Tuesday, August 11, 2020

ShriRamcharitmans Part 33 श्रीरामचरितमानस भाग ३३


 ShriRamcharitmans Part 33, 

Doha 186 to 188,

श्रीरामचरितमानस भाग ३३,

दोहा १८६ ते १८८,

श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड

दोहा--जानि सभय सुर भूमि सुनि बचन समेत सनेह ।

गगनगिरा गंभीर भइ हरनि सोक संदेह ॥ १८६ ॥

देव आणि पृथ्वी भयभीत झाल्याचे पाहून आणि त्यांचे स्नेहयुक्त बोलणे ऐकून शोक व संदेह दूर करणारी गंभीर आकाशवाणी झाली. ॥ १८६ ॥

जनि डरपहु मुनि सिद्ध सुरेसा । तुम्हहि लागि धरिहउँ नर बेसा ॥

अंसन्ह सहित मनुज अवतारा । लेहउँ दिनकर बंस उदारा ॥ 

' हे मुनींनो, सिद्धांनो व देवाधिदेवांनो ! घाबरु नका. तुमच्यासाठी मी मनुष्यरुप धारण करीन आणि पवित्र सूर्यवंशामध्ये आपल्या अंशासह अवतार घेईन. ॥ १ ॥

कस्यप अदिति महातप कीन्हा । तिन्ह कहुँ मैं पूरब बर दीन्हा ॥

ते दसरथ कौसल्या रुपा । कोसलपुरीं प्रगट नरभूपा ॥ 

कश्यप आणि अदिती यांनी मोठे तप केले होते. मी पूर्वीच त्यांना वर दिलेला आहे. तेच दशरथ आणि कौसल्या यांच्या रुपाने मनुष्यांचे राजा बनून अयोध्यापुरीत प्रकट झालेले आहेत. ॥ २ ॥

तिन्ह के गृह अवतरिहउँ जाई । रघुकुल तिलक सो चारिउ भाई ॥

नारद बचन सत्य सब करिहउँ । परम सक्ति समेत अवतरिहउँ ॥

त्यांच्या घरी मी रघुकुलात श्रेष्ठ चार भावांच्या रुपाने अवतार घेईन. नारदांचे ( शाप ) वचन मी पूर्णपणे सत्य करीन आणि आपल्या पराशक्तीसह अवतार घेईन. ॥ ३ ॥

हरिहउँ सकल भूमि गरुआई । निर्भय होहु देव समुदाई ॥

गगन ब्रह्मबानी सुनि काना । तुरत फिरे सुर हृदय जुड़ाना ॥

मी पृथ्वीचा सर्व भार हरण करीन. हे देववृंदांनो ! तुम्ही निर्भय व्हा. ' आकाशात झालेली ही भगवंतांची वाणी ऐकून देव लगेच परत गेले. त्यांचे मन संतुष्ट झाले. ॥ ४ ॥

तब ब्रह्मॉं धरनिहि समुझावा । अभय भई भरोस जियँ आवा ॥

मग ब्रह्मदेवांनी पृथ्वीला समजावून सांगितले. तीसुद्धा निर्भय झाली आणि तिला धीर आला. ॥ ५ ॥

दोहा--निज लोकहि बिरंचि गे देवन्ह इहइ सिखाइ ।

बानर तनु धरि धरि महि हरि पद सेवहु जाइ ॥ १८७ ॥

सर्व देवांना सांगितले की, ' वानरांचे रुप घेऊन तुम्ही पृथ्वीवर जाऊन भगवंतांच्या चरणाची सेवा करा. ' असे म्हणून ब्रह्मदेव आपल्या लोकी परत गेले. ॥ १८७ ॥

गए देव सब निज निज धामा । भूमि सहित मन कहुँ बिश्रामा ॥

जो कछु आयसु ब्रह्मॉं दीन्हा । हरषे देव बिलंब न कीन्हा ॥

सर्व देव आपापल्या लोकी गेले. पृथ्वीसह सर्वांच्या मनाला शांती लाभली. ब्रह्मदेवांनी जी आज्ञा दिली, त्यामुळे देव फार प्रसन्न झाले आणि त्यांनी ( तसे करण्यास ) वेळ घालविला नाही. ॥ १ ॥

बनचर देह धरी छिति माहीं । अतुलित बल प्रताप तिन्ह पाहीं ॥

गिरि तरु नख आयुध सब बीरा । हरि मारग चितवहिं मतिधीरा ॥

देवांनी पृथ्वीवर वानरदेह धारण केले. त्यांच्यामध्ये अपार बळ आणि पराक्रम होता. सर्वजण शूर होते. पर्वत, वृक्ष व नखें हीच त्यांची शस्त्रे होती. ते सर्व धीरबुद्धीचे ( वानररुप देव ) भगवंताच्या येण्याची वाट पाहू लागले. ॥ २ ॥

गिरि कानन जहँ तहँ भरि पूरी । रहे निज निज अनीक रचि रुरी ॥

यह सब रुचिर चरित मैं भाषा । अब सो सुनहु जो बीचहिं राखा ॥

ते वानर पर्वतांमध्ये व जंगलामध्ये जिकडे तिकडेआपल्या चांगल्या सेना बनवून सर्वत्र पसरले. हे सर्व चरित्र मी सांगितले. आता मध्येच सोडून दिलेले चरित्र ऐका. ॥ ३ ॥

अवधपुरी रघुकुलमनि राऊ । बेद बिदित तेहि दसरथ नाऊँ ॥

धरम धुरंधर गुननिधि ग्यानी । हृदयँ भगति मति सारँगपानी ॥

अयोध्यापुरीत रघुकुलशिरोमणि दशरथ नावाचा राजा झाला. त्यांचे नांव वेदामध्येही प्रसिद्ध आहे. ते धनुर्धर गुणांचे भांडार आणि ज्ञानी होते. त्यांच्या मनात शार्ङ्गधनुष्य धारण करणार्‍या भगवंतांची भक्ती होती आणि त्यांची बुद्धीही त्यांच्यामध्येच रमली होती. ॥ ४ ॥

दोहा--कौसल्यादि नारि प्रिय सब आचरन पुनीत ।

पति अनुकूल प्रेम दृढ़ हरि पद कमल बिनीत ॥ १८८ ॥

त्यांच्या कौसल्या इत्यादी प्रिय राण्या पवित्र आचरणाच्या होत्या. त्या फार नम्र आणि पतीला अनुकूल वागणार्‍या होत्या. श्रीहरींच्या चरणकमलांमध्ये त्यांचे निःसीम प्रेम होते. ॥ १८८ ॥

एक बार भूपति मन माहीं । भै गलानि मोरें सुत नाहीं ॥

गुर गृह गयउ तुरत महिपाला । चरन लागि करि बिनय बिसाला ॥

एकदा राज्याच्या मनात अतिशय खेद झाला की, मला पुत्र नाही. राजा त्वरित गुरुंच्याकडे गेला आणि त्यांच्या चरणांना प्रणाम करुन त्याने विनवणी केली. ॥ १ ॥

निज दुख सुख सब गुरहि सुनायउ । कहि बसिष्ठ बहु बिधि समुझायउ ॥

धरहु धीर होइहिं सुत चारी । त्रिभुवन बिदित भगत भय हारी ॥

राजाने आपले सारे दुःख गुरुंना सांगितले. गुरु वसिष्ठ यांनी त्यांना अनेक प्रकाराने समजावून सांगितले. ( आणि म्हटले, ) ' धीर धरा. तुम्हांला चार पुत्र होतील, ते तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध आणि भक्तांचे भय हरण करणारे होतील. ' ॥ २ ॥

सृंगी रिषिहि बसिष्ठ बोलावा । पुत्रकाम सुभ जग्य करावा ॥

भगति सहित मुनि आहुति दीन्हें । प्रगटे अगिनि चरु कर लीन्हें ॥

वसिष्ठांनी शृंगी ऋषींना बोलावून घेतले आणि त्यांच्याकडून पुत्रकामेष्ठी यज्ञ करवून घेतला. मुनींनी भक्तिपूर्वक आहुती दिल्यावर अग्निदेव हातामध्ये पायस घेऊन प्रगट झाले. ॥ ३ ॥    

जो बसिष्ठ कछु हृदयँ बिचारा । सकल काजु भा सिद्ध तुम्हारा ॥

यह हबि बॉंटि देहु नृप जाई । जथा जोग जेहि भाग बनाई ॥

अग्निदेव ( दशरथ राजांना ) म्हणाले, ' वसिष्ठांनी मनांत जे ठरवले होते, त्यानुसार तुमचे सर्व काम पूर्ण झाले. हे राजा, तू जाऊन हा पायस योग्य वाटेल, त्याप्रमाणे भाग करुन ( राण्यांना ) वाटून दे.' ॥ ४ ॥







Custom Search

No comments: