Monday, August 10, 2020

ShriRamcharitmans Part 32 श्रीरामचरितमानस भाग ३२

 

ShriRamcharitmans Part 32  

Doha 183 to 185

श्रीरामचरितमानस भाग ३२

दोहा १८३ ते १८५
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
छं०--जप जोग बिराग तप मख भागा श्रवन सुनइ दससीसा ।
आपुनु उठि धावइ रहै न पावइ धरि सब घालइ खीसा ॥
अस भ्रष्ट अचारा भा संसारा धर्म सुनिअ नहिं काना ।
तेहि बहुबिधि त्रासइ देस निकासइ जो कह बेद पुराना ॥
जप, योग, वैराग्य, तप आणि यज्ञात देवांना भाग मिळाल्याचे कळताच, तो तत्क्षणी स्वतः धावून जात असे. तेथे मग काहीही उरत नसे. तो सर्वांना पकडून विध्वंस करीत असे. जगात असे भ्रष्ट आचरण पसरले की, धर्माचे नावही ऐकू येत नसे.जो कोणी वेद व पुराण सांगत असे, त्याला रावण त्रास देत असे व देशातून हाकलून देत असे.
सो०--बरनि न जाइ अनीति घोर निसाचर जो करहिं ।
हिंसा पर अति प्रीति तिन्ह के पापहि कवनि मिति ॥ १८३ ॥
राक्षस जे घोर अत्याचर करीत, त्यांचे वर्णनही करता येणार नाही. हिंसेबद्दलच ज्यांना प्रेम वाटे, त्यांच्या पापांबद्दल किती सांगावे ? ॥ १८३ ॥
मासपारायण, सहावा विश्राम
 बाढ़े खल बहु चोर जुआरा । जे लंपट परधन परदारा ॥ 
मानहिं मातु पिता नहिं देवा । साधुन्ह सन करवावहिं सेवा ॥
परक्याचे धन व परस्त्रीबद्दल लोभ धरणारे, दुष्ट, चोर आणि जुगारी यांची संख्या खूप वाढली. लोक, माता-पिता आणि देवांना जुमानत नव्हते आणि साधूंकडून सेवा करुन घेत होते. ॥ १ ॥
जिन्ह के यह आचरन भवानी । ते जानेहु निसिचर सब प्रानी ॥
अतिसय देखि धर्म कै ग्लानी । परम सभीत धरा अकुलानी ॥
( श्रीशिव म्हणतात-) ' हे भवानी, ज्यांचे असे आचरण असते, त्या प्राण्यांना राक्षसच समज. अशा प्रकारे धर्माविषयी लोकांची अरुची व अनास्था पाहून पृथ्वी अत्यंत भयभीत व व्याकूळ झाली. ॥ २ ॥   
गिरि सरि सिंधु भार नहिं मोही । जस मोहि गरुअ एक परद्रोही ॥
सकल धर्म देखइ बिपरीता । कहि न सकइ रावन भय भीता ॥
( ती विचार करुं लागली की, ) पर्वत, नद्या व समुद्र यांचे ओझे मला कधी इतके वाटले नाही, जितके एक परद्रोह्याचे वाटते. पृथ्वीला सर्व धर्म विपरीत झाल्याचे दिसत होते, परंतु रावणाच्या भीतीमुळे ती बोलू शकत नव्हती. ॥ ३ ॥
धेनु रुप धरि हृदयँ बिचारी । गई तहाँ जहँ सुर मुनि झारी ॥
निज संताप सुनाएसि रोई । काहू तें कछु काज न होई ॥
( शेवटी ) मनात विचार करुन व गाईचे रुप घेऊन जेथे देव व मुनी ( लपले ) होते, तेथे ती गेली. पृथ्वीने रडत-रडत आपले दुःख उघड केले, परंतु कुणाकडूनही काही काम झाले नाही. ॥ ४ ॥
छं०-सुर मुनि गंधर्बा मिलि करि सर्बा गे बिरंचि के लोका ।
सँग गोतनुधारी भूमि बिचारी परम बिकल भय सोका ॥
ब्रह्माँ सब जाना मन अनुमाना मोर कछू न बसाई ।
जा करि तैं दासी सो अबिनासी हमरेउ तोर सहाई ॥
तेव्हा देव, मुनी आणि गंधर्व हे सर्व मिळून ब्रह्मदेवाच्या सत्यलोकी गेले. भय आणि शोकामुळे ती अत्यंत व्याकूळ झालेली बिचारी पृथ्वीसुद्धा गायीच्या रुपात त्यांच्याबरोबर होती. ब्रह्मदेवांनी सारे ओळखले. त्यांनी विचार केला की, यात माझे कांहीं चालणार नाही. ( तेव्हा त्यांनी पृथ्वीला म्हटले, ) ' ज्याची तू दासी आहेस, तोच अविनाशी तुम्हां-आम्हांला मदत करणारा आहे. 
सो०--धरनि धरहि मन धीर कह बिरंचि हरिपद सुमिरु ।
जानत जन की पीर प्रभु भंजिहि दारुन बिपति ॥ १८४ ॥   
ब्रह्मदेव म्हणाले, ' हे धरणी, मनात धीर धरुन श्रीहरींच्या चरणांचे स्मरण कर. प्रभु हे आपल्या सेवकांची यातना जाणतात. ते तुझ्या कठीण संकटाचा नाश करतील.' ॥ १८४ ॥
बैठे सुर सब करहिं बिचारा । कहँ पाइअ प्रभु करिअ पुकारा ॥
पुर बैकुंठ जान कह कोई । कोउ कह पयनिधि बस प्रभु सोई ॥
सर्व देव बसून विचार करु लागले की, प्रभूंना शोधायचे कोठे ? त्यांच्याजवळ तक्रार कुठे करायची ? कोणी म्हणाले की, वैकुंठाला जाऊया, कोणी म्हणत होता की, प्रभु क्षीरसमुद्रात निवास करतात, तेथे जाऊया. ॥ १ ॥
जाके हृदयँ भगति जसि प्रीति । प्रभु तहँ प्रगट सदा तेहिं रीती ॥
तेहिं समाज गिरिजा मैं रहेऊँ । अवसर पाइ बचन एक कहेऊँ ॥
ज्याच्या मनात जशी भक्ती आणि प्रीती असते, तेथे प्रभू त्याच पाहून मी म्हणाले, ॥ २ ॥
हरि ब्यापक सर्बत्र समाना । प्रेम तें प्रगट होहिं मैं जाना ॥
देस काल दिसि बिदिसिहु माहीं । कहहु सो कहाँ जहाँ प्रभु नाहीं ॥
भगवान सर्व ठिकाणी समानपणे भरलेले असतात. प्रेमामुळे ते प्रगट होतात. देश, काल, दिशाविदिशा यांमध्ये जिथे भगवान नाही, अशी जागा कुठे आहे ? सांगा बरे ! ॥ ३ ॥
अग जगमय सब रहित बिरागी । प्रेम तें प्रभु प्रगटइ जिमि आगी ॥
मोर बचन सब के मनमाना । साधु साधु करि ब्रह्म बखाना ॥
ते चराचरात व्याप्त असूनही सर्वांपासून अलिप्त च विरक्त आहेत. ( त्यांना कशातही आसक्ती नाही. ) ते प्रेमामुळे प्रगट होतात. जसा अग्नी प्रगट होतो. ( अग्नी हा अव्यक्त रुपाने व्याप्त आहे. परंतु जिथे त्याच्यासाठी अरणि मंथन इत्यादी साधन केले जाते, तेथे तो प्रकट होतो. त्याप्रमाणेच सर्वत्र व्याप्त असलेले भगवानही प्रेमामुळे प्रगट होतात. ) माझे बोलणें सर्वांना आवडले. ब्रह्मदेवांनी ' छान छान ! ' म्हणून माझी प्रशंसा केली. ॥ ४ ॥
दोहा--सुनि बिेंरचि मन हरष तन पुलकि नयन बह नीर ।
अस्तुति करत जोरि कर सावधान मतिधीर ॥ १८५ ॥
माझे म्हणणे ऐकून ब्रह्मदेवांना फार आनंद झाला. त्यांचे शरीर पुलकित झाले आणि नेत्रांतून प्रेम वाहू लागले. तेव्हा ते धीरबुद्धीचे ब्रह्मदेव एकाग्र होऊन हात जोडून स्तुती करु लागले. ॥ १८५ ॥
छं०--जय जय सुरनायक जन सुखदायक प्रनतपाल भगवंता ।
गो द्विज हितकारी जय असुरारी सिंधुसुता प्रिय कंता ॥
पालन सुर धरनी अद्भुत करनी मरम न जानइ कोई ।
जो सहज कृपाला दीनदयाला करउ अनुग्रह सोई ॥ १ ॥
' हे देवांचे स्वामी, सेवकांना सुख देणारे, शरणागतांचे रक्षण करणारे भगवन, तुमचा विजय असो, विजय असो. हे गो-ब्राह्मणांचे हित करणारे, असुरांचा विनाश करणारे, लक्ष्मीचे प्रिय स्वामी, तुमचा विजय असो. हे देव आणि पृथ्वीचे पालन करणारे, तुमची लीला अद्भुत आहे. तिचे रहस्य कोणीही जाणू शकत नाही. अशा प्रकारे जे स्वभावतःच कृपाळू व दीनदयाळू आहेत, तेच आम्हांवर कृपा करोत. ॥ १ ॥
जय जय अबिनासी सब घट बासी ब्यापक परमानंदा ।
अबिगत गोतीतं चरित पुनीतं मायारहित मुकुंदा ॥
जेहि लागि बिरागी अति अनुरागी बिगत मोह मुनिबृंदा ।
निसि बासर ध्यावहिं गुनगन गावहिं जयति सच्चिदानंदा ॥ २ ॥
२) हे अविनाशी, सर्वांच्या हृदयांत वसणारे सर्वव्यापक, परम आनंदरुप, अज्ञेय, इंद्रियातीत, पवित्रचरित्र, मायेने रहित मुकुंदा ! तुमचा विजय असो, विजय असो. ( या लोकीच्या व परलोकीच्या सर्व भोगांपासून ) विरक्त आणि मोहातून सर्वथा मुक्त ( ज्ञानी )मुनिवृंदसुद्धा अत्यंत प्रेमाने ज्यांचे रात्रंदिवस ध्यान करतात आणि ज्यांच्या गुणांच्या समुच्चयाचे गान करतात, त्या सच्चिदानंदांचा विजय असो. ॥ २ ॥    
जेहिं सृष्टि उपाई त्रिबिध बनाई संग सहाय न दूजा ।
सो करउ अघारी चिंत हमारी जानिअ भगति न पूजा ॥
जो भव भय भंजन मुनि मन रंजन गंजन बिपति बरुथा ।
मन बच क्रम बानी छाड़ि सयानी सरन सकल सुरजुथा ॥ ३ ॥
ज्यांनी दुसर्‍या कुणा मित्राविना किंवा सहाय्यकाविना एकट्यानेच ( किंवा स्वतःच आपणाला त्रिगुणरुप-ब्रह्मा, विष्णू, महेश बनवून किंवा कोणत्याही उपादान कारणाविना, अर्थात स्वतःच सृष्टीचे एकमात्र निमित्त व उपादान कारण बनून ) तीन प्रकारची सृष्टी निर्माण केली, त्या पापनाशक भगवान यांनी आमची आठवण ठेवावी. आम्ही भक्ती जाणत नाही, पूजा जाणत नाही. जे जन्म-मृत्युच्या भयाचे नाश करणारे, मुनींच्या मनाला आनंद देणारे आणि विपत्तींच्या राशींचा नाश करणारे आहेत, त्या भगवंतांना आम्ही सर्व देवांचे समुदाय कायावाचामनाने, मखलाशी करण्याचा स्वभाव सोडून ( प्राजंळपणे ) शरण आलो आहोत. ॥ ३ ॥   
सारद श्रुति सेषा रिषय असेषा जा कहुँ कोउ नहिं जाना ।
जेहि दीन पिआरे बेद पुकारे द्रवउ सो श्रेबहगवाना ॥
भव बारिधि मंदर सब बिधि सुंदर गुनमंदिर सुखपुंजा ।
मुनि सिद्ध सकल सुर परम भयातुर नमत नाथ कंजा ॥ ४ ॥
सरस्वती, वेद, शेष आणि सर्व ऋषी, यांपैकी कोणीही ज्यांना जाणत नाही, ज्यांना दीनजन प्रिय आहेत, असे वेद उच्चरवाने सांगतात, तेच भगवान आम्हांवर दया करोत. जे संसाररुपी समुद्राच्या मंथनासाठी ममदराचलरुप आहेत, सर्व प्रकारे सुंदर, गुणांचे धाम आणि सुखांचे राशी आहेत, असे हे नाथ ! तुमच्या चरणकमळी आम्ही मुनी, सिद्ध आणि सर्व देव भयाने अत्यंत व्याकूळ होऊन नमस्कार करतो.' ॥ ४ ॥


Custom Search

No comments: