स्नाना तेथ ।
मानववेषी जोगी कृत्य । त्रिशूळ डमरु धनुष्यादि ॥ ५ ॥
शैली शिंगी नाद अद्भुत । नाद नोहे तो आगम व्यक्त ।
साधहिताचा स्वार्थअर्थ । परिणाम सूचवी ॥ ६ ॥
अहो ती शिंगी नोहे देवता । साधकजनांची कामदुहिता ।
पूर्ण करावया परिणाम अर्था । बोधरवि प्रवेशती ॥ ७ ॥
रज तम सत्त्व तृतीय गुण । महामारक अति कठिण ।
ते त्रिवर्ग करिती खडतरपण । ऐक्य केला त्रिशूळ तो ॥ ८ ॥
यापरी आगमनिगमबीजें । सारव्यक्त तेजःपुंजें ।
तयाची पंथिका दावी करांबुजे । विशाळ डमरु विराजला ॥ ९ ॥
सगुणकथा सप्तधातु । गुणीं भरला गुणातीतु ।
नवरंगरसांत झाला व्यक्तु । हरिगुणींचि भक्तु होईना कां ॥ १० ॥
कामक्रोधषड्गुणविकार । सत्त्वस्थाचे शत्रु अनिवार ।
तयां जिंकितां विवेक फार । शरगांडीव विराजलें ॥ ११ ॥
अहो शर नोहे ते जाण युक्ती । कामक्रोधांतें देत मुक्ती ।
गांडीव नोहे तें विषयभक्ती । ज्ञानशरीं विराजलें ॥ १२ ॥
अगा शर न म्हणूं ते ज्ञानदिवटी । अज्ञानतमींचें द्वंद्व निवटी ।
अलक्षसंधानपूर्णकोटी । भेदाभेद सर्वथा ॥ १३ ॥
ऐसा महाराज प्रतापरुद्र । द्वंद्वलेश नसे मनीं वीरभद्र ।
अज्ञानतमींचा महाचंद्र । मच्छिंद्रातें भेटला ॥ १४ ॥
मच्छिंद्र करुनि येतसे स्नान । वीरभद्र येतसे स्नानालागून ।
तों मार्गी मच्छिंद्रातें पाहून । उभा केला हटकोनी ॥ १५ ॥
करुनि उभे नमनानमन । म्हणे स्वामी तुम्ही कोण ।
येरु म्हणे मच्छिंद्र अभिधान । निजदेहा मिरवीतसे ॥ १६ ॥
येरु म्हणे कवण पंथी । अभ्यास मिरवतसां जगाप्रती ।
मच्छिंद्र म्हणे जोगीये नीती । नाथपंथी मिरवीतों ॥ १७ ॥
येरु म्हणे कोण दर्शन । मच्छिंद्र म्हणे जोगीमहिमान ।
शैली कंथा मुद्रा भूषण । निजअंगीं मिरवीतसें ॥ १८ ॥
वीरभद्र म्हणे मुद्रा सान । न घालितां फाडिले कान ।
येरु म्हणे गुरुप्रसादें करुन । मंथनीं निर्मिला हा एक ॥ १९ ॥
वीरभद्र म्हणे काय पाखंड । व्यर्थचि उगलें वाढवूनि बंड ।
जगामाजी मिरवितां काळें तोंड । योग्यायोग्य दिसेना ॥ २० ॥
तरी आतां योगद्रुमा । मुद्रा सोडीं ह्या नसती उत्तमा ।
नाहीं तरी शिक्षा पावसी नेमा । ठाईं ठाईं महाराजा ॥ २१ ॥
अगा तव गुरु ऐसा कोण । वेदविधिच्या प्राज्ञेंकरुन ।
पूर्ण आगळीक पंथ निर्मून । जगामाजी मिरवतो ॥ २२ ॥
अगा स्वबुद्धीं तर्क करुन । भलतेंचि मत करी स्थापन ।
तो प्राज्ञिक नव्हे मुर्खाहून । शतमूर्ख म्हणावा ॥ २३ ॥
ऐसी ऐकतां भद्रगोष्टी । मच्छिंद्र संतप्त झाला पोटीं ।
म्हणे मशका खोटी । वल्गना करिसी अपार ॥ २४ ॥
अरे शतमुर्खाहूनि मूर्ख । म्हणूनि बोलसी दुःखदायक ।
परमात्मा क्षोभवूनि पातक । भार वाहिला निजमौळी ॥ २५ ॥
अरे आत्मा क्षोभतां पराचा । पापभार होत ब्रह्मांडींचा ।
तस्मात् तव गुरु कैंचा । दुजा गुरु विलोकीं ॥ २६ ॥
अरे नष्टा दुर्जन अधमा । तव दर्शने स्नान करणें आम्हां ।
आतां उगाचि जाय आपुल्या कामा । शिक्षा पावसील मम हस्ते ॥ २७ ॥
ऐशापरी मच्छिंद्रनाथाचें भाषण । ऐकतां वीरभद्राचें क्षोभलें मन ।
म्हणे भ्रष्टा तुझा प्राण । आतांचि घेईन ये काळीं ॥ २८ ॥
मग करीं कवळूनि सायकासन । सत्वर रगडूनि लाविला गुण ।
निर्वाण अर्धचंद्र बाण । तूणीरांतूनि काढिला ॥ २९ ॥
तें पाहूनि मच्छिंद्रनाथ । म्हणे पतित झालासी उन्मत्त ।
अरे उद्धटा आपुलें अहित । जनांमाजी मिरविसी ॥ ३० ॥
अरे सायकासन सिद्ध करुन । सोंग दाविसी मजलागून ।
परी हें बरवे नोहे मरण । ये काळीं पावसी ॥ ३१ ॥
अरे ऐसें सोंग मजकारण । कित्येक झाल अवलोकून ।
बहुरुप्याचें खडतरपण । शूरत्व रणीं मिरवेना ॥ ३२ ॥
कीं अजाकंठींचें लंबस्तन । परी नातुडे त्यांत दुग्धपान ।
तेवीं तूं दाखविसी हावभाव करुन । परी क्षणैक क्षीण होसील कीं ॥ ३३ ॥
वीरभद्र म्हणे मूर्खा ऐक । तूतें दावीन यमलोक । 
तव आयुष्य सरलें सकळिक । म्हणूनि येथें आलासी ॥ ३४ ॥
तरी मी तूतें काळक्षय । प्रगट झालों आहें प्रत्यक्ष ।
तरी तव गुरु प्रतापदक्ष । कैसा आहे पाहूं दे ॥ ३५ ॥
मच्छिंद्र म्हणे मशकासाठीं । मेरु मिळवील काय नगांची कोटी ।
कीं महाक्षीराब्धी घेऊनि नरोटी । भीक मागेल पोटातें ॥ ३६ ॥
मूर्खा ऐक वचनार्थ । मम गुरुचा मौळीं वरद हस्त । 
तेणें होतसे शरणागत । मानव दानव देवादि ॥ ३७ ॥
तेथें अर्भका तुझा पाड । किमर्थ आधीं मिरविसी कोड ।
महासविता तप्त उजेड । खद्योतातें मिरवेना ॥ ३८ ॥
वीरभद्र म्हणे तूं काय करिशी । मरणकाळीं फांटा फुटला तुजसा ।
आतां क्षणेंचि भूमीपाशीं । करीन नव्हतासि ऐसें ॥ ३९ ॥
अरे तव ग्रीवेतें काळपाश । आधींच पावलें आयुष्य नाश ।
म्हणूनि मूर्खा तूतें हौस । ये वादा स्फुरलासी ॥ ४० ॥
ऐसें म्हणनि वीरभद्रानें । गुणीं सज्जिलें अस्त्रविंदान ।
म्हणे भ्रष्टा सावधान । राममंत्र जल्पीं कां ॥ ४१ ॥
मच्छिंद्र म्हणे राममंत्र । तूतें वाटला अपवित्र ।
परी तेणेंचि सुखी पंचवक्र । दुःखलेशी मुकलासे ॥ ४२ ॥
अरे राममंत्रें वाल्या तरला । तें नाम तारील आतांचि मजला ।
परी सावध तूं होई कां वहिला । राममंत्रावेगळा ॥ ४३ ॥
ऐसें म्हणूनि कक्षे झोळी । विलोकूनि भस्म करीं कवळी ।
मग शस्त्रास्त्रीं तेणें काळीं । वज्रस्थापना जल्पतसे ॥ ४४ ॥
पूर्ण प्रयोग घालूनि धाटीं । भोंवतीं फिरवी भस्मचिमुटी ।
तेणें करुनि वज्रदाटी । दाही दिशा मिरवीतसे ॥ ४५ ॥
आणिक करीं कवळूनि भस्म । यासी विलोकी योगद्रुम ।
तों वीरभद्रें सायकें परम । निर्वाण बाण सोडिला ॥ ४६ ॥
तो बाण येतां किंकाटत । दृष्टीं पाहे मच्छिंद्रनाथ । 
मग आपुले मानी मनांत । बाण आहे तृणासम ॥ ४७ ॥
ऐसें म्हणूनि स्तब्धदृष्टी । उभा करीं कवळूनि भस्मचिमुटी ।
तवं तो बाण नभापोटीं । संचरुनि उतरतसे ॥ ४८ ॥
मच्छिंद्रनाथातें लक्षून । खालीं उतरतसे घ्यावया प्राण ।
तों सबळ बळें वज्र येऊन । प्रहार करितें पैं झालें ॥ ४९ ॥
तरी तें वज्र वरिष्ठ । आदळतांचि बाण झाला पिष्ट ।
तें पाहूनि वीरभद्र वरिष्ठ । परम चित्तीं क्षोभला ॥ ५० ॥
मग शक्तिअस्त्र देदीप्यमान । योजिता झाला रुद्रनंदन ।
सज्ज करुनि सायकसंधान । साधूनियां प्रेरिलें ॥ ५१ ॥
सवेंचि काढूनि दुसरा बाण । नागास्त्र तयावरी स्थापून ।
तोही चुंबीत पावला गगन । पाठोपाठ शक्तीच्या ॥ ५२ ॥
परी ती शक्ती बलाढ्य बहुत । स्वर्गी मिरवे शब्द करीत ।
ऐकतां शब्द भयभीत । सकळ मही झाली असे ॥ ५३ ॥
दिग्गज पळती रानोरान । शेष न ठेवी आपुली मान । 
वराह पाहूनि अति निर्वाण । दंताने मही सरसावी ॥ ५४ ॥
कूर्म करीतसे सबळ पृष्ठी । पाहूं पातले देव विमानदाटीं ।
तेही पाहूनि कपाटपोटी । संचरुनि पळतात ॥ ५५ ॥
देवविमानीं हडबड । पाहूनि उड्डगण पळती पाड ।
सोडूनि आपुले कार्य उघड । नभामाजी सरळले ॥ ५६ ॥
देव दानव यक्ष दैत्य । म्हणती पावला प्रळयमृत्यु ।
ही शक्ति नोहे प्रळय समस्त । मही बुडवील वाटतसे ॥ ५७ ॥
सबळ बळिष्ठ ती मही कांपत । तेणें नगकड्यांची खांचणी होत ।
मायलेक चुकूनि निश्र्चित । रुदन करिती हंबरडे ॥ ५८ ॥
सहस्त्र विजूंचा कडकडाट । दावूनि शब्द अनिवारलोट ।
नभमंडळ पाहूनि नीट । शक्ती भेदिली वज्रातें ॥ ५९ ॥
तेणें वज्र अति क्षीण । होऊनि पडलें गगनाहून ।
पुढें मच्छिंद्राचा लक्षूनि प्राण । हरावया येतसे ॥ ६० ॥
 यावरी नागास्त्र निःशक्त । तें पाहूनि मच्छिंद्रनाथ ।
त्वरें कवळूनि भस्म चिमुटींत । रुद्रास्त्र प्रेरीतसे ॥ ६१ ॥
त्यासवेंचि योजूनि खगेंद्र अस्त्राते । पाठोपाठीं प्रेरीत ।
परी रुद्राक्ष झालें व्यक्त । रुद्र एकादश प्रतापी ॥ ६२ ॥
एकादशरुद्रचूडामणी । शक्तीतें तल्लीन करी कवळूनी ।
तेणें हस्त पाद मूर्धनी । क्षीण होऊनि पडियेली ॥ ६३ ॥
शक्ती पडतां खचूनि महीं । रुद्र मिरवले अदृश्य देहीं । 
येरीकडे खगेंद्र अही । अस्त्रा अस्त्र भक्षेतसे ॥ ६४ ॥
तेणें नागास्त्र त्वरित । अदृश्य झालें युद्धरहित ।
यावरी अस्त्र विनयासुत । तेंही झालें अदृश्य ॥ ६५ ॥
यावरी वीरभद्र प्रतापतरणी । वातास्त्र प्रेरिता झाला गगनीं ।
तें मच्छिंद्रनाथ विलोकुनी । पर्वतास्त्र सोडितसे ॥ ६६ ॥
तेणें कोंडिला अवघा वात । मग वज्रास्त प्रेरी महारुद्रसुत ।
तेणेंकरुनि चूर्ण पर्वत । अदृश्यपणीं मिरवला ॥ ६७ ॥
यापरी प्रतापी वीरभद्र त्वरित । प्रेरिता झाला अग्न्यस्त्र । 
ते पाहूनि मच्छिंद्रनाथ । जलदास्त्र प्रेरीतसे ॥ ६८ ॥
त्यानें सकळ अग्नि विझवून । करितें झालें अदृश्य गमन ।
यावरी वीरभद्रें कामास्त्र सोडून । कामव्यथा योजीतसे ॥ ६९ ॥
त्यावरी विरक्तनाथ मच्छिंद्र । प्रेरिता झाला रत्यस्त्र । 
तेणेंकरुनि काम पळत । सुख पावला रतिसंगें ॥ ७० ॥
यावरी वीरभद्र दक्ष । प्रेरिता झाला महोरगास्त्र ।
तें पाहूनि मच्छिंद्रनाथ । संजिवनी प्रेरितसे ॥ ७१ ॥
वीरभद्र तो वैश्र्वानर । प्रेरिता झाला दानवास्त्र ।
मच्छिंद्रनाथ अति तत्पर । देवास्त्र प्रेरितसे ॥ ७२ ॥
मग अस्त्र तें बळवंत । देव दानव प्रगटले अमित ।
ते पाहूनियां उभयतांते । स्वग्रीवा तुकविती ॥ ७३ ॥
परस्परें धन्य धन्य । वदोनि हृदयीं करिती मान ।
गदगदोनि हास्यवचन । एकमेका बोलती ॥ ७४ ॥
वीरभद्र म्हणे सकळे महीं । वीर जिंकिलें भद्रयुद्धें प्रवाहीं ।
परी मच्छिंद्रा तुजसमान ये देहीं । देखिला नाहीं कोणीच ॥ ७५ ॥
मच्छिंद्र म्हणे वरदहस्त । पुढें पहा भद्रजात ।
येरी म्हणे म्हणे अविनाशवंत । गुरु आहे माझा कीं ॥ ७६ ॥
वीरभद्र तुकावूनि मान । म्हणे गुरु तुझा आहे प्राज्ञ ।
आणि तूंहि त्यांत अससी धन्य । प्राज्ञीकवंत सद्यशा ॥ ७७ ॥
ऐसें देवास्त्र युक्तप्रयुक्त । दानव करुनि सकळ शांत ।
अदृश्यपणीं स्वस्थानांत जाऊनियां पोचलें ॥ ७८ ॥
यावरी वीरभद्र ब्रह्मास्त्र । प्रेरिता झाला अति पवित्र ।
तें पाहूनियां वरदपात्र । विध्यस्त्र प्रेरितसे ॥ ७९ ॥
तें प्रगटतां चतुर्भुजमूर्ती । विधी लागे चरणाप्रती ।
यावरी कार्तिकास्त्र भद्रजाती । सोडिता झाला तत्क्षणीं ॥ ८० ॥              
 तें पाहूनियां दत्तवरदपाणी । स्त्रीअस्त्र सोडित गगनीं ।
तें बोलतां लावण्यखाणीं । स्वामीलागी विहिताती ॥ ८१ ॥
तेणेंकरुनि कार्तिकास्त्र । तत्क्षणीं पावलें शांत ।
यावरी भद्र तो काळास्त्र । प्रेरिता झाला तत्क्षणीं ॥ ८२ ॥
तें पाहुनि मच्छिंद्रनाथ । मायाप्रळयी प्रेरिलें अस्त्र ।
तेणें काळ भक्षूनि पवित्र । पंचतत्त्व कवळीतसे ॥ ८३ ॥
तें पाहूनि सकळ देव । करिते झालें मच्छिंद्रस्तव ।
म्हणती महाराजा युगभाव । सकळ नाश पावेल कीं ॥ ८४ ॥
म्हणती महाराजा कलिभाग । पुढें आहे अनंतयुग । 
तों आजि तुम्ही सकळ याग । विनाशरुपी पाहतां कीं ॥ ८५ ॥
तरी आतां कृपाकरुन । मायाप्रळय घ्या आवरुन । 
मग देववाणी श्रवणीं ऐकून । वासनीक अस्त्र प्रेरितसे ॥ ८६ ॥
तेणें मायाप्रळय हरला । मायाउत्पत्तिप्रयोग राहिला ।
मग सकळ विमानें उतरुनि महीला । देव नमिति मच्छिंद्राला ॥ ८७ ॥
ब्रह्मा विष्णु आणि रुद्र । स्तवनें केला शांत मच्छिंद्र । 
मग संनिध बोलावूनि वीरभद्र । करीं कर ओपिती ॥ ८८ ॥
म्हणती कविनारायण मच्छिंद्रनाथ । तरी आपण वाढवावी सदैव प्रीत ।
ऐसें वीरभद्रातें सांगूनि समस्त । प्रेमें प्रीती वाढविती ॥ ८९ ॥
यावरी बोले रुद्र प्रसन्न होऊन । कीं मच्छिंद्राची कामना कोण ।
ती मीच पूर्ण करीन । वरदचित्तेंकरुनिया ॥ ९० ॥
Shree Navanath Bhaktisar adhyay 7 
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सातवा ( ७ )


Custom Search

Sunday, October 4, 2015

Shree Navanath Bhaktisar adhyay 4 Part 1/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय चौथा ( ४ ) भाग १/२


Shree Navanath Bhaktisar adhyay 4 
 Shree Navanath Bhaktisar adhyay 4 is in Marathi. Here I am trying to give a very short description of this adhyay. Machchhindra decides to visit Hingala Goddess. Her temple was in a very furious forest and there was a door which was protected by the AshtaBhairavas. Who were very powerful fighters and won Yamadharma also. They asked why Machchhindra want to visit the Goddess temple. Unless he tells them how he had lived his life until now and which are his sins and good things he had done till then, they will not allow entering. Machchhindra told them that he was incarnation of God and had taken birth for shake of God’s work his life spent until then was the responsibility of Gods. Any sins committed or any good things if were done then it was the responsibility was of God. However Ashtabhairavasa were not allowing to enter through the gate and started the war which ultimately won by Machchhindra. AshtaBhairavasa used many weapons and astras using Mantras that interesting description is better to read from the Adhyays in original for understanding and satisfying. Then billion Chamundas came to fight with Machchhindra. These Chamundas were also very powerful and strong however they were also defeated. Goddess Bhagavati came to know all about this and was very surprised as AshtaBhairavas and Chamundas were defeated. She searched in her mind for who was Machchhindra and came to know that he was incarnation of God Kavi Narayan and take birth for Gods work and was a vasuputra. She approached to the gate and welcomed Machchhindra who bowed to her. Goddess told him to free AshtaBhairavas which Mchchhindra did. Then Goddess asked him to prove his Vidya. Machchhindra used VayuAstra Fanidaivat and chanted mantras and throw vibhuti on a big mountain. Mountain started revolving speedily on the serpent’s head without losing any rock, tree or soil on it. Then he placed the mountain on his place unaffected as per Goddess will. Goddess was very much pleased and took him to her place where Machchhindra stayed for three days. Goddess blessed him with two weapons one of which was dividing Sparshastra. Then bowing to Goddess he proceeded to the way of BaraMalhar. In the next adhyay the description will follow what happened there as written by Malu son of Dhundi from Narahari family.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय चौथा ( ४ ) भाग १/२
श्रीगणेशाय नमः ॥ 
जयजयाजी करुणानिधे । आगमअगोचर विशाळबुद्धे ।
सकळमुनिमानस हृदयवृंदे । उद्यान वाटे आनंदाचे ॥ १ ॥
हे योगिमानसरजनी । पंढरीशा मूळपीठणी ।
पुंडलिकाचे आराध्य स्वामिणी । उभी अससी विटेवरी ॥ २ ॥
सौम्य दिससी परी नीटक । बहुत ठक चित्तचालक ।
भक्तमानसभावहारक । छिनाल सुकृत उरों नेदीं ॥ ३ ॥
पहा कैसी बकासमान । नासाग्रभागीं दृष्टी देऊन ।
कोणी म्हणेल गरीबावाण । चांगुलपण मिरवीतसे ॥ ४ ॥
परी ही अंतरीची खुण । नरहरि मालू एकचि जाणे । 
भक्तीविषयीं लंपट वासना । मनामाजी हुटहुटी ॥ ५ ॥
सुकर्म हृदया घालूनि हात । युक्तिप्रयुक्ती काढूनि घेत ।
पुढें पुढें होऊनि कार्यार्थ । आपुले त्या संपादी ॥ ६ ॥
पहा दामाजीचें दायधन । गटकन गिळिलें अभिलाषून ।
कंगालवृत्ती सोंग धरुन । देव महार झाला असे ॥ ७ ॥
नरहरि सबळ सुवर्णकर्म । तयाच्या विषयीं वरिला काम ।
भांडावें तों जन्मोजन्म । शिवमौळी राहातसे ॥ ८ ॥
कुब्जादादुला वांकुडातिकुडा । नाहीं म्हणे तिला झाला पुंडा ।
वृदां पुरुषही जाडा । स्मशानवस्ती केलीसे ॥ ९ ॥
ठकवोनि मारिला काळयवन । सोळा सहस्त्र दादुला होऊन ।
शेवटीं न पावे समाधान । ब्रह्मस्थिती वरिलीसे ॥ १० ॥
चक्षुगोचर होत जें जें । तें मागूं शके अति निर्ल्लज्जें ।
सुदामाचें पृथुक खाजे । कोरडें न म्हणे सहसाही ॥ ११ ॥
काय वरिला मृत्यु दुकाळानें । द्रौपदीची खाय भाजीपानें ।
हात वोडवूनि लाजिरवाणें । मिटक्या मारुनि भक्षीतसे ॥ १२ ॥
शबरीचीं बोरें उच्छिष्ट पाहून । न म्हणे भक्षी मन लावून ।
चोखियाचा पदार्थ गोड पाहून । र्‍हदासहित सारीतसे ॥ १३ ॥
नामा बाळ ठकवूनि त्वरित । नैवेद्य भक्षित हातोहात ।
तस्मात् किती दुर्गुणांत । सद्गुणांतें आणावे ॥ १४ ॥
असो ऐसे परम ठकणी । येऊनि बैसली ग्रंथश्रेणी ।
मम चित्तातें समूळ घेऊनि । पायांपासीं ठेवीतसे ॥ १५ ॥
असो तिचे वरदेंकरुन । श्रोते ऐका आतां कथन ।
श्रीमच्छिंद्र योगी पूर्ण । हिंगळाकारणीं संचरला ॥ १६ ॥
मागिल अध्यायीं कथन । मच्छिंद्र मारुतीचे युद्ध होऊन । 
शेवटीं प्रीति विनटून । हिंगळाख्यस्थाना पावले ॥ १७ ॥
ती ज्वाळामुखी भगवती । महाप्रदीप्त आदिशक्ति ।
तेथें जाऊनि द्वाराप्रती । मच्छिंद्रनाथ पोचलें ॥ १८ ॥
तंव तें द्वार पाहतां क्षितीं । उंच बाहु सार्धशत । 
औरस चौरस षडशत । विराजलेसें द्वार तें ॥ १९ ॥
तें द्वारीं प्रचंड । अष्टाभैरव महाधेंड । 
त्यांनीं नाथपंथ पाहुनि वितंड । चित्तांत कामना उदेली ॥ २० ॥
नागपत्रअश्र्वत्थठायीं । मच्छिंद्रनाथ हा गोसावी ।
नेमाचरणीं विद्याप्रवाहीं । प्रसन्न केलें देवातें ॥ २१ ॥
तरी शाबरीविद्याकवित । येणें केलें वरदस्थित ।
तपीं तें प्रांजळ कायस्थ । केवीं झालें तें पाहूं ॥ २२ ॥
ऐसा काम धरुनि पोटीं । युद्धरीतीच्या सुखालोटीं ।
अष्टही भैरव एकथाटीं । प्रत्यक्ष झालें द्वारातें ॥ २३ ॥
अंगें नेमूनि संन्यासरुपा । देहपंकजा दावूनि तद्रुपा ।
म्हणती महाराजा योगदीपा । कोठें जासी तें सांग ॥ २४ ॥
येरु म्हणे शक्तिदर्शन । घेणें उदेलें अंतःकरण । 
तरी तुम्ही आहांत संन्यासधाम । तुम्हां जाणें आहे कां ॥ २५ ॥ तंव ते म्हणती जोगिया ऐक । आम्ही येथेंचि स्थायिक ।
भोगवतीकाजा वरदायक । द्वारपाळ म्हणवितों ॥ २६ ॥
तरी येथें कामनास्थित । दर्शनार्थ कोणी येत ।
तरी पापपुण्य पुसोनि त्याप्रत । मार्गापरी योजितसों ॥ २७ ॥
अगा पुमांसा प्राणी शब्दरचनें । दिसून येतां चित्तकामनें ।
त्या प्रसादूनि अंबादर्शनें । सिद्ध करितो महाराजा ॥ २८ ॥
आणि पापकलह अर्थ धूर्जटी । आमुतें दिसूनी येता दृष्टी ।
त्यासी मागें परतवूनि राहटी । तो पुरुष दर्शनासी मिरवेना ॥ २९ ॥
तस्मात् वागोत्तराचे देठी । प्रसाद मिरवला हो शेवटीं ।
तरी त्वत्कामना उदेली पोटीं । अंबा दर्शनीं मिरवावें ॥ ३० ॥
   
तरी महाराजा योगद्रुमा । पापपुण्यांचा झाडा आम्हां ।
दर्शवोनि दर्शन कामा । स्वस्थ करीं रतिसुखा ॥ ३१ ॥
अंतरी आला अर्थकंदर्प । येथें करितां कांही लोप ।
तरी संचार करितां द्वारमाप । मध्यें अटक महाराजा ॥ ३२ ॥
द्वार सांकडे होते अतिसान । गुंते करितां अनृत भाषण ।
मग त्यातें मागें ओढून । पूर्ण शिक्षा दावितों ॥ ३३ ॥
तस्मात् तुमची कर्मराहटी । झाली जैसी महींपाठीं ।
तींतें दर्शवूनि वाग्दिवटीं । दर्शनातें दर्शिजे ॥ ३४ ॥
येरु म्हणे द्वारस्थ बापा । आम्ही नेणों पुण्यपापा ।
कर्मसुकर्म अर्थकंदर्पा । ईश्र्वरी अर्थी केले असे ॥ ३५ ॥
जैसेया लहराभास । उभय नातळे त्या सुखास । 
हर्ष दरारा सावधपणास । ठायीं ठायीं मुरतसे ॥ ३६ ॥
तो नौका सरितातोयी जात । दों थडीं रुख दिसती पळत ।
दों थडींचा बा एक साक्षिवंत । रुखा पळ नेणेचि ॥ ३७ ॥
कीं तो व्यक्त बहू घटक्षितीं । अंतरदिवटा बहु गभस्ती ।
परी त्याची सदा दीप्ती । नयनीं मिरवे महाराजा ॥ ३८ ॥
तुटूनि नीतिपुण्यदुमा । आम्ही नेणों पाउली उगमा ।
तंव ते म्हणती नरेंद्रोत्तमा । बोल बोलसी हे काय ॥ ३९ ॥
जगीं जन्मोदय देह धरिल्या पोटीं । कर्माकर्म उभे राहटी ।
मिरवले हे प्रपंचहाटीं । पदार्थसवें हे दोन्ही ॥ ४० ॥
तरी बा तयाच्या गृहकपाटीं । ना तळपे ना मिरवे शक्ती ।
तरी आतां लोपूनि कर्माप्रती । अर्थ तुझा सरेना ॥ ४१ ॥
जैसें वेचिल्यावांचूनि धन । ना तळे कदा हाटींचे कण ।
तरी कर्माकर्म जल्पल्याविण । अर्थ तुझा सरेना ॥ ४२ ॥
तरी प्रांजळवचनप्रवाहीं । कासरिता मिरविल्याही ।
तेणें दर्शनें अंबापायीं । संगमातें मिरवेल ॥ ४३ ॥
नातरी गौण धरुनि पोटीं । वदतां अर्थ न लाधे जेठी ।
प्रांजळ वद कीं शेवटीं । फिरुनि जाशील माघारा ॥ ४४ ॥
तुवां प्रांजळ वदल्याविण । करुं न देऊं तुझें गमन ।
बहुचावटी जल्पल्यान । शिक्षा पावसी येथें तूं ॥ ४५ ॥
ऐसें ऐकतां मच्छिंद्रनाथ । म्हणे शासनीं उदेला आदित्यसुत ।
तेथें तुमची शक्ति अद्भुत । केवीं वर्णूं मशक हो ॥ ४६ ॥
जो महाप्रलय भद्ररुद्र । जो ग्रासूनि बैसला मुखचंद्र ।
तेथें तुमची कथा महींद्र । काय असे मशक हो ॥ ४७ ॥
ऐसी ऐकतां मच्छिंद्रगोष्टी । परम क्रोधाची झाली दाटी ।
मग ते अष्टभैरव थाटी । एकदांचि उठावले ॥ ४८ ॥
जैसें अपार विधानथाटी । अबळां सांडूनि उबलाकोटी ।
प्रदीप्त होऊनि सांगे गोष्टी । महाखगीं जाऊनियां ॥ ४९ ॥
तन्न्यायें अष्टभैरव । मांडिते झाले युद्धपर्व ।
कोणी त्रिशूळ परशु गांडीव । टणत्कारिलें ते समयीं ॥ ५० ॥
तो परजोनि असिलता । मुद्गलगुरु ज्या परमकठिणता ।
अंकुश बरची मांडू अस्ता । चक्रें चालती उद्देशें ॥ ५१ ॥
गदा दारुकायंत्र अचाट । भाले गुप्ती कुठार बोथट ।
ऐशीं शस्त्रें तीव्र अचाट । करीं कवळूनि उठावले ॥ ५२ ॥
तें पाहूनि मच्छिंद्रनाथ । भस्मझोळीं वोपिला हस्त ।
जय जय श्रीगुरुराजदत्त । म्हणूनि भस्म करीं कवळूनि ॥ ५३ ॥
दाही दिशा मंत्रगौरव । विभूती चर्चूनि आपुला भाव । 
म्हणे मित्रावरुणदेव । सिद्ध असोत मम काजा ॥ ५४ ॥
अश्र्विनी वरुण अग्नि वात । धरामरादि वज्रनाथ । 
गण गंधर्व तरंगिणीवत् । सिद्ध असोत आम्हांतें ॥ ५५ ॥ 
बुद्धिसिद्धि योगी अपार । ब्रह्मांडांत नांदणार । 
त्या सर्वांतें नमस्कार । साह्य असोत आमुतें ॥ ५६ ॥
ऐसी जल्पूनि मंत्रशक्ती । प्रेरिता दृढ झाली विभूती । 
युद्धसमारंभ क्षितीं । आमंत्रिलें सर्वासी ॥ ५७ ॥
मग वज्रपंजर प्रयोगभूती । धरास्त्रें नेमूनि शक्रदैवतीं ।
मंत्रप्रयोग सबळशक्ती । भाळीं विभूती चर्चीतसे ॥ ५८ ॥ 
तेणें शरीर वज्राहून । ते समयीं झाले अतिकठिण ।
मग म्हणे मच्छिंद्रनाथ पूर्ण । कार्य साधा आपुलें ॥ ५९ ॥
यावयातें कराल आळदुजस । तरी मातृपितृशपथेस ।
गुरु धिक्कारुनि निर्बळ यश । मुखा काळें कराल कीं ॥ ६० ॥
मग जिणें संदेहरुपी । मिरविणें येथे मम कंदर्पी ।
उडी सांडूनि कोरडे कूपीं । प्राण त्यजावा हें बरेंच ॥ ६१ ॥
ऐसी ऐकतां वज्रवाणी । पेटला सबळ जेवीं अग्नी ।
मग शस्त्रें शिखा नाथविधानीं । कवळूं पाहती ग्रासावया ॥ ६२ ॥
जे अष्टभैरव भद्रकाळ । शस्त्रें सोडिती उतावेळ ।
म्हणे येथें यांचा काळ । चिताभस्मीं मेळवा ॥ ६३ ॥
मग नाथशरीरा लक्षूनि अष्ट । शस्त्रें प्रेरिती प्रहार अनिष्ट ।
त्रिशूळ फरश ते नीट । दणाणीत अंगातें ॥ ६४ ॥
अंकुश परज गूर्ज मुद्गर । मांडू गदा भालचक्र । 
गुंफी खंजीर बरची असिल । सबळ प्रहारें भेदिती ॥ ६५ ॥
परी तो शस्त्रें मच्छिंद्रनाथ । तृणप्राय सकळ मानीत ।
शस्त्रवृष्टी घन वर्षत । मच्छिंद्र पर्वत झालासे ॥ ६६ ॥
ऐसें होतां ते अवसरीं । निर्विघ्न दिसती ते शस्त्र । 
मग परम कोपें गांडीवास्त्र । सज्ज करिते पैं झाले ॥ ६७ ॥
एकीं निर्मिला वातशर । दुजीं निर्मिला कामास्त्र तीव्र । 
तिजे निर्मिले वासव अस्त्र । महाशक्ती आगळी ते ॥ ६८ ॥
चौथीं योजिले नागास्त्रबंधन । जे महातक्षकाहूनि दारुण ।
पांचवें ब्रह्मास्त्र प्रवीण । शापादपि विराजे ॥ ६९ ॥
सहावें रुद्रास्त्र प्रळयकाळ । कीं भक्षूं पाहे ब्रह्मांड सकळ ।
सातवें दानवास्त्र सबळ । असंख्य राक्षस मिरवती ॥ ७० ॥
आठवें कृतांतास्त्र कठिण । प्रेरितां पावती मृत्यु काळ नाम । 
प्रचंड हस्तपाश कवळून । असंख्य स्थितीं मिरविती ॥ ७१ ॥
ऐसे योजूनि शरार्णव । मांडिते झाले प्रळयपर्व ।
शस्त्रासी मंत्रगौरव । दैवताशक्ती आराधिल्या ॥ ७२ ॥
ऐसे योजूनि गांडीवा गुणी । प्रेरिते झाले अष्टही क्षणीं ।
मग ते अस्त्र भ्रमतां गगनीं । प्रळयकाळ वोढवला ॥ ७३ ॥
वातास्त्राची प्रळयगती । महापर्वत स्वर्गपंथी ।
वायुचक्रीं भ्रमण करिती । अर्की कार्पास जेउता ॥ ७४ ॥
कामास्त्र परम कठिण । उर्वशीचें चांगुलपण ।
अन्य दारा करवीत गमन । मच्छिंद्रजती ये कृती ॥ ७५ ॥
त्याही परम सुंदर खाणी । पाहतां काममूर्छनीं ।
देच दानव मानव ध्यानीं । जपी तपी लागती ॥ ७६ ॥
वासवशक्ती अतिप्रौढी । तेज प्रवेशतां पडे ब्रह्मांडीं ।
मित्रता पाहूनि घालणें उडी । उरली नाहीं मागुतीं ॥ ७७ ॥
ती शक्ती होता प्रगट । शब्द करी कडकडाट ।
तेणें उचलूं पाहे ब्रह्मांडपीठ । धराकंप दाटला ॥ ७८ ॥
शेष दचकला आपुले मनीं । उंचावीतसे ग्रीवा मूर्धनी ।
कूर्म पृष्टा सरसावूनी । भयें कांपे चळचळां ॥ ७९ ॥
वराह उंचावोनि दंत । म्हणे धरा होती रसा व्यक्त ।
दिग्गज भयभीतचित्त । सैरा धांवती दशदिशां ॥ ८० ॥
अस्त्रें नोहे प्रळय अचाट । कीं प्रळयरुद्राचा हळहळाट ।
विमानयानीं पाहे सुभट । त्या पळतां समजेना ॥ ८१ ॥
तेज पाहतां सत्य अद्भुत । गंधर्व झाले मूर्छागत ।
तार तारांगण होत । चंद्र लपवी मुखातें ॥ ८२ ॥
सूर्य वरुणा करी दाटी । म्हणे राहें खगापोटीं ।
वेगीं प्रळय जेठी । जगामाजी मिरवला ॥ ८३ ॥
शिव झाला भयातुर । रक्षा कपाटें गिरिकंदर । 
ऐसा प्रळय होतां अपार । ठायीं ठायीं पडताती ॥ ८४ ॥
त्यांत नागास्त्र विषवल्लीसरणी । प्रगटतां विषाची प्रेरणी ।
अघटित तेथें जाहली करणी । आली विषाची मूर्छना ॥ ८५ ॥
होतां जलशापादिक । त्यांत प्रवेशला रुद्रास्त्र पावक ।
तो क्षणें जाळूं पाहें सकळिक । ग्रासीन म्हणे ब्रह्मांड ॥ ८६ ॥
त्यातें साह्यार्थ दानवास्त्र झालें । भयानक बहुधा रक्षक धांवले ।
तैशांत काळास्त्र परम शिरलें । प्राण हरुं लोकांचा ॥ ८७ ॥
ऐसी प्रळयाची होतां मांडणी । मच्छिंद्र देखतां नयनीं ।
मग नव अस्त्रशक्तिमंत्र जपूनी । विभूतीतें सोडीतसे ॥ ८८ ॥
तेणें अस्त्रविचक्षणीं । कैसे ऐका प्रतापखाणी ।
वातअस्त्राचे पुढे जाऊनी । पर्वतास्त्र विराजलें ॥ ८९ ॥
यावरी कामास्त्रापुढें जाऊनी । संचरले अस्त्र विरक्त धडपडूनी ।
तेणें कामास्त्र बापुडें होऊनी । पाठी देऊनि पळतसे ॥ ९० ॥

Shree Navanath Bhaktisar adhyay 4 
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय चौथा ( ४ ) 



Custom Search