Monday, February 29, 2016

Shri Navanath BhaktiSar Adhyay 24 Part 2/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय चोविसावा (२४) भाग २/२


Shri Navanath BhaktiSar Adhyay 24 
DrumilNarayan had taken birth as Bhartari. Bhartari was son of God Mitra-Varuni. Bhartari in his early age was cared by a dear by offering milk and looking after all his needs of the age. Bhartari was growing in the forest started to eat leaves like dear. He learnt the language of the animals. One day Jaysing and his wife Renuka saw Bhartari in the forest and were surprised that such a small child had been left their by his mother and father. However they took him with them and took care of him, thinking all the time that they have to return the child to his mother and father one day upon their asking to do so. Jaysing and his family came to Kashi on the bank of Bhagirathi. They decided to stay there as Kashi being a holy place. One day he took Bhartari with him and went in the God Shiva temple. God welcomed the child calling him as Bhartari. Jaysing herd it and came to know that the child is a God. He told everything to Renuka and they decided to name the child as Bhartari, as God Shiva had called him as Bhartari. One day Bhartari became unconscious while playing with other children who ran away. Mitra-Varini saw Bhartari wounded came down from swarga and cured him. He took Bhartari to Renuka and introducing himself told everything to her right from Bhartari's birth. He told her to take care of Bhartari. Further he assured her that nobody would take Bhartari from them. Renuka told everything to Jaysing. As Bhartari grew older day by day, Jaysing and Renuka thought of his marriage and decided to leave Kashi and to go to their native village. However in the forest they met with the thieves who killed Jaysing and took the money and everything with them. Renuka also died because of the shock. Bhartari became very sad and could not understand what to do. However a group of traders saw him and took him with them. What happened next would be told to us in the next 25th Adhayay by Dhudisut Malu from Narahari family.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय चोविसावा (२४) भाग २/२
आसन वसन भोजन पान । देती करिती बहु लालन । 
बाळ खेळतांना पाहून । हर्षयुक्त होती तीं ॥ १०१ ॥
बाळ भर्तरी पंचवर्षी । बोबडे बोले नाचे महीसी । 
नाच नाचोनि धांवोनि कंठासी । मिठी घाली मातेच्या ॥ १०२ ॥
मिठी घालितां रेणुका सती । उचलूनि घेत अंगावरती ।
चुंबन घेता उभय तीं । हास्यवदन करिताती ॥ १०३ ॥
हांसूनि एकमेकां म्हणती । ईश्र्वर पावला आपणांप्रती ।
उदरीं नसतां स्वसंतती । ईश्र्वरें दिधला कृपेनें ॥ १०४ ॥
दिधला परी आक्षेप चित्तासी । घेऊनि म्हणती या बाळासी ।
मातापिता चुकल्यासी । शोधीत असती महीतें ॥ १०५ ॥
परी तीं शोधितां कोठें । अवचित जरी पडली गांठ ।
मग तीं आपणांपासूनि नेटें । घेऊनि जातील बाळातें ॥ १०६ ॥
ऐसी चिंता उभय तीं । नित्य नित्य हृदयीं वाहती ।
अहा हें बाळ अलोलिक स्थिती । स्वरुपा मिती नसे त्याच्या ॥ १०७ ॥
ऐसें बाळ हें परम सगुण । हें तों नेतील आम्हांपासून ।
ऐसें चिंतिती परी मन । घोंटाळत उभयतांचें ॥ १०८ ॥
मग तीं उभयतां विचार करिती । कीं यासी सोडूनि क्षेत्राप्रती ।
मही हिंडता कोणे क्षितीं । गांठी पडेल तयांची ॥ १०९ ॥
मग त्या क्षेत्रीं स्थळ पाहून । राहते झाले भिक्षुकपणें ।
भिक्षा मागूनि क्षेत्राकारण । निर्वाहाते चालविती ॥ ११० ॥
यापरी तें भर्तरी बाळ । मेळ मुलांचे स्थावरमंडळ । 
तयांमाजी खेळे खेळ । राजचिन्हें सर्वस्वीं ॥ १११ ॥
आपण सर्वांचा होऊनि राव । मुलांचींच मुलें सर्व ।
काठीचे करुनि अश्र्व । शाळा लाविल्या तयानें ॥ ११२ ॥
मंत्री परिचारक पायदळ जन । स्वार झुंझार कारकून । 
नाना वेष मुलांसी दाखवून । राजचिन्हें करीतसे ॥ ११३ ॥
तरी खेळ नव्हे भविष्य होणार । होय भाग्याचा संस्कार ।
जैसें ज्याचें भाग्य पर । चिन्हें उदय पावलीं ॥ ११४ ॥
तरी असो राजचिन्हीं । खेळ खेळतां बाळपणीं ।
तों एके दिवशीं आरोहणोनी । काष्ठशालिके पळताती ॥ ११५ ॥              
पळती ते वाताकृती । मुखें हो हो करुनि म्हणती ।
हो हो म्हणूनि थापटिती । काष्ठशालिके अश्र्वातें ॥ ११६ ॥
ऐसें खेळतां सोडूनि क्षेत्र । धांवती भरले काननीं सर्वत्र ।
एकान्त विपिनीं खेळ खेळत । सन्निध कोणी नसेचि ॥ ११७ ॥
परी ते काननचव्हाट्यांत । भर्तरी धांवता शालिकाअश्र्वातें ।
तों पायासी ठेंच लागूनि महीतें । उलथोनियां पडियेला ॥ ११८ ॥
पडिला महीं कासावीस । होऊनि सांडिलें शुद्धबुद्धीस ।
नेत्रें विकासूनि महीतें । दाविता झाला तत्क्षणीं ॥ ११९ ॥
ते श्र्वेतवर्ण पाहूनि नयन । अर्भकें (लहान मुलें) पळालीं भयेंकरुन । 
म्हणती भर्तरी पावला मरण । भूत होईल आतां हा ॥ १२० ॥
मग हा आपुल्या लागोनि पाठीं । भक्षील सकळ मग शेवटीं ।
ऐसें भय मानूनि पोटीं । पळूनि गेलीं अर्भकें ॥ १२१ ॥
जाऊनि भागीरथीघांटावर । करीत बैसलीं आहेत विचार ।
म्हणती भर्तरिया भूत थोर । होऊनि हिंडे ग्रामांत ॥ १२२ ॥
मग गडे हो आपण गल्लीसी । कैसें खेळावें भक्षील आपणांसी ।
तरी आतां आपुले ग्रामासी । खेळ खेळू सदनांत ॥ १२३ ॥
यापरी दुसरा अर्भक बोलत । कीं बरवें सांडिलें काननातें ।
मनुष्य कोणी नव्हते तेथें । भक्षिलें असते आपणांसी ॥ १२४ ॥
ऐसे अर्भक घांटावर । करीत बैसले आहेत विचार ।
तों येरीकडे मूर्च्छा अपार । भर्तरीतें वेधली ॥ १२५ ॥
मही पडलासे उलथोन । शरीर सुकले तेणेंकरुन ।
ठायीं ठायीं भेदले पाषाण । रुधिर तेणें वाहातसे ॥ १२६ ॥
ऐसें होतां अवस्थेसी । मैत्रावरुणें पाहिलें त्यासी ।
मग पुत्रमोह हृदयासी । परम कळवळा दाटला ॥ १२७ ॥
मग महीस मित्रावरुणी । येता झाला स्नेहेंकरुनी ।
अति लगबगें बाळ उचलोनी । हृदयालागीं कवळिलें ॥ १२८ ॥
त्वरें आणूनि भागीरथीजीवन । तयासी करविलें तोयपान ।
हृदयालागीं आलिंगून । सावध केलें बाळासी ॥ १२९ ॥
आणि पाहूनि स्वयें कृपादृष्टीं । मग दुःखलेशाची झाली फिटी ।
पाषाणघाव घसवटीं । अदृश्यपणें मिरवले ॥ १३० ॥
मग तो बाळ सावधपणीं । अंकीं घेऊनि मिरवोनि ।
परम स्नेहें मुखावरोनी । वरदहस्तें कुरवाळी ॥ १३१ ॥
यापरी विप्राचा वेष धरोनी । तेथोनि चालिला मित्रावरुणी ।
भर्तरीचा धरोनि पाणी । सदनालागीं आणीतसे ॥ १३२ ॥
तों मार्गीं येतां घाबरे । पाहते झाले सर्व किशोर ।
पाहतांचि म्हणती भर्तरी थोर । भूत होऊनि आला रे ॥ १३३ ॥          
ऐसें म्हणूनि आरडोनी । पळताती अति भयेकरुनी ।
आपुलाले सदना जाऊनी । भये दडती संधींत ॥ १३४ ॥
येरीकडे मित्रा वरुणी । सदनीं आला त्यासी घेऊनी ।
माता रेणुकेसी पाचारोनी । म्हणे सांभाळीं बाळातें ॥ १३५ ॥
मग ते चरणीं ठेवूनि माथा । म्हणे महाराजा हे ताता ।
आपण कोण्या ग्रामीं असतां । परम स्नेहाळू आम्हां कीं ॥ १३६ ॥
ते रेणुका प्रेमळ सती । पाहतां विप्र दिव्यमूर्ती ।
वस्रासन टाकूनि निगुतीं । बैसविलें त्यावरी ॥ १३७ ॥
मग म्हणे बाळका करीं कवळून । आणिलें तुम्ही मोहेंकरुन ।
तरी सकळ संशय सोडून । नामाभिधान मज सांगा ॥ १३८ ॥
येरी म्हणे वो सती ऐक । या बाळाचा मी असे जनक ।
म्हणोनि स्नेहाचें दोंदिक । तरी तुजपाशीं मी आलों ॥ १३९ ॥
तरी बाळ तुजकारणें । कायावाचा केलें अर्पण ।
परी तूंही आतां संशय टाकून । संगोपन करीं याचें ॥ १४० ॥
तें ऐकूनि बोले ऐसें । तुम्ही बाळकाचे जनक कैसे । 
येरी म्हणे वो अनायासें । कथा ऐक बाळाची ॥ १४१ ॥
अगे मी विप्रवेषें तूतें । दिसत आहें परी मी दैवत । 
मित्रावरुणी नाम मातें । महीलागीं वदतात ॥ १४२ ॥
मग मूळापासूनि तीतें कथन । भर्तरीपात्रव्यक्त जनन ।
हरिणीस्तनींचें संगोपन । सकळ निर्णय वदलासे ॥ १४३ ॥
तरी या बाळाचे संभवन । अपूर्व आहे महीकारण ।
परी असो पूर्ण दैवानें । लाभ झाला तुज याचा ॥ १४४ ॥
झाला परी आर्तभूत । जगीं म्हणवीं कां आपुला सुत ।
काया वाचा बुद्धि सुत । रक्षण करीं उचित हें ॥ १४५ ॥
ऐसें सांगूनि मित्रावरुणी । जाता झाला आपुले स्थानीं ।
येरीकडे नितंबिनी  । परम चित्तीं तोषली ॥ १४६ ॥      
मग भ्रतारासी सांगे वर्तमान । तोही हर्षें ऐकून । 
मग जननीजनकांचें भय पूर्ण । बाळप्रकरणीं फिटलें कीं ॥ १४७ ॥
जैसें वस्र स्पर्शिल्या साबणीं । सकळ मळाची होय हानी ।
तेवीं मित्रावरुणीवाचेकरुनी । सकळ संशय फिटलासे ॥ १४८ ॥ 
किंवा गढूळ झालें असतां उदक । स्थिरावल्या दावी पवित्र मुख ।
तेवीं त्यांचा समूळ धाक । फिटूनि गेला तत्काळ ॥ १४९ ॥
कीं दारा सगुणपर । गृहीं असतां गरोदर ।
परी प्रसूतीचे भय थोर । प्रसूत झालिया फिटतसे ॥ १५० ॥
कीं अनभ्यस्त कांसे लागतां । परम भय मानी पार होतां ।
परी पार झालिया सकळ चिंता । फिटोनि जाय सरितेची ॥ १५१ ॥
कीं अचाट काननीं तस्करभयातें । मार्ग मिळाला भयव्यक्त ।
परी पार वस्ती पावल्या स्वस्थचित्त । भयापासूनि होतसे ॥ १५२ ॥
तन्न्यायें मित्रावरुणी । वार्ता ऐकतां उभय कर्णीं ।
भयमुक्त होती आनंदोनी । हेलावे चित्त पूर्णत्वें ॥ १५३ ॥
जैसें दुःख जाऊनि होतां सुख । पोसे शरीर दोंदिक ।
तेवीं त्यांचें चित्तीं बलाहक (मेघ) । आनंदाचा उदेला ॥ १५४ ॥
मग ते अतिप्रेमेंकरुन । आशापाशाचें गुंतलें बंधन । 
मग परम स्नेहाचा खुंट उभवोन । गरके घालिती त्यासवें ॥ १५५ ॥
ऐसियापरी दिवसेंदिवस । परम उदेलीं लालनपालनास ।
तंव काशीक्षेत्रीं पुण्यवस्तीस । पंच वरुषें लोटलीं ॥ १५६ ॥
तो षड्दशवर्षीं भर्तरीनाथ । पूर्ण झाला वयें व्यक्त ।
जयसिंग आणि रेणुकेप्रत । लग्नविचार सूचला ॥ १५७ ॥
मग उभयतां बैसूनि एकांतीं । म्हणती चला जाऊं स्वदेशाप्रती ।
लक्षूनि संबंधा जाती । लग्न करुं बाळाचें ॥ १५८ ॥
ऐसा विचार उभयतां करोनि । सोडिते झाले क्षेत्रालागोनी ।
माळवादेशीं त्यांचा ग्राम उद्देशोनी । मार्ग धरिती तयाचा ॥ १५९ ॥
मार्गी चालतां ग्रामोग्रामीं । भिक्षा करिती भिक्षुकधर्मी ।
मार्गीं चालतां भविष्य वर्मी । विकट झगटलें येऊनि ॥ १६० ॥
मार्गी चालता काननांत । तस्कर येऊनि अकस्मात ।
जयसिंग शस्रघातें । मुक्त केला प्राणांतें ॥ १६१ ॥
जवळी होतें वित्त कांहीं । तें हिरोनि नेलें तस्करीं उपायीं ।
जयसिंगाचें प्रेत महीं । निचेष्टित पडियेलें ॥ १६२ ॥ 
मग तें पाहूनि रेणुका सती । प्रेत कवळूनि देहानिगुतीं ।
परम शोक देहाप्रती । सांडिती झाली तेधवां ॥ १६३ ॥
मग तीं उभयतां स्रीपुरुष । भर्तरीनें काष्ठें मेळवूनि विशेष ।
अग्नि लावूनि उभयतांस । शोकडोहीं बुडाला ॥ १६४ ॥
उभयतांचे करितां दहन । परी शोकविशोकें पोळे प्राण ।
म्हणे अहा तातमातेनें । कैसें सोडिलें काननीं या ॥ १६५ ॥
अहा तुम्ही जननी जनक । पहातें झालां परत्रलोक ।
यावरी महीतें मायिक । कोणी नसे मजलागीं ॥ १६६ ॥
अहा जननी रेणुकानाम्नी । कैसी गेली मज सोडोनी ।
आतां आई आई म्हणोनि वाणी । बोलावूं मी कोणातें ॥ १६७ ॥
अहा जननी तूं परम मायिक । जाणती होतीस तृषाभूक ।
आतां निकटपणीं लोक । परम कैसें पाहतील ॥ १६८ ॥
अहा जननी रात्रींतून । तीन वेळां उठोन ।
करवीत होतीस तोयपान । तरी मन निष्ठुर कां केलें ॥ १६९ ॥
अहा हृदयीं धरुनि करिसी चुंबन । वाचे म्हणसी बाळ हें तान्हें ।
ऐसे म्हणोनि उदकपान । करवीत अससी नित्यशा ॥ १७० ॥ 
ऐसी माय तूं सघन । असोनि केलें निष्ठुरपण । 
मज ऐसा वनीं सोडून । गेलीस कैसी जननीये ॥ १७१ ॥
अहा ताता जयसिंगनामीं । कैसा गेलासी मज टाकुनी ।
आतां पृथ्वीवर दैन्यावाणी । कोठे राहूं निराश्रित ॥ १७२ ॥
अहा ताता बाहेर जातां । खाऊ मजला आणीत होतां ।
तो मुगुटीं खोवूनि सदनीं येतां । पाचारुनी मज देशी ॥ १७३ ॥
ऐसा मोह असतां पोटीं । सांडूनि गेलासी विपिनीं देठीं ।
ऐसें म्हणूनि करसंपुटीं । वक्षःस्थळ पिटीतसे ॥ १७४ ॥
ऐसें रुदन करीत करीत । पेटवूनि झाला शांतचित्त ।
परी तो तेथूनि न उठे त्वरित । प्राण सोडूं पहातसे ॥ १७५ ॥
तों मार्गेकरुनि व्यवसायिक । त्या वंजारें वृषभकटक । 
त्यांनीं पाहूनि त्याचा शोक । परम चित्तीं कळवळले ॥ १७६ ॥
मग तयापाशीं येऊन । पुसोनि घेतलें वर्तमान ।
वर्तमान कळल्या बोलती वचन । बोधनीतीं तयातें ॥ १७७ ॥
म्हणती अगा भाटसुता । शोक करिसी अति वृथा ।
होणार झालें विषयमाथां । विधिअक्षरें नेमीत ॥ १७८ ॥
जरी तूं आतां करिसी शोक । तरी काय मिळतील जननी जनक ।
ईश्र्वरकरणी प्रारब्ध फुटकें । आपुलेंचि म्हणावें ॥ १७९ ॥
तरी आतां धैर्य करुन । हित पाहावें आपुलें आपण ।
संसार करुनि आपुलें मतीनें । तीन्ही लोकीं मिरवावें ॥ १८० ॥
ऐसें म्हणूनि बोध अपार । उठविला त्याचा धरुनि कर ।
मग सवें घेऊनि मुक्कामावर । आणिलासे भर्तरी ॥ १८१ ॥
मुक्कामीं राहूनि सकळ जन । रात्रीं देऊनि अन्नपान । 
दुसरे दिवशीं सवें घेऊन । पुन्हां जात व्यवसायी ॥ १८२ ॥
ऐसेंपरी सात पांच दिन । शोक करितां गेले लोटून । 
मग दिवसेंदिवस होऊनि विस्मरण । सहजस्थिती वर्ततसे ॥ १८३ ॥      
मग त्या व्यावसायिकां सहज । करुं लागला तयांचे काज ।
काज होतां तेजःपुंज । सकळ चाहती आदरानें ॥ १८४ ॥
मग आसन वसन भूषणांसहित । व्यवसायिक सकळ संपादीत ।
ऐसेपरी कांहीं दिवस त्या स्थितींत । लोटूनि गेले तयाचे ॥ १८५ ॥
यावरी व्यवसायिक । धान्य भरुनि अति अमूप ।
उज्जयिनी शहर अवंतिक । मार्ग धरिला तयाचा ॥ १८६ ॥
मार्ग सरतां वृषभकटका । येऊनि पोहोंचला अवंतिका ।
तेथें कथेचा रस निका । होईल तो स्वीकारा पुढें ॥ १८७ ॥
म्हणाल पुढिले अध्यायीं रस । उगाचि मानाल स्वचित्तास । 
ऐसें तरी न म्हणावें पीयूष । चवी घेतां कळों येईल ॥ १८८ ॥
तरी ती कथा सुधारस थोर । वाढी श्रोत्यां धुंडीकुमर । 
मालू ऐसा नामोच्चार । नरहरिकृपें मिरवतसे ॥ १८९ ॥     
स्वस्ति श्रीभक्तिकथासार । संमत गोरक्षकाव्य किमयागार । 
सदा परिसोत भाविक चतुर । चतुर्विंशतितमाध्याय गोड हा ॥ १९० ॥
श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
॥ श्रीनवनाथभक्तिसार चतुर्विशतितमाध्याय संपूर्ण ॥
Shri Navanath BhaktiSar Adhyay 24  श्रीनवनाथभक्तिसार अध्याय चोविसावा (२४) 

Custom Search

Shri Navanath BhaktiSar Adhyay 24 Part 1/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय चोविसावा (२४) भाग १/२


Shri Navanath BhaktiSar Adhyay 24 
DrumilNarayan had taken birth as Bhartari. Bhartari was son of God Mitra-Varuni. Bhartari in his early age was cared by a dear by offering milk and looking after all his needs of the age. Bhartari was growing in the forest started to eat leaves like dear. He learnt the language of the animals. One day Jaysing and his wife Renuka saw Bhartari in the forest and were surprised that such a small child had been left their by his mother and father. However they took him with them and took care of him, thinking all the time that they have to return the child to his mother and father one day upon their asking to do so. Jaysing and his family came to Kashi on the bank of Bhagirathi. They decided to stay there as Kashi being a holy place. One day he took Bhartari with him and went in the God Shiva temple. God welcomed the child calling him as Bhartari. Jaysing herd it and came to know that the child is a God. He told everything to Renuka and they decided to name the child as Bhartari, as God Shiva had called him as Bhartari. One day Bhartari became unconscious while playing with other children who ran away. Mitra-Varini saw Bhartari wounded came down from swarga and cured him. He took Bhartari to Renuka and introducing himself told everything to her right from Bhartari's birth. He told her to take care of Bhartari. Further he assured her that nobody would take Bhartari from them. Renuka told everything to Jaysing. As Bhartari grew older day by day, Jaysing and Renuka thought of his marriage and decided to leave Kashi and to go to their native village. However in the forest they met with the thieves who killed Jaysing and took the money and everything with them. Renuka also died because of the shock. Bhartari became very sad and could not understand what to do. However a group of traders saw him and took him with them. What happened next would be told to us in the next 25th Adhayay by Dhudisut Malu from Narahari family.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय चोविसावा (२४) भाग १/२
श्रीगणेशाय नमः ॥
जयजयाजी निरंजना । अलक्ष गोचरव्यक्त निर्गुणा ।
पूर्णब्रह्मा मायाहरणा । चक्रचालका आदिपुरुषा ॥ १ ॥
हे गुणातीता सर्वत्रभरिता । सगुणरुपा लक्ष्मीकांता ।
मागिले अध्यायी रसाळ कथा । मच्छिंद्रोत्सव दाविला ॥ २ ॥
एका सुवर्णविटेसाठीं । कनकगिरि करी गोरक्षजेठी ।
आतां मम वाग्वटीं । भर्तरीआख्यान वदवीं कां ॥ ३ ॥
तरी श्रोते ऐका कथन । पूर्वीं मित्ररश्मी करितां गमन ।
वातचक्रीं प्रेरुनि स्यंदन । अस्ताचळा जातसे ॥ ४ ॥
तों उर्वशी विमानासनीं । येत होती भूलोकअवनीं ।
तंव ती दारा मुख्यमंडनीं । मदनबाळी देखिली ॥ ५ ॥
देखतांचि पंचबाणीं । शरीर वेधलें मित्रावरुणीं । 
वेधतांची इंद्रियस्थानीं । येऊनि रेत झगटले ॥ ६ ॥
झगटतांचि इंद्रिय रेत । स्थान सोडूनि झालें विभक्त ।
विभक्त होतां पतन त्वरित । आकाशाहूनि पैं झालें ॥ ७ ॥
परी आकाशाहूनी होतांचि पतन । वातानें तें विभक्तपण ।
द्विभाग झालें महीकारण । येऊनियां आदळलें ॥ ८ ॥
एक भाग लोमशआश्रमा । येऊनि पावला थेट उत्तमा ।
घटीं पडतांचि तनू उत्तमा । अगस्तीची ओतली ॥ ९ ॥
यापरी दुसरा भाग । तो कौलिका ऋषीच्या आश्रमा चांग ।
येतांचि कैसा झाला वेग । तोचि श्रवण करा आतां ॥ १० ॥
कौलिक घेऊनि पात्र भर्तरी । भिक्षोद्देश धरुनि अंतरीं ।
निघता झाला सदनाबाहेरी । वस्तीपर्यटन करावया ॥ ११ ॥
परी कौलिक येतांचि बाहेर । भर्तरी ठेवूनि महीवर ।
बंद करीतसे सदनद्वार । कडीटाळें देऊिनियां ॥ १२ ॥
परी भर्तरी ठेविली अंगणांत । तों आकाशांतूनि रेत त्यांत ।
येऊनियां अकस्मात । भाग एक आदळला ॥ १३ ॥
तों इकडे कौलिक ऋषी । टाळें देऊनि गृहद्वारासी । 
येऊनि पाहे भर्तरीसी । तों रेत व्यक्त देखिलें ॥ १४ ॥
रेत व्यक्त देखतांचि पात्र । अंतःकरणीं विचारी तों पवित्र ।
चितीं म्हणे वरुणीमित्र । रेत सांडिलें भर्तरी ॥ १५ ॥
तरी यांत धृमीनारायण । अवतार घेईल कलींत पूर्ण ।
तीन शत एक सहस्र दिन । वर्षें लोटलीं कलीचीं ॥ १६ ॥
इतुकीं वर्षें कलीची गेलिया । धृमीनारायण अवतरेल भर्तरी या ।
तरी आतां भर्तरी रक्षूनियां । ठेऊं आश्रमीं तैसीच ॥ १७ ॥
मग ती भर्तरी रेतव्यक्ती । रक्षिता झाला आश्रमाप्रती ।
त्यासी दिवस लोटतां बहुतीं । पुढें कली लागला ॥ १८ ॥
मग तो कौलिक ऋषी । गुप्त विचरता प्रकट देशीं ।
भर्तरी नेऊनि मंदराचळासी । गुहाद्वारीं ठेविली ॥ १९ ॥
गुहाद्वारीं ठेवूनि पात्र ।अदृष्य विचरे तों पवित्र ।
तों कली लोटतां वर्षें तीन सहस्र । एकशतें तीन वर्षें ॥ २० ॥
तों द्वारकाधीशअंशेंकरुन । भर्तरींत संचरला धृमीनारायण ।
जीवित्व व्यक्त रेताकारण । होतांचि वाढी लागला ॥ २१ ॥
वाढी लागतां दिवसेंदिवस । पुतळा रेखत चालिला विशेष ।
पूर्ण भरतां नवमास । सिद्ध झाला तो पुतळा ॥ २२ ॥
परी मधुमक्षिकेनें पात्रांत । मधूचें जाळें केलें होतें ।
तयाचे संग्रहें व्यक्त । बाळ वाढी लागला ॥ २३ ॥
वाढी लागतां मधुबाळ । नवमास लोटतां गेला काळ ।
परी तो देहें होतां स्थूळ । भर्तरी पात्र भंगलें ॥ २४ ॥
बहुत दिवसांचें पात्रसाधन । झालें होतें कुइजतपण ।
त्यांत पर्जन्यकाळीं कड्यावरुन । पर्वत कोसळतां लोटले ॥ २५ ॥
कोसळतां परी एक पाषाण । गडबडीत पातला तें स्थान ।
परी पावतांचि पात्रासी झगटोन । भर्तरी भंग पावली ॥ २६ ॥
भर्तरी भंगतांचि बाळ त्यांत । तेजस्वी मिरवलें शकलांत ।
मक्षिकेचें मोहोळ व्यक्त । तेंही एकांग जाहलें ॥ २७ ॥
मग निर्मलपणीं बाळ व्यक्त । मिरवों लागलें स्वतेजांत ।
जैसें अभ्र वेगळें होतां दीप्त । निर्मळपणीं मिरवतसे ॥ २८ ॥
कीं स्थिरावल्या जैसे जीवन । तळा बैसलें गढूळपण । 
तें बाळ भर्तरीशुक्तिकारत्न । विमुक्त झालें वेष्टणा ॥ २९ ॥
परी कडा कोसळला कडकडीत । शब्द जाहले अति नेट ।
तेणेंकरुनि मक्षिका अचाट । भय पावोनि पळाल्या ॥ ३० ॥
येरीकडे एकटें बाळ । शब्दरुदनी करी कोल्हाळ ।
तेथें चरे कुरंगमेळ । तया ठायीं पातला ॥ ३१ ॥
तयांत गरोदर कुरंगिणी । चरत आली तये स्थानीं ।
तो बाळ रुदन करितां नयनीं । निवांत तृणीं पडलेंसे ॥ ३२ ॥
तरी अफाट तृण दिसे महीं । त्यांतही बाळ सबळ प्रवाहीं ।
चरत येतां हरिणी तया ठायीं । प्रसूत झाली बाळ पैं ॥ ३३ ॥
प्रसूत होतां बाळें दोन्ही । झाली असतां कुरंगिणी ।
पुनः मागे पाहे परतोनी । तों तीन बाळें देखिलीं ॥ ३४ ॥
माझींच बाळें त्रिवर्ग असती । ऐसा भास ओढवला चित्तीं ।
मग जिव्हा लावूनि तयांप्रति । चाटूनि घेतलें असे ॥ ३५ ॥
परी तीं खडतरपणीं दोन्हीं पाडसें तीतें । संध्याअवसरी झगटली स्तनातें । 
परी हें बाळ नेणे पानातें । स्तन कवळावें कैसें तें ॥ ३६ ॥
मग ते कुरंगिणी लोटूनि पाडस । चहूंकडे ठेवूनि चौपदास ।
मग वत्सलोनि लावी कांसेस । मुख त्याचें थानासी ॥ ३७ ॥
ऐसे लोटतां कांहींएक दिवस । तों तें रांगूं लागलें महीस ।
मग ते मृगी लावूनि थानास । संगोपन करीतसे ॥ ३८ ॥
ऐेसें करवोनि स्तनपानीं । नित्य पाजी कुरंगिणी ।
आपुलें मुखींची जिव्हा लावूनि । करी क्षाळण शरीरासी ॥ ३९ ॥
पाडसें ठेवूनि तया स्थानीं । चरुं जातसे विपिना हरिणी ।
घडोघडी येतसे परतोनी । जाई पाजूनि बाळातें ॥ ४० ॥
ऐसें करितां संगोपन । वर्षे लोटली तयांतें दोन ।
मग हरिणांमध्येचि जाऊन । पत्रें भक्षी वृक्षांची ॥ ४१ ॥
परी त्या वनचरांचे मेळीं । विचरता सावजभाषा सकळी ।
स्पष्ट होऊनि त्या मंडळीं । त्यांसमान बोलतसे ॥ ४२ ॥
हस्तिवर्ग गायी म्हैंशी व्याघ्र । जंबुक लांडगे हरिण भयंकर ।
शार्दूल रोही (मृग) गेंडा सांबर । भाषा समजे सकळांची ॥ ४३ ॥
सर्प किडे मुंगी पाळी । पक्षी यांची बोली सकळी ।
तैसेंचि कोकूनि उत्तर पावलीं । देत असे सकळांसी ॥ ४४ ॥
ऐसियापरी वनचररंगणीं । प्रत्यक्ष अवतार विचरे काननीं ।
जिकडे जिकडे जाय हरिणी । तिकडे तिकडे जातसे ॥ ४५ ॥
ऐसा पांच वर्षेंपर्यंत । हरिणीमागें तो हिंडत । 
तों एके दिवशी चरत चरत । हरिणी आली त्या मार्गें ॥ ४६ ॥
काननी चरतां मार्गे नेटे । तो बाळही आला ते वाटे ।
तों मार्गीं सह स्त्रीपुरुष भाट । मग त्या वाटे तीं येती ॥ ४७ ॥
त्या भाटा जयसिंग नाम । कांता रेणुका सुमध्यम ।
परी उभयतांचा एक नेम । एकचित्तीं वर्तती ॥ ४८ ॥
वर्तती परी कैसे अलोटी । शत्रुमित्र ऐक्यदृष्टी । 
कीं धनदवातका मोह पोटीं । समानचि वर्ततसे ॥ ४९ ॥
तन्न्यायें पुरुष कांता । प्रपंचहाटीं वर्तत असतां ।
तों सहज त्या मार्गें येतां । तया ठायीं पातलीं ॥ ५० ॥                
पातलीं परी मार्गावरती । बाळ देखिलें दिव्यशक्ती ।
बालार्क किरणी तेजाकृती । लखलखीत देखिलें ॥ ५१ ॥
कीं सहजासहज करावया गमन । महीं उतरला रोहिणीरमण ।
कीं पावकतेजकांती वसन । गुंडाळलें वाटतसे ॥ ५२ ॥
ऐशापरी तेजःपुंज । जयसिंग भाट देखतां सहज ।
मनांत म्हणे अर्कतेज । बाळ असे कोणाचें ॥ ५३ ॥
ऐसें स्त्रियेसी म्हणतसे । ऐसिया अरण्यांत असे ।
बाळ सांडूनि गेलीं सुरस । मातापितां कैसीं तीं ॥ ५४ ॥
कीं सहजचालीं चालतां । यांत चुकली याची माता ।
ऐसे अपार संशय घेतां । तयापाशीं पातली ॥ ५५ ॥
पातली परी बाळ पाहोन । भयें व्याप्त झालें मन ।
मग मृग बोलिले आरंबळोन । पळूं लागले मार्गातें ॥ ५६ ॥
तें पाहूनि जयसिंग भाटें । धांवोनि धरिली बाळकाची पाठ । 
पाठीं लागूनि धरुनि मनगट । उभा केला बाळ तो ॥ ५७ ॥
उभा धरुनि त्यातें बोलत । म्हणे बाळ सांडी भयातें ।
तूतें भेटवीन तव मातेतें । माता कोण ती सांग ॥ ५८ ॥
परी तें कुरंगभाषेकरुन । आरंबळतसे छंदेंकरुन २
नेत्रां लोटलें अपार जीवन । हांक मारी हरिणीतें ॥ ५९ ॥
परी ते हरिणी बाळ पाहून । कासावीस झाले पंचप्राण ।
परी मनुष्य भयेंकरुन । निकट येऊं शकेना ॥ ६० ॥
हरिणी आपुले ठायींच्या ठायीं । परम आरंबळे महीतें देहीं ।
येरीकडे मार्ग प्रवाहीं । भाट बोले बाळातें ॥ ६१ ॥
म्हणे वत्सा व्यर्थ कां रडसी । कोण मातापिता आहे तुजसी । 
सोडूनि गेलीं अरण्यासी । तरी भेटवूं तुज आतां ॥ ६२ ॥
परी कुरंगभाषेकरुन । ब्यां ब्यां करुनि करीत रुदन । 
मग भाट म्हणे हे वाचाहीन । मुखस्तंभ वाटतसे ॥ ६३ ॥
मग हस्तेखुणेनें पुसे त्यातें । परी खूणही तें नेणें परतें ।
मग जयसिंग म्हणे आपुले मनातें । परम अज्ञानी बाळक हे ॥ ६४ ॥
तरी आतां असो कैसें । यातें आपुल्या न्यावें वस्तीस । 
याची जननी भेटल्यास । हस्तगत यातें करुं ॥ ६५ ॥
ऐसा विचार करुनि मानसीं । उचलूनि घेतला स्वस्कंधासी ।
परी तें आरंबळोनि हरिणीसी । पाचारित अट्टाहासें ॥ ६६ ॥
परी ती कुरंगभाषा कांहीं । जयसिंगातें माहीत नाहीं ।
तैसें वाहूनि मार्गप्रवाहीं । घेऊन जात बाळका ॥ ६७ ॥
परी त्या बाळकासी घेऊनि जातां । अति आरंबळे हरिणी चित्ता ।
सव्यअपसव्य वेडा भंवता । घेऊनि हंबरडा मारीतसे ॥ ६८ ॥
बाळावरी ठेवूनी दृष्टी । धांव घेतसे पाठोपाठीं ।
ठायीं ठायीं महींतटीं । उभी राहूनि आरंबळे ॥ ६९ ॥
ऐसी हरिणी आरंबळत । दुरोनि त्यासी मार्ग गमत ।
परी तो जयसिंग पाहूनि मनांत । विचार करी आपुल्या ॥ ७० ॥
म्हणे हरिणी कवणे अर्थीं । हिडत आहे काननाप्रती ।
पाडस चुकार झालें निगुतीं । म्हणोनि हिंडे विपिनीं ही ॥ ७१ ॥
ऐसियेपरी चित्तीं भास । भासूनि गमन करीतसे मार्गास ।
गमन करितां स्वगृहास । वस्तीस जाऊनि पोहोंचला ॥ ७२ ॥
मग ती वस्ती पाहोनि हरिणी । विपीना गेली निराशपणीं ।
परी ठायीं उभी राहूनी । हंबरडा मारी आक्रोशें ॥ ७३ ॥
येरीकडे जयसिंग भाट । येतां ग्रामा झाला प्रविष्ट ।
बाळ ओपूनि कांते सुभट । वस्ती फिरुं पातला ॥ ७४ ॥
सकळ वस्तीस फेरी फिरुन । पुन्हां शिबिरा येत परतोन ।
ऐसें करिता मास तीन । लोटूनि गेले वस्तीसी ॥ ७५ ॥
परी तें बाळ आरंबळतां । भयानें राहिली सकळ व्यथा । 
मग थोडी थोडी संवय लागतां । विसर पडला हरिणीस ॥ ७६ ॥
तेचि नीतीं बाळा विसर । शनैक पडला कुरंगापर ।
भोजनपानादिक सारासार । कळों सविस्तर लागलें ॥ ७७ ॥
बोली चाली शनैःशनैक । प्रविष्ट जहालें तें बाळक ।
मग हाका मारी जननी जनक । भक्षावया मागतसे ॥ ७८ ॥
असो ऐसियापरी अलोट । ग्रामोग्रामीं हिंडे भाट । 
हिंडता हिंडता भागीरथीतट । काशीक्षेत्रीं पातला ॥ ७९ ॥
पातला परी विश्र्वेश्र्वरी । दर्शना जात देवालयांतरी । 
स्नान करुनि भागीरथीतीरी । बाळ घेऊनि गेला असे ॥ ८० ॥
विश्र्वेश्र्वराचे दर्शन करीत । तों लिंगांतूनि बोलला उमाकांत ।
यावें भर्तरीअवतारांत । दृश्य झाले तुम्हीं कीं ॥ ८१ ॥
ऐसें ऐकूनि नमस्कारितां । शब्दोदयीं झाला बोलता ।
त्याचे ते शब्द समजता । जयसिंगें ऐकिले ॥ ८२ ॥      
मग तो मनांत करी विचार । बाळ हे करितां नमस्कार । 
शिवलिंग बोले अति मधुर । भर्तरी ऐसें म्हणोनि ॥ ८३ ॥
तरी हा आहे कोण अवतारदक्ष । स्वर्गवासी आहे प्रत्यक्ष ।
परी प्रारब्धयोगें आम्हां सुलक्ष । प्राप्त झाला वाटतसे ॥ ८४ ॥
जैसा दरिद्रिया मांदुसघट । सहज चालता आदळे वाट ।
तेवीं आम्हां बाळ चोखट । प्राप्त झाले दैवयोगें  ॥ ८५ ॥
कीं चिंतातुरासी चिंतामणी । अवचट लाधला मार्गेंकरुनी ।
तेवीं मातें अवतारतरणी । प्राप्त झाला दैवानें ॥ ८६ ॥ 
कीं दुष्ट काळाची थोर रहाटी । प्राण अन्नाविण होतां कष्टी ।
तै सुरभी येऊनि कृपा होटी । थान आपुले ओपीतसे ॥ ८७ ॥
तन्न्यायें मातें झालें । निर्दैवा दैवें बाळ लाधलें ।
लाधले परी पुण्य पावलें । अवतारी दिसतो हा ॥ ८८ ॥
हें पुण्य तरी वर्णूं केवढें । जयासाठीं हा स्थूळवट दगड ।
हर्षें पावूनि संस्कारपाड । यावें भर्तरी म्हणतसे ॥ ८९ ॥
तरी आतां भर्तरी नाम । थोर पाचांरु वाचेकारण ।
ऐसी चित्तीं कल्पना योजून । पुन्हां शिबिरा पातले ॥ ९० ॥
पातले परी कांतेलागून । सर्व निवेदिलें वर्तमान ।
म्हणे हा पुत्र तुजकारण । अवतारदक्ष सांपडला ॥ ९१ ॥
परी हा अवतारदक्ष कैसा । म्हणशील तरी वो वाग्रसा ।
तरी शिव प्रत्यक्ष बोलिला ऐसा । यावें भर्तरी म्हणोनी ॥ ९२ ॥
अगे हा बाळ करितां नमन । ध्वनि हे निघाली लिंगांतून ।
ती म्यां ऐकिली आपुल्या कानें । म्हणोनि म्हणतों अवतार हा ॥ ९३ ॥
तरी आतां येथूनि यातें । भर्तरी ऐसें नाम निश्र्चित ।
पाचारुनि अंतर्भूत । पालन करीं बाळाचें ॥ ९४ ॥
ऐसें सांगूनि तो युवती । टाकूनि गेला फेरीप्रती । 
परी श्रोते चित्तीं कल्पना घेती । शिव कां बोलिला भर्तरी ॥ ९५ ॥
यावें भर्तरी ऐसें वचन । किमर्थ वदला उमारमण ।
तरी तो भर्तरींत पावला जन्म । म्हणोनि शिव बोलिला असे ॥ ९६ ॥
भर्तरीअवतार सघन । यावें भर्तरी ऐसें म्हणोन ।
तरी आतां ऐसें ऐका वचन । कथा पुढें परिसावी ॥ ९७ ॥
ऐसें जयसिंग रेणुकेसी । सांगूनि वर्तमान तियेसी ।
भर्तरी नाम आनंदेसी । पाचारीत उभयतां ॥ ९८ ॥
त्या उभयतांचे जठरांतरीं । संतति नसे संसारविहारीं ।
म्हणोनि स्नेहाची मोहित लहरी । बोलली असे तयातें ॥ ९९ ॥
रेणुका नित्य बैसवोनि अंकीं । चुंबन घेतसे लालनअंकीं ।
नाना पदार्थ मागितल्या कीं । आणूनि देती उभयतां ॥ १०० ॥
Shri Navanath BhaktiSar Adhyay 24  श्रीनवनाथभक्तिसार अध्याय चोविसावा (२४) 


Custom Search

Saturday, February 27, 2016

Shri Navanath BhaktiSar Adhyay 23 Part 2/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय तेवीसावा (२३) भाग २/२


Shri Navanath BhaktiSar Adhyay 23 
Machchhindra wanted to test his disciple Goraksha. Machchhindra had brought a gold brick from female kingdom with him. He while passing through a dense forest made a drama that he was very frighten that thieves may trouble them. He handed over his zoli to Goraksha. Goraksha found a gold brick in it and knew the reason why Machchhindra was talking about thieves. He took out the gold brick and threw into the deep dense grass. He asked Machchhindra why he was carrying a gold brick. Machchhindra told him that he was planning a bhandara that is offering food to Rushies, Munies and others. Goraksha with his Mantra vidya turned the mountain into gold. He fulfilled the wish of his guru of offering food to Rushies, Munies, Gods and many others. Thus he proved that he had neither feeling of selfishness nor any attachment towards worldly objects. In the next Adhyay 24 Dhundusut Malu will tell us a new story.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय तेवीसावा (२३) भाग २/२
नाना बैरागी संन्यासी । जपी तपी संतयोगियांसी ।
येथें आणोनि समाजेंसीं । अन्नदानें ऊत्साह करावा ॥ १०१ ॥
सुरवरगंधर्वगणसहित । देवदानवकिन्नरांसहित । 
मेळवोनि अपरिमित । आनंदउत्साह करावा ॥ १०२ ॥
ऐसें सांगतांचि चित्रसेनातें । मग चित्रसेन पाचारी गंधर्वांतें ।
एकशत गंधर्व महीवरते । प्रकट झाले येवोनि ॥ १०३ ॥
मग त्या गंधर्वांसी चित्रसेनें । सांगूनि सर्व वर्तमान । 
दाही दिशा प्रेरणा करुन । प्रज्ञावंत आणिले कीं ॥ १०४ ॥
जपी तपी योगशीळ । गुप्त प्रकट आणिले सकळ ।
नवनाथादि ऋषिमंडळ । येऊनियां पोहोचले ॥ १०५ ॥
शुक दत्तात्रेय याज्ञवल्की । वसिष्ठ वामदेव कपिल शेखी ।
व्यास पाराशर नारद ऋषी । वाल्मीक पाचारिले गंधर्वीं ॥ १०६ ॥
आठ्यायशीं सहस्त्र ऋषिभार । स्वर्गीहूनि उतरले देवकिन्नर ।
गणगंधर्वादि वसुलोक अपार । तपोलोक पातले ॥ १०७ ॥
त्यांतचि अष्टवसूंसहित । उपरिचर आला विमानव्यक्त ।
तेणे येतांचि मच्छिंद्रास वृत्तांत । कीलोतळेचा सांगितला ॥ १०८ ॥
कीं सोडून स्त्रीदेश अवनी । सिंहलद्वीपा गेली मैनाकिनी ।
परी तुमच्या वियोगेंकरुनी । क्षीणशरीर झालीसे ॥ १०९ ॥
तरी असो कैसें तें । भेटेल तुम्हां ईश्र्वरसत्ते । 
परी योगक्षेम स्वशरीरातें । आहांत कीं त्रिवर्ग ॥ ११० ॥
मच्छिंद्र म्हणे अहो जी ताता । तव कृपेची दृष्टी असतां ।
सदा मिरवूं सर्व क्षेमता । पदोपदीं अर्थातें ॥ १११ ॥
ऐसें वदतां उभय जाण । तों देवांसह उतरला पाकशासन ।
ब्रह्मा विष्णु रुद्रादि पूर्ण । महीलागीं उतरले ॥ ११२ ॥
श्रीनाथासी भेटोनि सकळ । मग ठाईं ठाईं सर्व मंडळ ।
विराजूनि वार्ता सकळ । ठाईं ठाईं करिताती ॥ ११३ ॥                                 
येरीकडे गोरक्षनाथें । पाचारुनि मच्छिंद्रातें ।
म्हणे समुदाय अपरिमित । मिळाला कीं महाराजा ॥ ११४ ॥        
तरी तुमची कनकवीट । आणोनि देतों सुभट ।
तितुक्यांत अर्थ सारोनि सुभट । बोलवावें समस्तातें ॥ ११५ ॥
यावरी बोले मच्छिंद्रनाथ । काय करुं ही कनकवीट ।
तुजएवढा शिष्यवर्गांत । असतां चिंता नसे मज ॥ ११६ ॥
ऐसें बोलतां मच्छिंद्रनाथ । गदगदा हांसे गोरक्षसुत ।
म्हणे महाराजा प्रतापवंत । सकळ तुम्ही प्रकटलां ॥ ११७ ॥
ऐसें बोलोनि वागुत्तरीं । माथा ठेवी चरणांवरी । 
म्हणे महाराजा स्वशरीरीं । स्वस्थ आपण असावें ॥ ११८ ॥
अष्टसिद्धी अणिमा गरिमा । प्राप्ति प्राकाम्य आणि महिमा ।
वशित्व ईशित्व आठवी प्रतिमा । सिद्धींलागीं पाचारा ॥ ११९ ॥
पाचारिल्या अष्टजणी । येवोनि लागल्या गोरक्षचरणीं ।
म्हणती आज्ञा करा स्वामी । कामनेसह अर्थांतें ॥ १२० ॥
येरु म्हणे वो प्रियभामिनी । तृप्त करावें मंडळीलागुनी ।
षड्रसान्नरुचीकरोनी । संतुष्ट सर्व करावे ॥१२१ ॥     
मग तेथ अवश्य म्हणोनि सिद्धी । वेंचित्या झाल्या आपुल्या बुद्धी ।
अन्न निर्मिलें पर्वतमांदी । षड्रसादि पक्कान्नें ॥ १२२ ॥
ऐशा सिद्धी योजिल्या कामा । याचिपरी सडासंमार्जन आरामा ।
सप्तही संख्या नेमूनि उत्तमा । मही पवित्र करीतसे ॥ १२३ ॥
तरी त्या सप्तही सटव्या कोण । ऐका तयांचीं नामाभिधानें ।
आणि तयांतें काय कामानें । निरोपिलें विधीनें ॥ १२४ ॥
तरी त्या उत्पत्तिस्थानीं जन्मकाळा । जावोनि लक्षावें यांनीं बाळा ।
विधिअक्षरें लिहिलीं भाळा । वाचूनि सटव्या पाहती ॥ १२५ ॥     
जरी सप्त सटव्या मानवासी । शोभा न मिरवे असुरप्रदेशीं ।
रानसटवी वनचरांसी । विलोकूनि जातसे ॥ १२६ ॥
वृषभ अश्र्व गांवाचे पशु । घोडसटवी आहे त्यांस ।
वासतसटवी खेचरांस । पक्षीकुळा मिरवतसे ॥ १२७ ॥
अंबुधासटवी जलचरांत । सबुधासटवी उदधी जात ।
ऐसिया कामीं सटव्या सात । कमलोद्भवें लाविल्या ॥ १२८ ॥
त्या सातही परिचारिका । सडासंमार्जन करिती निका ।
यापरी वाढणें आनंददोदिका । जळदेवता आराधिल्या ॥ १२९ ॥
कुमारी धनदा नंदा विमळा । लक्ष्मी विख्याता प्रबळ ज्ञानमंगळा ।
नववी समर्थ देवता बाळा । ह्या नवही वाढिती सकळांते ॥ १३० ॥
गंधर्वें करावें पाचारणें । समाचार घ्यावा अष्टवसुनें ।
चौकी द्यावी भैरवानें । अष्टदिशा अष्टांनी ॥ १३१ ॥
उपरिचरवसूनें करपल्लवीं । सकळांसी दक्षिणा द्यावी ।
मच्छिंद्र करीत आघवी । प्रदक्षिणा भावार्थें ॥ १३२ ॥
चित्रसेन गंधर्वपती । तांबूल देतसे सर्वांप्रती ।
आणि तीर्थ जे भागीरथी । तोय वाढी सर्वांतें ॥ १३३ ॥
यापरी अष्टोत्तरशत तीर्थ । पाणी वाहती समर्थ ।
आणि उचलणें उच्छिष्टपात्रांते । ऐशी कामें करिताती ॥ १३४ ॥
महानुभाव जो उमापती । अति आदरें स्वपंक्ती ।
अप्सरा किन्नर गायन करिती । नारदादि येवोनियां ॥ १३५ ॥
ऐसे नेम नेमूनि कामा । दिधलें ऐसें कार्यउगमा ।
आनंदोत्साह होतां सुकर्मा । सर्वानंद हेलावे ॥ १३६ ॥
ऐसी होतां आनंदस्थिती । परी गहनी आठवला गोरक्षचित्तीं ।
मग येवोनियां मच्छिंद्राप्रती । बोलता झाला प्राज्ञिक ॥ १३७ ॥
हे महाराजा गुरुनाथा । प्राणिमात्र आले समर्था ।
परी कर्दमपुतळा गहिनीनाथा । येथें आणावा वाटतें ॥ १३८ ॥
ऐसें मोहक ऐकोनि वचन । म्हणे गंधर्वा पाठवोन ।
कोंतिगेसहित मधुब्राह्मण । बाळासह आणावा ॥ १३९ ॥
मग चित्रसेना सांगोनि वृत्तांत । पत्र लिहिलें मधुविप्रातें ।
सुलोचन गंधर्वाचे ओपूनि हस्तें । कनकगिरीशी पाठविला ॥ १४० ॥
गंधर्व जावोनि कनकगिरीसी । भेटोनि कोंतिगे मधुविप्रासी ।
मग आनंदोत्सव वृत्तांतासी । निवेदिलें सकळ तेथ ॥ १४१ ॥
मग पत्र देवोनि त्याहातीं । वाचूनि पाहे विप्रमूर्ती ।
पाचारण ही मजकुरशक्ती । ध्यानालागीं संचरली ॥ १४२ ॥
मग बाळासह सपरिवार । येता झाला मधुविप्र ।
मुक्कामोमुक्काम महीवर । साधूनियां पोंचला ॥ १४३ ॥
सप्तवर्षीं गहिनीनाथा । आणुनि लोटला पदावरुता ।
मच्छिंद्र अंकी घेवोनि त्यातें । प्रेमें चुंबन घेतसे ॥ १४४ ॥
अति स्नेहानें करोनि लालन । म्हणे अवतारी करभंजन ।
गैबी जन्मला गहिनीनाम । सकळांलागीं दिठावी ॥ १४५ ॥
ऐसिये स्नेहाचापरम अवसर । पाहोनि बोलता झाला शंकर ।
कीं आम्हांलागी पुढें अवतार । घेणें आहे मच्छिंद्रा ॥ १४६ ॥
तरी त्या अवतरणीं नेमस्ती । मही मिरवे नामांप्रती ।
तरी त्या अनुग्रहाचे स्थितीं । गहिनीनाथ चदविला ॥ १४७ ॥
तरी यातें विद्या अभ्यासून । सकळ अधिकारी करावा पूर्ण ।
मी अनुग्रह याचा घेईन । पुढिले ते अवतारीं ॥ १४८ ॥
ऐसें सांगतां शिव त्यास । मग बोलावूनि गोरक्षास ।
प्रत्यक्ष अनुग्रह गहिनीनाथास । गोरक्षापासोनि देवविला ॥ १४९ ॥
सर्व देवांचे साक्षीसहित । मौळी ठेविला वरदहस्त ।
ब्रह्मपरायण गहिनीनाथ । जाहला सत्य परियेसा ॥ १५० ॥
अनुग्रहउत्साह मंडळीस । एक मास उभवला आनंद द्रुम ।
मग कुबेरा पाचारुनि नेम । सांगता झाला गोरक्ष ॥ १५१ ॥
म्हणे हा कनकगिरी जा घेवोन । आम्हां देई अपार भूषण ।
सकळ मंडळी गौरवोन । पाठविणें स्वस्थाना ॥ १५२ ॥
मग तो कुबेर बोले वचन । येथेंचि असो द्यावें धन ।
मी लागेल तैसें इच्छेसमान । भूषणांते आणितों ॥ १५३ ॥
मग अपार दिंडें वस्त्रें आणोन । महत्त्वासारखें दिधलें वांटोन ।
द्रव्यादि देवोनि याचकजन । तोषविले सकळ ॥ १५४ ॥
सकळ तोषले पावोनि मान । पावती आपुलें स्वस्थान ।
परी मच्छिंद्र तेथें राहोन । अभ्यासिती गहिनीतें ॥ १५५ ॥
उपरी गंधर्व मच्छिंद्रपिता । तो आपुले स्वस्थाना जातां ।
त्यासवें देऊनि मीननाथा । सिंहलद्वीपीं पाठविले ॥ १५६ ॥
उपरिचरवसुनें मीननाथ । केला कीलोतळेच्या हस्तगत ।
मच्छिंद्राचा सकळ वृत्तांत । निवेदिला तियेसी ॥ १५७ ॥
कीलोतळेनें ऐकोनि वृत्तांत । नेत्रीं आणिले अश्रुपात ।
म्हणे आतां मातें मच्छिंद्रनाथ । कैसा भेटेल कळेना ॥ १५८ ॥
उपरिचर बोले वो शुभाननी । चिंता न करीं कांहीं मनीं ।
एक वेळा मच्छिंद्रमुनी । निजदृष्टीं पाहसील ॥ १५९ ॥
ऐसें म्हणोनि उपरिचर गेला । येरीकडे कीलोतळा ।
हृदयीं कवळोनि मीननाथबाळा । प्रेमें चुंबन घेतसे ॥ १६० ॥
म्हणे बाळा माझिये खंती । होतसे कीं तुजप्रती ।
सोडूनि आलासी नाथ निगुती । श्रीमच्छिंद्र पितयातें ॥ १६१ ॥
ऐसें बोलूनि मीननाथातें । वारंवार चुंबन घेत । 
येरीकडे गर्भाद्रीतें गहिनी विद्या अभ्यासी ॥ १६२ ॥
तये वेळेसी कोण कोण तेथें । राहिले होते ऐका नाथ ।
विचार करोनि उमाकांत । गर्भाद्रीतें राहिले ॥ १६३ ॥
अदृश्य अस्त्र नगीं प्रेरुन । स्वस्थाना गेला कुबेर निघोन ।
तेणें नग तो कनकवर्ण । झांकोळून पैं गेला ॥ १६४ ॥  
परी गर्भाद्रिपर्वतांत । वस्ती राहिला उमाकांत ।
तो अद्यापि आहे स्वस्थानांत । म्हातारदेव म्हणती त्या ॥ १६५ ॥
तयाचिया पश्र्चिम दिशेसी । कानिफा राहिला शिष्यकटकेंसीं ।
वस्ती करोनि नाम या ग्रामासी । मढी ऐसें ठेविलें ॥ १६६ ॥
तयाचे दक्षिण पर्वतीं । राहता झाला मच्छिंद्रजती ।
त्याहूनि पूर्वेस महीपर्वतीं । जालिंदर राहिला ॥ १६७ ॥
आणि त्या पर्वतापैलदेशीं । नागनाथ राहिला वडवानळेंशीं ।
आणि रेवणसिद्ध तया महीसी । विटेग्रामीं राहिला ॥ १६८ ॥
वामतीर्थ गर्भाद्रिपर्वतीं । राहता झाला गोरक्षजती ।
सेवेसी शिष्य ठेवोनि सप्ती । विद्या सांगे गहिनीतें ॥ १६९ ॥
एक वर्षपर्यंत । अभ्यासिला गहिनीनाथ । 
सकळ विद्येचें स्वसामर्थ्य । तया देहीं सांठविलें ॥ १७० ॥  
परी कोतीगांवीं मधुब्राह्मण । गेले होते गहिनीस ठेवोन ।
ते जालिंदरासमीप दिशेकारण । वस्तीलागीं विराजले ॥ १७१ ॥
विराजिले परी गहिनीनाथ । अभ्यासिते झाले पात्रभरित ।
मग गोरक्षें बोळवोनि त्यातें । विप्रापाशीं पाठविला ॥ १७२ ॥
यावरी त्या वस्तीस । वसते झाले बहुत दिवस । 
शके दहाशें वर्षास । समाधी त्यांनीं घेतल्या ॥ १७३ ॥
घेतल्या परी यवनधर्म । कबरव्यक्त झाले आश्रम ।
पुढें औरंगजेब तें पाहून । पुसता झाला लोकांसी ॥ १७४ ॥
ह्या कोणाच्या असती कबरी । ते म्हणती तव पूर्वजांच्या साचारीं ।
मठींत कान्होबापर्वतीं मच्छेंद्र । आवडतें स्थान त्यांचे तें ॥ १७५ ॥
त्याहूनि पूर्वेसी जालिंदर । विराजली त्याची कबर ।
त्याहूनि खालता वल्ली थोर । गहिनीनाथ नांदतसे ॥ १७६ ॥
मग तेणें ऐकोनि ऐसी मात । पालटिलें त्या नांवातें ।
जानपीर जालिंदरातें । ठेविलें असे राजानें ॥ १७७ ॥
गहिनीनाथासी गैबी पीर । नाम ठेविलें तेवीं साचार ।
महजदी बांधोनि पुजारे । ठाईं ठाई स्थापिले ॥ १७८ ॥
मच्छिंद्र आणि कानिफाचें । नामाभिधान बदलूनि साचें ।
मायाबा कान्होबा बोलोनि साचें । यवन पुजारी स्थापिले ॥ १७९ ॥
कल्याण कलबुर्गी बाबाचैतन्य । राजबागशर नाम ठेविलें त्यानें ।
म्हणाल केलें यवनकारण । ऐसें विपरीत त्या रायें ॥ १८० ॥
परी समाधी पाहिल्या कबरीऐशा । म्हणोनि त्यातें पडला भास ।
कीं हे पीर असतील यवनकुळींचे । म्हणोनि प्रविष्ट करावें ॥ १८१ ॥
म्हणोनि ऐसें कृत्य घडलें । यापरी ऐकोनि श्रोता बोले ।
कीं कबरयुक्त नाथ केले भले । काय म्हणोनि झालेती ॥ १८२ ॥
तरी ते अंतरसाक्ष नाथ । यवन राजे होतील महीतें ।
ते छळतील हिंदुदेवांतें । म्हणोनि कबरी बांधल्या ॥ १८३ ॥
परी हें असो आतां कथन । मध्यें कथा असती दैदीप्यमान ।
नाथांनी योजूनि आपुलालें स्थान । ठाई ठाईं राहिले ॥ १८४ ॥
गोरक्ष सटव्या ठेवोनि रक्षण । निघता झाला तीर्थाकारण ।
त्या सटव्या तेथें अद्यापि राहून । रक्षिताती स्थानासी ॥ १८५ ॥
यापरी पुढें गोरक्षनाथ । भेटेल जाऊनि भर्तरीतें । 
ती कथा पुढें रसाळभरित । श्रोतिये श्रवणीं स्वीकारा ॥ १८६ ॥
नरहरिंवंशीं धुंडीकुमर । कवि मालू असे संतकिंकर । 
कथा सांगेल भक्तिसार । भर्तरीचें आख्यान ॥ १८७ ॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ।
सदा परिसोत भाविक चतुर । त्रयोविंशाध्याय गोड हा ॥ १८८ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ 
॥ श्रीनवनाथभक्तिसार त्रयोविंशाध्याय संपूर्ण ॥

Shri Navanath BhaktiSar Adhyay 23 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय तेवीसावा (२३)

Custom Search